Hardik Pandya and Jasprit Bumrah against NamibiaImage Credit source: Bcci x Account
टीम इंडियाने आयसीसी टी 20I वर्ल्ड कप 2026 स्पर्धेत सलग दुसरा विजय मिळवला आहे. टीम इंडियाने नामिबियाचा 93 धावांनी धुव्वा उडवला आहे. टीम इंडियाने नामबियासमोर 210 धावांचं आव्हान ठेवलं होतं. मात्र भारतीय गोलंदाजांसमोर नामिबायाला 20 ओव्हरही खेळता आलं नाही. टीम इंडियाने नामिबियाला 10 बॉलआधी ऑलआऊट केलं. भारताने नामिबियाला 18.2 ओव्हरमध्ये 116 रन्सवर गुंडाळलं. भारताने अशाप्रकारे यूएसएनंतर आता नामिबियाचा धुव्वा उडवून सलग दुसरा विजय साकारला आहे. तसेच टीम इंडियाचा नामिबिया विरुद्धचा हा टी 20I क्रिकेटमधील एकूण आणि सलग दुसरा विजय ठरला.
भारताचा वर्ल्ड कपमधील सर्वात मोठा विजय
टीम इंडियाने नामिबियावर एकतर्फी फरकाने मात करत ऐतिहासिक कामगिरी केली. भारताचा टी 20i वर्ल्ड कप इतिहासातील हा सर्वात मोठा विजय ठरला. भारताचं या कामगिरीसाठी सोशल मीडियावरुन अभिनंदन केलं जात आहे.
सामन्यात काय झालं?
नामिबियाने नाणेफेक जिंकून भारताला बॅटिंगची संधी दिली. टीम इंडियासाठी इशान किशन आणि हार्दिक पंड्या या दोघांनी सर्वाधिक धावा केल्या. इशानने सर्वाधिक 61 धावांचं योगदान दिलं. हार्दिकने 28 चेंडूत 4 चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीने 52 धावांची चाबूक खेळी केली. तर संजू सॅमसन, शिवम दुबे आणि तिलक वर्मा या तिघांनी निर्णायक योगदान दिलं. संजू, शिवम आणि तिलक या तिघांनी अनुक्रमे 22, 23 आणि 25 अशा धावा केल्या. भारताने अशाप्रकारे 9 विकेट्स गमावून 209 रन्स केल्या. नामिबियासाठी गेरहार्ड इरास्मस याने सर्वाधिक 4 विकेट्स मिळवल्या.
नामिबियाची कडक सुरुवात
लॉरेन स्टीनकॅम्प जॅन फ्रायलिंक या सलामी जोडीने 210 धावांचा पाठलाग करताना नामिबियाला आश्वासक सुरुवात करुन दिली. या दोघांनी 33 धावा जोडल्या. त्यानंतर जॅन 22 रन्सवर आऊट झाला. लॉरेन स्टीनकॅम्प आणि लॉफ्टी-ईटन या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी 34 रन्सची पार्टनरशीप केली. लॉरेन स्टीनकॅम्प याने 29 धावा करुन मैदानाबाहेरचा रस्ता धरला. इथून टीम इंडियाने नामिबियाला ठराविक अंतराने झटके देण्याची सुरुवात केली आणि डाव गुंडाळला.
टीम इंडियाची बॉलिंग
टीम इंडियाकडून नामिबिया विरुद्ध एकूण 6 जणांनी बॉलिंग केली. भारताच्या सर्व गोलंदाजांनी विकेट मिळवली. मिस्ट्री स्पिनर वरुण चक्रवर्ती याने सर्वाधिक 3 विकेट्स मिळवल्या. बॅटिंगने चमक दाखवणाऱ्या हार्दिक पंड्या याने बॉलिंगनेही योगदान दिलं. हार्दिक आणि अक्षर पटेल या दोघांनी प्रत्येकी 2-2 विकेट्स मिळवल्या. तर अर्शदीप सिंह, जसप्रीत बुमराह आणि शिवम दुबे या तिघांनी प्रत्येकी 1-1 विकेट मिळवून नामिबियाचं पॅकअप करण्यात योगदान दिलं.
शहर
- पुणे: राजगुरूनगरमध्ये भीषण हत्याकांड! उपचारासाठी आलेल्या आजारी मामाची भाच्याकडून धारदार शस्त्राने हत्या, नंतर स्वतःही संपवले जीवन!
- नांदेड: दुष्काळाच्या बैठकीत नेत्यांना काजू-बदामाची मेजवानी मिळायला नको दुष्काळी स्थितीवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले!
- पुणे: सोलापूर महामार्गावर भीषण अपघात; रस्ता ओलांडताना अज्ञात वाहनाच्या धडकेत सहाय्यक फौजदाराचा जागीच मृत्यू!
- पुणे: मोठी कारवाई! आग प्रतिबंधक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या लोहगावमधील ११ विनापरवाना पीजी-हॉस्टेल सील!
महाराष्ट्र
- मुंबई: लालबागच्या राजाच्या दर्शनादरम्यान मोठी दुर्घटना; २५ वर्षीय जयदीप नेमाडे तरुणाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू!
- पुणे: राजगुरूनगरमध्ये भीषण हत्याकांड! उपचारासाठी आलेल्या आजारी मामाची भाच्याकडून धारदार शस्त्राने हत्या, नंतर स्वतःही संपवले जीवन!
- सातारा: जिल्हा बँक निवडणूक महायुती म्हणून एकत्र लढवावी; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची स्पष्ट भूमिका!
- नांदेड: दुष्काळाच्या बैठकीत नेत्यांना काजू-बदामाची मेजवानी मिळायला नको दुष्काळी स्थितीवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले!
गुन्हा
- अहिल्यानगर: संतापजनक प्रकार; पवनचक्कीच्या निर्जन परिसरामध्ये नेऊन महिलेचे अपहरण व जबर मारहाण
- हिंगोली: वसमतमध्ये खळबळ! पडक्या आणि निर्जन विश्रामगृहात आढळला ३२ वर्षीय तरुणाचा संशयास्पद मृतदेह; डोक्यावर गंभीर जखमा असल्यामुळे हत्येचा दाट संशय
- पुणे: "आम्ही इथले भाई... बघतोय काय!"; पुण्यात उघडपणे कोयता फिरवून नागरिकांमध्ये दहशत पसरवल्याची धक्कादायक घटना!
- छत्रपती संभाजीनगर: लग्नाचा प्रस्ताव नाकारल्याच्या रागातून मेडिकल दुकानात घुसून २२ वर्षीय केमिस्टची निर्घृण हत्या, पोलिसांनी अवघ्या ९ तासांत आवळल्या आवडी
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
- आजचे राशिभविष्य १५ सप्टेंबर २०२६: महादेवाची कृपा आणि गणेशाची साथ या राशींसाठी ठरणार भाग्य चमकवणारी, होणार धनलाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- मध्य प्रदेश: मतदान न करण्याच्या' इशाऱ्यामुळे संतापले केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया; गुना येथे ३ कोटींच्या रस्ता प्रकल्पाची त्वरित घोषणा!
- दिल्ली: धर्म म्हणजे कोणताही रिलीजन किंवा पूजापद्धती नव्हे; राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवतांचे महत्त्वपूर्ण विधान आणि धर्माची नेमकी व्याख्या
- नवी दिल्ली: पहिले शिवसेना, नंतर राष्ट्रवादी आणि आता तृणमूल काँग्रेस; टीएमसीचे नाव व चिन्ह गोठवल्यावरून राहुल गांधींचा केंद्र सरकार व निवडणूक आयोगावर कडाडून हल्लाबोल
- दिल्ली: विद्यापीठ निवडणूक २०२६ मतदानाच्या पूर्वसंध्येला नॉर्थ कॅम्पसमध्ये दोन विद्यार्थी गट भिडले, तुफान हाणामारीत एक विद्यार्थी गंभीर जखमी!


























Subscribe to my channel




