मुंबई: ठाण्यातील भिवंडी परिसरात अत्यंत दुर्दैवी आणि मोठी दुर्घटना घडली आहे. भिवंडी महानगरपालिका हद्दीतील नारपोली परिसरातील गंगारामवाडी येथील कोहिनूर अपार्टमेंट ही चार मजली इमारत गुरुवारी रात्री सुमारे ११.३० वाजण्याच्या सुमारास अचानक पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळली. या भीषण दुर्घटनेत आतापर्यंत ९ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती प्रशासनाने दिली असून, मृतांच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असून ढिगाऱ्याखाली आणखी काही जण अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. घटनास्थळी एनडीआरएफ, अग्निशमन दल, पोलीस आणि पालिका प्रशासनाकडून संयुक्तपणे युद्धपातळीवर शोध आणि बचावकार्य सुरू आहे.
मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, भिवंडी महानगरपालिका हद्दीतील नारपोली परिसरातील गंगारामवाडी येथील कोहिनूर अपार्टमेंट ही चार मजली इमारत २००७ मध्ये बांधण्यात आली होती. या इमारतीत दोन विंग असून एकूण ३० घरे होती. निकृष्ट दर्जाच्या बांधकामामुळे ही इमारत सुरुवातीपासूनच कमकुवत असल्याचे निदर्शनास आले होते. त्यामुळे भिवंडी महानगरपालिकेने यापूर्वीच तिला अतिधोकादायक म्हणून घोषित केले होते. गुरुवारी तळमजल्यावरील काही पिलर नादुरुस्त झाल्याने त्यांच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले होते. सायंकाळी सहा वाजल्यापासूनच इमारतीला तडे जाऊ लागले होते आणि रात्री आठच्या सुमारास ती एका बाजूला झुकू लागल्याचे स्पष्टपणे दिसून आले होते.
परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन प्रभाग समिती क्रमांक ४ चे सहाय्यक आयुक्त अरविंद घोगरे यांनी तातडीने कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेत इमारत रिकामी करण्याची कारवाई केली होती. मात्र, प्रशासनाची कारवाई झाल्यानंतरही तळमजल्यावरील दुरुस्तीचे काम सुरूच ठेवण्यात आले होते. तसेच काही रहिवासी घरातील महत्त्वाचे साहित्य किंवा कागदपत्रे घेण्यासाठी पुन्हा इमारतीत गेले होते, त्याच दरम्यान इमारत अचानक कोसळली आणि ते दुर्दैवाने ढिगाऱ्याखाली अडकले.
जेसीबीसह विविध आधुनिक यंत्रणांच्या मदतीने मलबा आणि ढिगारा हटविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. या दुर्घटनेत आतापर्यंत शमीम शेख (३२), रंजीत सिंग (४५), मिराज रसूल शेख (३४), संतोष कुमार पांडे (४२) आणि शमीम अन्सारी (३०) यांसह इतरांचा मृत्यू झाला असून काही मृतांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. प्रशासनाकडून बचावकार्य जोमाने सुरू असून ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नागरिकांचा शोध घेतला जात आहे, त्यामुळे मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
शहर
- पुढील २४ तास अत्यंत महत्त्वाचे! पुण्यासह उत्तर महाराष्ट्राला मुसळधार पावसाचा इशारा; नाशिक, धुळे व जळगावला 'रेड अलर्ट'!
- यवतमाळ: मोबाईलवरून मदतीची आर्त हाक, पण कार नदीत बुडाल्याने काळाने तिघांवर साधला घाला
- मुंबई: विरारमधील संतापजनक प्रकार; डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे प्रसूतीदरम्यान थेट जमिनीवर कोसळले नवजात बाळ; गंभीर जखमी बालकावर उपचार सुरू
- ठाणे: डोंबिवलीत संतापजनक प्रकार; नोकरीचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर तिघा नराधमांकडून अत्याचार; मानपाडा पोलिसांकडून आरोपी जेरबंद
महाराष्ट्र
- सोलापूर: शेळगी पुलावर पुणे-उमरगा एसटी बसची ट्रकला धडक; चालकासह महिला प्रवाशाचा जागीच मृत्यू, १० जण गंभीर जखमी
- पुढील २४ तास अत्यंत महत्त्वाचे! पुण्यासह उत्तर महाराष्ट्राला मुसळधार पावसाचा इशारा; नाशिक, धुळे व जळगावला 'रेड अलर्ट'!
- यवतमाळ: मोबाईलवरून मदतीची आर्त हाक, पण कार नदीत बुडाल्याने काळाने तिघांवर साधला घाला
- मुंबई: विरारमधील संतापजनक प्रकार; डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे प्रसूतीदरम्यान थेट जमिनीवर कोसळले नवजात बाळ; गंभीर जखमी बालकावर उपचार सुरू
गुन्हा
- ठाणे: डोंबिवलीत संतापजनक प्रकार; नोकरीचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर तिघा नराधमांकडून अत्याचार; मानपाडा पोलिसांकडून आरोपी जेरबंद
- नागपुर: विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या संघात निवड न झाल्याने १७ वर्षीय महिला क्रिकेटपटूचे टोकाचे पाऊल
- यवतमाळ: झोपेत असलेल्या महिलेची कुऱ्हाडीने वार करून निर्घृण हत्या; खळबळजनक घटनेने परिसर हादरला
- अहिल्यानगर: एका क्लिकमध्ये बँक खाते रिकामे! अहिल्यानगरमध्ये सायबर भामट्यांचा सुळसुळाट, अवघ्या सात महिन्यांत नागरिकांचे १८ कोटी लाटले
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- आजचे राशिभविष्य ३० जुलै २०२६: या राशींच्या कुंडलीतील ग्रह मजबूत, स्वामींची साथ मिळणार तर काहींचे वाढणार टेन्शन
- आजचे राशिभविष्य २९ जुलै २०२६: गणपती बाप्पाच्या कृपेने ‘या’ राशींना मिळणार नवीन नोकरी आणि आनंदाची बातमी
- आजचे राशिभविष्य २७ जुलै २०२६ : या राशींना नोकरीत प्रमोशन तर काही राशींना व्यवहारात सतर्क राहण्याचा इशारा, जाणून घ्या आजचे भविष्य
- आजचे राशिभविष्य २५ जुलै २०२६: विठूरायाची कृपा आणि शनीची साथ, या राशींचा दिवस ठरणार सोन्याचा!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- उत्तर प्रदेश: डॉक्टरांनी मृत घोषित केलेल्या ६५ वर्षीय महिलेची अंत्यविधीची तयारी सुरू असताना १७ तासांनी पुन्हा परतली प्राणांतून सुटका;
- मध्य प्रदेश: लग्नास नकार दिल्यामुळे तरुणाने बँक कर्मचारी प्रेयसीची केली हत्या; मृतदेह पेट्रोल टाकून जाळल्याने मोठी खळबळ
- उत्तर प्रदेश: कानपूर हादरले! चहात विष कालवून हळूहळू मारण्याचा प्रयत्न; चार्टर्ड अकाउंटंट पतीने पत्नीचा पोलखोल करणारा 'हिडन कॅमेरा' व्हिडिओ आणला समोर
- उत्तर प्रदेश: मथुरा बनले देशाचे नवे 'मिनी जामताडा'! १८ गावांमधील गल्लीबोळांतून तब्बल ३१२ सायबर ठगांना बेड्या; उत्तर प्रदेश पोलिसांची आतापर्यंतची सर्वात मोठी धडक कारवाई

























Subscribe to my channel




