इतिहास स्वतःची पुनरावृत्ती करतो. आज घडणाऱ्याघटनांकडे पाहिले तर 1973 मध्ये देशासमोर उभ्याराहिलेल्या ऐतिहासिक संकटाची चाहूल पुन्हा लागल्याचेदिसते. अर्थात, सध्या तरी याला प्रलयाची चाहूल म्हणतायेणार नाही. कारण मागील 53 वर्षांत भारत अधिकमजबूत झाला आहे. इंदिरा गांधी यांनी 1971 ची निवडणूक प्रचंड बहुमतानेजिंकली होती. आपल्या सहकारी भारतीय कम्युनिस्ट पक्षआणि द्रविड मुनेत्र कळघम यांच्या मदतीने त्यांनीजवळपास 80 टक्के जागांवर विजय मिळवला होता.त्याच वर्षी पाकिस्तानवर विजय मिळवत बांगलादेशाचीनिर्मिती झाली. पुढील वर्षी 19 राज्ये आणि केंद्रशासितप्रदेशांतील निवडणुकांत 15 राज्यांत त्यांनी निर्णायकविजय मिळवला. मणिपूर, मेघालय, मिझोरम आणि गोवाया चार राज्यांत त्यांना यश मिळाले नव्हते. ती लहान राज्येहोती. त्यावेळी मिझोरम आणि गोवा हे केंद्रशासित प्रदेशहोते. इंदिरा गांधी त्या काळात सत्ता व प्रतिष्ठेच्या सर्वोच्चशिखरावर होत्या. इतकी आव्हानविरहित सत्ता भारतातीलकोणत्याही नेत्याला मिळालेली नाही. नरेंद्र मोदी हे त्यांच्याजवळ पोहोचलेले दिसतात. मात्र परिस्थिती नाट्यमयरीत्या बदलली. 1972-73 मध्येसलग दोन वर्षे मान्सून अपयशी ठरला. 1965-66 मध्येहीभारताने अशी परिस्थिती अनुभवली होती. त्या काळात मुख्यतः कृषिप्रधान अर्थव्यवस्थेलाहरितक्रांतीमुळे मिळालेला फायदा या संकटाने पुसूनटाकला. 1973 मध्ये योम किप्पूर युद्ध झाले आणि पश्चिमआशियाई देशांनी प्रथमच तेलाचा वापर शस्त्र म्हणून करतजागतिक तेलसंकट निर्माण केले. तेलटंचाई आणिवाढत्या किमतींमुळे दुष्काळाचे संकट अधिक गडद झाले. भारतातील तरुणांचा संताप उफाळून आला आणि त्याची सुरुवात गुजरातमधून झाली. आर्थिक संकटाचा परिणाम प्रत्येकावर — बेरोजगारी, भाडेवाढ आणि महागाई.कॉलेज वसतिगृहांच्या मेस फी वाढीमुळे या आंदोलनाची ठिणगी पडली. त्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री चिमनभाई पटेल यांच्याविरोधात भ्रष्टाचारविरोधी आंदोलन उभे राहिले.लवकरच बिहारमध्ये लालू प्रसाद यादव आणि नीतीशकुमार यांसारख्या विद्यार्थी नेत्यांनी ‘छात्र संघर्ष समिती’ स्थापन करून महागाई आणि भ्रष्टाचाराविरोधात जोरदार आंदोलन उभारले. त्यांनी जयप्रकाश नारायण यांच्याकडे आंदोलनाचे नेतृत्व सोपवले. इंदिरा गांधींनी याला प्रत्युत्तर म्हणून अनेक पावलेउचलली. चिमनभाई पटेल यांना हटवले. बिहारमध्येअब्दुल गफूर 1974 पर्यंत सत्तेवर राहिले. पण एप्रिल 1975 मध्ये त्यांनाही जावे लागले. 1974 च्या उन्हाळ्यात इंदिरा गांधींनी ‘पोखरण-1’ ही पहिली अणुचाचणी केली. त्यांनी परदेशी शक्ती, सीआयए सरकार अस्थिर करण्याचा कट रचत असल्याचा आरोप केला. मात्र जनतेचा मूडबदलण्यात त्यांना यश आले नाही. कारण बेरोजगारी शिखरावर पोहोचली होती आणि 1974 मध्ये महागाई दर29 टक्क्यांवर गेला होता. सप्टेंबरमध्ये तो 34.68 टक्क्यांवर पोहोचला होता. अशीसुनामी कोण थांबवू शकले असते? अशा परिस्थितीतइंदिरा गांधींनी आणीबाणी लागू केली. भारतीयलोकशाहीवरील हा कायमस्वरूपी डाग ठरला. अखेरीसत्यामुळेही त्यांना वाचवता आले नाही. 1977 मधीलनिष्पक्ष निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. आता मागील 18 महिन्यांतील घटनांकडे आणिभविष्यातील संकेतांकडे पाहा. पश्चिम आशियातीलयुद्धामुळे पुन्हा एकदा तेलसंकटाचे धक्के बसत आहेत.विदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदार मोठ्या प्रमाणात पैसेकाढत आहेत. त्यामुळे 20 अब्ज डॉलर देशाबाहेर गेलेआहेत. अनेक मोठ्या भारतीय कंपन्या परदेशातगुंतवणूक करत आहेत. परिणामी थेट विदेशी गुंतवणुकीचेचित्र जवळपास शून्यावर आले आहे. या सगळ्यामुळेडॉलर कमकुवत होत असतानाही रुपयावर दबाव वाढतआहे. यूपीए सरकारच्या अखेरच्या काळात रुपयाच्या‘मजबुती’ला मुद्दा बनवून भाजपने मोठी चूक केली होती.आता त्याचे उलट परिणाम दिसत आहेत आणिक्रिकेटमधील ‘नर्व्हस नाइंटी’सारखी अस्वस्थता जाणवतआहे. डॉलरच्या तुलनेत रुपया 100 चा टप्पा पार करेल,अशी भीती सरकारला वाटत आहे. मात्र चलनाची ताकद ही जागतिक बाजारपेठ आणिअर्थव्यवस्थेच्या स्थितीनुसारच ठरते. चीनकडून आपणधडा घ्यायला हवा होता. त्यांनी आधीच ओळखले होतेकी आपले चलन तुलनेने कमजोर ठेवण्यातच फायदाआहे. तेलामुळे बसलेला धक्का हा 1973 चीच पुनरावृत्तीआहे. सरकार अखेरीस वाढलेल्या किमतींचा भारग्राहकांवर टाकणार. महागाई वाढेल आणि बेरोजगारीअधिक वेदनादायक ठरेल. 1973 मध्ये जसा मान्सूनअपयशी ठरला होता, तसाच इशारा यंदा अल-नीनोवर्षाबाबत दिला जात आहे. त्याचा परिणाम काय होईल, हेअजून स्पष्ट नाही. आज जीडीपीमध्ये शेतीचा वाटा कमीअसला तरी कृषी संकटाचा परिणाम सर्वाधिक लोकांवरहोतो. त्यामुळे लोकांच्या मनातील भावना ओळखणेआवश्यक आहे. काही संकेत अगदी स्पष्ट आहेत. नीटपरीक्षेभोवतीचा वाद हा या संतापाचे प्रतिबिंब आहे. सरकार ‘ईज ऑफ डुइंग बिझनेस’ची भाषा करते, पणरोजगार देणाऱ्या शिक्षणासाठीची स्पर्धा किती क्रूर झालीआहे, हे पाहणे गरजेचे आहे. कॅट, नीट, जेईई, क्लॅट,यूपीएससी, एनडीए, आयएमए, अग्निवीर आणि आतासीयूईटीसारख्या प्रवेश परीक्षांमुळे भारतीय तरुण एकाचक्रव्यूहात अडकला आहे. त्यामुळे आधीच त्रस्त मध्यमवर्गाची बचत संपत आहे, तरनिम्न मध्यमवर्ग कर्जाच्या खाईत ढकलला जात आहे.आणि शेवटी काही फसवे लोक संपूर्ण व्यवस्था हाताळूनपरीक्षा रद्द करवतात, पुन्हा नव्याने तयारी करण्याची वेळविद्यार्थ्यांवर येते. कल्पना करा, हे तरुण किती संतप्त असतील. विशेषतःसरकारचे उत्तर इतकेच असते की दोषींना तुरुंगात टाकूआणि परीक्षा पुन्हा घेऊ. सतत पुनरावृत्ती होणाऱ्या यादुष्टचक्रासमोर लोक हतबल झाले आहेत. हा संताप 1973-74 मधील गुजरातच्या मेस फी वाढकिंवा बिहारमधील महागाईविरोधातील आंदोलनाइतकाचतीव्र आहे का, हे सांगणे कठीण आहे. मात्र ‘कॉक्रोचजनता पार्टी’च्या समर्थनार्थ निर्माण झालेली मोठी लाटकाही स्पष्ट संकेत नक्कीच देते.
(लेखकाचे हे वैयक्तिक मत आहे. )
तरुणांमधील आक्रोश वाढतोय...आज तरुणांमध्ये दिसत असलेलाअसंतोष तो 1973-74 मध्ये गुजरातच्याकॉलेज मेस फी वाढ किंवा बिहारमधीलमहागाईविरोधातील आंदोलनाइतकाचतीव्र आहे का? याचे उत्तर सध्या देणेकठीण आहे. मात्र ‘कॉक्रोच जनतापार्टी’च्या समर्थनार्थ निर्माण झालेलीमोठी लाट काही संकेत नक्कीच देत आहे.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- डोंबिवली हादरली! १४० हून अधिक तरुणींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून लाखोंची फसवणूक; 'लव्ह स्कॅम'चा मास्टरमाइंड अटकेत.
- नाशिक हादरले! अनैतिक संबंधांतून ३६ वर्षीय विवाहितेने २६ वर्षीय प्रियकराचा केला गळा आवळून खून;
- ग्रामपंचायत राक्षेवाडी प्रभाग रचनेत मोठा गोंधळ; प्रशासनाने विश्वासात न घेतल्याचा ग्रामस्थांचा आरोप!
- नाशिक हादरले! कढी आवडली नाही म्हणून सासू-पतीने सुनेच्या अंगावर ओतली उकळती कढी, अंगावर शहारे आणणारी घटना.
महाराष्ट्र
- डोंबिवली हादरली! १४० हून अधिक तरुणींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून लाखोंची फसवणूक; 'लव्ह स्कॅम'चा मास्टरमाइंड अटकेत.
- नाशिक हादरले! अनैतिक संबंधांतून ३६ वर्षीय विवाहितेने २६ वर्षीय प्रियकराचा केला गळा आवळून खून;
- ग्रामपंचायत राक्षेवाडी प्रभाग रचनेत मोठा गोंधळ; प्रशासनाने विश्वासात न घेतल्याचा ग्रामस्थांचा आरोप!
- वाढवण बंदर महामार्ग प्रकल्पात फसवणूक; आदिवासी कुटुंबाचे ५० लाख रुपये लुटले!
गुन्हा
- डोंबिवली हादरली! १४० हून अधिक तरुणींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून लाखोंची फसवणूक; 'लव्ह स्कॅम'चा मास्टरमाइंड अटकेत.
- नाशिक हादरले! अनैतिक संबंधांतून ३६ वर्षीय विवाहितेने २६ वर्षीय प्रियकराचा केला गळा आवळून खून;
- वाढवण बंदर महामार्ग प्रकल्पात फसवणूक; आदिवासी कुटुंबाचे ५० लाख रुपये लुटले!
- नाशिक हादरले! कढी आवडली नाही म्हणून सासू-पतीने सुनेच्या अंगावर ओतली उकळती कढी, अंगावर शहारे आणणारी घटना.
राजकीय
- जनसांख्यिकीय बदलांवर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; अवैध घुसखोरीच्या तपासणीसाठी उच्चस्तरीय समिती गठीत!
- विदर्भात राजकीय भूकंप; काँग्रेसच्या २३ नगरसेवकांना ५ लाखांचे आमिष दाखवून 'पळवून नेले', वडेट्टीवारांचा भाजपवर गंभीर आरोप!
- 'नवीन नागपूर'च्या विकासाला रॉकेट गती! भूसंपादनाचा धडाका; ७८ एकर जमीन ताब्यात, शेतकऱ्यांना १५० कोटींचे वाटप
- महिला बालविकास विभागात खळबळ! मंत्री अदिती तटकरेंच्या खासगी सचिवावर बदल्यांचे रॅकेट चालवल्याचा आणि महिला अधिकाऱ्यांना धमकावल्याचा रोहिणी खडसेंचा गंभीर आरोप
इतर
- आजचे राशिभविष्य २७ मे २०२६: गजकेसरी योगाचा या राशींना होणार फायदा, आजचा दिवस कसा असेल?
- आजचे राशिभविष्य २६ मे २०२६: मंगळाच्या राजयोगाने ४ राशींचे होणार मंगल, भाग्य उजळणार आणि धनलाभ मिळणार!
- अमरावतीत उन्हाचा हाहाकार! पारा थेट ४७ अंशांवर पोहोचल्याने २ दिवसांत ३ जणांचा उष्माघाताने मृत्यू; प्रशासनाचा रेड अलर्ट
- शेतकऱ्याच्या घामाची क्रूर चेष्टा! बीडमध्ये कांदा विकून हाती काहीच नाही, उलट वाहतूक भाड्यासाठी खिशातूनच द्यावे लागले ३०१ रुपये; बळिराजाच्या डोळ्यांत पाणी
मनोरंजन
- खिलाडी अक्षय कुमारचे मोठे पाऊल! काश्मीरमधील सरकारी शाळेच्या उभारणीसाठी दिली तब्बल १ कोटी रुपयांची देणगी
- 'दुनियादारी'च्या यशानंतर मी हवेत होतो अन् तो माज..."; 'प्यारवाली लव्हस्टोरी' फ्लॉप झाल्याची संजय जाधवांनी सांगितली कटू आठवण
- दार उघड बये' हाक पुन्हा घुमणार! लाडके आदेश बांदेकर 'होम मिनिस्टर'च्या नव्या सीझनसह छोट्या पडद्यावर परतणार?
- आयपीएल २०२६ मध्ये युवा वादळ! 'ऑरेंज कॅप'धारक वैभव सूर्यवंशीचा विश्वविक्रम; टी२० क्रिकेटमध्ये भारताचा सर्वात यशस्वी टीनेजर फलंदाज!
विडियो गॅलेरी

नसरापूर हादरलंय… आणि प्रत्येक आई-बापाच्या काळजात भीतीचं सावट दाटलंय! @punebatamya
संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याला वैचारिक दिशा देणारे महामानव…
बच्चू कडूंची शिवसेनेत अधिकृत एन्ट्री…मुद्द्यांसाठी राजकारण की नवं राजकीय समीकरण?
देश विदेश
- भारतात इबोलाची धास्ती! बेंगळुरूत संशयित रुग्ण क्वारंटाईन, अद्याप एकही पॉझिटिव्ह केस नाही.
- एकाच कंपनीने घडवला चमत्कार! 'AI' च्या लाटेवर स्वार होत तैवानने भारतीय शेअर बाजाराला टाकले मागे
- युद्धविरामाच्या चर्चेदरम्यान अमेरिकेचा इराणवर मोठा हल्ला; होर्मुज सामुद्रधुनीजवळ उडवल्या इराणी नौका!
- खिलाडी अक्षय कुमारचे मोठे पाऊल! काश्मीरमधील सरकारी शाळेच्या उभारणीसाठी दिली तब्बल १ कोटी रुपयांची देणगी


















Subscribe to my channel


