IND vs PAK Pitch Report: हायव्होल्टेज सामन्यात खेळपट्टी कोणाला मदत करणार? फलंदाज की गोलंदाजांचं नाणं खणखणणार Image Credit source: Getty Images
टी20 वर्ल्डकप स्पर्धेत भारत पाकिस्तान सामना यावर मोहोर लागली आहे. गेल्या काही दिवसांपासून या सामन्याबाबत खलबतं सुरू होती. अखेर पाकिस्तान भारताविरुद्ध सामना खेळण्यास तयार झाला आणि क्रीडाप्रेमींसाठी व्हायव्होल्टेज सामना पाहण्याची संधी मिळाली. भारत पाकिस्तान सामना 15 फेब्रुवारीला होत आहे. हा सामना कोलंबोमधील आर. प्रेमदासा स्टेडियमवर खेळवला जाईल. भारत आणि पाकिस्तान या दोन्ही संघाचा या स्पर्धेतील तिसरा सामना आहे. दोन्ही संघांनी यापूर्वी खेळलेल्या दोन्ही सामन्यात विजय मिळवला आहे. त्यामुळे या सामन्यातील विजय सुपर 8 फेरीत स्थान पक्कं करणार आहे. त्यामुळे या सामन्याचं महत्त्व आणखी वाढलं आहे. भारत-पाकिस्तान सामना होणाऱ्या कोलंबो स्टेडियमची खेळपट्टी कशी असेल ते येथे जाणून घेऊया.
कोलंबो स्टेडियमममधील खेळपट्टी कशी आहे?
भारतीय संघाची बाजू कायम फलंदाजांवर अवलंबून आहे. पण कोलंबोची खेळपट्टी तशी नसेल. कारण ही खेळपट्टी फिरकीपटूंना मदत करणार असणार आहे. त्यामुळे भारताला ताकही फुंकून प्यावं लागणार आहे. कारण पाकिस्तानकडे चांगला फिरकीचा मारा आहे. तसेच भारताची गेल्या वर्षात फिरकीविरुद्ध खेळण्याची क्षमता कमकुवत झाली आहे. त्यामुळे ही खेळपट्टी भारतीय फलंदाजांसाठी कसोटी असणार आहे. भारताने या सामन्यात चांगली फलंदाजी केली तर विजय पक्का असणार आहे. त्यामुळे नाणेफेकीचा कौल जिंकल्यावर प्रथम फलंदाजी करणं फायद्याचं ठरेल. पण दव फॅक्टरही तितकंच महत्त्वाचं आहे. त्यामुळे भारतीय गोलंदाजांचा कस लागेल.
भारत आणि पाकिस्तान टी20 वर्ल्डकप स्पर्धेत आतापर्यत आठवेळा आमनेसामने आले आहेत. भारताने त्यापैकी 7 सामन्यात विजय मिळवला आहे. तर पाकिस्तानने एकच सामना जिंकला आहे. पाकिस्तानचा एकमेव विजय 2021 टी20 वर्ल्डकप स्पर्धेत मिळवला होता. रेकॉर्ड जरी भारतीय संघाच्या बाजूने असला तरी कमी लेखून चालणार नाही. भारताला या सामन्यात रणनितीनुसार कामगिरी करावी लागेल. कारण खेळपट्टी ही फिरकीला मदत करणारी असणार आहे. यापूर्वी श्रीलंकेत खेळताना भारतीय संघ अडचणीत आला होता. त्यामुळे भारताला काळजी घ्यावी लागेल.
शहर
- पुणे: बारामतीत धक्कादायक घटना; तांदूळवाडीत एकाच घरात माय-लेकाचा संशयास्पद मृत्यू
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- मुंबई: मेक्सिकन पर्यटकाला लुटणे चालकाला पडले महागात! अवघ्या २ किमी प्रवासासाठी मागितले ५०० रुपये, पर्यटकाचे अस्खलित हिंदी उत्तर ऐकून ड्रायव्हरची उडाली दांडी!
महाराष्ट्र
- पुणे: बारामतीत धक्कादायक घटना; तांदूळवाडीत एकाच घरात माय-लेकाचा संशयास्पद मृत्यू
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- महाराष्ट्र: शेतकऱ्यांप्रमाणे आता मच्छिमारांनाही मिळणार कर्जमाफी? मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे तयार करणार कर्जमाफीची सविस्तर रूपरेषा!
गुन्हा
- मुंबई: लोकलमध्ये संतापजनक प्रकार जागेवरून झालेल्या वादानंतर धावत्या ट्रेनमधून खाली ढकलल्याने दिव्यांग वृद्धाचा मृत्यू!
- रत्नागिरी: ॲप डाउनलोड करून शुभेच्छा कार्ड तयार करणे पडले महागात; रत्नागिरीतील वृद्धाची साडेआठ लाखांची फसवणूक!
- पुणे: कोथरूडच्या एआरएआय टेकडीवर रक्ताच्या थारोळ्यात आढळला तरुणाचा मृतदेह
- नाशिक: १६ वर्षे लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या जोडीदाराची प्रियकराच्या मदतीने गळा चिरून हत्या, मृतदेह थेट कसारा घाटात फेकला
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशीभविष्य: १९ ऑगस्ट २०२६, ग्रह नक्षत्रांचा तुमच्या राशीवर काय होईल परिणाम?
- आजचे राशिभविष्य १५ ऑगस्ट २०२६: शनिदेवाची कृपा, या राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ!
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
- १३ ऑगस्ट २०२६ चे आजचे राशिभविष्य: श्रावण मासाच्या पहिल्या दिवशी कोणावर होणार शिवकृपा
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- साखर: तब्बल १० वर्षांनंतर भारतात होणार आयात! देशांतर्गत वाढत्या किंमती रोखण्यासाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय, १० लाख टन कच्ची साखर मागवण्यास मंजुरी!
- दिल्ली: बाळासाठी सोडली कॉर्पोरेट नोकरी वाटलं करिअर संपलं, स्निग्धाने होमस्टे व्यवसायातून उभा केला २१ लाखांचा महसूल!
- हैदराबाद: भरधाव 'ॲस्टन मार्टिन' कारची धडक, इनऑर्बिट मॉलबाहेर २६ वर्षीय तरुणीचा दुःखद अंत; आंध्र प्रदेशच्या राज्यसभा खासदाराच्या मुलावर गुन्हा दाखल!
- नवी दिल्ली: "आम्ही त्यांना आजच अपात्र घोषित करू शकतो का?" शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाचे मोठे सवाल

























Subscribe to my channel



