न्यायव्यवस्थेमध्ये एक विशिष्ट प्रकारचा आत्मविश्वास असतो. तो तिला जीवनातील मोठ्या प्रश्नांवर निर्णय देण्यास सक्षम बनवतो. त्यात संकोच नसतो.आत्मसंशय नसतो; उलट आपल्या समोरील याचिकानीट वाचून आणि युक्तिवाद काळजीपूर्वक ऐकूनघेतलेल्या व्यक्तीची ठाम भूमिका त्यात दिसते. त्यामुळेत्यांच्या निर्णयांत संदिग्धता किंवा अर्धवटपणाला जागाराहत नाही. भोजशाला प्रकरणच घ्या. न्यायालयासमोर प्रश्न होताकी भोजशाला परिसर — येथे कमाल मौला मशीद असल्याचे सांगितले जाते — त्याचे मूळ स्वरूप हिंदू मंदिराचे आहे का? तेथे शुक्रवारी नमाज आणिमंगळवार व वसंत पंचमीला सरस्वती पूजेची व्यवस्थासुरू ठेवावी का? न्यायालयाने त्या परिसराला मंदिरमानत हिंदूंना प्रवेशाची परवानगी दिली. मुस्लिमांनामशीद बांधण्यासाठी इतर योग्य जागेची मागणी करण्यासाठी अर्ज करण्याची मुभाही दिली. मात्र अशा प्रकारच्या निर्णयांना रोखण्यासाठीच 1991 मध्ये उपासनास्थळ (विशेष तरतूद) कायदा करण्यात आला होता. याकायद्यानुसार भारतातील प्रत्येक उपासना स्थळाचेधार्मिक स्वरूप 15 ऑगस्ट 1947 रोजी जसे होते, तसेचकायम मानण्यात आले. केवळ बाबरी मशीद वादाच्याविशेष स्वरूपामुळे त्याला अपवाद ठेवले होते. पणआता या कायद्यातील एक कमकुवत दुवा शोधला गेलाआहे. प्रत्यक्षात या कायद्यात प्राचीन आणि संरक्षितस्मारकांसाठी मर्यादित अपवाद ठेवण्यात आला होता.भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षणाने संरक्षित केलेल्या वारसास्मारकांच्या बाबतीत स्वातंत्र्यकाळातील धार्मिक स्थितीस्थिर मानण्याचा आणि नव्या दाव्यांवर बंदी घालण्याचानियम लागू होणार नाही, असे त्यात नमूद होते. यामागील तर्क समजण्यासारखा आहे. कारण भविष्यातआणखी पुरातत्त्वीय अवशेष सापडू शकतात. मात्र हामर्यादित अपवाद होता; शंभर वर्षांहून जुन्या प्रत्येकरचनेचे उत्खनन करून तपासणी करण्यासाठी खुलेनिमंत्रण नव्हते. आता उच्च न्यायालयाने हा अपवादचमूळ नियमापेक्षा मोठा मान्य केला आहे. त्यामुळेसर्वोच्च न्यायालयाने अपीलमध्ये वेगळी भूमिका घेतलीनाही, तर उपासना स्थळ कायदा जवळपास निष्प्रभठरेल. आता शंभर वर्षांपेक्षा जुने प्रत्येक स्मारकन्यायालयीन वादाची वाट पाहत उभे राहील. आणित्यातून काय सापडेल, हे आपल्याला ठाऊक आहे —मशिदींखाली मंदिरांचे अवशेष, त्यांच्या खालीबौद्धकालीन अवशेष आणि कदाचित त्याहूनही प्राचीनचिन्हे. पण संसदेला हा इतिहास माहीत नव्हता म्हणून हाकायदा करण्यात आलेला नव्हता. उलट प्रत्येकअवशेषावर पुन्हा खटले चालवणे, अशी प्रकरणेन्यायालयात खेचणे यामुळे देशाची प्रगती होणार नाही,याची संसदेला जाणीव होती. दुसऱ्या एका प्रकरणात गंगेत मांसाहारी अन्नफेकल्याप्रकरणी पाच मुस्लिमांना अटक करण्यातआली. न्यायाधीशांनी जामिनाला विरोध करणारेयुक्तिवाद फेटाळून लावत आरोपींनी खेद व्यक्तकेल्याचे आणि त्यांच्यावर कोणताही गुन्हेगारी इतिहासनसल्याचे नमूद केले. त्यामुळे त्यांना तुरुंगात ठेवण्याचेकारण नसल्याचे सांगितले. मात्र त्याचवेळी त्यांनीअसेही निरीक्षण नोंदवले की गंगेत मांसाहारी अन्नफेकणे हे हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणारे मानलेजाऊ शकते. न्यायालय असेही म्हणू शकले असते कीकोणत्याही प्रकारचे उरलेले अन्न नदीत टाकणे चुकीचेआहे. हिंदूंना गंगेत मांस फेकल्याने आक्षेप असेल. पणप्लास्टिक, औद्योगिक कचरा आणि सांडपाणीसोडल्याने नाही, असे मानणे कठीण आहे. मात्रन्यायालये श्रद्धेशी संबंधित प्रश्नांत उतरतात. तेव्हाअनेकदा राजकीयदृष्ट्या प्रभावी बाजूवर अधिक भरदिला जातो. त्यामुळे वाद अधिकच वाढतात. (हे लेखकाचे वैयक्तिक मत आहे.) उपासना स्थळ कायदा यासाठी बनवण्यात आलेला नव्हता की देशाच्यासंसदेला इतिहास माहीत नव्हता. उलटसंसदेला हे समजत होते की प्रत्येकजखम पुन्हा कुरवाळत राहिल्यास देशप्रगती करू शकणार नाही.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- नाशिक हादरले! कश्यपी धरणात बुडून गर्भवती महिलेसह चौघांचा दुर्दैवी मृत्यू, दोन वर्षांच्या चिमुकलीचे प्राण वाचले.
- गर्भलिंग निदान रॅकेटचा पर्दाफाश! बी.ए.एम.एस. डॉक्टर आणि तोतया 'डॉक्टर' अटकेत; दौंड न्यायालयातून ५ दिवसांची कोठडी
- विकास लवांडे यांना मोठा दिलासा! धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी पुणे न्यायालयाकडून अखेर जामीन मंजूर
- .डिझेल दरवाढीचा भडका: एसटीचा प्रवास महागणार? परिवहन मंत्र्यांनी दिले दरवाढीचे संकेत!
महाराष्ट्र
- कोल्हापूर हादरलं! बीसीएच्या विद्यार्थिनीचे टोकाचे पाऊल; घरी फोन केला आणि हॉस्टेलमध्येच जीवन संपवले.
- नाशिक हादरले! कढी आवडली नाही म्हणून सासू-पतीने सुनेच्या अंगावर ओतली उकळती कढी, अंगावर शहारे आणणारी घटना.
- नाशिक हादरले! कश्यपी धरणात बुडून गर्भवती महिलेसह चौघांचा दुर्दैवी मृत्यू, दोन वर्षांच्या चिमुकलीचे प्राण वाचले.
- शेतकऱ्यांना मोठा दिलासा! खरीप हंगामासाठी आता कॅनमध्ये मिळणार डिझेल; जिल्हा प्रशासनाचा महत्त्वाचा निर्णय!
गुन्हा
- नाशिक हादरले! कढी आवडली नाही म्हणून सासू-पतीने सुनेच्या अंगावर ओतली उकळती कढी, अंगावर शहारे आणणारी घटना.
- दैवी शक्ती'चा दावा करून अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार, तीन भोंदूबाबांविरुद्ध गुन्हा!
- गर्भलिंग निदान रॅकेटचा पर्दाफाश! बी.ए.एम.एस. डॉक्टर आणि तोतया 'डॉक्टर' अटकेत; दौंड न्यायालयातून ५ दिवसांची कोठडी
- अनैतिक संबंधातून थरारक हत्या! पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीला संपवले, JCB ने शेतात गाडला मृतदेह
राजकीय
- विदर्भात राजकीय भूकंप; काँग्रेसच्या २३ नगरसेवकांना ५ लाखांचे आमिष दाखवून 'पळवून नेले', वडेट्टीवारांचा भाजपवर गंभीर आरोप!
- 'नवीन नागपूर'च्या विकासाला रॉकेट गती! भूसंपादनाचा धडाका; ७८ एकर जमीन ताब्यात, शेतकऱ्यांना १५० कोटींचे वाटप
- महिला बालविकास विभागात खळबळ! मंत्री अदिती तटकरेंच्या खासगी सचिवावर बदल्यांचे रॅकेट चालवल्याचा आणि महिला अधिकाऱ्यांना धमकावल्याचा रोहिणी खडसेंचा गंभीर आरोप
- महायुतीत महामंडळ वाटपाचा तिढा सुटणार! लाल दिव्याच्या गाड्या आणि पदांचे वाटप अंतिम टप्प्यात; लवकरच होणार घोषणा!
इतर
- आजचे राशिभविष्य २७ मे २०२६: गजकेसरी योगाचा या राशींना होणार फायदा, आजचा दिवस कसा असेल?
- आजचे राशिभविष्य २६ मे २०२६: मंगळाच्या राजयोगाने ४ राशींचे होणार मंगल, भाग्य उजळणार आणि धनलाभ मिळणार!
- अमरावतीत उन्हाचा हाहाकार! पारा थेट ४७ अंशांवर पोहोचल्याने २ दिवसांत ३ जणांचा उष्माघाताने मृत्यू; प्रशासनाचा रेड अलर्ट
- शेतकऱ्याच्या घामाची क्रूर चेष्टा! बीडमध्ये कांदा विकून हाती काहीच नाही, उलट वाहतूक भाड्यासाठी खिशातूनच द्यावे लागले ३०१ रुपये; बळिराजाच्या डोळ्यांत पाणी
मनोरंजन
- खिलाडी अक्षय कुमारचे मोठे पाऊल! काश्मीरमधील सरकारी शाळेच्या उभारणीसाठी दिली तब्बल १ कोटी रुपयांची देणगी
- 'दुनियादारी'च्या यशानंतर मी हवेत होतो अन् तो माज..."; 'प्यारवाली लव्हस्टोरी' फ्लॉप झाल्याची संजय जाधवांनी सांगितली कटू आठवण
- दार उघड बये' हाक पुन्हा घुमणार! लाडके आदेश बांदेकर 'होम मिनिस्टर'च्या नव्या सीझनसह छोट्या पडद्यावर परतणार?
- आयपीएल २०२६ मध्ये युवा वादळ! 'ऑरेंज कॅप'धारक वैभव सूर्यवंशीचा विश्वविक्रम; टी२० क्रिकेटमध्ये भारताचा सर्वात यशस्वी टीनेजर फलंदाज!
देश विदेश
- एकाच कंपनीने घडवला चमत्कार! 'AI' च्या लाटेवर स्वार होत तैवानने भारतीय शेअर बाजाराला टाकले मागे
- युद्धविरामाच्या चर्चेदरम्यान अमेरिकेचा इराणवर मोठा हल्ला; होर्मुज सामुद्रधुनीजवळ उडवल्या इराणी नौका!
- खिलाडी अक्षय कुमारचे मोठे पाऊल! काश्मीरमधील सरकारी शाळेच्या उभारणीसाठी दिली तब्बल १ कोटी रुपयांची देणगी
- संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचे मोठे विधान: २०४७ पर्यंत भारत बनणार जगातील सर्वात मोठा शस्त्रास्त्र निर्यातदार देश!























Subscribe to my channel


