इराण, इस्रायल आणि अमेरिका यांच्यातील संघर्षाने रौद्र रूप धारण केले आहे. यामुळे सध्या दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर युद्धसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. मध्यपूर्व आशियातील सर्वच विमानतळावर अशीच काहीशी परिस्थिती पाहायला मिळत आहे. यामुळे अनेक भारतीय नागरिक हे परदेशात अडकले आहेत. भारत सरकार त्यांच्या सुटकेसाठी प्रयत्न करत आहेत. त्यातच काल भारत सरकार आणि एमिरेट्स (Emirates) विमान कंपनीच्या समन्वयाने एका विशेष विमानाचे आयोजन करण्यात आले. हे विशेष विमान आज पहाटे ३ वाजता मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर दाखल झाले. यानंतर अनेकांनी सुटकेचा नि:श्वास सोडत भारत सरकारचे आभार मानले आहेत. यानंतर एका प्रवाशाने दुबईत नेमकी कशी परिस्थिती होती याबद्दलची माहिती दिली.
नेमकं काय घडलं?
इराण आणि इस्रायलमधील युद्धाने रौद्र रूप धारण केल्यामुळे मध्यपूर्वेतील आकाश सध्या क्षेपणास्त्रे आणि ड्रोनच्या आवाजाने हादरले आहे. याच युद्धाचा थेट फटका दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला बसला. दोन दिवसांपूर्वी दुबई विमानतळाच्या परिसरात झालेल्या हल्ल्यामुळे मोठी भीती पसरली होती. दुबई विमानतळावर धुराचे साम्राज्य होते. सर्वत्र काळा धूर पसरला होता. यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव सर्व आंतरराष्ट्रीय उड्डाणे तातडीने रद्द करण्यात आली. यामध्ये भारताच्या विविध शहरांत जाणारे शेकडो प्रवासी विमानतळावरच अडकून पडले होते.
स्विमिंग पूलमध्ये जाण्यासही मनाई
मर्चंट नेव्हीमध्ये रुजू होण्यासाठी निघालेल्या अजय सिंग यांच्यासाठी हा प्रवास एका दुख:द स्वप्नासारखा ठरला. मी दुबई विमानतळावर कनेक्टिंग फ्लाईटची प्रतीक्षा करत होते. त्याचवेळी हा हल्ला झाला. अचानक एक मोठा स्फोट झाला. यामुळे संपूर्ण विमानतळ धुराने भरून गेले. यानंतर विमानतळावर घबराट पसरली. काही लोक जीव वाचवण्यासाठी सैरावैरा धावू लागले. आम्हाला तातडीने सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आणि एका हॉटेलमध्ये ठेवण्यात आले. तिथे इतके कडक निर्बंध होते की आम्हाला हॉटेलच्या खोलीबाहेर पडण्यास, अगदी स्विमिंग पूलमध्ये जाण्यासही मनाई होती, असे अजय सिंग यांनी सांगितले.
अनेकांकडून जमिनीला स्पर्श करून कृतज्ञता व्यक्त
आम्ही रात्रभर ज्या हॉटेलमध्ये होतो, तिथे फक्त स्फोटांचे आणि विमानांचे आवाज येत होते. आम्ही घरी परतण्याची आशा सोडली होती. हॉटेलमध्ये अनेक थकलेले प्रवासी जेव्हा इफ्तारची तयारी करत होते, तेव्हाच अचानक घोषणा झाली की, भारतीयांसाठी एका विशेष विमानाची व्यवस्था करण्यात आली आहे. एमिरेट्स विमान कंपनीने पुढाकार घेत या प्रवाशांसाठी तातडीने उड्डाण आयोजित केले, असेही त्यांनी म्हटले.
ही घोषणा होताच प्रत्येक भारतीय व्यक्तींनी एकही क्षण वाया न घालवता आपले सामान गोळा केले आणि विमानतळाकडे धाव घेतली. आज पहाटे ३ वाजता जेव्हा हे विशेष विमान मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरले, तेव्हा प्रत्येक प्रवाशांच्या डोळ्यात आनंदाश्रू होते. विमानातून बाहेर पडताच अनेकांनी जमिनीला स्पर्श करून कृतज्ञता व्यक्त केली. मी तिथे जे पाहिले ते भयानक होते, पण आता आपल्या देशाच्या मातीवर पाऊल ठेवताच सर्व भीती नाहीशी झाली आहे. आता आम्ही सुरक्षित आहोत, अशी भावना अजय सिंग यांनी व्यक्त केली.
[embedded content]
शहर
- पुणे: फुरसुंगी गोळीबार प्रकरणात बिष्णोई टोळीचा सोशल मीडिया कनेक्शन; Signal ॲपवरून होत होता गुप्त संवाद
- पुणे: सरकारी कर्ज मिळवून देण्याच्या आमिषाने शेकडो महिलांची फसवणूक; मुख्य आरोपीला अटक
- पुणे: व्हिडिओ रेकॉर्ड करून कंत्राटदाराची आत्महत्या; आर्थिक वादातील गंभीर आरोपांमुळे खळबळ
- कोल्हापूर : भरदिवसा भाजप कार्यकर्त्यावर गोळीबार; खासगी सावकारीच्या वादातून हल्ल्याचा संशय
महाराष्ट्र
- पुणे: फुरसुंगी गोळीबार प्रकरणात बिष्णोई टोळीचा सोशल मीडिया कनेक्शन; Signal ॲपवरून होत होता गुप्त संवाद
- पुणे: सरकारी कर्ज मिळवून देण्याच्या आमिषाने शेकडो महिलांची फसवणूक; मुख्य आरोपीला अटक
- पुणे: व्हिडिओ रेकॉर्ड करून कंत्राटदाराची आत्महत्या; आर्थिक वादातील गंभीर आरोपांमुळे खळबळ
- कोल्हापूर : भरदिवसा भाजप कार्यकर्त्यावर गोळीबार; खासगी सावकारीच्या वादातून हल्ल्याचा संशय
गुन्हा
- कोल्हापूर : भरदिवसा भाजप कार्यकर्त्यावर गोळीबार; खासगी सावकारीच्या वादातून हल्ल्याचा संशय
- कोल्हापूर: उसने दिलेल्या पैशांसाठी तगादा लावणाऱ्या महिलेचा विष पाजून खून; दीड महिन्यानंतर पोलिसांनी उलगडला थरारक गुन्हा
- जळगाव: विवाहितेचे मुलासह अपहरण; दोन महिने डांबून ठेवत नराधमाकडून अत्याचार
- यवतमाळ: कौटुंबिक वादातून सासऱ्याने जावयाची हत्या केल्याचा आरोप; परिसरात खळबळ
राजकीय
- दिल्ली: अमित शाहांच्या भेटीनंतर शिंदे गटाला मिळणार दोन मंत्रिपदे? 'या' नेत्यांच्या नावाची चर्चा.
- सिंधुदुर्ग: सावंतवाडी पाणीपुरवठा योजनेला वेग; आमदार दीपक केसरकर आणि जिल्हाधिकाऱ्यांकडून प्रकल्पाची प्रत्यक्ष पाहणी!
- नाशिक: १२ नगरसेवक फुटण्याच्या भीतीने उद्धव ठाकरे स्वतः रिंगणात; मातोश्रीवर होणार 'वन-टू-वन' चर्चा.
- मुंबई: महाराष्ट्रात समान नागरी कायदा (UCC) लागू करण्याच्या हालचालींना वेग; दोन आठवड्यांत स्थापन होणार तज्ज्ञ समिती.
इतर
- आजचे राशिभविष्य १५ जुलै: गणरायाची विशेष कृपा या राशींवर; काहींनी आर्थिक आणि आरोग्याची घ्यावी काळजी.
- मुंबई: व्हायरल ताप, डेंग्यू आणि गॅस्ट्रोच्या रुग्णांत १५ ते २० टक्क्यांनी वाढ; 'या' लक्षणांकडे करू नका दुर्लक्ष!
- आजचे राशिभविष्य (१४ जुलै २०२६): गणरायाच्या कृपेने 'या' राशींना धनलाभ, यश आणि नव्या संधींची चाहूल!
- आजचे राशिभविष्य १३ जुलै २०२६: या राशींना होणार बंपर लाभ, आजचा दिवस ठरेल खास!
मनोरंजन
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
- क्रिकेट विश्व: क्रिकेटर सौरव गांगुली च्या बायोपिक चं पहिलं पोस्टर रिलीज !
विडियो गॅलेरी

देश विदेश
- छत्रपती संभाजीनगर: स्नॅपचॅटवरील प्रेमाची साद! ओडिशाहून प्रेमाखातर थेट महाराष्ट्रात पोहोचली १९ वर्षीय तरुणी.
- गोवा: सात खाण कंपन्यांना मोठा दिलासा; बेकायदा खाणकामप्रकरणी दाखल FIR मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाकडून रद्द
- उत्तर प्रदेश: ४९ वर्षांनंतर न्याय; १९७७ च्या हत्याकांडातील पाच आरोपींची सर्वोच्च न्यायालयाकडून निर्दोष मुक्तता
- जागतिक तेल संकट अटळ? होर्मुझमधील तणावामुळे 'सेफ्टी बफर' झाले रिकामे; IMF चा गंभीर इशारा.























Subscribe to my channel




