तंदुरस्त राहण्यासाठी आपण योग्य आहार घेत असतो. त्यात वेगवेगळ्या भाज्यांचा समावेश करतोच. तर भाज्या हे जीवनसत्त्वे आणि खनिजांचा एक उत्तम स्रोत आहेत, म्हणून तुमच्या रोजच्या आहारात विविध प्रकारच्या हंगामी भाज्यांचा समावेश करणे महत्वाचे आहे. यामुळे तुमच्या एकूण आरोग्याला फायदा होतो, जो तुमच्या चेहऱ्यावर दिसून येतो. कारण प्रत्येक भाज्यांमध्ये वेगवेगळे गुणधर्म असतात जे तुमची त्वचा आतून निरोगी ठेवते, सोबतच नैसर्गिक चमक देते. तसेच योग्य प्रमाणात भाज्यांचे सेवन त्वचेवरील मुरुम, डाग, रंगद्रव्य, केस गळणे आणि कमकुवत नखे यासारख्या सौंदर्य समस्या टाळण्यास देखील मदत करते. भाज्या खाल्ल्या जाऊ शकतात आणि त्या त्वचेवर लावू देखील शकतो. कारण काही भाज्यांमधील रस हे त्वचेवरील अनेक समस्या सोडवू शकतात.
तुमचे केस निरोगी बनवण्यापासून ते चमकदार त्वचा आणि नखे मजबूत करण्यापर्यंत भाज्या प्रभावी आहेत. कांद्यापासून ते लसूण, बटाटे, टोमॅटो आणि काकडीपर्यंत… चला जाणून घेऊयात वेगवेगळ्या भाज्यांचे रस तुमचे सौंदर्य कसे वाढवू शकतात.
बटाट्याचा रस तुमचा चेहरा उजळवेल
बटाट्याचा रस त्वचेला त्वरित उजळवतो. यासाठी बटाटा किसून किंवा त्याचे बारीक पातळ काप करून थेट तुमच्या चेहऱ्यावर लावू शकता किंवा बटाट्याचा रस, टोमॅटोचा रस, तांदळाचे पीठ आणि कोरफडीचे जेल मिक्स करून नंतर त्यात गुलाबजल टाका. हा फेस पॅक तुम्ही आठवड्यातून दोनदा चेहऱ्यावर लावल्याने उत्कृष्ट परिणाम पाहायला मिळेल. यामुळे टॅनिंग दूर होते आणि तुमची त्वचा नैसर्गिकरित्या चमकदार राहते.
कांद्याचा रस
कांद्याच्या रसाचे केसांसाठी आश्चर्यकारक फायदे आहेत, कारण त्यात सल्फर असते, जे केराटिनच्या निर्मितीस मदत करते. यामुळे केस मजबूत, जाड, चमकदार आणि काळे होतात. कांद्याच्या रसाचा योग्य प्रमाणात वापर केल्यास कोंडा देखील कमी होतो. तुम्ही कापसाच्या मदतीने तुमच्या स्कॅल्पला कांद्याचा रस लावू शकता आणि शॅम्पू करण्यापूर्वी एक तास तसेच राहू द्या.
टोमॅटो त्वचेवरील डाग दूर करतील
टोमॅटोच्या रसात बेसन आणि चिमूटभर हळद मिक्स करून तयार मिश्रण चेहऱ्यावर लावल्याने त्वचेवरील डाग हळूहळू कमी होतील आणि तुमची त्वचा स्वच्छ दिसेल. शिवाय टोमॅटो कापून एक तास रेफ्रिजरेटरमध्ये ठेवून नंतर तो गोलाकार हालचालीत चेहऱ्यावर हलका हाताने मसाज केल्यास छिद्रे घट्ट होतील आणि तुमचा चेहरा तेजस्वी दिसेल.
नखांसाठी लसूण उपयुक्त
तुम्ही लसणाचा रस काढून त्यात तुमचे नखे थोडा वेळ बुडवू शकता. नंतर 10 मिनिटांनी नखं धुवा आणि त्यांना चांगले मॉइश्चरायझर लावा. यामुळे तुमचे नखे चमकदार आणि मजबूत होतील. तुम्ही लसणाच्या पाकळ्या सोलून थेट तुमच्या नखांवर लावू शकता.
काकडीचा रस अद्भुत आहे
तुम्ही काकडी किसून डोळ्यांवर ठेवू शकता. यामुळे डोळ्यांना थंडावा मिळतोच आणि काळी वर्तुळे रोखण्यासाठी देखील प्रभावी काम करते. तुमच्या पायांची त्वचा खूप कोरडी झाली असेल तर तुम्ही ती हायड्रेट करण्यासाठी काकडीचा रस वापरू शकता. यासाठी, लिंबू आणि काकडीचा रस किंवा त्याची पेस्ट ऑलिव्ह ऑइलमध्ये मिक्स करा आणि तुमच्या त्वचेला लावा. अशा प्रकारे वेगवेगळ्या भाज्या तुमचे सौंदर्य वाढवण्यासाठी खूप प्रभावी ठरू शकतात.
( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)
शहर
- छत्रपती संभाजीनगर: काळीज पिळवटणारी घटना! घरी बनवलेली खिचडी खाल्ल्याने विषबाधा होऊन २४ तासांत लहान भाऊ अन् बहिणीचा उपचारादरम्यान मृत्यू
- छत्रपती संभाजीनगर: लग्नाचा प्रस्ताव नाकारल्याच्या रागातून मेडिकल दुकानात घुसून २२ वर्षीय केमिस्टची निर्घृण हत्या, पोलिसांनी अवघ्या ९ तासांत आवळल्या आवडी
- अहिल्यानगर: दूध वाहतूक करणाऱ्या चालकाला एकट्यात गाठून कोयत्याने सपासप वार करत संपवले, खर्ड्यातील घटनेने खळबळ
- पुणे: ज्येष्ठ विचारवंत, राजकीय विश्लेषक व काँग्रेसचे निष्ठावान नेते डॉ. रत्नाकर महाजन यांचे पुण्यात निधन; पुरोगामी चळवळीचा अभ्यासू चेहरा हरपला
महाराष्ट्र
- रत्नागिरी: कोकणातील अंगावर काटा आणणारी वास्तवता! राजापूर तालुक्यातील सागवे वाडपवाडीत मृतदेह नेण्यासाठी ग्रामस्थांना चक्क पात्रातून काढावा लागतोय पायी रस्ता
- सातारा: देशसेवेदरम्यान शहीद झालेले वीर जवान रोहित पवार यांच्यावर साताऱ्यातील चिंचणी येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; साऱ्यांचे डोळे झाले पाणावले
- रत्नागिरी: कोकण किनारपट्टीवर आजपासून वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता! हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा जारी
- छत्रपती संभाजीनगर: काळीज पिळवटणारी घटना! घरी बनवलेली खिचडी खाल्ल्याने विषबाधा होऊन २४ तासांत लहान भाऊ अन् बहिणीचा उपचारादरम्यान मृत्यू
गुन्हा
- अहिल्यानगर: दूध वाहतूक करणाऱ्या चालकाला एकट्यात गाठून कोयत्याने सपासप वार करत संपवले, खर्ड्यातील घटनेने खळबळ
- हिंगोली: तू पोलिसांना टिप का देतोस? खबरी असल्याच्या संशयातून वसमतमध्ये २२ वर्षीय तरुणाची विटा-दगडने ठेचून निर्घृण हत्या
- पुणे: बारामतीत खळबळ! झुंबा डान्स क्लासवर कारवाई न करण्यासाठी ५ लाखांची लाच स्वीकारताना पोलीस हवालदार एसीबीच्या जाळ्यात
- उत्तर प्रदेश: प्रशासकीय हलगर्जीपणाचा कळस! उत्तर प्रदेशमधील पूरग्रस्त भागात मदत म्हणून वाटले एक्स्पायर्ड कफ सिरप, लहान मुलांची प्रकृती बिघडली
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य ९ सप्टेंबर २०२६: सिंह राशीतील चंद्र गोचरमुळे ‘डबल धमाका’ आणि मालमत्ता वाढीचे योग!
- आजचे राशिभविष्य ७ सप्टेंबर २०२६ : शेवटचा श्रावणी सोमवार या राशींसाठी ठरणार भाग्यशाली, शिवकृपा लाभणार!
- आजचे राशिभविष्य ५ सप्टेंबर २०२६ दहीहंडी विशेष: चंद्र-मंगळ योगामुळे या राशींना मिळणार प्रचंड धनलाभ आणि करिअरमध्ये यश!
- आजचे राशिभविष्य 4 सप्टेंबर 2026 : जन्माष्टमीच्या दिवशी ग्रहांचा शुभ संयोग या राशींसाठी नशीब बदलवणारा, श्रीकृष्णाची मिळणार कृपा !
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- दिल्ली: देशातून जातीव्यवस्था समूळ नष्ट करा, आम्ही स्वतःहून आरक्षण सोडायला तयार आहोत; केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंचे मोठे विधान
- नवी दिल्ली: राहुल गांधींच्या खटल्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण; न्यायमूर्ती सूर्यकांत म्हणाले न्यायालयासमोर सगळे समान आहेत, कोणीही श्रेष्ठ नाही
- उत्तर प्रदेश: प्रशासकीय हलगर्जीपणाचा कळस! उत्तर प्रदेशमधील पूरग्रस्त भागात मदत म्हणून वाटले एक्स्पायर्ड कफ सिरप, लहान मुलांची प्रकृती बिघडली
- तमिळनाडू: टीव्हीकेचे नेते विजय यांच्या सरकारसमोर मोठे राजकीय संकट, विरोधकांचे सरकार कोसळण्याचे भाकीत आणि नव्या समीकरणांची चर्चा


























Subscribe to my channel



