इंटरनेटवर ‘डू इंडियन्स लॅक सिव्हिक-सेन्स’ (भारतीयांमध्ये नागरी जाणिवांचा अभाव आहे का?) असे शोधून पाहा. तुम्ही थक्क व्हाल. अशा चुका/ साहित्यांची तिथे रेलचेल आहे. यात लोक आपल्या नागरी भानाच्या अभावाची खंत व्यक्त करताना दिसतात. गोष्ट फक्त रस्ते, पर्यटन स्थळे आणि थंड हवेच्या ठिकाणांवर कचरा फेकण्यापुरती मर्यादित राहिलेली नाही. जगातील प्रमुख पर्यटन स्थळे जसे की बुर्ज खलिफा, आयफेल टॉवर किंवा व्हिएतनामची ‘ट्रेन-स्ट्रीट’, येथे जाऊन भारतीयांनी नाचणे, ट्रेनमध्ये घाण करणे, रांग मोडणे आणि गरजूंसाठी असलेल्या सुविधांचा गैरवापर करणे, अशा तक्रारी आता सर्रास ऐकू येऊ लागल्या आहेत. एक भारतीय म्हणून हे सर्व बघणे आणि वाचणे लाजीरवाणे वाटते. यामुळे परदेशात आपली प्रतिमा मलिन होते. विदेशी हॉटेल्समध्ये भारतीयांना वागणुकीबद्दल विशेष सूचना दिल्या जाऊ लागल्या आहेत. आपण इतरांच्या हिताबाबत किती उदासीन आहोत, याचे भारतीय रस्ते हे एक उत्तम उदाहरण आहे. नागरी भानाची व्याख्याच मुळात अशी आहे की, माणसाने असे वागले पाहिजे ज्यातून त्याला जाणीव होईल की सार्वजनिक ठिकाणे आणि व्यवस्था कुण्या एकट्यासाठी नाहीत, तर ती सर्वांसाठी आहेत. एक समाज म्हणून आपण असा विचार का करतो की, आपल्याला जे काही मिळू शकते ते आपण हिसकावून किंवा ओरबाडून घेतले पाहिजे? मग बाकीच्यांचे काहीही होवो. कदाचित हे अशा एका कठोर वातावरणात जगण्याचा परिणाम आहे, जिथे संसाधने मर्यादित आहेत आणि नियम फारसे गांभीर्याने घेतले जात नाहीत. जिथे फक्त ताकदवानांचेच चालते आणि प्रत्येक व्यक्तीने स्वतःच्याच जीवावर राहिले पाहिजे, असे गृहीत धरले गेले आहे. रस्त्यांवर कचरा फेकणे, ट्रॅफिक सिग्नल तोडणे, सार्वजनिक ठिकाणी थुंकणे, मोबाइलवर मोठ्या आवाजात बोलणे, व्हिडिओ पाहणे, रात्री उशिरापर्यंत मोठ्या आवाजात गाणी लावणे, रांग मोडणे, बेकायदेशीर पार्किंग करणे आणि सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणे : या गोष्टी ओळखीच्या वाटतात का? मला खात्री आहे की त्या नक्कीच ओळखीच्या वाटतील; कारण आपण आपल्या आजूबाजूला आयुष्यभर हेच सर्व पाहिले आहे. तरीही सर्वच भारतीयांमध्ये नागरी जाणिवेचा अभाव आहे असा सरसकट निष्कर्ष काढणे चुकीचे ठरेल. बहुसंख्य भारतीय असेही आहेत, जे खूप चांगले वागतात. परंतु, व्हायरल रीलच्या या काळात वाईट गोष्टी वारंवार पाहिल्या आणि शेअर केल्या जातात. त्यामुळे सर्वच जण असे आहेत, असा एक गैरसमज निर्माण होतो. हे कसे सुधारायचे? हे फक्त निकृष्ट शिक्षण आणि कडक नियमांच्या अभावाचे प्रकरण आहे का? एनसीईआरटीच्या पुस्तकांमधून मुलांना कचरा न पसरवण्याचे शिक्षण दिल्याने आणि युरोपच्या धर्तीवर ट्रॅफिकचे नियम मोडल्यास भक्कम दंड लावल्याने हे ठीक होईल का? दुर्दैवाने, यावरचा उपाय इतका सोपा नाही. टोकियो, सिंगापूर आणि सोल यांसारखी शहरे काही दशकांपूर्वी अशाच समस्यांशी झुंजत होती. त्यांनी हे कसे सुधारले, हे जाणून घेण्यासाठी आधी हे समजून घेणे आवश्यक आहे की नागरी भानाचा ऱ्हास कसा होतो. साधारणपणे याच्या चार अवस्था असतात. पहिली- पायाभूत सुविधांचा अभाव. दुसरी- नियमांमधील शिथिलता. तिसरी- अतिशय दाट लोकवस्ती असलेले शहरी भाग; जिथे व्यवस्थेवर गरजेपेक्षा जास्त ताण पडतो. आणि चौथी- वेगाने होणारे शहरीकरण. यामुळे लोक सतत मोठ्या शहरांमध्ये येतात खरे; पण तिथे अंगीकाराव्या लागणाऱ्या वागणुकीची आणि नियमांची त्यांना समज नसते. भारतात लाल सिग्नल तोडणाऱ्यांपैकी किती जणांना दंड आकारला जातो? कॅमेऱ्यांच्या मदतीने हे केले जाऊ शकते आणि यातून सरकारला महसूलही मिळेल. कचरा फेकणाऱ्यांपैकी किती जणांकडून भरपाई वसूल केली जाते? भरपाईची रक्कम भलेही कमी असू दे; पण तिची सक्ती असणे आवश्यक आहे. भारतातील सर्वात स्वच्छ शहर असलेल्या इंदूरकडून आपण शिकले पाहिजे. तिथे आता अशी परिस्थिती झाली आहे की, आपले शहर स्वच्छ ठेवणे ही नागरिकांसाठी अभिमानाची गोष्ट बनली आहे. इतर शहरेही असे करू शकतात. लक्षात ठेवा, जोपर्यंत देशातील नागरिकांमध्ये नागरी भान येत नाही आणि ते आपली सार्वजनिक ठिकाणे स्वच्छ ठेवू शकत नाहीत, तोपर्यंत कोणताही देश विकसित म्हणवून घेऊ शकत नाही. आपल्याकडे तर उलट बेशिस्त आणि ‘जुगाड’ यांचे उदात्तीकरण केले जाते; पण हे काही विकासाचे मापदंड असू शकत नाहीत.(हे लेखकाचे वैयक्तिक मत आहे.) भारतात लाल सिग्नल तोडणाऱ्यांपैकी किती जणांना दंड आकारला जातो? कचरा टाकणाऱ्यांपैकी किती जणांकडून भरपाई वसूल केली जाते? दंड आणि भरपाईची रक्कम भलेही कमी असू दे; पण तिची सक्ती असणे आवश्यक आहे.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- मुंबई: वित्त खाते परत मिळवण्यासाठी राष्ट्रवादी आक्रमक; सुनेत्रा पवारांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळ लवकरच अमित शहांची भेट घेणार!
- मुंबई: शिंदेसेनेला ठाण्यात मोठा धक्का! बनावट आदिवासी प्रमाणपत्राप्रकरणी नगरसेविका सुलेखा चव्हाण यांचे पद रद्द
- मुंबई: प्रसाद ओक म्हणजेच धर्मवीर आनंद दिघे.., मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून अभिनेत्याचं तोंडभरून कौतुक!
- पुणे: रेल्वे मार्गावर मेगा ब्लॉक; गाड्यांना फटका बसणार? हडपसर-घोरपडी-पुणे मार्गावरील कामाची संपूर्ण माहिती
महाराष्ट्र
- मुंबई: वित्त खाते परत मिळवण्यासाठी राष्ट्रवादी आक्रमक; सुनेत्रा पवारांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळ लवकरच अमित शहांची भेट घेणार!
- मुंबई: शिंदेसेनेला ठाण्यात मोठा धक्का! बनावट आदिवासी प्रमाणपत्राप्रकरणी नगरसेविका सुलेखा चव्हाण यांचे पद रद्द
- कोल्हापूर: महादेवी उर्फ माधुरी हत्तीणीच्या घरवापसीचा मार्ग मोकळा; कोल्हापूरच्या नांदणी मठात लवकरच परतणार लाडकी 'माधुरी'!
- हिंगोली: तू पोलिसांना टिप का देतोस? खबरी असल्याच्या संशयातून वसमतमध्ये २२ वर्षीय तरुणाची विटा-दगडने ठेचून निर्घृण हत्या
गुन्हा
- पुणे: बारामतीत खळबळ! झुंबा डान्स क्लासवर कारवाई न करण्यासाठी ५ लाखांची लाच स्वीकारताना पोलीस हवालदार एसीबीच्या जाळ्यात
- उत्तर प्रदेश: प्रशासकीय हलगर्जीपणाचा कळस! उत्तर प्रदेशमधील पूरग्रस्त भागात मदत म्हणून वाटले एक्स्पायर्ड कफ सिरप, लहान मुलांची प्रकृती बिघडली
- पुणे: 'सैराट' प्रकरणाची पुनरावृत्ती! आंतरजातीय प्रेमविवाह केल्याच्या रोषातून संतापलेल्या भावांचा बहिणीच्या पतीवर पिस्तूल आणि कोयत्याने जीवघेणा हल्ला
- नाशिक: रोड आणि सिडकोत तोतया पोलिसांचा उच्छाद; भरदिवसा नागरिकांना चकमा देत साडेपाच तोळे सोने लांबवले
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य ७ सप्टेंबर २०२६ : शेवटचा श्रावणी सोमवार या राशींसाठी ठरणार भाग्यशाली, शिवकृपा लाभणार!
- आजचे राशिभविष्य ५ सप्टेंबर २०२६ दहीहंडी विशेष: चंद्र-मंगळ योगामुळे या राशींना मिळणार प्रचंड धनलाभ आणि करिअरमध्ये यश!
- आजचे राशिभविष्य 4 सप्टेंबर 2026 : जन्माष्टमीच्या दिवशी ग्रहांचा शुभ संयोग या राशींसाठी नशीब बदलवणारा, श्रीकृष्णाची मिळणार कृपा !
- आजचे राशिभविष्य ३ सप्टेंबर २०२६: या राशींवर असणार स्वामींची कृपा आणि गणपती बाप्पाचा आशीर्वाद, पहा तुमचे भाग्य!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

4 September 2026
श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त मथुरेत भक्तिमय वातावरण; कृष्ण जन्मभूमी मंदिरात जन्मोत्सवाचा जल्लोष!
जन्माष्टमीनिमित्त चौपाटीच्या इस्कॉन मंदिरात भक्तिमय वातावरण! 🦚🙏
देश विदेश
- दिल्ली: देशातून जातीव्यवस्था समूळ नष्ट करा, आम्ही स्वतःहून आरक्षण सोडायला तयार आहोत; केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंचे मोठे विधान
- नवी दिल्ली: राहुल गांधींच्या खटल्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण; न्यायमूर्ती सूर्यकांत म्हणाले न्यायालयासमोर सगळे समान आहेत, कोणीही श्रेष्ठ नाही
- उत्तर प्रदेश: प्रशासकीय हलगर्जीपणाचा कळस! उत्तर प्रदेशमधील पूरग्रस्त भागात मदत म्हणून वाटले एक्स्पायर्ड कफ सिरप, लहान मुलांची प्रकृती बिघडली
- तमिळनाडू: टीव्हीकेचे नेते विजय यांच्या सरकारसमोर मोठे राजकीय संकट, विरोधकांचे सरकार कोसळण्याचे भाकीत आणि नव्या समीकरणांची चर्चा


























Subscribe to my channel



