न्यायव्यवस्थेमध्ये एक विशिष्ट प्रकारचा आत्मविश्वास असतो. तो तिला जीवनातील मोठ्या प्रश्नांवर निर्णय देण्यास सक्षम बनवतो. त्यात संकोच नसतो.आत्मसंशय नसतो; उलट आपल्या समोरील याचिकानीट वाचून आणि युक्तिवाद काळजीपूर्वक ऐकूनघेतलेल्या व्यक्तीची ठाम भूमिका त्यात दिसते. त्यामुळेत्यांच्या निर्णयांत संदिग्धता किंवा अर्धवटपणाला जागाराहत नाही. भोजशाला प्रकरणच घ्या. न्यायालयासमोर प्रश्न होताकी भोजशाला परिसर — येथे कमाल मौला मशीद असल्याचे सांगितले जाते — त्याचे मूळ स्वरूप हिंदू मंदिराचे आहे का? तेथे शुक्रवारी नमाज आणिमंगळवार व वसंत पंचमीला सरस्वती पूजेची व्यवस्थासुरू ठेवावी का? न्यायालयाने त्या परिसराला मंदिरमानत हिंदूंना प्रवेशाची परवानगी दिली. मुस्लिमांनामशीद बांधण्यासाठी इतर योग्य जागेची मागणी करण्यासाठी अर्ज करण्याची मुभाही दिली. मात्र अशा प्रकारच्या निर्णयांना रोखण्यासाठीच 1991 मध्ये उपासनास्थळ (विशेष तरतूद) कायदा करण्यात आला होता. याकायद्यानुसार भारतातील प्रत्येक उपासना स्थळाचेधार्मिक स्वरूप 15 ऑगस्ट 1947 रोजी जसे होते, तसेचकायम मानण्यात आले. केवळ बाबरी मशीद वादाच्याविशेष स्वरूपामुळे त्याला अपवाद ठेवले होते. पणआता या कायद्यातील एक कमकुवत दुवा शोधला गेलाआहे. प्रत्यक्षात या कायद्यात प्राचीन आणि संरक्षितस्मारकांसाठी मर्यादित अपवाद ठेवण्यात आला होता.भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षणाने संरक्षित केलेल्या वारसास्मारकांच्या बाबतीत स्वातंत्र्यकाळातील धार्मिक स्थितीस्थिर मानण्याचा आणि नव्या दाव्यांवर बंदी घालण्याचानियम लागू होणार नाही, असे त्यात नमूद होते. यामागील तर्क समजण्यासारखा आहे. कारण भविष्यातआणखी पुरातत्त्वीय अवशेष सापडू शकतात. मात्र हामर्यादित अपवाद होता; शंभर वर्षांहून जुन्या प्रत्येकरचनेचे उत्खनन करून तपासणी करण्यासाठी खुलेनिमंत्रण नव्हते. आता उच्च न्यायालयाने हा अपवादचमूळ नियमापेक्षा मोठा मान्य केला आहे. त्यामुळेसर्वोच्च न्यायालयाने अपीलमध्ये वेगळी भूमिका घेतलीनाही, तर उपासना स्थळ कायदा जवळपास निष्प्रभठरेल. आता शंभर वर्षांपेक्षा जुने प्रत्येक स्मारकन्यायालयीन वादाची वाट पाहत उभे राहील. आणित्यातून काय सापडेल, हे आपल्याला ठाऊक आहे —मशिदींखाली मंदिरांचे अवशेष, त्यांच्या खालीबौद्धकालीन अवशेष आणि कदाचित त्याहूनही प्राचीनचिन्हे. पण संसदेला हा इतिहास माहीत नव्हता म्हणून हाकायदा करण्यात आलेला नव्हता. उलट प्रत्येकअवशेषावर पुन्हा खटले चालवणे, अशी प्रकरणेन्यायालयात खेचणे यामुळे देशाची प्रगती होणार नाही,याची संसदेला जाणीव होती. दुसऱ्या एका प्रकरणात गंगेत मांसाहारी अन्नफेकल्याप्रकरणी पाच मुस्लिमांना अटक करण्यातआली. न्यायाधीशांनी जामिनाला विरोध करणारेयुक्तिवाद फेटाळून लावत आरोपींनी खेद व्यक्तकेल्याचे आणि त्यांच्यावर कोणताही गुन्हेगारी इतिहासनसल्याचे नमूद केले. त्यामुळे त्यांना तुरुंगात ठेवण्याचेकारण नसल्याचे सांगितले. मात्र त्याचवेळी त्यांनीअसेही निरीक्षण नोंदवले की गंगेत मांसाहारी अन्नफेकणे हे हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणारे मानलेजाऊ शकते. न्यायालय असेही म्हणू शकले असते कीकोणत्याही प्रकारचे उरलेले अन्न नदीत टाकणे चुकीचेआहे. हिंदूंना गंगेत मांस फेकल्याने आक्षेप असेल. पणप्लास्टिक, औद्योगिक कचरा आणि सांडपाणीसोडल्याने नाही, असे मानणे कठीण आहे. मात्रन्यायालये श्रद्धेशी संबंधित प्रश्नांत उतरतात. तेव्हाअनेकदा राजकीयदृष्ट्या प्रभावी बाजूवर अधिक भरदिला जातो. त्यामुळे वाद अधिकच वाढतात. (हे लेखकाचे वैयक्तिक मत आहे.) उपासना स्थळ कायदा यासाठी बनवण्यात आलेला नव्हता की देशाच्यासंसदेला इतिहास माहीत नव्हता. उलटसंसदेला हे समजत होते की प्रत्येकजखम पुन्हा कुरवाळत राहिल्यास देशप्रगती करू शकणार नाही.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- कोल्हापुरात संतापजनक प्रकार! लॉजवर बोलावून सुरू होते बेकायदेशीर गर्भलिंग निदान; पोलिसांचा छापा पडताच तोतया डॉक्टर मशीन घेऊन पसार, महिला व एजंट ताब्यात"
- राष्टकुल खेळ २०२६: महाराष्ट्राच्या तेजस शिर्सेची ऐतिहासिक कामगिरी; पुरुष 110 मीटर हर्डल्सच्या अंतिम फेरीत धडक, भारताला पदकाची मोठी आशा"
- हुडकेश्वर पोलिस ठाण्यातून कुख्यात चोर फरार; शौचालयाच्या बहाण्याने पोलिसांच्या डोळ्यात धूळ फेकून आरोपी पसार, खात्यात एकच खळबळ"
- महिला सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य! महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात राबवणार १० कलमी राष्ट्रीय कृती आराखडा; राष्ट्रीय महिला आयोगाची मोठी घोषणा"
महाराष्ट्र
- नांदेड शहरात तासभर कोसळला मुसळधार पाऊस; मराठवाड्यातील इतर भागांत हलक्या सरी आणि रिमझिम"
- लातूर: स्मार्ट मीटर काढा आणि जुने मीटर पूर्ववत बसवा; महावितरणच्या मनमानी कारभाराविरोधात आणि स्मार्ट वीज मीटरच्या सक्तीविरुद्ध नागरिकांचा संताप व तीव्र आंदोलन
- कोल्हापुरात संतापजनक प्रकार! लॉजवर बोलावून सुरू होते बेकायदेशीर गर्भलिंग निदान; पोलिसांचा छापा पडताच तोतया डॉक्टर मशीन घेऊन पसार, महिला व एजंट ताब्यात"
- कोल्हापूर: शिवाजी विद्यापीठाचा अजब कारभार; विद्यार्थ्यांच्या कष्टाच्या पैशातून भरला कर्मचाऱ्यांचा आयकर दंड, शैक्षणिक वर्तुळात तीव्र संताप
गुन्हा
- बीड: आष्टी तालुक्यातील लिंबोडी येथे १९ वर्षीय युवकाने संपवले जीवन, सकाळी गायरानात आढळला मृतदेह
- बंगळुरू: पतीच्या अनैतिक संबंधांना कंटाळून बाळंतीणीने संपवले जीवन, मृतदेहाशेजारीच शांत झोपलेला होता ७ महिन्यांचा चिमुकला
- मुंबईत सायबर गुन्हेगारीचा मोठा धक्का! दिल्ली पोलिसांच्या नावे आभासी अटकेत ठेवून वृद्ध व्यावसायिकाची तब्बल आठ कोटी रुपयांची फसवणूक"
- चंद्रपुर: हॉटेलमध्ये घुसून एमआयएमच्या एकमेव नगरसेवकावर १५ ते १६ जणांकडून प्राणघातक हल्ला, राजकीय वर्तुळात चिंता
राजकीय
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
- जळगाव: राष्ट्रवादीचा मोठा नेता भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या मार्गावर, मंत्री गुलाबराव पाटील यांच्यासमोर तगडे आव्हान निर्माण होणार?
इतर
- आजचे राशिभविष्य २५ जुलै २०२६: विठूरायाची कृपा आणि शनीची साथ, या राशींचा दिवस ठरणार सोन्याचा!
- आजचे राशिभविष्य २४ जुलै २०२६: शुक्र या राशींसाठी पाडणार पैशांचा पाऊस, पुण्याई येणार फळाला, इच्छापूर्ती होणार!
- आजचे राशिभविष्य २३ जुलै २०२६: सूर्य-गुरूचा द्विग्रह योग या राशींसाठी ठरणार लकी, गुरु देणार यश, संपत्ती व प्रगती!
- आजचे राशिभविष्य २१ जुलै २०२६: या राशींना मिळणार गुडन्यूज तर या राशींना बसणार मोठा फटका! पहा तुमचे भविष्य
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- चंदीगड: ट्यूशन घेणाऱ्या पत्नीचे २० वर्षांच्या विद्यार्थ्यासोबत अफेअर, पतीने रंगेहाथ पकडल्यानंतर उचलले टोकाचे पाऊल
- नवी दिल्ली: झारखंड हायकोर्टाचा मोठा निर्णय: रात्री २ वाजता बायकोने काजळ-लिपस्टिक लावले म्हणजे ती मानसिक रोगी ठरत नाही
- नवी दिल्ली: केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर सोनम वांगचुक यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले- 'हा लोकशाहीचा विजय'
- नवी दिल्ली: 'आताची पिढी प्रश्न विचारतेय, ऐकून घ्यायला हवं'; CJP आंदोलनावर सरसंघचालक मोहन भागवतांचं मोठं वक्तव्य



























Subscribe to my channel



