Big Blow to Ujjwala Beneficiaries

उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना मोठा फटका! आता वर्षाला मिळणार फक्त ४ सिलिंडर; केंद्र सरकारचा मोठा निर्णय

Big Blow to Ujjwala Beneficiariesकेंद्र सरकारच्या 'प्रधानमंत्री उज्ज्वला योजने'चा (PMUY) लाभ घेणाऱ्या कोट्यवधी लाभार्थ्यांसाठी एक महत्त्वाची आणि धक्कादायक बातमी समोर आली आहे. वाढत्या एलपीजी (LPG) किमती आणि सबसिडीवरील वाढता आर्थिक भार लक्षात घेता, सरकारने या योजनेतील नियमांत बदल करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. आता उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना मिळणाऱ्या सबसिडीयुक्त गॅस सिलिंडरची संख्या ९ वरून थेट ४ वर आणण्यात आली आहे.

 

नेमके काय बदल झाले आहेत?
प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेची सुरुवात मे २०१६ मध्ये झाली होती. त्यावेळी लाभार्थ्यांना वर्षाला १२ सबसिडीयुक्त गॅस सिलिंडर देण्याचे निश्चित करण्यात आले होते. त्यानंतर काळानुसार ही संख्या १२ वरून ९ करण्यात आली आणि आता पुन्हा एकदा मोठी कपात करत ती केवळ ४ सिलिंडरपर्यंत मर्यादित करण्यात आली आहे. या निर्णयामुळे सर्वसामान्यांना गॅसच्या वापराबाबत मोठी काटकसर करावी लागणार आहे.

सरकारचे स्पष्टीकरण:
पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाचे सचिव प्रवीण मल खनूजा यांनी दिलेल्या माहितीनुसार, उज्ज्वला योजनेतील लाभार्थी कुटुंबांच्या वार्षिक गॅस वापराच्या सरासरीचा अभ्यास करून ही मर्यादा ठरवण्यात आली आहे. जागतिक बाजारातील एलपीजीच्या वाढत्या दरांचा आणि मध्य पूर्वेतील तणावाचा परिणाम भारतावर होत असून, यामुळेच हा निर्णय घेणे भाग पडल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

सध्या दिल्लीमध्ये १४.२ किलोच्या घरगुती गॅस सिलिंडरची किंमत ९४२ रुपये इतकी आहे. सबसिडी वजा केल्यानंतरही उज्ज्वला लाभार्थ्यांना एका सिलिंडरसाठी ६४२ रुपये मोजावे लागत आहेत. सरकारने ऑक्टोबर २०२३ मध्ये सबसिडी ३०० रुपये केली होती, परंतु आता सिलिंडरच्या मर्यादेत कपात केल्याने सर्वसामान्यांच्या खिशावर याचा मोठा ताण पडणार आहे.

 

सविस्तर वाचा, लिंक कमेंट मध्ये  https://punenews24.in/



महाराष्ट्र

राजकीय

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *