प्रा. चेतनसिंह सोळंकी यांचा कॉलम:आज आपल्या जगाला सर्वात जास्त गरज क्लायमेट सत्याग्रहाची आहे‎

‎देश सध्या भीषण उष्णतेच्या तडाख्यात आहे. तापमान‎सातत्याने नवे विक्रम प्रस्थापित करत आहे. जेव्हा मी‎लोकांना विचारतो की पुढच्या वर्षी उष्णता कमी होईल की‎जास्त, तेव्हा बहुतांश लोक काही क्षण विचार करून‎म्हणतात- कदाचित आणखी जास्त. हे उत्तर केवळ अंदाज‎नाही, तर एक कठोर सत्य आहे. पृथ्वी पूर्वीपेक्षा अधिक‎वेगाने तापत असल्याने पुढच्या वर्षी परिस्थिती आपोआप‎सुधारेल असे गृहीत धरून चालणे म्हणजे स्वतःला भ्रमात‎ठेवणे आहे. सगळ्यात मोठा प्रश्न हा आहे की येणारा‎काळ अधिक भयावह होऊ नये म्हणून आज आपण काय‎केले पाहिजे. जगभरात पर्यावरण संरक्षण, तांत्रिक विकास,‎नवीन धोरणे आणि आंतरराष्ट्रीय परिषदांवर सातत्याने काम‎सुरू आहे. असे असूनही हवामान संकट आपल्या‎डोळ्यांसमोर वेगाने वाढत आहे. याचा अर्थ ही समस्या खूप‎खोलवर आहे. मला वाटते की मानवी समाज या संदर्भात‎तीन मूलभूत चुका करत आहे. पहिली चूक ही की‎आपण निसर्गाची संसाधने- कोळसा, पेट्रोल, डिझेल आणि‎नैसर्गिक वायूला आपले भांडवल समजून बसलोत.‎कोणत्याही व्यवसायात जर तुम्ही तुमचे भांडवलच खर्च‎करू लागलात, तर तो व्यवसाय फार काळ टिकू शकत‎नाही. ‘स्मॉल इज ब्युटीफुल'' या प्रसिद्ध पुस्तकात ई. एफ.‎शुमाकर यांनी 1973 मध्येच चेतावणी दिली होती की,‎मानवी समाज पृथ्वीचे नैसर्गिक भांडवल आपल्या‎उत्पन्नासारखे खर्च करत आहे. विज्ञान, तंत्रज्ञान आणि यंत्रे‎आपण बनवली आहेत, त्यांचा वापर करणे योग्य आहे. पण‎कोट्यवधी वर्षांत तयार झालेले जीवाश्म इंधन आपण‎बनवलेले नाही. ते निसर्गाचे भांडवल आहे. जर आपण तेच‎भांडवल सातत्याने जाळत राहिलो, तर दिवाळखोरी‎निश्चित आहे.‎ दुसरी चूक अशी, आपले उत्पादन व उपभोग यातील‎वाढ अनंतकाळापर्यंत चालेल, असे आपण गृहीत धरून‎चाललोत. विज्ञान वाढत आहे, तंत्रज्ञान वाढत आहे,‎अर्थव्यवस्था वाढत आहे, पण पृथ्वी वाढत नाहीये. तिची‎संसाधने मर्यादित आहेत. मर्यादित पृथ्वीवर अमर्याद उपभोग‎कधीही शक्य होऊ शकत नाही. पण आपण विकासाची‎संपूर्ण व्याख्याच अधिक उत्पादन आणि अधिक उपभोगावर‎आधारित केली आहे. तिसरी आणि कदाचित सर्वात‎मोठी चूक ही आहे की, पर्यावरण आणि हवामान बदलाची‎समस्या सरकार सोडवेल असे आपण मानतो. वास्तव की‎ही समस्या कोणत्याही एका सरकारने किंवा उद्योगाने निर्माण‎केलेली नाही. ही समस्या आपण सर्वांनी मिळून निर्माण‎केली आहे. आपण जे कपडे घालतो, जे खातो, जे खरेदी‎करतो, जितकी वीज वापरतो, जितका प्रवास करतो- या‎सर्वांचा थेट संबंध कार्बन उत्सर्जनाशी आहे. त्यामुळे याचे‎समाधानही केवळ सरकारांकडून येणार नाही. जोपर्यंत‎प्रत्येक व्यक्ती स्वतःची जबाबदारी समजून घेत नाही,‎तोपर्यंत कोणतेही धोरण पुरेसे ठरणार नाही. म्हणूनच मला‎वाटते की आज जगाला सर्वात जास्त गरज क्लायमेट‎सत्याग्रहाची आहे. सत्याग्रहाचा अर्थ केवळ विरोध नाही,‎तर सत्याचा आग्रह धरणे हा आहे. आजचे सर्वात मोठे सत्य‎हे आहे की पृथ्वी मर्यादित असल्याने आपले जीवन आणि‎उपभोगही मर्यादित असायला हवा. क्लायमेट सत्याग्रहाचा‎अर्थ आहे स्वेच्छेने मर्यादित आणि जबाबदार जीवनशैली‎स्वीकारणे; आपली गरज आणि हाव यातील फरक समजून‎घेणे; आणि निसर्गाच्या संसाधनांचा वापर अधिकार म्हणून‎नाही तर जबाबदारी म्हणून करणे. जर आपण क्लायमेट‎सत्याग्रह स्वीकारला, तर तो आपल्या तिन्ही चुकांवर उपाय‎ठरू शकतो. हे आपल्याला अमर्याद उपभोगाच्या शर्यतीतून‎बाहेर काढून संतुलित जीवनाकडे घेऊन जाईल. आणि‎सर्वात महत्त्वाचे म्हणजे, हे लोकांना केवळ प्रेक्षक न ठेवता‎समाधानाचा भागीदार बनवेल. आता वेळ केवळ चर्चेची‎नाही, तर वैयक्तिक जबाबदारीची आहे.‎ (हे लेखकाचे वैयक्तिक विचार आहेत)‎

This post was originally published on this site.



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

राजकीय

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *