महापालिका निवडणुकीचे निकाल लागले, महापालिका निवडणुकीमध्ये भाजप हा राज्यात सर्वात मोठा पक्ष ठरला, तर राज्यात शिवसेना शिंदे गट दुसऱ्या क्रमाकांवर आहे. मात्र दुसरीकडे मुंबई आणि आणखी एक दोन महापालिका वगळता शिवसेना ठाकरे गटाला या निवडणुकीत अपेक्षित कामगीरी करता आली नाही. भाजप जरी राज्यात सर्वात मोठा पक्ष ठरला असला तरी अनेक महापालिका अशा होत्या जिथे भाजप बहुमताच्या आकड्यापासून दूर होता, त्यामुळे या महापालिकांमध्ये आपला महापौर बसवण्यासाठी भाजपला मित्र पक्षांची गरज लागली. चंद्रपूर महापालिकेत तर शिवसेना ठाकरे गटाच्या नगरसेवकांनीच भाजपला पाठिंबा दिला, त्यामुळे चंद्रपूरमध्ये महापौरपदाच्या निवडणुकीत भाजप उमेदवाराचा विजय झाला, काँग्रेस बहुमताच्या जवळ जात असताना देखील त्यांना सत्तेपासून दूर रहावे लागले. दरम्यान आता ज्यांनी चंद्रपूरमध्ये भाजपला पाठिंबा दिला, त्या नगरसेवकांवर कारवाई करणार असल्याचं शिवसेना ठाकरे गटानं स्पष्ट केलं आहे.
एकीकडे हे सर्व सुरू असतानाच कल्याण डोंबिवली महापालिकेत देखील शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का बसला होता. या महापालिकेत शिवसेना ठाकरे गटाचे चार नगरसेवक ऐनवेळी नॉट रिचेबल झाल्यानं केवळ आठ नगरसेवकांचाच गट बनवण्याची वेळ शिवसेना ठाकरे गटावर आली होती. मात्र आता मोठी बातमी समोर येत आहे, ती म्हणजे हे सर्व नगरसेवक पुन्हा परतले आहेत. तब्बल 28 दिवसांनंतर ठाकरे गटाचे चार ‘नॉट रिचेबल’ नगरसेवक आज कोकण भवनात दाखल झाले आहेत.
चार नगरसेवकांपैकी एकाने शिवसेना ठाकरे गटात अधिकृत प्रवेश केला आहे, तर तिघांनी स्वतंत्र नोंदणी केली आहे. नॉट रिचेबल असलेल्या नगरसेवकांपैकी किर्ती ढोणे यांनी शिवसेना ठाकरे गटात अधिकृत प्रवेश केला आहे. देवदर्शनासाठी गेले होते, वरिष्ठांच्या संपर्कात होते, इतर तिघांविषयी माहिती नाही, अशी प्रतिक्रिया यावेळी शिवसेना ठाकरे गटात सहभागी झालेल्या किर्ती ढोणे यांनी दिली आहे. दरम्यान दुसरीकडे ‘आमचा आठ जणांचा गट आहे, तीन नगरसेवक अजून संपर्कात नाहीत; शिस्तभंगाची प्रक्रिया सुरू असून कठोर कारवाई करू’ असा इशारा ठाकरे गटाचे गटनेते उमेश बोरगावकर यांनी दिला आहे.
शहर
- नागपूर: संशयाच्या जाळ्यात उद्ध्वस्त झाली दोन कुटुंबे! दोन्ही प्रकरणांतील आरोपी पती पोलिसांच्या ताब्यात
- पुणे: मंचरमध्ये बनावट दुधाचा गोरखधंदा उघड; १३ जणांना अटक, २६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
- पुणे: इंद्रायणीच्या महापुरात वारकऱ्यांसाठी मोठा निर्णय! शाळा, महाविद्यालयांसह १० इमारती तात्पुरत्या अधिग्रहित
- पुणे: मुळा-मुठा आणि भीमा नदीला महापूर! संगम-वाळकी पूल पाण्याखाली; दौंड तालुक्यात रेड अलर्ट
महाराष्ट्र
- नागपूर: संशयाच्या जाळ्यात उद्ध्वस्त झाली दोन कुटुंबे! दोन्ही प्रकरणांतील आरोपी पती पोलिसांच्या ताब्यात
- एलपीजी गॅस सिलिंडरची चिंता मिटणार! ऊर्जा सुरक्षेसाठी भारताचा मोठा निर्णय; आखाती देशांवरील अवलंबित्व घटणार!
- पुणे: मंचरमध्ये बनावट दुधाचा गोरखधंदा उघड; १३ जणांना अटक, २६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
- पुणे: इंद्रायणीच्या महापुरात वारकऱ्यांसाठी मोठा निर्णय! शाळा, महाविद्यालयांसह १० इमारती तात्पुरत्या अधिग्रहित
गुन्हा
- पुणे: शिक्रापूरमध्ये माजी महिला सरपंचाच्या गळ्यातील सोन्याचे गंठण चोरट्यांनी हिसकावले
- उत्तर प्रदेश: कौटुंबिक वादातून पत्नीने पतीला जिवंत जाळले; पोलीस तपासात धक्कादायक कबुली!
- थरारक! कर्जात बुडालेल्या कॉलेज विद्यार्थ्याने लुटून विहिरीत ढकलले; दोरीला धरून ५५ वर्षीय महिलेचा विहिरीत २१ तासांचा मृत्यूशी संघर्ष! अखेर चमत्कारीक बचाव
- सरपंचपदासाठी काय पण! मराठा असूनही मिळवले 'पारधी' जातीचे बोगस प्रमाणपत्र; बीड जिल्हा जात पडताळणी समितीने दाखला ठरवला रद्द!
राजकीय
- तमिळनाडू: विजय सरकार पाडण्यासाठी आमदाराला ₹35 कोटींची ऑफर; तिघांना अटक
- उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीचे वारे; भाजपच्या प्रभारीपदासाठी विनोद तावडेंच्या नावाची जोरदार चर्चा!
- सचिन अहिर शिंदेंच्या गोटात; संजय राऊतांचे 'ते' ट्विट व्हायरल, कवी सुरेश भटांच्या ओळींतून व्यक्त केली खंत!
- उद्धव ठाकरेंना शिवसेनेचे ६ खासदार शिंदे गटात; 'ऑपरेशन टायगर' यशस्वी!
इतर
- दैनिक राशिभविष्य: आज या राशींचे नशीब फळफळणार; आर्थिक प्रगती आणि नोकरीत बढतीचे योग!
- मराठवाड्यात जुलैच्या सुरुवातीलाही पावसाची ओढ! पहिल्या आठवड्यात केवळ २३.२ मिमी पाऊस; धरणे कोरडी, पेरण्या रखडल्याने बळीराजा हवालदिल!
- धाराशिवच्या जमिनीचा पोत खालावला! मृद आरोग्य पत्रिकेच्या अहवालात 'नत्र' कमतरतेची गंभीर नोंद; खरिपासाठी सेंद्रिय खतांचा वापर वाढवण्याचे आवाहन.
- शनीच्या दृष्टीचा राशींवर होणार परिणाम, जाणून घ्या ४ जुलै २०२६ चा दिवस कसा असेल!
मनोरंजन
- अखेर वितळला बर्फ! कश्मीरा पायावर पडून रडली, सुनीता आहुजांनी सांगितला १५ वर्षांच्या वादाचा शेवट!
- 'वेलकम टू द जंगल' मधून संजय दत्त बाहेर का पडला? अखेर दिग्दर्शक अहमद खान यांनी सांगितंलं खरं कारण!
- मुंबई: 'हेरा फेरी 3' बंद? कायदेशीर कचाट्यात अडकलेल्या चित्रपटातून प्रियदर्शन बाहेर, म्हणाले - "हा चित्रपट कधीच रिलीज होणार नाही!"
- 'द इंडिया स्टोरी'चा टीझर रिलीज! श्रेयस तळपदे आणि काजल अग्रवालची जोडी शेतीतील एका गंभीर वास्तवावर प्रकाश टाकणार.
विडियो गॅलेरी

देश विदेश
- एलपीजी गॅस सिलिंडरची चिंता मिटणार! ऊर्जा सुरक्षेसाठी भारताचा मोठा निर्णय; आखाती देशांवरील अवलंबित्व घटणार!
- उत्तर प्रदेश: कौटुंबिक वादातून पत्नीने पतीला जिवंत जाळले; पोलीस तपासात धक्कादायक कबुली!
- फिफा विश्वचषक २०२६ मध्ये थरार! बेलिंगहॅम चमकला, १० खेळाडूंसह खेळणाऱ्या इंग्लंडने मेक्सिकोला नमवून गाठली उपांत्यपूर्व फेरी
- पाशवी कृत्य! दारुड्या पतीने पत्नीला जिवंत जाळले, अपघाताचा बनाव रचला; फतेहपूर पोलिसांच्या तपासात अखेर सत्य उघड!


























Subscribe to my channel

