टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेच्या अंतिम फेरीत पाकिस्तान! शादाब खानला उपांत्य फेरीचं विचारताच... VideoImage Credit source: PTI
टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेत भारताने पाकिस्तानविरुद्धचा सामना एकतर्फी जिंकला. पाकिस्तानची या सामन्यात कुठेच छाप पडली नाही. उलट कर्णधार सूर्यकुमार यादवने तिलक वर्मा आणि रिंकु सिंह यांना गोलंदाजी दिली आणि आणखी लाज काढली. पाकिस्तानने हा सामना 61 धावांनी गमावला. या सामन्यात मिस्ट्री स्पिनर उस्मान तारीकची खूपच चर्चा रंगली होती. पण त्यालाही भारताविरूद्ध खास काही करता आलं नाही. पण या पराभवाचं पाकिस्तानला काहीच वाटत नाही, असं उस्मान तारीक म्हणाला. खरं तर लाज वाटावा असा पराभव होता, पण पाकिस्तानचा स्वभाव तसा आहे त्याला काय करणार? आता नामिबिया विरूद्धच्या सामन्यापूर्वी फिरकीपटू शादाब खानने अंतिम सामन्यावरच दावा ठोकला आहे. नामिबियाविरुद्धच्या सामन्यापूर्वी शादाब खानने सांगितलं की, अंतिम फेरीपर्यंत कोलंबोत असणार आहोत. पाकिस्तानचे सर्व सामने तटस्थ म्हणजेच श्रीलंकेत होणार आहेत.
शादाब खान सराव करून परतत असताना त्याला पाकिस्तानी पत्रकाराने प्रश्न विचारला की, उपांत्य फेरीपर्यंत येथेच असाल का? तेव्हा त्याने कोलंबोत अंतिम फेरीपर्यंत असू असं सांगितलं. खरं तर पाकिस्तानची या स्पर्धेतील स्थिती नाजूक आहे. एकाच ठिकाणी गेल्या काही दिवसांपासून सराव करत असूनही काहीच उपयोग झाला नाही. नेदरलँडसारख्या दुबळ्या संघाने विजयासाठी झुंजवलं. तर भारताने पाकिस्तानचा 61 धावांनी धुव्वा उडवला. पाकिस्तानचे आघाडीचे फलंदाज झटपट बाद झाले. त्यामुळे पाकिस्तान अंतिम फेरी गाठेल असं वाटत नाही. त्यात सुपर 8 फेरीत तगडे संघ आहेत. या संघावर मात करून उपांत्य फेरी गाठणं कठीण काम आहे. पाकिस्तानच्या स्थितीवर अंतिम फेरीचा सामना अहमदाबादला होणार की कोलंबोत होणार हे ठरणार आहे.
Shadab Khan said, “We will play the final.” pic.twitter.com/ycnA5kK7iE
— Sheri. (@CallMeSheri1_) February 17, 2026
पाकिस्तानी संघात बदल होणार?
भारताविरूद्धच्या सामन्यात पराभवाची नामुष्की ओढावल्यानंतर पाकिस्तानी संघात बदल होण्याची शक्यता वाढली आहे. नामिबियाविरुद्धच्या सामन्यात प्लेइंग 11 मध्ये बदल केला जाण्याची शक्यता आहे. बाबर आझम आणि शाहीन आफ्रिदी यांना ड्रॉप केलं जाऊ शकतं. बाबरच्या जागी फखर जमान आणि शाहीनच्या जागी सलमान मिर्झाला स्थान मिळू शकतं. या दोन्ही खेळाडूंनी मंगळवारी जोरदार सराव केला.
शहर
- मुंबई: दहीहंडी उत्सवात मोठी दुर्घटना! मालाडमध्ये विटांचा खांब अंगावर कोसळून ७ वर्षीय चिमुकल्याचा जागीच मृत्यू
- पुणे: छत्रपती संभाजी राजे आंतरराष्ट्रीय विमानतळ: जागाबदलाच्या तांत्रिक अहवालामुळे पुण्यात मोठा वादंग निर्माण!
- पुणे: एमपीएससी पेपर लीक प्रकरण विद्यार्थ्यांचा संताप अनावर, अध्यक्षांच्या हकालपट्टीची मागणी करत पुण्यात भव्य मोर्चाचा इशारा!
- पुणे: दहीहंडीच्या उत्साहाला गालबोट! जुन्या सांगवीत लोखंडी कमान आणि डीजेचा सांगाडा अंगावर कोसळून ४५ वर्षीय महिलेचा करुण अंत!
महाराष्ट्र
- सांगली: जिल्हा परिषदेचा अभिनव उपक्रम! आता विकासकामांसाठी लोकांकडूनही गोळा केल्या जाणार देणग्या
- मुंबई: दहीहंडी उत्सवात मोठी दुर्घटना! मालाडमध्ये विटांचा खांब अंगावर कोसळून ७ वर्षीय चिमुकल्याचा जागीच मृत्यू
- जालना: मराठा आरक्षणावरून मोठी बातमी मनोज जरांगे यांच्या आंदोलनावर आणि दोन दिवसांपूर्वी झालेल्या बैठकीवर मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांचे मोठे स्पष्टीकरण
- पुणे: छत्रपती संभाजी राजे आंतरराष्ट्रीय विमानतळ: जागाबदलाच्या तांत्रिक अहवालामुळे पुण्यात मोठा वादंग निर्माण!
गुन्हा
- धाराशिव: नळदुर्ग किल्ल्यावर मन हेलावणारी दुर्घटना; राष्ट्रीय स्तरावरील कुस्तीपटू मातेने तीन चिमुकल्यांसह मारली दरीत उडी, मायलेकांचा मृत्यू!
- अमरावतीत: ब्रेकअपचा बदला घेण्यासाठी भरदिवसा गर्दीच्या ठिकाणी १७ वर्षीय तरुणीची चाकूने भोसकून निर्घृण हत्या!
- कोल्हापूर: पन्हाळा तालुक्यातील काखे येथे अनैतिक संबंधाच्या संशयातून विवाहितेचा भरदिवसा अंगणात निर्घृण खून!
- कोल्हापूर: कौटुंबिक प्रेमप्रकरणाच्या रागातून १७ वर्षीय तरुणाचा इन्स्टाग्रामवरून बोलावून निर्घृण खून, मृतदेह दरीत फेकत पोलिसांची दिशाभूल!
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य 4 सप्टेंबर 2026 : जन्माष्टमीच्या दिवशी ग्रहांचा शुभ संयोग या राशींसाठी नशीब बदलवणारा, श्रीकृष्णाची मिळणार कृपा !
- आजचे राशिभविष्य ३ सप्टेंबर २०२६: या राशींवर असणार स्वामींची कृपा आणि गणपती बाप्पाचा आशीर्वाद, पहा तुमचे भाग्य!
- आजचे राशिभविष्य २९ ऑगस्ट २०२६: या ४ राशींसाठी ग्रहांची स्थिती अशुभ, सतर्क राहण्याचा सल्ला; वाचा सविस्तर भविष्य!
- आजचे राशिभविष्य: २० ऑगस्ट २०२६ रोजी तुमच्या राशीवर काय असेल ग्रहांची स्थिती? जाणून घ्या सविस्तर!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- नेपाळ: महाप्रळयानंतर तब्बल ११ दिवसांनी ढिगाऱ्याखालून महिलेला वाचवले; थरारक बचावाचा व्हिडिओ व्हायरल
- नवी दिल्ली: प्रधानमंत्री किसान योजना शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! किसान कार्ड नसल्यास ₹6000 हजारांचा हप्ता मिळणार नाही, 32 लाख शेतकरी चिंतेत
- नवी दिल्ली: समजा, मी तुमचा विद्यार्थी आहे, मला..पंतप्रधानांच्या प्रश्नावर शिक्षिकेचं उत्तर अन् एकच हशा पिकला
- केरळ: हायवेवर उभ्या असलेल्या लॉरीला कार धडकल्याने इंजिनिअरिंगच्या ८ विद्यार्थ्यांचा करुण अंत!



























Subscribe to my channel




