ईडी आणि इतर तपास संस्था निवडणुकीपूर्वीच विरोधीपक्षांना लक्ष्य करतात का? प्रथमत: या प्रश्नावर ईडीचा -आणि भाजपचा युक्तिवाद - सैद्धांतिकदृष्ट्या योग्यवाटतो : भ्रष्टाचाराच्या प्रकरणांतील कारवाईनिवडणुकीच्या टप्प्यांद्वारे निश्चित केली जाऊ शकतनाही. गैरकृत्ये समोर येत असतील तर राजकीयकॅलेंडरची पर्वा न करता तपास केला पाहिजे. कोणाच्याहीसोयीसाठी त्यांना थांबवू नये.
पण, हा केवळ योगायोग आहे का की निवडणुकीपूर्वीविरोधी पक्षांना सातत्याने लक्ष्य केले जाते. केंद्रातीलसत्ताधारी पक्षाला अशा तपासांना सामोरे जावे लागतनाही? संविधानाने असे आदेश दिले आहेत की तपाससंस्थांनी भीती किंवा पक्षपात न करता काम करावे. त्यांनी राजकीय फायदा घेण्याऐवजी त्यांची कर्तव्ये पारपाडावीत. तरीसुद्धा गेल्या दशकातील राजकीय कथेचा बारकाईने विचार केल्यास ईडी आणि सीबीआयन्यायाच्या साधनांपेक्षा राजकारणाचे साधन म्हणून अधिक काम करत आहेत या विश्वासाला बळकटी मिळते. राजकारणात सार्वजनिक धारणा ही लोकशाही स्पर्धा अवलंबून असलेल्या वर्तन, विश्वास आणि निष्पक्षतेला आकार देते. लाखो मतदारांना निवडणूक क्षेत्रातअसमानता जाणवू लागते तेव्हा निकालांची वैधता आणिलोकशाही जाणीव दोन्ही धोक्यात येतात. म्हणूनच केंद्रीयसंस्थांकडून पक्षपातीपणाची धारणा केवळ तक्रार म्हणूनपाहू नये; ती लोकशाहीमध्ये समान सहभागाच्या भावनेतरुजलेली आहे. पश्चिम बंगाल निवडणुकीपूर्वीतृणमूलच्या राजकीय सल्लागार कंपनी-आय-पीएसीवरील छाप्यामुळे ही धारणा आणखी बळकटझाली. सध्या हा खटला न्यायालयात सुरू आहे. राज्यआणि केंद्राच्या निवडणुकांमध्ये ‘आप’ला देखील ईडीआणि सीबीआयच्या अशाच कारवाईचा सामना करावालागला होता. २०२१ च्या तामिळनाडू विधानसभानिवडणुकीदरम्यान द्रमुक प्रमुख एमके स्टॅलिन यांच्याकुटुंबातील सदस्यांवर आयकर छापे टाकण्यात आले होतेआणि ईडीने अनेक मंत्र्यांचीही चौकशी केली होती. गेल्यादशकातील अशा कृतींना निवडणूक परिदृश्यातून वेगळेकरून पाहणे कठीण आहे. हे तपास संस्था राजकीयपोकळीत काम करत नाहीत. विशेषतः निवडणुकीदरम्यानते प्रमुख नेत्यांविरुद्ध - जाणूनबुजून किंवा चुकून -कारवाई करतात तेव्हा त्याचे राजकीय परिणामअपरिहार्यपणे होतात. २०१४ पासून उपलब्ध असलेल्याडेटाच्या विश्लेषणातून असे दिसून येते की सीबीआयआणि ईडीने दाखल केलेली सुमारे ९५% प्रकरणे विरोधीनेत्यांविरुद्ध आहेत. ईडीच्या छाप्यांमध्येही लक्षणीय वाढझाली आहे. २०१४ पर्यंतच्या दशकात ईडीच्या छाप्यांचीसंख्या शंभरच्या आसपास होती. ती नंतरच्या दशकातहजारोंवर पोहोचली. आणि सध्याच्या केंद्रीयमंत्रिमंडळातील ७२ मंत्र्यांपैकी २९ मंत्र्यांवर (जवळपास४०%) गुन्हेगारी खटले दाखल आहेत हे असूनही असेघडते. ही माहिती मंत्र्यांनी स्वतः निवडणूक आयोगालादिलेल्या त्यांच्या प्रतिज्ञापत्रात दिली आहे. त्यात हत्या,खून करण्याचा प्रयत्न, अपहरण, चोरी आणि फसवणूकयासारख्या आरोपांचा समावेश आहे. या प्रकरणांचीचौकशी देखील त्याच कठोरतेने आणि वेगाने झाली आहेका? राजकीयदृष्ट्या एका पक्षावर हा पद्धतशीर दबाव हेतूसिद्ध करत नसला तरी तो असमानतेची धारणा निश्चितचबळकट करतो. व्यवस्थेत संस्थांवर विश्वास आधीचकमी आहे. तिथे लोकशाही स्पर्धेच्या निष्पक्षतेबद्दल गंभीरशंका निर्माण होतात. लक्षात घ्या की आपण येथेआरोपांच्या गुणवत्तेवर चर्चा करत नाहीत; त्यासाठीचौकशी आवश्यक आहे. परंतु कोणत्याही लोकशाहीमध्येएक पक्ष निवडणूक प्रचारादरम्यानही संस्थात्मकतटस्थतेचा पूर्ण फायदा घेत असेल आणि दुसरा पक्षसतत तपासणीला सामोरे जात असेल तर समान संधीचीभावना कमकुवत होते. केंद्रीय संस्थांच्या गैरवापराचेआरोप हे केवळ वैयक्तिक बाबी नाहीत; तर तोविश्वासाचा प्रश्न आहे. हा विश्वास तुटतो तेव्हा त्याचादबाव संपूर्ण लोकशाही व्यवस्थेवर जाणवतो.
मतदारांना असे वाटू लागते कीनिवडणुकीचे मैदान समतुल्य नाही, तेव्हानिकालांची वैधता आणि लोकशाहीजाणीव दोन्ही धोक्यात येतात. म्हणून,केंद्रीय संस्थांकडून पक्षपातीपणाच्याधारणेकडे तक्रार म्हणून पाहिले जाऊ नये.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- सावध राहा! सोलापुरातील 'या' १५ शाळा आहेत बेकायदेशीर; विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्यासाठी शिक्षणाधिकाऱ्यांचे पालकांना आवाहन!
- नोकरीच्या बाजारात आता पदवीपेक्षा कौशल्याला भाव; मॅनपॉवरग्रुपच्या सर्वेक्षणातून धक्कादायक वास्तव समोर!
- AI मुळे जागतिक बाजारात मोठी उलथापालथ; टॉप १० मधून रिलायन्स, एचडीएफसी बाहेर, भारतीय कंपन्यांचे रँकिंग घसरले!
- आजीचा मोठा विजय! सांभाळ करण्याच्या अटीवर नातवाच्या नावे केलेली ७.५ एकर जमीन आजीने पुन्हा स्वतःच्या नावे केली
महाराष्ट्र
- AI मुळे जागतिक बाजारात मोठी उलथापालथ; टॉप १० मधून रिलायन्स, एचडीएफसी बाहेर, भारतीय कंपन्यांचे रँकिंग घसरले!
- आजीचा मोठा विजय! सांभाळ करण्याच्या अटीवर नातवाच्या नावे केलेली ७.५ एकर जमीन आजीने पुन्हा स्वतःच्या नावे केली
- उत्तर प्रदेशच्या विद्यार्थिनींसाठी आनंदाची बातमी! 'राणी लक्ष्मीबाई योजने'अंतर्गत ५० हजार मेधावी मुलींना मिळणार मोफत स्कूटी
- शिवनेरी पायथ्याशी शिवराज्याभिषेकाचा अभूतपूर्व जल्लोष! २६ लाखांच्या हायड्रोलिक लिफ्टचे उद्घाटन; जुन्नरमध्ये 'बिबट सफारी' प्रकल्पाला मंजुरीची घोषणा!
गुन्हा
- पुणे: बंडू आंदेकर टोळीतील सराईत गुंडाला बेड्या; आठ महिन्यांपासून पोलिसांना गुंगारा देणारा ओम नगरकर गजाआड
- पिंपरी-चिंचवड: बनावट 'आरटीआय' कार्यकर्त्यांचा पर्दाफाश: पीएमआरडीए (PMRDA) अधिकाऱ्यांना धमकावून खंडणी उकळणाऱ्या टोळीला अटक!
- उत्तर प्रदेश: शामली धर्मांतर अमली पदार्थ तस्कराचा मुलगा 'आयुष' पाकिस्तानी धर्मप्रसारकांच्या भाषणांचा होता चाहता!
- झारखंड: गर्लफ्रेंडसाठी पोटच्या ३ चिमुरड्या मुलींचा झोपेतच गळा चिरला; निर्घृण तिहेरी हत्याकांडाने देश हादरला
राजकीय
- कोल्हापुरात 'शक्तीपीठ महामार्गा'वरून राजकीय ठिणगी; सतेज पाटील आणि राजेश क्षीरसागर आमनेसामने!
- तृणमूल काँग्रेसमध्ये राजकीय भूकंप; २० खासदार 'नॉट रिचेबल', गुप्त बैठका आणि संभाव्य फुटीच्या चर्चांनी ममता बॅनर्जींची चिंता वाढली.
- पंजाब भाजपमध्ये मोठी खळबळ; प्रदेशाध्यक्षपदी के.एस. ढिल्लों यांच्या नियुक्तीनंतर सरचिटणीस डॉ. जगमोहन सिंग राजू यांचा राजीनामा.
- ममता बॅनर्जींना दिल्लीत मोठा धक्का; तृणमूलच्या दोन राज्यसभा खासदारांचा तडकाफडकी राजीनामा.
इतर
- आजचे राशीभविष्य: मंगळाच्या कृपेने या राशींना होणार धनलाभ, मालमत्ता खरेदीचे योग!
- एसटीचा प्रवास आता अधिक हायटेक! सवलतीसाठी 'एनसीएमसी' स्मार्ट कार्ड अनिवार्य, तर बसस्थानकांच्या २०० मीटर परिसरात अवैध वाहतुकीवर बंदी!
- रोज सकाळी जिरे पाणी पिणे आरोग्यासाठी फायदेशीर की अपायकारक? डॉक्टरांनी सांगितली सत्यता.
- ८ जून २०२६ रोजी कोणत्या राशींवर होणार धनवर्षाव? जाणून घ्या तुमचे भविष्य!
मनोरंजन
- टीम इंडिया मुल्लांपूरमध्ये दाखल: अफगाणिस्तानविरुद्धच्या कसोटी सामन्याची तयारी, गिलच्या सहभागावर प्रश्नचिन्ह!
- आयपीएल फायनल नंतर गुजरात टायटन्सला मोठा धक्का! टीम बसमध्ये शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग; शुभमन गिलसह सर्व खेळाडू सुखरूप!
- अभिनेत्री यमुना हिच्या आयुष्यातील चढ-उतार आणि संघर्षाची कहाणी.
- "आरारारा खतरनाक…": 'मुळशी पॅटर्न २'ची घोषणा! हक्काच्या घराच्या संघर्षावर आधारित असेल नवा चित्रपट.
देश विदेश
- नोकरीच्या बाजारात आता पदवीपेक्षा कौशल्याला भाव; मॅनपॉवरग्रुपच्या सर्वेक्षणातून धक्कादायक वास्तव समोर!
- रेल्वे: ४० वर्षे जुनी प्रणाली होणार कालबाह्य, ऑगस्टपासून एआय (AI) आधारित अत्याधुनिक प्रणालीची सुरुवात!
- उत्तर प्रदेश: शामली धर्मांतर अमली पदार्थ तस्कराचा मुलगा 'आयुष' पाकिस्तानी धर्मप्रसारकांच्या भाषणांचा होता चाहता!
- झारखंड: गर्लफ्रेंडसाठी पोटच्या ३ चिमुरड्या मुलींचा झोपेतच गळा चिरला; निर्घृण तिहेरी हत्याकांडाने देश हादरला



























Subscribe to my channel
