इतिहास स्वतःची पुनरावृत्ती करतो. आज घडणाऱ्याघटनांकडे पाहिले तर 1973 मध्ये देशासमोर उभ्याराहिलेल्या ऐतिहासिक संकटाची चाहूल पुन्हा लागल्याचेदिसते. अर्थात, सध्या तरी याला प्रलयाची चाहूल म्हणतायेणार नाही. कारण मागील 53 वर्षांत भारत अधिकमजबूत झाला आहे. इंदिरा गांधी यांनी 1971 ची निवडणूक प्रचंड बहुमतानेजिंकली होती. आपल्या सहकारी भारतीय कम्युनिस्ट पक्षआणि द्रविड मुनेत्र कळघम यांच्या मदतीने त्यांनीजवळपास 80 टक्के जागांवर विजय मिळवला होता.त्याच वर्षी पाकिस्तानवर विजय मिळवत बांगलादेशाचीनिर्मिती झाली. पुढील वर्षी 19 राज्ये आणि केंद्रशासितप्रदेशांतील निवडणुकांत 15 राज्यांत त्यांनी निर्णायकविजय मिळवला. मणिपूर, मेघालय, मिझोरम आणि गोवाया चार राज्यांत त्यांना यश मिळाले नव्हते. ती लहान राज्येहोती. त्यावेळी मिझोरम आणि गोवा हे केंद्रशासित प्रदेशहोते. इंदिरा गांधी त्या काळात सत्ता व प्रतिष्ठेच्या सर्वोच्चशिखरावर होत्या. इतकी आव्हानविरहित सत्ता भारतातीलकोणत्याही नेत्याला मिळालेली नाही. नरेंद्र मोदी हे त्यांच्याजवळ पोहोचलेले दिसतात. मात्र परिस्थिती नाट्यमयरीत्या बदलली. 1972-73 मध्येसलग दोन वर्षे मान्सून अपयशी ठरला. 1965-66 मध्येहीभारताने अशी परिस्थिती अनुभवली होती. त्या काळात मुख्यतः कृषिप्रधान अर्थव्यवस्थेलाहरितक्रांतीमुळे मिळालेला फायदा या संकटाने पुसूनटाकला. 1973 मध्ये योम किप्पूर युद्ध झाले आणि पश्चिमआशियाई देशांनी प्रथमच तेलाचा वापर शस्त्र म्हणून करतजागतिक तेलसंकट निर्माण केले. तेलटंचाई आणिवाढत्या किमतींमुळे दुष्काळाचे संकट अधिक गडद झाले. भारतातील तरुणांचा संताप उफाळून आला आणि त्याची सुरुवात गुजरातमधून झाली. आर्थिक संकटाचा परिणाम प्रत्येकावर — बेरोजगारी, भाडेवाढ आणि महागाई.कॉलेज वसतिगृहांच्या मेस फी वाढीमुळे या आंदोलनाची ठिणगी पडली. त्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री चिमनभाई पटेल यांच्याविरोधात भ्रष्टाचारविरोधी आंदोलन उभे राहिले.लवकरच बिहारमध्ये लालू प्रसाद यादव आणि नीतीशकुमार यांसारख्या विद्यार्थी नेत्यांनी ‘छात्र संघर्ष समिती’ स्थापन करून महागाई आणि भ्रष्टाचाराविरोधात जोरदार आंदोलन उभारले. त्यांनी जयप्रकाश नारायण यांच्याकडे आंदोलनाचे नेतृत्व सोपवले. इंदिरा गांधींनी याला प्रत्युत्तर म्हणून अनेक पावलेउचलली. चिमनभाई पटेल यांना हटवले. बिहारमध्येअब्दुल गफूर 1974 पर्यंत सत्तेवर राहिले. पण एप्रिल 1975 मध्ये त्यांनाही जावे लागले. 1974 च्या उन्हाळ्यात इंदिरा गांधींनी ‘पोखरण-1’ ही पहिली अणुचाचणी केली. त्यांनी परदेशी शक्ती, सीआयए सरकार अस्थिर करण्याचा कट रचत असल्याचा आरोप केला. मात्र जनतेचा मूडबदलण्यात त्यांना यश आले नाही. कारण बेरोजगारी शिखरावर पोहोचली होती आणि 1974 मध्ये महागाई दर29 टक्क्यांवर गेला होता. सप्टेंबरमध्ये तो 34.68 टक्क्यांवर पोहोचला होता. अशीसुनामी कोण थांबवू शकले असते? अशा परिस्थितीतइंदिरा गांधींनी आणीबाणी लागू केली. भारतीयलोकशाहीवरील हा कायमस्वरूपी डाग ठरला. अखेरीसत्यामुळेही त्यांना वाचवता आले नाही. 1977 मधीलनिष्पक्ष निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. आता मागील 18 महिन्यांतील घटनांकडे आणिभविष्यातील संकेतांकडे पाहा. पश्चिम आशियातीलयुद्धामुळे पुन्हा एकदा तेलसंकटाचे धक्के बसत आहेत.विदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदार मोठ्या प्रमाणात पैसेकाढत आहेत. त्यामुळे 20 अब्ज डॉलर देशाबाहेर गेलेआहेत. अनेक मोठ्या भारतीय कंपन्या परदेशातगुंतवणूक करत आहेत. परिणामी थेट विदेशी गुंतवणुकीचेचित्र जवळपास शून्यावर आले आहे. या सगळ्यामुळेडॉलर कमकुवत होत असतानाही रुपयावर दबाव वाढतआहे. यूपीए सरकारच्या अखेरच्या काळात रुपयाच्या‘मजबुती’ला मुद्दा बनवून भाजपने मोठी चूक केली होती.आता त्याचे उलट परिणाम दिसत आहेत आणिक्रिकेटमधील ‘नर्व्हस नाइंटी’सारखी अस्वस्थता जाणवतआहे. डॉलरच्या तुलनेत रुपया 100 चा टप्पा पार करेल,अशी भीती सरकारला वाटत आहे. मात्र चलनाची ताकद ही जागतिक बाजारपेठ आणिअर्थव्यवस्थेच्या स्थितीनुसारच ठरते. चीनकडून आपणधडा घ्यायला हवा होता. त्यांनी आधीच ओळखले होतेकी आपले चलन तुलनेने कमजोर ठेवण्यातच फायदाआहे. तेलामुळे बसलेला धक्का हा 1973 चीच पुनरावृत्तीआहे. सरकार अखेरीस वाढलेल्या किमतींचा भारग्राहकांवर टाकणार. महागाई वाढेल आणि बेरोजगारीअधिक वेदनादायक ठरेल. 1973 मध्ये जसा मान्सूनअपयशी ठरला होता, तसाच इशारा यंदा अल-नीनोवर्षाबाबत दिला जात आहे. त्याचा परिणाम काय होईल, हेअजून स्पष्ट नाही. आज जीडीपीमध्ये शेतीचा वाटा कमीअसला तरी कृषी संकटाचा परिणाम सर्वाधिक लोकांवरहोतो. त्यामुळे लोकांच्या मनातील भावना ओळखणेआवश्यक आहे. काही संकेत अगदी स्पष्ट आहेत. नीटपरीक्षेभोवतीचा वाद हा या संतापाचे प्रतिबिंब आहे. सरकार ‘ईज ऑफ डुइंग बिझनेस’ची भाषा करते, पणरोजगार देणाऱ्या शिक्षणासाठीची स्पर्धा किती क्रूर झालीआहे, हे पाहणे गरजेचे आहे. कॅट, नीट, जेईई, क्लॅट,यूपीएससी, एनडीए, आयएमए, अग्निवीर आणि आतासीयूईटीसारख्या प्रवेश परीक्षांमुळे भारतीय तरुण एकाचक्रव्यूहात अडकला आहे. त्यामुळे आधीच त्रस्त मध्यमवर्गाची बचत संपत आहे, तरनिम्न मध्यमवर्ग कर्जाच्या खाईत ढकलला जात आहे.आणि शेवटी काही फसवे लोक संपूर्ण व्यवस्था हाताळूनपरीक्षा रद्द करवतात, पुन्हा नव्याने तयारी करण्याची वेळविद्यार्थ्यांवर येते. कल्पना करा, हे तरुण किती संतप्त असतील. विशेषतःसरकारचे उत्तर इतकेच असते की दोषींना तुरुंगात टाकूआणि परीक्षा पुन्हा घेऊ. सतत पुनरावृत्ती होणाऱ्या यादुष्टचक्रासमोर लोक हतबल झाले आहेत. हा संताप 1973-74 मधील गुजरातच्या मेस फी वाढकिंवा बिहारमधील महागाईविरोधातील आंदोलनाइतकाचतीव्र आहे का, हे सांगणे कठीण आहे. मात्र ‘कॉक्रोचजनता पार्टी’च्या समर्थनार्थ निर्माण झालेली मोठी लाटकाही स्पष्ट संकेत नक्कीच देते.
(लेखकाचे हे वैयक्तिक मत आहे. )
तरुणांमधील आक्रोश वाढतोय...आज तरुणांमध्ये दिसत असलेलाअसंतोष तो 1973-74 मध्ये गुजरातच्याकॉलेज मेस फी वाढ किंवा बिहारमधीलमहागाईविरोधातील आंदोलनाइतकाचतीव्र आहे का? याचे उत्तर सध्या देणेकठीण आहे. मात्र ‘कॉक्रोच जनतापार्टी’च्या समर्थनार्थ निर्माण झालेलीमोठी लाट काही संकेत नक्कीच देत आहे.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- पुणे: पासपोर्ट अर्जदारांसाठी सुवर्णसंधी ८ जुलैला प्रादेशिक कार्यालयात विशेष जनसंवाद सत्र
- रत्नागिरी: रत्नागिरी विमानतळावरून तीन महिन्यांत पहिले उड्डाण होणार; मंत्री उदय सामंत यांची घोषणा
- नागपूर: संशयाच्या जाळ्यात उद्ध्वस्त झाली दोन कुटुंबे! दोन्ही प्रकरणांतील आरोपी पती पोलिसांच्या ताब्यात
- पुणे: मंचरमध्ये बनावट दुधाचा गोरखधंदा उघड; १३ जणांना अटक, २६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
महाराष्ट्र
- पुणे: पासपोर्ट अर्जदारांसाठी सुवर्णसंधी ८ जुलैला प्रादेशिक कार्यालयात विशेष जनसंवाद सत्र
- रत्नागिरी: रत्नागिरी विमानतळावरून तीन महिन्यांत पहिले उड्डाण होणार; मंत्री उदय सामंत यांची घोषणा
- नागपूर: संशयाच्या जाळ्यात उद्ध्वस्त झाली दोन कुटुंबे! दोन्ही प्रकरणांतील आरोपी पती पोलिसांच्या ताब्यात
- एलपीजी गॅस सिलिंडरची चिंता मिटणार! ऊर्जा सुरक्षेसाठी भारताचा मोठा निर्णय; आखाती देशांवरील अवलंबित्व घटणार!
गुन्हा
- पुणे: शिक्रापूरमध्ये माजी महिला सरपंचाच्या गळ्यातील सोन्याचे गंठण चोरट्यांनी हिसकावले
- उत्तर प्रदेश: कौटुंबिक वादातून पत्नीने पतीला जिवंत जाळले; पोलीस तपासात धक्कादायक कबुली!
- थरारक! कर्जात बुडालेल्या कॉलेज विद्यार्थ्याने लुटून विहिरीत ढकलले; दोरीला धरून ५५ वर्षीय महिलेचा विहिरीत २१ तासांचा मृत्यूशी संघर्ष! अखेर चमत्कारीक बचाव
- सरपंचपदासाठी काय पण! मराठा असूनही मिळवले 'पारधी' जातीचे बोगस प्रमाणपत्र; बीड जिल्हा जात पडताळणी समितीने दाखला ठरवला रद्द!
राजकीय
- तमिळनाडू: विजय सरकार पाडण्यासाठी आमदाराला ₹35 कोटींची ऑफर; तिघांना अटक
- उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीचे वारे; भाजपच्या प्रभारीपदासाठी विनोद तावडेंच्या नावाची जोरदार चर्चा!
- सचिन अहिर शिंदेंच्या गोटात; संजय राऊतांचे 'ते' ट्विट व्हायरल, कवी सुरेश भटांच्या ओळींतून व्यक्त केली खंत!
- उद्धव ठाकरेंना शिवसेनेचे ६ खासदार शिंदे गटात; 'ऑपरेशन टायगर' यशस्वी!
इतर
- दैनिक राशिभविष्य: आज या राशींचे नशीब फळफळणार; आर्थिक प्रगती आणि नोकरीत बढतीचे योग!
- मराठवाड्यात जुलैच्या सुरुवातीलाही पावसाची ओढ! पहिल्या आठवड्यात केवळ २३.२ मिमी पाऊस; धरणे कोरडी, पेरण्या रखडल्याने बळीराजा हवालदिल!
- धाराशिवच्या जमिनीचा पोत खालावला! मृद आरोग्य पत्रिकेच्या अहवालात 'नत्र' कमतरतेची गंभीर नोंद; खरिपासाठी सेंद्रिय खतांचा वापर वाढवण्याचे आवाहन.
- शनीच्या दृष्टीचा राशींवर होणार परिणाम, जाणून घ्या ४ जुलै २०२६ चा दिवस कसा असेल!
मनोरंजन
- अखेर वितळला बर्फ! कश्मीरा पायावर पडून रडली, सुनीता आहुजांनी सांगितला १५ वर्षांच्या वादाचा शेवट!
- 'वेलकम टू द जंगल' मधून संजय दत्त बाहेर का पडला? अखेर दिग्दर्शक अहमद खान यांनी सांगितंलं खरं कारण!
- मुंबई: 'हेरा फेरी 3' बंद? कायदेशीर कचाट्यात अडकलेल्या चित्रपटातून प्रियदर्शन बाहेर, म्हणाले - "हा चित्रपट कधीच रिलीज होणार नाही!"
- 'द इंडिया स्टोरी'चा टीझर रिलीज! श्रेयस तळपदे आणि काजल अग्रवालची जोडी शेतीतील एका गंभीर वास्तवावर प्रकाश टाकणार.
विडियो गॅलेरी

पवई परिसरातील JVLR मार्गावर L&T गेट क्रमांक ५ जवळ मुख्य रस्त्यावर मोठा खड्डा
🚨 हडपसरमध्ये पावसाने उघड केली ड्रेनेज व्यवस्थेची पोलखोल!
पुणे: हडपसर रेल्वे स्थानकाबाहेरील रस्त्याची दुरवस्था; खड्डे-चिखलामुळे हजारो प्रवाशांचे हाल.
देश विदेश
- एलपीजी गॅस सिलिंडरची चिंता मिटणार! ऊर्जा सुरक्षेसाठी भारताचा मोठा निर्णय; आखाती देशांवरील अवलंबित्व घटणार!
- उत्तर प्रदेश: कौटुंबिक वादातून पत्नीने पतीला जिवंत जाळले; पोलीस तपासात धक्कादायक कबुली!
- फिफा विश्वचषक २०२६ मध्ये थरार! बेलिंगहॅम चमकला, १० खेळाडूंसह खेळणाऱ्या इंग्लंडने मेक्सिकोला नमवून गाठली उपांत्यपूर्व फेरी
- पाशवी कृत्य! दारुड्या पतीने पत्नीला जिवंत जाळले, अपघाताचा बनाव रचला; फतेहपूर पोलिसांच्या तपासात अखेर सत्य उघड!


























Subscribe to my channel

