
Devendra Fadnavis : शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी समोर आलीये. जागतिक युद्धजन्य परिस्थितीमुळे भाव पडल्याने कापूस आणि सोयाबीन उत्पादकांना 4000 कोटी रुपये देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. आचारसंहिता लागल्याने ते पैसे खात्यात जमा झाले नाही. आचारसंहिता संपताच हे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहेत.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत माहिती दिलीये. काल राळेगाव (यवतमाळ) येथील सभेत उपस्थितांना संबोधित करत होते. त्यावेळी त्यांनी कापूस आणि सोयाबीन उत्पादकांना 4000 कोटी रुपये देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे, अशी माहिती दिली.
|
|
उपस्थितांना संबोधत करताना फडणवीसांनी म्हटलं की, पंतप्रधान मोदींनी शेतकरी सन्मान योजनेत शेतकऱ्यांना ६ हजार रुपये दिले. तर राज्य सरकारने देखील ६ हजार रुपये दिले. जगभरात काही देशांमध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली. रशिया -युक्रेन युद्ध, इरान - इस्रायल युद्ध त्यामुळे कापसावर निर्बंध आले. परिणामी कापूस आणि सोयाबीनचे भाव कमी झाले.
शेतकऱ्यांचं होणरं नुकसान पाहता राज्य सरकारने यावर निर्णय घेतला आहे. यामध्ये शेतकऱ्यांना ४००० कोटीरुपये देण्यात येणार आहे. आचारसंहिता संपल्यावर जो काही फरक पिकांच्या किंमतीत असेल त्यानुसार त्या त्या शेतकऱ्याच्या बँक खात्यात हे पैसे जमा होणार आहेत, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
हे तुमचं, सामान्य माणसाचं आणि गोरगरिबांचं सरकार आहे, असं देखील फडणवीसांनी उपस्थितांना संबोधित करताना म्हटलंय. राज्यात लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. त्यामुळे महायुतीमधील सर्वच मोठ्या नेत्यांनी प्रचार सभांवर जोर दिलाय.
यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघातून महायुतीने राजश्री पाटील यांना उमेदवारी दिलीये. तर महाविकास आघाडीकडून संजय देशमुख यांच्या नावाची घोषणा करण्यात आलीये. त्यामुळे राजश्री पाटील आणि संजय देशमुख या दोघांमध्ये थेट लढत पाहायला मिळणार आहे.
शहर
- नागपूर दर्गा धर्मांतर प्रकरण: तरुणीला बुरखा आणि कलमा वाचायला लावून बळजबरीने धर्मांतराचा प्रयत्न
- भारत-नेपाल सीमेवर नागरिकांना मोठा दिलासा! बालेन शाह सरकारचा मोठा निर्णय; भारतातून आणणाऱ्या सामानावरील शुल्क सवलत पाच पटीने वाढवली!
- ग्राहकांसाठी आनंदाची बातमी! सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण; चांदी तब्बल ६,००० रुपयांनी स्वस्त!
- शिल्पा शिंदेच्या 'खोट्या' कबुलीजबाबावर हिना खानचा संताप; पंतप्रधान मोदींकडे केली उपरोधिक मागणी!
महाराष्ट्र
- नागपूर दर्गा धर्मांतर प्रकरण: तरुणीला बुरखा आणि कलमा वाचायला लावून बळजबरीने धर्मांतराचा प्रयत्न
- ग्राहकांसाठी आनंदाची बातमी! सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण; चांदी तब्बल ६,००० रुपयांनी स्वस्त!
- शिल्पा शिंदेच्या 'खोट्या' कबुलीजबाबावर हिना खानचा संताप; पंतप्रधान मोदींकडे केली उपरोधिक मागणी!
- भोंदूगिरीचा पर्दाफाश! अघोरी पूजा आणि मृत्यूची भीती दाखवून 'भोंदू कमलेश'ने राज्यभरातील भाविकांना लुटले; पोलिसांची दोन पथके रवाना!
गुन्हा
- मलबार हिल पोलिसांत गुन्हा! सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वरिष्ठ लिपिकाकडून विवाहितेची १५ लाखांना फसवणूक!
- अमरावती: "तू आम्हाला दारू पाजतो का?"; नकार देताच वाद झाला अन् दगडाने ठेचून तरुणाचा खून;
- पुण्यात रक्तरंजित थरार! आयटीआयच्या विद्यार्थ्याची झोपेत असताना वर्गमित्राकडून निर्घृण हत्या
- रायगड: दागिन्यांच्या हव्यासापोटी वृद्धेचा जीव घेतला! अलिबागमध्ये ८५ वर्षीय महिलेची हत्या; मृतदेह आंबेनळी घाटात फेकला
राजकीय
- तृणमूल काँग्रेसमध्ये मोठी खळबळ! २३ खासदार बंडखोर गटाच्या संपर्कात, ममता बॅनर्जींच्या अडचणीत वाढ?
- कर्नाटकात राजकीय भूकंप: मंत्री रामलिंगा रेड्डींचा राजीनामा; खातेवाटपावरून मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप!
- छगन भुजबळ दिल्लीला जाणार? राज्यसभेसाठी नाव निश्चित होण्याची शक्यता, समीर भुजबळांच्या मंत्रिमंडळ प्रवेशाची चर्चा!
- पश्चिम बंगाल: तृणमूल काँग्रेसमध्ये मोठी फूट! 'ममता बॅनर्जी आता आमच्या नेत्या नाहीत', बंडखोर आमदारांचा खळबळजनक दावा
इतर
- मुंबई हादरली: डोकेडिया कुटुंब मृत्यू प्रकरणाचे गूढ वाढले; टरबूज नाही, तर 'उंदीर मारण्याचे विष' कारणीभूत?
- आजचे राशीभविष्य ५ जून २०२६: ग्रहांच्या आशीर्वादाने नशीब उजळणार, जाणून घ्या काय सांगतात तुमचे तारे!
- पुणे: सामाजिक बांधिलकी जपत 'ONP Hospitals'तर्फे ७ जून रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन!
- अन्न व औषध प्रशासनाचा बीडमध्ये धडाका: तुकाराम मुंढेंच्या आदेशानुसार भेसळयुक्त पदार्थ आणि गुटखा जप्त
मनोरंजन
- आयपीएल फायनल नंतर गुजरात टायटन्सला मोठा धक्का! टीम बसमध्ये शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग; शुभमन गिलसह सर्व खेळाडू सुखरूप!
- अभिनेत्री यमुना हिच्या आयुष्यातील चढ-उतार आणि संघर्षाची कहाणी.
- "आरारारा खतरनाक…": 'मुळशी पॅटर्न २'ची घोषणा! हक्काच्या घराच्या संघर्षावर आधारित असेल नवा चित्रपट.
- "बॉलिवूडमध्ये मराठी कलाकारांना 'घाटी' समजलं जातं"; वैभव मांगलेंचे बॉलीवूडवर अत्यंत खळबळजनक भाष्य!
देश विदेश
- खिसा रिकामा, महागाई जोरात! २००० ते २०२६ दरम्यान जीवनावश्यक वस्तू ५ ते ६ पटीने महागल्या; पेट्रोल अन् दुधाचे दर ऐकून चक्रावाल!खिसा रिकामा, महागाई जोरात! २००० ते २०२६ दरम्यान जीवनावश्यक वस्तू ५ ते ६ पटीने महागल्या; पेट्रोल अन् दुधाचे दर ऐकून चक्रावाल!
- गरिबीवर मात! ई-रिक्षा चालकाच्या मुलाने क्रॅक केली JEE Advanced परीक्षा; आयआयटीत (IIT) जाणारा ठरला गावातील पहिलाच तरुण!
- नोएडा शहरासाठी आजची सकाळ अत्यंत भीतीदायक ठरली, कारण शहरातील दोन वेगवेगळ्या ठिकाणी आगीच्या भीषण घटना घडल्या आहेत.
- पश्चिम बंगाल: तृणमूल काँग्रेसमध्ये मोठी फूट! 'ममता बॅनर्जी आता आमच्या नेत्या नाहीत', बंडखोर आमदारांचा खळबळजनक दावा


























Subscribe to my channel


