अभिनेता राजपाल यादवचं नुसतं नाव जरी घेतलं तरी चेहऱ्यावर हसू फुलतं. छोट्यातल्या छोट्या भूमिकांमध्येही जिवंतपणा आणणाऱ्या राजपाने ‘हेरा फेरी’, ‘भागम भाग’, ‘भुलभुलैया’ यांसारख्या चित्रपटांमध्ये विनोदी भूमिका साकारल्या आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून तो हिंदी चित्रपटसृष्टीत काम करतोय. परंतु सध्या राजपाल त्याच्या आयुष्यातील सर्वांत कठीण काळाचा सामना करतोय. राजपालने त्याच्या करिअरमध्ये पहिल्यांदाच चित्रपट दिग्दर्शित करण्याचा निर्णय घेतला आणि या प्रक्रियेदरम्यान केलेल्या चुकांमुळे तो खूप अडचणीत सापडला आहे. ही समस्या इतकी मोठी झाली की अखेर त्याला तुरुंगात आत्मसमर्पण करावं लागलं.
दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण करणं आणि ‘अता पता लापता’ या चित्रपटाची कमान सांभाळणं हा राजपाल यादवच्या आयुष्यातील सर्वांत वाईट निर्णय ठरला. हा चित्रपट त्याच्यासाठी फक्त एक प्रोजेक्ट नव्हता तर त्याने त्याकडे स्वप्न म्हणून पाहिलं होतं. हे स्वप्न त्याने सत्यात उतरवलं आणि तो चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शितसुद्धा झाला. परंतु प्रेक्षकांकडून त्याला विशेष प्रतिसाद मिळाला नाही. बॉक्स ऑफिसवर दणक्यात आपटलेल्या या चित्रपटामुळे राजपालवर कर्जाचं डोंगर उभं राहिलं. कर्ज फेडण्यासाठी त्याने जे चेक्स दिले, ते सर्व बाऊन्स झाले. अखेर त्याच्याविरोधात हे प्रकरण कोर्टात पोहोचलं. हा खटला बराच काळ चालला आणि न्यायालयाच्या आदेशानुसार त्याला तिहार तुरुंगात आत्मसमर्पण करावं लागलं. पडद्यावर विनोदी भूमिका साकारून प्रेक्षकांना हसवणारा हा अभिनेता तुरुंगात आत्मसमर्पण करताना स्वत: रडला.
राजपाल यादवने ज्या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं होतं, त्यात त्याने मुख्य भूमिकासुद्धा साकारली होती. या चित्रपटाचं बजेट जवळपास 11 कोटी रुपये असल्याचं म्हटलं जात आहे. 11 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर फक्त 38 लाख रुपये कमावले होते. हा चित्रपट 2012 मध्ये प्रदर्शित झाला होता. फिल्म इंडस्ट्रीत अनेकांकडून उत्साहाच्या आणि महत्त्वाकांक्षेच्या जोरावर काही निर्णय घेतले जातात. चित्रपट निर्मितीची आवड असणं ही चांगली गोष्ट असली तरी कधीकधी अनुभव आणि योग्य सल्ल्याचा अभाव महागात पडू शकतो, अशी प्रतिक्रिया दिग्दर्शक अनीस बाज्मीने दिली. बहुतेक कलाकारांना कागदपत्रे आणि करारांची गुंतागुंत नीट समजत नाही आणि इथूनच खऱ्या समस्येची सुरुवात होते.
शहर
- मुंबई: दहीहंडी उत्सवात मोठी दुर्घटना! मालाडमध्ये विटांचा खांब अंगावर कोसळून ७ वर्षीय चिमुकल्याचा जागीच मृत्यू
- पुणे: छत्रपती संभाजी राजे आंतरराष्ट्रीय विमानतळ: जागाबदलाच्या तांत्रिक अहवालामुळे पुण्यात मोठा वादंग निर्माण!
- पुणे: एमपीएससी पेपर लीक प्रकरण विद्यार्थ्यांचा संताप अनावर, अध्यक्षांच्या हकालपट्टीची मागणी करत पुण्यात भव्य मोर्चाचा इशारा!
- पुणे: दहीहंडीच्या उत्साहाला गालबोट! जुन्या सांगवीत लोखंडी कमान आणि डीजेचा सांगाडा अंगावर कोसळून ४५ वर्षीय महिलेचा करुण अंत!
महाराष्ट्र
- सांगली: जिल्हा परिषदेचा अभिनव उपक्रम! आता विकासकामांसाठी लोकांकडूनही गोळा केल्या जाणार देणग्या
- मुंबई: दहीहंडी उत्सवात मोठी दुर्घटना! मालाडमध्ये विटांचा खांब अंगावर कोसळून ७ वर्षीय चिमुकल्याचा जागीच मृत्यू
- जालना: मराठा आरक्षणावरून मोठी बातमी मनोज जरांगे यांच्या आंदोलनावर आणि दोन दिवसांपूर्वी झालेल्या बैठकीवर मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांचे मोठे स्पष्टीकरण
- पुणे: छत्रपती संभाजी राजे आंतरराष्ट्रीय विमानतळ: जागाबदलाच्या तांत्रिक अहवालामुळे पुण्यात मोठा वादंग निर्माण!
गुन्हा
- धाराशिव: नळदुर्ग किल्ल्यावर मन हेलावणारी दुर्घटना; राष्ट्रीय स्तरावरील कुस्तीपटू मातेने तीन चिमुकल्यांसह मारली दरीत उडी, मायलेकांचा मृत्यू!
- अमरावतीत: ब्रेकअपचा बदला घेण्यासाठी भरदिवसा गर्दीच्या ठिकाणी १७ वर्षीय तरुणीची चाकूने भोसकून निर्घृण हत्या!
- कोल्हापूर: पन्हाळा तालुक्यातील काखे येथे अनैतिक संबंधाच्या संशयातून विवाहितेचा भरदिवसा अंगणात निर्घृण खून!
- कोल्हापूर: कौटुंबिक प्रेमप्रकरणाच्या रागातून १७ वर्षीय तरुणाचा इन्स्टाग्रामवरून बोलावून निर्घृण खून, मृतदेह दरीत फेकत पोलिसांची दिशाभूल!
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य 4 सप्टेंबर 2026 : जन्माष्टमीच्या दिवशी ग्रहांचा शुभ संयोग या राशींसाठी नशीब बदलवणारा, श्रीकृष्णाची मिळणार कृपा !
- आजचे राशिभविष्य ३ सप्टेंबर २०२६: या राशींवर असणार स्वामींची कृपा आणि गणपती बाप्पाचा आशीर्वाद, पहा तुमचे भाग्य!
- आजचे राशिभविष्य २९ ऑगस्ट २०२६: या ४ राशींसाठी ग्रहांची स्थिती अशुभ, सतर्क राहण्याचा सल्ला; वाचा सविस्तर भविष्य!
- आजचे राशिभविष्य: २० ऑगस्ट २०२६ रोजी तुमच्या राशीवर काय असेल ग्रहांची स्थिती? जाणून घ्या सविस्तर!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- नेपाळ: महाप्रळयानंतर तब्बल ११ दिवसांनी ढिगाऱ्याखालून महिलेला वाचवले; थरारक बचावाचा व्हिडिओ व्हायरल
- नवी दिल्ली: प्रधानमंत्री किसान योजना शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! किसान कार्ड नसल्यास ₹6000 हजारांचा हप्ता मिळणार नाही, 32 लाख शेतकरी चिंतेत
- नवी दिल्ली: समजा, मी तुमचा विद्यार्थी आहे, मला..पंतप्रधानांच्या प्रश्नावर शिक्षिकेचं उत्तर अन् एकच हशा पिकला
- केरळ: हायवेवर उभ्या असलेल्या लॉरीला कार धडकल्याने इंजिनिअरिंगच्या ८ विद्यार्थ्यांचा करुण अंत!



























Subscribe to my channel




