पुणे: पवना धरणग्रस्तांच्या पुनर्वसनाचे ढोल बडवणाऱ्या शासन आणि लोकप्रतिनिधींच्या दाव्यांची पोलखोल करणारी एक अत्यंत संतापजनक आणि मानवी मनाला सुन्न करणारी घटना समोर आली आहे. पवन धरणातील गेव्हंडे पुनर्वसन वसाहतीत राहणाऱ्या गीताबाई चिंधू बोडके यांचे गुरुवार, ३० जुलै रोजी निधन झाले. मात्र, या पुनर्वसन वसाहतीत स्मशानभूमीसारखी अत्यंत मूलभूत आणि अत्यावश्यक सुविधाच उपलब्ध नसल्यामुळे, मृत्यूनंतर त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करणे अशक्य झाले. परिणामी, मृतदेह शुक्रवार, ३१ जुलै सकाळपर्यंत तब्बल रात्रभर घरातच ठेवावा लागल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. या गंभीर प्रकारामुळे संपूर्ण परिसरात आणि धरणग्रस्त वर्तुळात प्रचंड संतापाची लाट उसळली आहे.
हवामानाचा अंदाज आणि मुसळधार पाऊस सुरू असताना अशा परिस्थितीत अंत्यसंस्कार करायचे तरी कुठे, असा मोठा प्रश्न शोकाकुल कुटुंबियांमसमोर व ग्रामस्थांसमोर निर्माण झाला होता. प्रशासनाच्या या ढिसाळ कारभाराविरोधात आणि मूलभूत सुविधांच्या अभावामुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी आज सकाळी ९ वाजता जोवण–तिकोणा मार्गावर आक्रमक होत 'रास्ता रोको' आंदोलन केले. यावेळी शासन, प्रशासन आणि स्थानिक लोकप्रतिनिधींविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली, ज्यामुळे काही काळ या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती.
या प्रकल्पासाठी परिसरातील हजारो एकर बहुमोल जमीन संपादित करण्यात आली होती, ज्या बदल्यात अनेक कुटुंबांनी त्यांची हक्काची घरे, पिढ्यानपिढ्यांची शेती आणि हक्काची उपजीविका कायमची गमावली. पुनर्वसन करताना नागरिकांना सर्व प्रकारच्या आधुनिक व मूलभूत सुविधा देण्याची पोकळ आश्वसने देण्यात आली होती. मात्र, आजही स्मशानभूमीसारखी प्राथमिक सुविधा उपलब्ध न झाल्यामुळे धरणग्रस्तांना आपल्या माणसांना मृत्यूनंतर सन्मानाने अखेरचा निरोप देणेही कठीण झाले आहे, अशी तीव्र प्रतिक्रिया ग्रामस्थांनी व्यक्त केली.
निवडणुकीच्या काळात धरणग्रस्तांच्या समस्यांवर राजकारण करणारे अनेक नेते केवळ आश्वासनांची खैरात वाटतात; परंतु असा एखादा आपत्कालीन प्रसंग ओढवल्यास एकही लोकप्रतिनिधी मदतीसाठी किंवा धरणग्रस्तांच्या पाठीशी उभा राहत नाही, असा आरोप ग्रामस्थांनी केला. गेव्हंडे पुनर्वसन वसाहतीसाठी तातडीने स्मशानभूमीची हक्काची जागा मंजूर करून तिथे सर्व आवश्यक सुविधा विकसित कराव्यात, अन्यथा यापेक्षाही अधिक तीव्र आणि आक्रमक जनआंदोलन छेडले जाईल, असा सज्जड इशारा संतप्त ग्रामस्थांच्या वतीने प्रशासनाला देण्यात आला आहे.
शहर
- मुंबई: शिंदेसेनेला ठाण्यात मोठा धक्का! बनावट आदिवासी प्रमाणपत्राप्रकरणी नगरसेविका सुलेखा चव्हाण यांचे पद रद्द
- मुंबई: प्रसाद ओक म्हणजेच धर्मवीर आनंद दिघे.., मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून अभिनेत्याचं तोंडभरून कौतुक!
- पुणे: रेल्वे मार्गावर मेगा ब्लॉक; गाड्यांना फटका बसणार? हडपसर-घोरपडी-पुणे मार्गावरील कामाची संपूर्ण माहिती
- मुंबई: महाराष्ट्र शासनाचा मोठा निर्णय! आता शेतीशी संबंधित सर्व व्यवहार एकाच डिजिटल छताखाली होणार, शेतकऱ्यांना होणार मोठा फायदा
महाराष्ट्र
- मुंबई: शिंदेसेनेला ठाण्यात मोठा धक्का! बनावट आदिवासी प्रमाणपत्राप्रकरणी नगरसेविका सुलेखा चव्हाण यांचे पद रद्द
- कोल्हापूर: महादेवी उर्फ माधुरी हत्तीणीच्या घरवापसीचा मार्ग मोकळा; कोल्हापूरच्या नांदणी मठात लवकरच परतणार लाडकी 'माधुरी'!
- हिंगोली: तू पोलिसांना टिप का देतोस? खबरी असल्याच्या संशयातून वसमतमध्ये २२ वर्षीय तरुणाची विटा-दगडने ठेचून निर्घृण हत्या
- जालना: अमृता फडणवीस यांनी प्रेमाने जेवणाचं आमंत्रण दिलं, तर भाऊबिजेला नक्की घरी जाईन मनोज जरांगे पाटील
गुन्हा
- पुणे: बारामतीत खळबळ! झुंबा डान्स क्लासवर कारवाई न करण्यासाठी ५ लाखांची लाच स्वीकारताना पोलीस हवालदार एसीबीच्या जाळ्यात
- उत्तर प्रदेश: प्रशासकीय हलगर्जीपणाचा कळस! उत्तर प्रदेशमधील पूरग्रस्त भागात मदत म्हणून वाटले एक्स्पायर्ड कफ सिरप, लहान मुलांची प्रकृती बिघडली
- पुणे: 'सैराट' प्रकरणाची पुनरावृत्ती! आंतरजातीय प्रेमविवाह केल्याच्या रोषातून संतापलेल्या भावांचा बहिणीच्या पतीवर पिस्तूल आणि कोयत्याने जीवघेणा हल्ला
- नाशिक: रोड आणि सिडकोत तोतया पोलिसांचा उच्छाद; भरदिवसा नागरिकांना चकमा देत साडेपाच तोळे सोने लांबवले
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य ७ सप्टेंबर २०२६ : शेवटचा श्रावणी सोमवार या राशींसाठी ठरणार भाग्यशाली, शिवकृपा लाभणार!
- आजचे राशिभविष्य ५ सप्टेंबर २०२६ दहीहंडी विशेष: चंद्र-मंगळ योगामुळे या राशींना मिळणार प्रचंड धनलाभ आणि करिअरमध्ये यश!
- आजचे राशिभविष्य 4 सप्टेंबर 2026 : जन्माष्टमीच्या दिवशी ग्रहांचा शुभ संयोग या राशींसाठी नशीब बदलवणारा, श्रीकृष्णाची मिळणार कृपा !
- आजचे राशिभविष्य ३ सप्टेंबर २०२६: या राशींवर असणार स्वामींची कृपा आणि गणपती बाप्पाचा आशीर्वाद, पहा तुमचे भाग्य!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- नवी दिल्ली: राहुल गांधींच्या खटल्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण; न्यायमूर्ती सूर्यकांत म्हणाले न्यायालयासमोर सगळे समान आहेत, कोणीही श्रेष्ठ नाही
- उत्तर प्रदेश: प्रशासकीय हलगर्जीपणाचा कळस! उत्तर प्रदेशमधील पूरग्रस्त भागात मदत म्हणून वाटले एक्स्पायर्ड कफ सिरप, लहान मुलांची प्रकृती बिघडली
- तमिळनाडू: टीव्हीकेचे नेते विजय यांच्या सरकारसमोर मोठे राजकीय संकट, विरोधकांचे सरकार कोसळण्याचे भाकीत आणि नव्या समीकरणांची चर्चा
- गोवा: देशातील ड्रग्ज नेटवर्कचा समूळ नायनाट करणार; गोव्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची मोठी घोषणा, तीन वर्षांचा रोडमॅप जाहीर



























Subscribe to my channel



