“आजी, मी शाळेत जातोय!’ असं मी दररोज सकाळी दारातून ओरडायचो. त्यावर तिचा तो धारदार पण प्रेमळ आवाज यायचा: “मी किती वेळा समजावून सांगू? ‘जातोय’ असं कधीच म्हणू नकोस, फक्त ‘शाळेत जाऊन परत येईन’ असं म्हण.’ मी तिच्याकडे पाहिल्याशिवाय कधीच राहायचो नाही, “काय फरक पडतो’ आणि ती जे म्हणाली होती तेच पुन्हा म्हणून मी पळून जायचो. ते दोन शब्द-”मी येतोय’-सुरक्षितता आणि आश्वासनाचा एक अलिखित करार होता. ज्यावर आमचे वडीलधारी विश्वास ठेवत असत. त्यांना दारात उभे राहून हात हलवण्याची किंवा चुंबन पाठवण्याची गरज नव्हती. आम्ही निघताना ते आमच्याकडे काळजीयुक्त नजरेने पाहत नसत. हे ते दिवस होते जेव्हा आमच्याकडे काहीच नव्हते. आणि तरीही आम्हाला कशाचीही कमतरता नव्हती. ते आम्हाला अनवाणी आणि मोकळ्या मनाने जगात जाऊ देत. या विश्वासाने की गाव आम्हाला सुखरूप परत आणेल. आमचे पाय चिखलाने माखले तरी आम्ही रडत नसू. आम्ही रस्त्याच्या कडेला असलेल्या हातपंपावरून पाणी काढायचो. अंगावरची धूळ झटकून टाकायचो आणि वर्गाच्या जमिनीवर मांडी घालून बसायचो. त्या काळी, आम्हाला आमच्या प्रगतिपुस्तकाची (रिपोर्ट कार्डची) चिंतासुद्धा नव्हती. उत्तीर्ण किंवा अनुत्तीर्ण एवढंच महत्त्वाचं होतं. मोठ्यांकडून बोलणी खाणं ही रोजचीच गोष्ट होती; त्यामुळे कोणताही मानसिक आघात होत नसे. जर एखाद्या अनोळखी व्यक्तीने खोडसाळपणाबद्दल आमचे कान पिळले, तर आम्ही वकील शोधायला धावत नसायचो-आम्ही ते सहज स्वीकारायचो. गावात सामाजिक पालकत्वाची पद्धत होती. आम्ही सर्वांचेच होतो. तेव्हा आमच्यासाठी सर्वात मोठी शरमेची गोष्ट कोणती होती? शिकवणीला (ट्युशनला) जाणं. 1960 च्या दशकात, अतिरिक्त वर्गांचा अर्थ असा होता की, एखादी गोष्ट पहिल्याच प्रयत्नात समजण्याइतके तुम्ही हुशार नाही. आणि आमची सर्वात मोठी चैन कोणती होती? सायकलच्या पुढच्या दांड्यावर किंवा गंजलेल्या कॅरियरवर बसून धुळीच्या वाटेवरून वेगाने सायकल चालवणे आणि फळे तोडण्यासाठी सायकलचा शिडीसारखा वापर करणे. तेव्हा आम्हाला वाटायचं की जणू आम्ही जग जिंकलं आहे. ते दिवस होते जेव्हा सर्वात मोठ्या आशा जुन्या पुस्तकांमध्ये होत्या. आम्ही पुस्तकांच्या पानांमध्ये मोराची पिसे आणि वाळलेली पिंपळाची पाने खोचत असू. या भोळ्या विश्वासाने की त्यामुळे आम्ही अधिक शहाणे होऊ. त्या नाजूक, सांगाड्यासारख्या दिसणाऱ्या पानांमध्ये-जी एखाद्या ललित कलेसारखी वाटत होती. रुजलेली ही श्रद्धा आम्हाला अशी एक गोष्ट देत असे, जी शहरांमध्ये क्वचितच मिळते-शुद्ध, निर्भेळ आशा. त्या काळी, प्रत्येक पाठ्यपुस्तकाला तपकिरी रंगाचे कव्हर असायचे आणि ती कापडी पिशव्यांमध्ये व्यवस्थित ठेवली जात असत. कारण ती फक्त आमची नव्हती. पुढच्या वर्षी ‘जुनी’ पुस्तके म्हणून विकण्यासाठी ती जपून ठेवावी लागत असत. त्यानंतर अभ्यासक्रम बदलेपर्यंत, मी आठवीपर्यंत जुन्या पुस्तकांचा वापर करूनच शिकलो. तरीही, आमच्या आई-वडिलांनी अभ्यासाच्या ओझ्याबद्दल कधीच तक्रार केली नाही. आयुष्य निश्चितच मर्यादित होते, पण आम्हाला कधीही गरिबी जाणवली नाही. दक्षिण भारतातील ‘मंदिरांचे शहर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कुंभकोणममध्ये-जिथे मी माझे बालपण, प्राथमिक शिक्षणासह, घालवले-संस्कृती पाठ्यपुस्तकांमधून शिकवली जात नव्हती; ती मातीत खोलवर रुजलेली होती. प्रत्येक गल्ली आणि वस्तीत मंदिरे असल्याने, ते रस्तेच पवित्र वाटत असत. रस्त्यावर थुंकण्याची, कचरा टाकण्याची किंवा तो प्रदूषित करण्याची कोणाचीही हिंमत होत नसे. याचे कारण म्हणजे एक अदृश्य सामाजिक धागा आम्हाला एकत्र बांधून ठेवत होता-भूमी, वडीलधारी मंडळी, प्राचीन मंदिरे आणि बारमाही कावेरी नदी यांच्याबद्दलचा आदर. निसर्ग आमच्यासाठी शोषण करण्याचे साधन नव्हता; उलट, ती आमच्या जीवनाचा अविभाज्य भाग असलेली एक देवी होती. शनिवारी जेव्हा मी वाचले की गोव्यातील 56 गावांतील लोक, त्यांना ‘शहरी क्षेत्र’ म्हणून पुनर्वर्गीकृत करण्याच्या सरकारच्या निर्णयामुळे नाराज झाले आहेत. फंडा असा की... आधुनिक शहरे कधीही घरासारखी शांतता निर्माण करू शकत नाहीत, जिथे एखादे मूल ‘मी जाऊन परत येतोय’ असे म्हणू शकेल आणि त्याला खात्री असेल की ‘सामाजिक पालक’ त्याची काळजी घेण्यासाठी आहेत. आज, जेव्हा मी शहरांमधील गर्दीने भरलेले पण उदासीन रस्ते पाहतो. तेव्हा मला जुन्या दिवसांतील सुरक्षिततेची आठवण येऊ लागते.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- जालना: सरकारने चर्चेची दारे खुली ठेवलीत, पण मनोज जरांगे पाटलांचा एल्गार; म्हणाले, माघार नाही!
- मुंबई: नेपाळमधील महाप्रलय: मेसेजला सिंगल टिक, नेटवर्क नसेल का? ठाण्यातील समीर व अपर्णा जोशी यांच्या कुटुंबांची वाढली घालमेल
- नाशिक: समृद्धी महामार्गावर दरोडेखोरांची दहशत; धावत्या वाहनांचे टायर पंक्चर करत छ. संभाजीनगरच्या कुटुंबाला १८ लाखांना लुटले, सिन्नर तालुक्यात खळबळ
- पुणे: प्रेयसीच्या आजाराबद्दल समजताच प्रियकराचं धक्कादायक रूप; पुण्यातील तरुणीने संपवले जीवन, चारित्र्यावर संशय घेणाऱ्या नराधम प्रियकराला अटक
महाराष्ट्र
- जालना: सरकारने चर्चेची दारे खुली ठेवलीत, पण मनोज जरांगे पाटलांचा एल्गार; म्हणाले, माघार नाही!
- जळगाव: रक्षाबंधनादिवशी स्टेटस ठेवून भावाने संपवले जीवन, सणाचा आनंद शोकात बदलला
- मुंबई: नेपाळमधील महाप्रलय: मेसेजला सिंगल टिक, नेटवर्क नसेल का? ठाण्यातील समीर व अपर्णा जोशी यांच्या कुटुंबांची वाढली घालमेल
- नाशिक: समृद्धी महामार्गावर दरोडेखोरांची दहशत; धावत्या वाहनांचे टायर पंक्चर करत छ. संभाजीनगरच्या कुटुंबाला १८ लाखांना लुटले, सिन्नर तालुक्यात खळबळ
गुन्हा
- पुणे: बारामतीत धक्कादायक घटना; तांदूळवाडीत एकाच घरात माय-लेकाचा संशयास्पद मृत्यू
- मुंबई: लोकलमध्ये संतापजनक प्रकार जागेवरून झालेल्या वादानंतर धावत्या ट्रेनमधून खाली ढकलल्याने दिव्यांग वृद्धाचा मृत्यू!
- रत्नागिरी: ॲप डाउनलोड करून शुभेच्छा कार्ड तयार करणे पडले महागात; रत्नागिरीतील वृद्धाची साडेआठ लाखांची फसवणूक!
- पुणे: कोथरूडच्या एआरएआय टेकडीवर रक्ताच्या थारोळ्यात आढळला तरुणाचा मृतदेह
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य: २० ऑगस्ट २०२६ रोजी तुमच्या राशीवर काय असेल ग्रहांची स्थिती? जाणून घ्या सविस्तर!
- आजचे राशीभविष्य: १९ ऑगस्ट २०२६, ग्रह नक्षत्रांचा तुमच्या राशीवर काय होईल परिणाम?
- आजचे राशिभविष्य १५ ऑगस्ट २०२६: शनिदेवाची कृपा, या राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ!
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

पुण्यात NCP कार्यालयाबाहेर तरुणांच्या दोन गटांत राडा; एकमेकांना मारहाण
मुंबई लोकलच्या छतावर चढला तरुण; ओव्हरहेड वायरच्या संपर्कात येऊन 45% भाजला
वादळाआधीच मेक्सिकोत जोरदार वाऱ्यांचा तडाखा; मैदानातून खेळाडूंची धावपळ!
देश विदेश
- मुंबई: नेपाळमधील महाप्रलय: मेसेजला सिंगल टिक, नेटवर्क नसेल का? ठाण्यातील समीर व अपर्णा जोशी यांच्या कुटुंबांची वाढली घालमेल
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- साखर: तब्बल १० वर्षांनंतर भारतात होणार आयात! देशांतर्गत वाढत्या किंमती रोखण्यासाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय, १० लाख टन कच्ची साखर मागवण्यास मंजुरी!
- दिल्ली: बाळासाठी सोडली कॉर्पोरेट नोकरी वाटलं करिअर संपलं, स्निग्धाने होमस्टे व्यवसायातून उभा केला २१ लाखांचा महसूल!

























Subscribe to my channel


