पुणे: पवना धरणग्रस्तांच्या पुनर्वसनाचे ढोल बडवणाऱ्या शासन आणि लोकप्रतिनिधींच्या दाव्यांची पोलखोल करणारी एक अत्यंत संतापजनक आणि मानवी मनाला सुन्न करणारी घटना समोर आली आहे. पवन धरणातील गेव्हंडे पुनर्वसन वसाहतीत राहणाऱ्या गीताबाई चिंधू बोडके यांचे गुरुवार, ३० जुलै रोजी निधन झाले. मात्र, या पुनर्वसन वसाहतीत स्मशानभूमीसारखी अत्यंत मूलभूत आणि अत्यावश्यक सुविधाच उपलब्ध नसल्यामुळे, मृत्यूनंतर त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करणे अशक्य झाले. परिणामी, मृतदेह शुक्रवार, ३१ जुलै सकाळपर्यंत तब्बल रात्रभर घरातच ठेवावा लागल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. या गंभीर प्रकारामुळे संपूर्ण परिसरात आणि धरणग्रस्त वर्तुळात प्रचंड संतापाची लाट उसळली आहे.
हवामानाचा अंदाज आणि मुसळधार पाऊस सुरू असताना अशा परिस्थितीत अंत्यसंस्कार करायचे तरी कुठे, असा मोठा प्रश्न शोकाकुल कुटुंबियांमसमोर व ग्रामस्थांसमोर निर्माण झाला होता. प्रशासनाच्या या ढिसाळ कारभाराविरोधात आणि मूलभूत सुविधांच्या अभावामुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी आज सकाळी ९ वाजता जोवण–तिकोणा मार्गावर आक्रमक होत 'रास्ता रोको' आंदोलन केले. यावेळी शासन, प्रशासन आणि स्थानिक लोकप्रतिनिधींविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली, ज्यामुळे काही काळ या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती.
या प्रकल्पासाठी परिसरातील हजारो एकर बहुमोल जमीन संपादित करण्यात आली होती, ज्या बदल्यात अनेक कुटुंबांनी त्यांची हक्काची घरे, पिढ्यानपिढ्यांची शेती आणि हक्काची उपजीविका कायमची गमावली. पुनर्वसन करताना नागरिकांना सर्व प्रकारच्या आधुनिक व मूलभूत सुविधा देण्याची पोकळ आश्वसने देण्यात आली होती. मात्र, आजही स्मशानभूमीसारखी प्राथमिक सुविधा उपलब्ध न झाल्यामुळे धरणग्रस्तांना आपल्या माणसांना मृत्यूनंतर सन्मानाने अखेरचा निरोप देणेही कठीण झाले आहे, अशी तीव्र प्रतिक्रिया ग्रामस्थांनी व्यक्त केली.
निवडणुकीच्या काळात धरणग्रस्तांच्या समस्यांवर राजकारण करणारे अनेक नेते केवळ आश्वासनांची खैरात वाटतात; परंतु असा एखादा आपत्कालीन प्रसंग ओढवल्यास एकही लोकप्रतिनिधी मदतीसाठी किंवा धरणग्रस्तांच्या पाठीशी उभा राहत नाही, असा आरोप ग्रामस्थांनी केला. गेव्हंडे पुनर्वसन वसाहतीसाठी तातडीने स्मशानभूमीची हक्काची जागा मंजूर करून तिथे सर्व आवश्यक सुविधा विकसित कराव्यात, अन्यथा यापेक्षाही अधिक तीव्र आणि आक्रमक जनआंदोलन छेडले जाईल, असा सज्जड इशारा संतप्त ग्रामस्थांच्या वतीने प्रशासनाला देण्यात आला आहे.
शहर
- मुंबई: स्कूटर चोरणारी दुकली जेरबंद; एमआयडीसी पोलिसांच्या धडक कारवाईत लाखांच्या ११ इलेक्ट्रिक स्कूटर हस्तगत
- मुंबई: बेस्ट बस क्रमांक ४४ च्या ढिसाळ कारभाराबद्दल प्रवाशांमध्ये तीव्र संताप; वरळी ते काळाचौकी मार्गावरील नागरिकांचे प्रचंड हाल
- राज्य सरकारचा मोठा निर्णय! १ सप्टेंबरपासून उपमुख्यमंत्र्यांसह मंत्र्यांचे छापील पेपर बंद, आता फक्त ई-पेपर व ऑनलाइन बातम्या!
महाराष्ट्र
- नाशिक: लासलगावात खळबळ; पोलीस ठाण्याच्या हाकेच्या अंतरावर भरदिवसा कारची काच फोडून ७० हजार रुपयांची रोकड लांबवली
- मुंबई: स्कूटर चोरणारी दुकली जेरबंद; एमआयडीसी पोलिसांच्या धडक कारवाईत लाखांच्या ११ इलेक्ट्रिक स्कूटर हस्तगत
- मुंबई: बेस्ट बस क्रमांक ४४ च्या ढिसाळ कारभाराबद्दल प्रवाशांमध्ये तीव्र संताप; वरळी ते काळाचौकी मार्गावरील नागरिकांचे प्रचंड हाल
- राज्य सरकारचा मोठा निर्णय! १ सप्टेंबरपासून उपमुख्यमंत्र्यांसह मंत्र्यांचे छापील पेपर बंद, आता फक्त ई-पेपर व ऑनलाइन बातम्या!
गुन्हा
- यवतमाळ: झोपेत असलेल्या महिलेची कुऱ्हाडीने वार करून निर्घृण हत्या; खळबळजनक घटनेने परिसर हादरला
- अहिल्यानगर: एका क्लिकमध्ये बँक खाते रिकामे! अहिल्यानगरमध्ये सायबर भामट्यांचा सुळसुळाट, अवघ्या सात महिन्यांत नागरिकांचे १८ कोटी लाटले
- पुणे: पत्नी घर सोडून गेली, दोन दिवसांनी पतीने संपवले आयुष्य; हातावरील मजकूर आणि सुसाईड नोट पाहून पोलीसही झाले अवाक
- सांगली: कामावरून झालेल्या वादातून झोपलेल्या तरुणाच्या डोक्यात लाकडी दांडके घालून निर्घृण खून; आरोपी पसार
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- आजचे राशिभविष्य ३० जुलै २०२६: या राशींच्या कुंडलीतील ग्रह मजबूत, स्वामींची साथ मिळणार तर काहींचे वाढणार टेन्शन
- आजचे राशिभविष्य २९ जुलै २०२६: गणपती बाप्पाच्या कृपेने ‘या’ राशींना मिळणार नवीन नोकरी आणि आनंदाची बातमी
- आजचे राशिभविष्य २७ जुलै २०२६ : या राशींना नोकरीत प्रमोशन तर काही राशींना व्यवहारात सतर्क राहण्याचा इशारा, जाणून घ्या आजचे भविष्य
- आजचे राशिभविष्य २५ जुलै २०२६: विठूरायाची कृपा आणि शनीची साथ, या राशींचा दिवस ठरणार सोन्याचा!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- उत्तर प्रदेश: डॉक्टरांनी मृत घोषित केलेल्या ६५ वर्षीय महिलेची अंत्यविधीची तयारी सुरू असताना १७ तासांनी पुन्हा परतली प्राणांतून सुटका;
- मध्य प्रदेश: लग्नास नकार दिल्यामुळे तरुणाने बँक कर्मचारी प्रेयसीची केली हत्या; मृतदेह पेट्रोल टाकून जाळल्याने मोठी खळबळ
- उत्तर प्रदेश: कानपूर हादरले! चहात विष कालवून हळूहळू मारण्याचा प्रयत्न; चार्टर्ड अकाउंटंट पतीने पत्नीचा पोलखोल करणारा 'हिडन कॅमेरा' व्हिडिओ आणला समोर
- उत्तर प्रदेश: मथुरा बनले देशाचे नवे 'मिनी जामताडा'! १८ गावांमधील गल्लीबोळांतून तब्बल ३१२ सायबर ठगांना बेड्या; उत्तर प्रदेश पोलिसांची आतापर्यंतची सर्वात मोठी धडक कारवाई


























Subscribe to my channel




