Hardik Pandya and Jasprit Bumrah against NamibiaImage Credit source: Bcci x Account
टीम इंडियाने आयसीसी टी 20I वर्ल्ड कप 2026 स्पर्धेत सलग दुसरा विजय मिळवला आहे. टीम इंडियाने नामिबियाचा 93 धावांनी धुव्वा उडवला आहे. टीम इंडियाने नामबियासमोर 210 धावांचं आव्हान ठेवलं होतं. मात्र भारतीय गोलंदाजांसमोर नामिबायाला 20 ओव्हरही खेळता आलं नाही. टीम इंडियाने नामिबियाला 10 बॉलआधी ऑलआऊट केलं. भारताने नामिबियाला 18.2 ओव्हरमध्ये 116 रन्सवर गुंडाळलं. भारताने अशाप्रकारे यूएसएनंतर आता नामिबियाचा धुव्वा उडवून सलग दुसरा विजय साकारला आहे. तसेच टीम इंडियाचा नामिबिया विरुद्धचा हा टी 20I क्रिकेटमधील एकूण आणि सलग दुसरा विजय ठरला.
भारताचा वर्ल्ड कपमधील सर्वात मोठा विजय
टीम इंडियाने नामिबियावर एकतर्फी फरकाने मात करत ऐतिहासिक कामगिरी केली. भारताचा टी 20i वर्ल्ड कप इतिहासातील हा सर्वात मोठा विजय ठरला. भारताचं या कामगिरीसाठी सोशल मीडियावरुन अभिनंदन केलं जात आहे.
सामन्यात काय झालं?
नामिबियाने नाणेफेक जिंकून भारताला बॅटिंगची संधी दिली. टीम इंडियासाठी इशान किशन आणि हार्दिक पंड्या या दोघांनी सर्वाधिक धावा केल्या. इशानने सर्वाधिक 61 धावांचं योगदान दिलं. हार्दिकने 28 चेंडूत 4 चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीने 52 धावांची चाबूक खेळी केली. तर संजू सॅमसन, शिवम दुबे आणि तिलक वर्मा या तिघांनी निर्णायक योगदान दिलं. संजू, शिवम आणि तिलक या तिघांनी अनुक्रमे 22, 23 आणि 25 अशा धावा केल्या. भारताने अशाप्रकारे 9 विकेट्स गमावून 209 रन्स केल्या. नामिबियासाठी गेरहार्ड इरास्मस याने सर्वाधिक 4 विकेट्स मिळवल्या.
नामिबियाची कडक सुरुवात
लॉरेन स्टीनकॅम्प जॅन फ्रायलिंक या सलामी जोडीने 210 धावांचा पाठलाग करताना नामिबियाला आश्वासक सुरुवात करुन दिली. या दोघांनी 33 धावा जोडल्या. त्यानंतर जॅन 22 रन्सवर आऊट झाला. लॉरेन स्टीनकॅम्प आणि लॉफ्टी-ईटन या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी 34 रन्सची पार्टनरशीप केली. लॉरेन स्टीनकॅम्प याने 29 धावा करुन मैदानाबाहेरचा रस्ता धरला. इथून टीम इंडियाने नामिबियाला ठराविक अंतराने झटके देण्याची सुरुवात केली आणि डाव गुंडाळला.
टीम इंडियाची बॉलिंग
टीम इंडियाकडून नामिबिया विरुद्ध एकूण 6 जणांनी बॉलिंग केली. भारताच्या सर्व गोलंदाजांनी विकेट मिळवली. मिस्ट्री स्पिनर वरुण चक्रवर्ती याने सर्वाधिक 3 विकेट्स मिळवल्या. बॅटिंगने चमक दाखवणाऱ्या हार्दिक पंड्या याने बॉलिंगनेही योगदान दिलं. हार्दिक आणि अक्षर पटेल या दोघांनी प्रत्येकी 2-2 विकेट्स मिळवल्या. तर अर्शदीप सिंह, जसप्रीत बुमराह आणि शिवम दुबे या तिघांनी प्रत्येकी 1-1 विकेट मिळवून नामिबियाचं पॅकअप करण्यात योगदान दिलं.
शहर
- नाशिक: भोंदू अशोक खरातच्या जामीन अर्जावर आज महत्त्वाची सुनावणी; ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम सरकार पक्षातर्फे मांडणार बाजू
- मुंबई: एक देश, एक निवडणूक'मुळे प्रशासनाची कार्यक्षमता वाढेल आणि विकासकामांना वेग मिळेल; नेत्यांचे स्पष्ट प्रतिपादन
- बीड: लेकींच्या शिक्षणासाठी आईचा अनवाणी एल्गार; साडी नेसून धावली अन् अंबाजोगाईत जिंकली मॅरेथॉन!
- जालना: सरकारने चर्चेची दारे खुली ठेवलीत, पण मनोज जरांगे पाटलांचा एल्गार; म्हणाले, माघार नाही!
महाराष्ट्र
- नाशिक: भोंदू अशोक खरातच्या जामीन अर्जावर आज महत्त्वाची सुनावणी; ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम सरकार पक्षातर्फे मांडणार बाजू
- मुंबई: एक देश, एक निवडणूक'मुळे प्रशासनाची कार्यक्षमता वाढेल आणि विकासकामांना वेग मिळेल; नेत्यांचे स्पष्ट प्रतिपादन
- बीड: लेकींच्या शिक्षणासाठी आईचा अनवाणी एल्गार; साडी नेसून धावली अन् अंबाजोगाईत जिंकली मॅरेथॉन!
- जालना: सरकारने चर्चेची दारे खुली ठेवलीत, पण मनोज जरांगे पाटलांचा एल्गार; म्हणाले, माघार नाही!
गुन्हा
- पुणे: बारामतीत धक्कादायक घटना; तांदूळवाडीत एकाच घरात माय-लेकाचा संशयास्पद मृत्यू
- मुंबई: लोकलमध्ये संतापजनक प्रकार जागेवरून झालेल्या वादानंतर धावत्या ट्रेनमधून खाली ढकलल्याने दिव्यांग वृद्धाचा मृत्यू!
- रत्नागिरी: ॲप डाउनलोड करून शुभेच्छा कार्ड तयार करणे पडले महागात; रत्नागिरीतील वृद्धाची साडेआठ लाखांची फसवणूक!
- पुणे: कोथरूडच्या एआरएआय टेकडीवर रक्ताच्या थारोळ्यात आढळला तरुणाचा मृतदेह
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य: २० ऑगस्ट २०२६ रोजी तुमच्या राशीवर काय असेल ग्रहांची स्थिती? जाणून घ्या सविस्तर!
- आजचे राशीभविष्य: १९ ऑगस्ट २०२६, ग्रह नक्षत्रांचा तुमच्या राशीवर काय होईल परिणाम?
- आजचे राशिभविष्य १५ ऑगस्ट २०२६: शनिदेवाची कृपा, या राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ!
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- मुंबई: नेपाळमधील महाप्रलय: मेसेजला सिंगल टिक, नेटवर्क नसेल का? ठाण्यातील समीर व अपर्णा जोशी यांच्या कुटुंबांची वाढली घालमेल
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- साखर: तब्बल १० वर्षांनंतर भारतात होणार आयात! देशांतर्गत वाढत्या किंमती रोखण्यासाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय, १० लाख टन कच्ची साखर मागवण्यास मंजुरी!
- दिल्ली: बाळासाठी सोडली कॉर्पोरेट नोकरी वाटलं करिअर संपलं, स्निग्धाने होमस्टे व्यवसायातून उभा केला २१ लाखांचा महसूल!

























Subscribe to my channel



