जेव्हा इतर कंपन्या आपले बजेट गोठवत असतात आणि एखादी कंपनी वेगाने नोकरभरती करू लागते, तेव्हा साहजिकच तुमचे लक्ष त्याकडे वेधले जाते. म्हणूनच, जेव्हा मी ऐकले की थायलंडमध्ये मुख्यालय असलेले ॲग्री-टेक स्टार्टअप ‘लिव्हिंग रूट्स’, जे अभी अग्रवाल आणि अविका नरुला यांनी सुरू केले आहे, ते अतिरिक्त लोकांची भरती करत आहे, तेव्हा मला आश्चर्य वाटले की असे का? कुतूहलापोटी केलेल्या शोधात जगभरातील अशा कंपन्यांचा शोध लागला, ज्यांनी शेतकऱ्यांच्या समस्या ओळखल्या आहेत आणि त्यावर उपाय तयार करत आहेत. लिव्हिंग रूट्स त्यापैकीच एक आहे. ही कंपनी स्थानिक कचरा, सहजीवी मायक्रोब्स आणि एआयआधारित डेटाच्या माध्यमातून रासायनिक खतांना सेंद्रिय पर्याय तयार करते, जेणेकरून मातीचे आरोग्य सुधारेल आणि पारंपरिक रसायनांवरील अवलंबित्व कमी होईल. जगात ग्राहक वस्तूंच्या पुरवठ्याची जीवनरेखा असलेल्या होर्मुझ सामुद्रधुनीला बाधित करणारे भू-राजकीय तणाव निवळताना दिसत नाहीत. अशा स्थितीत खतांची समस्या दीर्घकाळ टिकू शकते. संघर्ष लांबला तर जगात पिकांचे उत्पादन घटू शकते आणि किराणा महाग होऊ शकतो. अतिरिक्त 4.5 कोटी लोकांना गंभीर अन्न असुरक्षिततेला सामोरे जावे लागू शकते, असा इशारा यूएनच्या अन्न आणि कृषी संघटनेने दिला आहे. शेतकरी अनेक महिने, किंबहुना वर्षभरापूर्वीच नियोजन करत असल्यामुळे, अनेक शेतकरी आता 2027 च्या उत्पादनाचा अंदाज लावू लागले आहेत. दुसरीकडे, जागतिक बँकेचा अंदाज आहे की या वर्षी खतांच्या किमती एक तृतीयांशने वाढू शकतात. याची खरेदी क्षमता 2022 मध्ये सुरू झालेल्या रशिया-युक्रेन युद्धानंतरच्या सर्वात वाईट पातळीवर पोहोचू शकते. परिणामी, शेतकरी प्रचंड दबावाखाली आहेत. विशेषतः यामुळे, कारण मोठ्या प्रमाणावर वापरल्या जाणाऱ्या नायट्रोजन खत युरियाचा मोठा हिस्सा आखाती देशांतूनच येतो. कृषी व्यवसाय याचा फटका सहन करत आहेत. काही लोक शेणखतासारख्या जुन्या पद्धतींकडे परतत आहेत, तर काही रसायनांवरील अवलंबित्व कमी करणाऱ्या नवीन तंत्रज्ञानाचा वापर करत आहेत. यामध्ये बदामाच्या टरफलांपासून बनवलेल्या इनपुटपासून ते प्रगत मायक्रोबियल उत्पादनांचा समावेश आहे. असेच काम करणारी कॅलिफोर्नियाची ‘नायट्रिसिटी’ आपली क्षमता वाढवत आहे आणि तिचे अंदाजित उत्पादन 2028 पर्यंत बुक झाले आहे. मलेशियातील दुग्ध उत्पादक ‘फार्म फ्रेश’ गुरांचा कचरा कृमींना खाऊ घालते. बदल्यात ते कृमी ते गवत सुपीक बनवतात, जे त्यांच्या गाई खातात. ही कंपनी पूर्वीही असे करत असली, तरी या वर्षी युरियाच्या किमती वाढल्याने ती यावर अधिक अवलंबून राहिली. कंपनीच्या मुख्य आर्थिक अधिकाऱ्यांनी सार्वजनिकपणे सांगितले की, ते त्यांच्या जमिनीवर कोंबड्यांची विष्ठा टाकतात. खरे तर, परदेशात पीक वाढीचे मार्ग शोधणाऱ्या शेतकऱ्यांसाठी पोल्ट्री खत हे सर्वाधिक मागणी असलेले उत्पादन बनले आहे. लिव्हिंग रूट्सचा दावा आहे की त्यांचे ‘फोटोबूस्ट’ नावाचे उत्पादन रासायनिक खतांचा वापर 50 टक्क्यांपर्यंत आणि खर्च 20 टक्क्यांपर्यंत कमी करू शकते. मोठ्या प्रमाणात कोंबड्यांची विष्ठा वाहून नेणारे ट्रान्सपोर्टरही चांगली कमाई करत आहेत. शिवाय, फ्रान्सचे स्टार्टअप ‘टूपी ऑरगॅनिक्स’ आहे, जे शाळांमधून मानवी मूत्र गोळा करून त्याचे अशा बॅक्टेरियल फीडमध्ये रूपांतर करते, जे वनस्पतींच्या वाढीस उपयुक्त ठरते. वाचायला जरी हे विचित्र वाटत असले, तरी सध्या खऱ्या जगात हेच उपाय अमलात येत आहेत. जेव्हा जागतिक कृषी समुदाय या टंचाईवर मात करण्यासाठी व्यावहारिक पर्यायांच्या प्रतीक्षेत आहे, तेव्हा बाजारात एक पोकळीही निर्माण झाली आहे. व्यवसाय सुरू करण्याच्या तयारीत असलेल्या सुशिक्षित उद्योजकांसाठी हीच संधी आहे की त्यांनी शेतीच्या या समस्यांवर उपाय शोधून परिस्थिती आपल्या बाजूने वळवावी. पण हे तितके सोपे नाही. या उपायांची मोठ्या प्रमाणावर अंमलबजावणी करणे हे अजूनही मोठे आव्हान आहे, कारण अनेक दशकांपासून पारंपरिक खतांवर अवलंबून असलेले शेतकरी अनोळखी उत्पादनांवर विश्वास ठेवण्यास सहसा तयार नसतात. काही जैविक उपाय स्थिरतेच्या समस्येशीही झुंजत आहेत. उदाहरणार्थ, मुसळधार पावसात मायक्रोब्स वाहून जातात. पण यामुळे पर्याय तयार करण्याच्या प्रयत्नांमध्ये खंड पडता कामा नये. फंडा हा आहे की, जर तुम्ही भविष्यातील समस्या आधीच ओळखली आणि वेळेवर उपाय तयार केला, तर नफा आपोआप तुमच्या मागे येईल.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- पुणे: अण्णाभाऊ साठे जयंती मिरवणुकीत डीजेवरील वादानंतर रक्तरंजित थरार; टोळक्याच्या बेदम मारहाणीत तरुण जागीच ठार, १० जण अटकेत
- पुणे: सदाशिव पेठेत पोलीस व्हॅनचा थरार! भरधाव गाडीने उडवल्या अनेक वाहने, सीसीटीव्ही व्हिडिओ व्हायरल
- पुणे: पाण्याची चिंता मिटली! खडकवासला धरणसाखळीतील चारही धरणे तुडुंब भरण्याच्या मार्गावर, पाणीसाठा ९६ टक्क्यांवर
- मुंबई: जुलैमध्ये पावसाचा दिलासा, शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद, पण ऑगस्टमध्ये काय होणार? हवामान विभागाचा ताजा अंदाज
महाराष्ट्र
- राज्यातील ९० लाखांहून अधिक शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी; पीएम किसान आणि नमो शेतकरी योजनेचे ४००० रुपये एकत्रित मिळणार का
- नागपुर: अवघ्या एकाच दिवसात तीन वेगवेगळ्या महिलांच्या अंगावरील लाखांचे सोन्याचे दागिने लांबवले
- वर्धा: एटीएम फोडून १२ लाखांची रोकड लांबवली; पुरावा नष्ट करण्यासाठी चोरांनी एटीएमलाच लावली आग
- पुणे: अण्णाभाऊ साठे जयंती मिरवणुकीत डीजेवरील वादानंतर रक्तरंजित थरार; टोळक्याच्या बेदम मारहाणीत तरुण जागीच ठार, १० जण अटकेत
गुन्हा
- अमरावती: बापट चौकात मध्यरात्री रक्ताचा थरार; तरुणाची निर्घृण हत्या, शहरात एकच खळबळ
- पुणे: सिंहगड रोड परिसरात खळबळ; किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या, परिसरात तीव्र संताप
- सांगली: बकरी विकण्याच्या आमिषाखाली ठाणे आणि सोलापूरमधील चार जणांची सायबर फसवणूक; सांगलीच्या सिमकार्डचा वापर
- ठाणे: उल्हासनगरमध्ये सायबर फसवणूक; लंडनच्या डॉक्टर मित्राकडून २५ हजार पाउंड्सचे आमिष दाखवून महिला डॉक्टरला २ लाखांना गंडा
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- आजचे राशिभविष्य १ ऑगस्ट २०२६: महिन्याची सुरुवात या राशींसाठी धडाक्यात, मिळणार गुडन्यूज तर या राशींची उडणार तारांबळ
- आजचे राशिभविष्य ३१ जुलै २०२६: या भाग्यवान राशींवर असणार श्रीगणेशाची कृपा, संपत्ती आणि लाभाचे योग
- आजचे राशिभविष्य ३० जुलै २०२६: या राशींच्या कुंडलीतील ग्रह मजबूत, स्वामींची साथ मिळणार तर काहींचे वाढणार टेन्शन
- आजचे राशिभविष्य २९ जुलै २०२६: गणपती बाप्पाच्या कृपेने ‘या’ राशींना मिळणार नवीन नोकरी आणि आनंदाची बातमी
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- ग्लास्गो राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताचा ऐतिहासिक पराक्रम; ज्युडोमध्ये सुवर्णपदक जिंकणारी अस्मिता डे ठरली पहिली भारतीय खेळाडू!
- गोवा: बांबोळीतील 'फुलान्चो खुरीस'जवळ भीषण अपघात; वाहन पेट घेतल्याने एक जण ठार, तर दोघे जण गंभीर जखमी
- नवी दिल्ली: आधार कार्डमध्ये पत्ता अपडेट करणे झाले आणखी सोपे; नवीन अॅपवरून घरबसल्या करा अर्ज
- जम्मू-काश्मीर: कुलगाममधील केल्लम भागात दहशतवादी हल्ला, छत्तीसगडच्या दोन मजुरांचा मृत्यू; 'लष्कर-ए-तैयबा'कडून कृत्याची कबुली




























Subscribe to my channel




