Political Heat Over Marathi Language: Controversy Erupts in Maharashtra Over Local Language Priority

मुंबई : राज्यातील स्थानिक भाषेला प्राधान्य देण्याच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापले आहे.

Political Heat Over Marathi Language: Controversy Erupts in Maharashtra Over Local Language Priorityमुंबई : राज्यातील स्थानिक भाषेला प्राधान्य देण्याच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापले आहे. रिक्षाचालकांना मराठी भाषा अनिवार्य करण्याच्या विषयावर मनसेने आक्रमक भूमिका घेत नवा उपक्रम जाहीर केला आहे. “धडा शिकवायची हीच योग्य वेळ,” असे स्पष्ट मत मनसे नेते संदीप देशपांडे यांनी व्यक्त केले आहे.

या पार्श्वभूमीवर, रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी येणे बंधनकारक असावे, हा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. राज्य सरकारकडून यासंदर्भात आधीच धोरणात्मक निर्णय जाहीर करण्यात आला असला, तरी त्याची अंमलबजावणी प्रभावीपणे होत नसल्याचा आरोप मनसेकडून केला जात आहे. त्यामुळेच आता संघटनेने थेट रस्त्यावर उतरून जनजागृतीसह दबाव वाढवण्याची भूमिका घेतली आहे.

मनसेच्या या उपक्रमाअंतर्गत विविध ठिकाणी रिक्षाचालकांशी संवाद साधून मराठी भाषेचा वापर करण्याचे आवाहन केले जाणार आहे. आवश्यक असल्यास आंदोलनाचा मार्गही अवलंबला जाईल, असे संकेत पक्षाकडून देण्यात आले आहेत. स्थानिक प्रवाशांशी संवाद साधताना मराठीला प्राधान्य दिले गेले पाहिजे, अशी भूमिका या मोहिमेतून मांडली जात आहे.

दरम्यान, या मुद्द्यावरून राजकीय वर्तुळात मतमतांतरेही समोर येत आहेत. काही जण स्थानिक भाषेला प्राधान्य देण्याच्या भूमिकेला पाठिंबा देत असताना, इतरांकडून मात्र याला अतिरेकी भूमिका म्हणूनही पाहिले जात आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत हा विषय अधिकच चर्चेचा ठरण्याची शक्यता आहे.

एकीकडे सरकारच्या नियमांची aअंमलबजावणी आणि दुसरीकडे राजकीय पक्षांचा दबाव यामुळे रिक्षा व्यवसायातील चालकांवर नवीन जबाबदाऱ्या येण्याची चिन्हे आहेत. परिणामी, या निर्णयाचा प्रत्यक्ष परिणाम काय होतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *