न्यायव्यवस्थेमध्ये एक विशिष्ट प्रकारचा आत्मविश्वास असतो. तो तिला जीवनातील मोठ्या प्रश्नांवर निर्णय देण्यास सक्षम बनवतो. त्यात संकोच नसतो.आत्मसंशय नसतो; उलट आपल्या समोरील याचिकानीट वाचून आणि युक्तिवाद काळजीपूर्वक ऐकूनघेतलेल्या व्यक्तीची ठाम भूमिका त्यात दिसते. त्यामुळेत्यांच्या निर्णयांत संदिग्धता किंवा अर्धवटपणाला जागाराहत नाही. भोजशाला प्रकरणच घ्या. न्यायालयासमोर प्रश्न होताकी भोजशाला परिसर — येथे कमाल मौला मशीद असल्याचे सांगितले जाते — त्याचे मूळ स्वरूप हिंदू मंदिराचे आहे का? तेथे शुक्रवारी नमाज आणिमंगळवार व वसंत पंचमीला सरस्वती पूजेची व्यवस्थासुरू ठेवावी का? न्यायालयाने त्या परिसराला मंदिरमानत हिंदूंना प्रवेशाची परवानगी दिली. मुस्लिमांनामशीद बांधण्यासाठी इतर योग्य जागेची मागणी करण्यासाठी अर्ज करण्याची मुभाही दिली. मात्र अशा प्रकारच्या निर्णयांना रोखण्यासाठीच 1991 मध्ये उपासनास्थळ (विशेष तरतूद) कायदा करण्यात आला होता. याकायद्यानुसार भारतातील प्रत्येक उपासना स्थळाचेधार्मिक स्वरूप 15 ऑगस्ट 1947 रोजी जसे होते, तसेचकायम मानण्यात आले. केवळ बाबरी मशीद वादाच्याविशेष स्वरूपामुळे त्याला अपवाद ठेवले होते. पणआता या कायद्यातील एक कमकुवत दुवा शोधला गेलाआहे. प्रत्यक्षात या कायद्यात प्राचीन आणि संरक्षितस्मारकांसाठी मर्यादित अपवाद ठेवण्यात आला होता.भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षणाने संरक्षित केलेल्या वारसास्मारकांच्या बाबतीत स्वातंत्र्यकाळातील धार्मिक स्थितीस्थिर मानण्याचा आणि नव्या दाव्यांवर बंदी घालण्याचानियम लागू होणार नाही, असे त्यात नमूद होते. यामागील तर्क समजण्यासारखा आहे. कारण भविष्यातआणखी पुरातत्त्वीय अवशेष सापडू शकतात. मात्र हामर्यादित अपवाद होता; शंभर वर्षांहून जुन्या प्रत्येकरचनेचे उत्खनन करून तपासणी करण्यासाठी खुलेनिमंत्रण नव्हते. आता उच्च न्यायालयाने हा अपवादचमूळ नियमापेक्षा मोठा मान्य केला आहे. त्यामुळेसर्वोच्च न्यायालयाने अपीलमध्ये वेगळी भूमिका घेतलीनाही, तर उपासना स्थळ कायदा जवळपास निष्प्रभठरेल. आता शंभर वर्षांपेक्षा जुने प्रत्येक स्मारकन्यायालयीन वादाची वाट पाहत उभे राहील. आणित्यातून काय सापडेल, हे आपल्याला ठाऊक आहे —मशिदींखाली मंदिरांचे अवशेष, त्यांच्या खालीबौद्धकालीन अवशेष आणि कदाचित त्याहूनही प्राचीनचिन्हे. पण संसदेला हा इतिहास माहीत नव्हता म्हणून हाकायदा करण्यात आलेला नव्हता. उलट प्रत्येकअवशेषावर पुन्हा खटले चालवणे, अशी प्रकरणेन्यायालयात खेचणे यामुळे देशाची प्रगती होणार नाही,याची संसदेला जाणीव होती. दुसऱ्या एका प्रकरणात गंगेत मांसाहारी अन्नफेकल्याप्रकरणी पाच मुस्लिमांना अटक करण्यातआली. न्यायाधीशांनी जामिनाला विरोध करणारेयुक्तिवाद फेटाळून लावत आरोपींनी खेद व्यक्तकेल्याचे आणि त्यांच्यावर कोणताही गुन्हेगारी इतिहासनसल्याचे नमूद केले. त्यामुळे त्यांना तुरुंगात ठेवण्याचेकारण नसल्याचे सांगितले. मात्र त्याचवेळी त्यांनीअसेही निरीक्षण नोंदवले की गंगेत मांसाहारी अन्नफेकणे हे हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणारे मानलेजाऊ शकते. न्यायालय असेही म्हणू शकले असते कीकोणत्याही प्रकारचे उरलेले अन्न नदीत टाकणे चुकीचेआहे. हिंदूंना गंगेत मांस फेकल्याने आक्षेप असेल. पणप्लास्टिक, औद्योगिक कचरा आणि सांडपाणीसोडल्याने नाही, असे मानणे कठीण आहे. मात्रन्यायालये श्रद्धेशी संबंधित प्रश्नांत उतरतात. तेव्हाअनेकदा राजकीयदृष्ट्या प्रभावी बाजूवर अधिक भरदिला जातो. त्यामुळे वाद अधिकच वाढतात. (हे लेखकाचे वैयक्तिक मत आहे.) उपासना स्थळ कायदा यासाठी बनवण्यात आलेला नव्हता की देशाच्यासंसदेला इतिहास माहीत नव्हता. उलटसंसदेला हे समजत होते की प्रत्येकजखम पुन्हा कुरवाळत राहिल्यास देशप्रगती करू शकणार नाही.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- पुणे: तुकाराम मुंढेंच्या एफडीए पथकाची मोठी कारवाई; अन्न सुरक्षेचे उल्लंघन व अस्वच्छतेमुळे १६ आस्थापनांचे परवाने निलंबित
- मुंबई: गोरेगाव-मुलुंड लिंक रोडच्या पिलर उभारणीचे काम मध्यरात्री सुरू; आवाजामुळे न्यू दिंडोशीतील रहिवाशांची झोपमोड, नागरिक त्रस्त
- नाशिक: विदर्भ प्रवासाला मोठे बूस्टर नाशिक-बडनेरा मेमूचा 'स्पेशल' टॅग हटला; आता १५ ऑगस्टपासून नियमितपणे दररोज धावणार
- छत्रपती संभाजीनगर: मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली ताप १०२ अंशांवर पोहोचला असून टायफॉइडची लक्षणे, रुग्णालयात दाखल
महाराष्ट्र
- सांगली: नागपंचमी २०२६ शिराळ्यात होणार ४१ नागांचे जिवंत दर्शन; वन्यजीव विभागाकडून कडक अटी व शर्तींवर परवानगी मंजूर
- पुणे: तुकाराम मुंढेंच्या एफडीए पथकाची मोठी कारवाई; अन्न सुरक्षेचे उल्लंघन व अस्वच्छतेमुळे १६ आस्थापनांचे परवाने निलंबित
- मुंबई: गोरेगाव-मुलुंड लिंक रोडच्या पिलर उभारणीचे काम मध्यरात्री सुरू; आवाजामुळे न्यू दिंडोशीतील रहिवाशांची झोपमोड, नागरिक त्रस्त
- नाशिक: विदर्भ प्रवासाला मोठे बूस्टर नाशिक-बडनेरा मेमूचा 'स्पेशल' टॅग हटला; आता १५ ऑगस्टपासून नियमितपणे दररोज धावणार
गुन्हा
- नाशिक: केमिकल वापरून बनवल्या जात होत्या बनावट नोटा; त्र्यंबकेश्वर मार्गावरील बंगल्यावर पोलिसांचा छापा
- कोल्हापूर: वीजचोरीचा मोठा भांडाफोड शिरोळमध्ये स्मार्ट मीटरमध्ये फेरफार करून ९ लाखांची चोरी; पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल!
- सांगली: "मेस बदलली म्हणून विद्यार्थ्याला लाथाबुक्क्यांनी अमानुष मारहाण; विटा येथील 'गुरुकुल'मधील प्रकाराने खळबळ."
- पुणे: "पहाटे ३ वाजता थरार; गळ्याला कोयता लावून व्यापाऱ्याची कार फोडली अन् रोकड लुटली!"
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
- १३ ऑगस्ट २०२६ चे आजचे राशिभविष्य: श्रावण मासाच्या पहिल्या दिवशी कोणावर होणार शिवकृपा
- पंचांग १२ ऑगस्ट २०२६: दीपअमावस्या, बुधादित्य योग, गजकेसरी योग आणि शुभ मुहूर्त
- ८ ऑगस्ट २०२६ चे सविस्तर राशिभविष्य: आज शनीची विशेष कृपा, या राशींचे नशीब चमकणार!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- झारखंड: रांचीमध्ये तिरंगा यात्रेत सहभागी होण्यापासून रोखत पोलीस प्रशासनाकडून धक्काबुक्की; जेएलकेएम नेते देवेंद्र नाथ महतो यांचा गंभीर आरोप
- मध्य प्रदेश: "आता देशासाठी जीव देणार नाही, तर देशद्रोह्यांचा जीव घेऊ"; ८० व्या स्वातंत्र्यदिनी बागेश्वर धामचे पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांचे अत्यंत आक्रमक विधान
- जम्मू-काश्मीर: किश्तवाड येथे महिंद्रा स्कॉर्पियो कार अनियंत्रित होऊन चिनाब नदीत कोसळली, ५ जणांचा मृत्यू
- गोवा: मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची मोठी घोषणा; विकसित गोवा २०३७' चा रोडमॅप जाहीर, रोजगार पायाभूत सुविधा आणि पर्यटनावर विशेष भर


























Subscribe to my channel




