सयाजी शिंदे, अजित पवार, शरद पवारImage Credit source: Tv9
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातातील मृत्यूनंतर राज्यातील राजकारणात अनेक घडामोडी घडत आहेत. अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. तर दुसरीकडे दोन्ही राष्ट्रवादी पक्षांच्या विलिनीकरणाच्या चर्चांनाही जोर धरला आहे. अशातच अभिनेते सयाजी शिंदे यांच्या दाव्याने खळबळ उडाली आहे. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणं हे बोलणं आमच्यासमोर झालं होतं, दोन्ही NCP नं एकत्र यावं हे अजितदादांचं स्वप्न होतं, असं सयाजी शिंदे म्हणाले. दादांचं अपुरं राहिलेलं स्वप्न पूर्ण व्हावं, अशी इच्छा सयाजी शिंदेंनी बोलून दाखवली आहे. राज्याची ताकद वाढवण्यासाठी दोन्ही राष्ट्रवादींनी एकत्र यावं, असंही म्हणाले आहेत.
“सर्वधर्मसमभाव ठेवून, गरीब-श्रीमंत न बघता, खालून आल्यामुळे त्यांनी सर्व इतकं पुढे नेण्याचं ठरवलं होतं. मला असं वाटतं की, त्यांची स्वप्नं ही आपण सर्वांनी आणि खासकरून सुनेत्रा वहिनींनी, सुप्रियाताईंनी पूर्ण करावीत. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र यावं, हे दादांचं पहिलं स्वप्न होतं. हे त्यांचं अपुरं राहिलेलं स्वप्न पूर्ण व्हावं, तरच महाराष्ट्राला खरी ताकद मिळेल. महाराष्ट्राची ताकद वाढवायची असेल तर दोन्ही पवार कुटुंबीय ताबडतोब एकत्र यायला पाहिजेत”, असं मत सयाजी शिंदे यांनी मांडलं आहे.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत आमच्यासमोर चर्चा झाली होती, असा दावा त्यांनी यावेळी केला. याविषयी ते पुढे म्हणाले, “कौटुंबिक भावना बाजूला सारून त्यांनी याबाबत निर्णय घ्यावा. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत आमच्यासमोर चर्चा झाली होती. पण अचानक हे सर्व घडलं. कोणीकाही या गोष्टीला वेगळा मार्ग न लावता, त्याआधी दोन्ही पवार कुटुंब एकत्र आले, तर महाराष्ट्र पुढे जाईल.” सयाजी शिंदेंनी नुकतीच सुनेत्रा पवार यांची भेट घेतली.
“अजित पवार यांच्या जाण्याने महाराष्ट्र नि:शब्द झाला आहे. काहीतरी सुचायलाही खूप वेळ जातोय, काय बोलावं हेच सुचत नाहीये. आज मी सुनेत्रा पवारांची भेट घेतली. काय बोलावं हेच कळत नव्हतं. त्यानंतर मोठ्या साहेबांचीही भेट घेतली. मला असं वाटतं की महाराष्ट्राच्या भल्यासाठी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र याव्यात. निवडणुकीच्या वेळी, प्रचाराच्या वेळी अशी चर्चा झाली होती की आता एकत्रच येणार आहोत. फक्त औपचारिकता राहिली होती. असं असताना असं अचानक काहीतरी व्हावं, हे महाराष्ट्राच्या दृष्टीने अत्यंत वाईट झालं आहे”, अशा शब्दांत ते व्यक्त झाले.
शहर
- वृक्ष संवर्धन समितीच्या हातून १९ झाडांची कत्तल; वसुंधरा दिनी पर्यावरणाचे उल्लंघन
- रामदास स्वामी खरेच शिवरायांचे गुरू होते का? १६७२ पूर्वी भेटीचे ठोस पुरावे नाहीत इतिहासकार काय म्हणतात?
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
- अधिकारी होण्याचं स्वप्न अधुरंच! 'सीएटी' परीक्षेला जाताना काळाचा घाला; १८ वर्षीय तरुणीला ट्रकने चिरडले
महाराष्ट्र
- नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरण: नशिल्या 'शीर खुर्मा'पासून फेस स्कॅनपर्यंत... तपासात धक्कादायक खुलासे!
- वृक्ष संवर्धन समितीच्या हातून १९ झाडांची कत्तल; वसुंधरा दिनी पर्यावरणाचे उल्लंघन
- रामदास स्वामी खरेच शिवरायांचे गुरू होते का? १६७२ पूर्वी भेटीचे ठोस पुरावे नाहीत इतिहासकार काय म्हणतात?
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
गुन्हा
- नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरण: नशिल्या 'शीर खुर्मा'पासून फेस स्कॅनपर्यंत... तपासात धक्कादायक खुलासे!
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
- नागपूर हादरले! भरधाव कारने ७२ वर्षीय योग शिक्षिकेला चिरडले; सीताबर्डी परिसरात भीषण 'हिट अँड रन'
- "तो माझ्याशी बोलत नाही..." रागाच्या भरात तरुणीने तरुणाचे खासगी फोटो केले व्हायरल; अमरावतीमधील धक्कादायक प्रकार
राजकीय
- NCP मध्ये घमासान! दिल्लीत सुनेत्रा पवार अॅक्टिव्ह, पटेल-तटकरे अडचणीत? मोठा निर्णय लवकरच?
- Mumbai ; झिरवळांची ‘विकेट’ जाणार? प्री-कॅबिनेट बैठकीत मोठा ट्विस्ट; सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीत काय घडलं?
- गुरुदेवांच्या आशीर्वादाने घशाची समस्या दूर; मुंबई महापौर रितू तावडेंच्या वक्तव्याची चर्चा
- मोठी अपडेट! रुपाली चाकणकर अडचणीत? आज चौकशीला हजर राहणार का?
इतर
- भारतातील जातीव्यवस्था : वास्तव, परिणाम आणि पुढील दिशा
- पुण्याच्या आर्या नाचणची सिल्वासा CBSE बोर्डात चमकदार कामगिरी; AI विषयात 100/100 गुण
- भारतीय रेल्वे इतक्या रंगबिरंगी का? प्रवाशांसाठी या रंगांचा अर्थ काय?
- Pune ; शेती: बाजार समित्यांमध्ये कांदा आणि कापसाच्या भावात चढ-उतार पाहायला मिळत आहेत. यामुळे शेतकरी चिंतेत
मनोरंजन
- पनवेल रेल्वे स्थानकावर थरार! लिफ्टमध्ये चार प्रवासी अर्धा तास अडकले; रेल्वे पोलिसांच्या तत्परतेमुळे सुखरूप सुटका
- महाराष्ट्र हवामान अपडेट: विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता, तर काही भागांत उष्णतेच्या लाटेचा इशारा
- मुंबईकरांचा प्रवास गारेगार! हार्बर रेल्वेच्या ताफ्यात नवीन AC लोकल; फेऱ्यांची संख्या आता थेट २८ वर
- क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले: स्त्रिया आणि शोषितांची मुक्ती करणारा महान योद्धा
देश विदेश
- भारत-रशिया ऐतिहासिक करार: ३००० सैनिकांच्या तैनातीला मंजुरी; सीमेवर तणाव वाढल्याने पाकिस्तानच्या पोटात गोळा
- इराणची मोठी कारवाई! जैश अल-अदल या दहशतवादी संघटनेच्या संपूर्ण टीमचा खात्मा; पाकिस्तान सीमेवर थरार
- LPG : युद्ध थांबताच एलपीजीबाबत केंद्राचा मोठा निर्णय; नवीन फॉर्म्युला जाहीर, कुणाला फायदा?
- अखेर निर्णायक टप्पा! अमेरिकेला धक्का; इराणने पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव फेटाळला, जगभरात खळबळ






















Subscribe to my channel




