बरखा दत्त यांचा कॉलम:शाळांमध्ये मुलांना चिडवणे किती ‎मुलांचे आयुष्य उद्ध्वस्त करणार?‎

‎‎‎‎‎‎‎‎एका नामांकित खासगी शाळेत नऊ वर्षांच्या एका‎चिमुरडीने सततचे चिडवणे आणि उपेक्षेला कंटाळून‎आत्महत्या केली. मात्र, या घटनेला आठ महिने उलटून‎गेल्यानंतरही प्राचार्या, वर्गशिक्षक किंवा व्यवस्थापनावर‎कोणतीही अंतर्गत कारवाई झालेली नाही. पोलिसांची‎कारवाईही संथ गतीने सुरू असून आतापर्यंत कुणालाही‎अटक करण्यात आलेली नाही. जयपूरमधील अमायराच्या‎मृत्यूची ही घटना आपल्याकडून संताप आणि आक्रोशाची‎अपेक्षा करते. अमायराचे आई-वडील शिवानी आणि‎विजय मीना यांचा असा आरोप आहे की, शाळेचे‎व्यवस्थापन प्रभावशाली आणि राजकीय वरदहस्त‎असलेले असल्यामुळे पोलिस या प्रकरणात मवाळ‎भूमिका घेत आहेत. पोलिसांचा प्रयत्न त्यांच्याच मुलीवर‎खापर फोडण्याचा होता, असे त्यांचे म्हणणे आहे. एका ‎‎पोलिस अधिकाऱ्याने तर चक्क अमायरा ही भ्रमित होती, ‎‎असेही म्हटले. परंतु, सीसीटीव्ही फुटेज मात्र यापेक्षा‎पूर्णपणे वेगळेच चित्र समोर आणते. पहिले सीसीटीव्ही‎फुटेज नोव्हेंबर 2025 मध्ये समोर आले होते, जेव्हा‎अमायराने शाळेच्या इमारतीवरून चौथ्या मजल्यावरून‎उडी मारून आपला जीव दिला होता. या अपघातापूर्वी‎अमायरा कित्येक महिन्यांपासून शाळेत तिची छेड काढली‎जात असल्याची तक्रार करत होती. तिने एकदा थेट‎मुख्याध्यापकांकडेही याची तक्रार केली होती. आता या‎घटनेच्या काही महिन्यांनंतर, तिच्या कुटुंबीयांनी आठ‎मिनिटांचे एक नवीन सीसीटीव्ही फुटेज जाहीर केले आहे.‎हे फुटेज अमायराच्या मृत्यूच्या आधीच्या शेवटच्या काही‎मिनिटांचे अत्यंत गंभीर चित्र समोर आणते. या फुटेजमध्ये‎एक विद्यार्थी डिजिटल पाटी काढून ती अमायराला‎दाखवताना दिसत आहे. इतर विद्यार्थीही तिला‎चिडवण्यात सामील होतात. तिला जे दाखवण्यात आले,‎त्यात लैंगिक संकेत होते, असे अमायराच्या आईचे मानणे‎आहे. अमायरा तिच्या शिक्षिकेकडे एकदा नव्हे तर पाच‎वेळा जाते, पण प्रत्येक वेळी तिच्या बोलण्याकडे दुर्लक्ष‎केले जाते. एका प्रसंगात तर शिक्षिका तिची मदत‎करण्याऐवजी उलट तिलाच रागावताना दिसत आहे.‎फुटेजमध्ये ती मुलगी हात जोडून उभी आहे. ती आपले‎तोंडही झाकताना दिसत आहे, जे ती अत्यंत मानसिक‎तणावात आणि दुःखात असल्याचे दर्शवते. ज्या‎विद्यार्थिनीने आपल्या वर्गमित्रांच्या वर्तनाची वारंवार तक्रार‎केली होती, तिच्यावर शिक्षक विशेष लक्ष ठेवतील, अशी‎किमान अपेक्षा तरी तुम्ही करू शकता. पण त्याऐवजी, ती‎मुलगी कुणाच्याही देखरेखीशिवाय वर्गाबाहेर निघून जाते.‎जेव्हा ती एकटी पायऱ्या चढते, तेव्हा ती मुलगी कुठे जात‎आहे आणि का, असा प्रश्न कुणाच्याही मनात येत नाही.‎उंचीची भीती वाटणारी ती मुलगी इमारतीवर जाऊन बसते‎आणि सुमारे 48 फूट खाली उडी मारते. एवढे महिने‎उलटून गेल्यानंतरही अनेक महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरे‎मिळालेली नाहीत. जसे की, त्या डिजिटल पाटीवर नक्की‎काय होते? शिक्षिकेने हस्तक्षेप का केला नाही? ती मुलगी‎एकटीच बाहेर कशी गेली? ती कुणाच्याही‎देखरेखीशिवाय शाळेच्या कॉरिडॉरमध्ये (सज्जा)‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎एकटीच कशी फिरत राहिली? सीबीएसईच्या सत्यशोधक‎समितीने म्हटले होते की, अमायराचा मृत्यू टाळता आला‎असता आणि शाळा योग्य वेळी हस्तक्षेप करण्यात‎अपयशी ठरली. समितीला असेही आढळले की, मुलगी‎ज्या ठिकाणी पडली ती जागा फॉरेन्सिक पुराव्यांसाठी‎महत्त्वाची असतानाही, शाळेने घाईघाईने ती जागा स्वच्छ‎करून घेतली. या प्रकरणाचा तपास करणारे 3 अधिकारीही‎आतापर्यंत बदलण्यात आले आहेत. शिवानी आणि विजय‎यांनी मला सांगितले की, न्यायाची ही लढाई सुरू‎केल्यापासून एक तर त्यांच्याच मुलीला दोषी ठरवले जात‎आहे किंवा मग त्यांना. शिवानी या नोकरी करणाऱ्या आई‎होत्या आणि त्यांनी आपल्या मुलीकडे दुर्लक्ष केले, असा‎आरोपही त्यांच्यावर ठेवण्यात आला. अमायराचा हा‎दुःखद मृत्यू म्हणजे छळ, संवेदनहीनता आणि संस्थात्मक‎पातळीवर पद्धतशीरपणे केलेली लपवाछपवी याची एक‎कहाणी आहे. उद्या तिच्या जागी तुमचीही मुलगी असू‎शकते! (हे लेखिकेचे वैयक्तिक मत आहे.)‎ कुणाच्याही मनात हा प्रश्न आला नाही की‎ती मुलगी वर्गाबाहेर कुठे व का जात‎आहे? उंचीची भीती वाटणारी ती चिमुरडी‎48 फूट उंचावरून खाली उडी मारते. त्या‎डिजिटल पाटीवर असे काय होते?‎

This post was originally published on this site.



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *