Rohit Shetty House Firing : प्रसिद्ध दिग्दर्शक रोहित शेट्टीच्या मुंबई येथील जुहू बंगल्यावर फायरिंगची घटना काही दिवसांपूर्वी घडली होती. या प्रकरणी काही लोकांना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. आरोपींची कसून चौकशी करण्यात येत आहे. आतापर्यंतच्या चौकशीतून फायरिंग करणाऱ्यांचे थेट कनेक्शन बिश्नोई गँगपर्यंत असल्याचे समोर आले आहे. प्रसिद्ध अभिनेता सलमान खान याच्या घरावरदेखील गोळीबार प्रकरणात बिश्नोई गँगचेच कनेक्शन समोर आले होते. दरम्यान, आता केलेल्या नव्या तपासातून या प्रकरणात अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. या माहितीमुळे बिश्नोई गँग तरुणांना कसे गुन्हेगारीकडे वळवते याचे धक्कादायक उदाहरणच समोर आले आहे.
नेमकी काय माहिती समोर आली आहे?
रोहित शेट्टी यांच्या घरावर झालेल्या गोळीबार प्रकरणात तपासादरम्यान काही महत्त्वाची माहिती समोर आली आहे. शुभम लोनकर व्यतिरिक्त आरजू बिश्नोई हा देखील अटक करण्यात आलेल्या आरोपींच्या संपर्कात असल्याची माहिती पोलिस तपासात पुढे आली आहे. या प्रकरणात आरजू बिश्नोई आणि शुभम लोनकर यांना वाँटेड आरोपी घोषित करण्यात आले आहे. मुख्य आरोपी दीपक शर्मा याच्या कुटुंबात २ भाऊ आणि ३ बहिणी आहेत.
पैशांची गरज असल्यानेच गोळीबारास होकार
दीपक शर्मा याची आर्थिक परिस्थिती खूपच हलाखीची आहे. त्याच्या लहान बहिणीचे गेल्या वर्षी लग्न झाले होते. त्या लग्नासाठी घर गहाण ठेवून त्याने कर्ज घेतले होते. दुसरी एक बहीण आजारी असल्यामुळे तिच्या पतीने तिला सोडले असून तिची जबाबदारीही दीपकवर आहे. पैशांची गरज असल्यामुळे दीपकने हा गुन्हा करण्यास होकार दिल्याचे तपासात समोर आले आहे. रोहित शेट्टीच्या घरावर गोळीबार करण्यापूर्वी दीपक चांगलाच घाबरला होता. त्यामुळे त्याने अगोदर मद्यपान केले आणि नंतर गोळीबार केला, असे तपासातून समोर आले आहे.
दिले जाणार होते एकूण तीन लाख रुपये
फायरिंगसाठी दीपक आणि त्याच्या तीन साथीदारांना एकूण ३ लाख रुपये देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. त्यातील ५०,००० रुपयांची पहिली किस्त आधीच देण्यात आली होती. अटक आरोपी सनीचे इन्स्टाग्राम अकाउंट तपास यंत्रणांच्या रडारवर आहे. सुमित कुशवाहा यालाही सुरुवातीला शुभम लोनकर आणि आरजू बिश्नोई यांनी फायरिंगसाठी संपर्क केला होता, अशी माहिती पोलिसांना मिळाली आहे. मात्र काही कारणास्तव सुमितने हे काम केले नाही. तरीही तो पोलिसांच्या रडारवर असून त्याचे आरोपींशी संबंध असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.
शहर
- मुंबई: दहीहंडी उत्सवात मोठी दुर्घटना! मालाडमध्ये विटांचा खांब अंगावर कोसळून ७ वर्षीय चिमुकल्याचा जागीच मृत्यू
- पुणे: छत्रपती संभाजी राजे आंतरराष्ट्रीय विमानतळ: जागाबदलाच्या तांत्रिक अहवालामुळे पुण्यात मोठा वादंग निर्माण!
- पुणे: एमपीएससी पेपर लीक प्रकरण विद्यार्थ्यांचा संताप अनावर, अध्यक्षांच्या हकालपट्टीची मागणी करत पुण्यात भव्य मोर्चाचा इशारा!
- पुणे: दहीहंडीच्या उत्साहाला गालबोट! जुन्या सांगवीत लोखंडी कमान आणि डीजेचा सांगाडा अंगावर कोसळून ४५ वर्षीय महिलेचा करुण अंत!
महाराष्ट्र
- सांगली: जिल्हा परिषदेचा अभिनव उपक्रम! आता विकासकामांसाठी लोकांकडूनही गोळा केल्या जाणार देणग्या
- मुंबई: दहीहंडी उत्सवात मोठी दुर्घटना! मालाडमध्ये विटांचा खांब अंगावर कोसळून ७ वर्षीय चिमुकल्याचा जागीच मृत्यू
- जालना: मराठा आरक्षणावरून मोठी बातमी मनोज जरांगे यांच्या आंदोलनावर आणि दोन दिवसांपूर्वी झालेल्या बैठकीवर मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांचे मोठे स्पष्टीकरण
- पुणे: छत्रपती संभाजी राजे आंतरराष्ट्रीय विमानतळ: जागाबदलाच्या तांत्रिक अहवालामुळे पुण्यात मोठा वादंग निर्माण!
गुन्हा
- धाराशिव: नळदुर्ग किल्ल्यावर मन हेलावणारी दुर्घटना; राष्ट्रीय स्तरावरील कुस्तीपटू मातेने तीन चिमुकल्यांसह मारली दरीत उडी, मायलेकांचा मृत्यू!
- अमरावतीत: ब्रेकअपचा बदला घेण्यासाठी भरदिवसा गर्दीच्या ठिकाणी १७ वर्षीय तरुणीची चाकूने भोसकून निर्घृण हत्या!
- कोल्हापूर: पन्हाळा तालुक्यातील काखे येथे अनैतिक संबंधाच्या संशयातून विवाहितेचा भरदिवसा अंगणात निर्घृण खून!
- कोल्हापूर: कौटुंबिक प्रेमप्रकरणाच्या रागातून १७ वर्षीय तरुणाचा इन्स्टाग्रामवरून बोलावून निर्घृण खून, मृतदेह दरीत फेकत पोलिसांची दिशाभूल!
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य 4 सप्टेंबर 2026 : जन्माष्टमीच्या दिवशी ग्रहांचा शुभ संयोग या राशींसाठी नशीब बदलवणारा, श्रीकृष्णाची मिळणार कृपा !
- आजचे राशिभविष्य ३ सप्टेंबर २०२६: या राशींवर असणार स्वामींची कृपा आणि गणपती बाप्पाचा आशीर्वाद, पहा तुमचे भाग्य!
- आजचे राशिभविष्य २९ ऑगस्ट २०२६: या ४ राशींसाठी ग्रहांची स्थिती अशुभ, सतर्क राहण्याचा सल्ला; वाचा सविस्तर भविष्य!
- आजचे राशिभविष्य: २० ऑगस्ट २०२६ रोजी तुमच्या राशीवर काय असेल ग्रहांची स्थिती? जाणून घ्या सविस्तर!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- नेपाळ: महाप्रळयानंतर तब्बल ११ दिवसांनी ढिगाऱ्याखालून महिलेला वाचवले; थरारक बचावाचा व्हिडिओ व्हायरल
- नवी दिल्ली: प्रधानमंत्री किसान योजना शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! किसान कार्ड नसल्यास ₹6000 हजारांचा हप्ता मिळणार नाही, 32 लाख शेतकरी चिंतेत
- नवी दिल्ली: समजा, मी तुमचा विद्यार्थी आहे, मला..पंतप्रधानांच्या प्रश्नावर शिक्षिकेचं उत्तर अन् एकच हशा पिकला
- केरळ: हायवेवर उभ्या असलेल्या लॉरीला कार धडकल्याने इंजिनिअरिंगच्या ८ विद्यार्थ्यांचा करुण अंत!



























Subscribe to my channel




