केरळच्या अलीकडच्या दौऱ्यात मला काही विचित्रगोष्टी दिसल्या. अनेक शहरांतील चहाची दुकाने बंदहोती. तिथल्या एका स्थानिक मल्याळी चहावाल्यानेविचारले, ‘एलपीजी सिलेंडरशिवाय आम्ही कायकरणार? आम्हाला माहित आहे की पश्चिमआशियातील युद्धामुळे ही टंचाई निर्माण झाली आहे,आम्ही कोणाला दोषही देत नाही; पण सरकार आमचीसमस्या किमान मान्यही करू शकत नाही का?’ गोंधळाच्या वातावरणात ही छोटीशी गोष्ट दुर्लक्षित राहूशकते. पण ती अशा आर्थिक अंडरकरंटकडे बोटदाखवते. तो राजकीय वर्ग स्वीकारण्यास कचरत आहे.अधिकृतपणे सर्व काही ठीक असल्याचे सांगितले जात असले, तरी जमिनीवरील वास्तव खूपच नाजूक आहे. पश्चिम आशियातील तणावामुळे पुरवठा मार्गविस्कळीत झाले आहेत. विशेषतः होर्मुजच्यासामुद्रधुनीत. यामुळे मालाची वाहतूक आणि विम्याचाखर्च वाढला आहे. परंतु, इथे एक महत्त्वाचा मुद्दा आहे: जागतिक अडथळे संकट निर्माण करू शकतात. पणत्याचा परिणाम किती होईल हे देशांतर्गत धोरणे ठरवतात. आणि नेमक्या याच ठिकाणी सरकारचा ‘ऑल इजवेल’ हा दावा पोकळ वाटतो. एलपीजीचेच उदाहरणघ्या. लाखो कुटुंबांपर्यंत स्वच्छ इंधन पोहोचवणे ही गेल्यादशकांतील सर्वात मोठी बदल घडवून आणणारी आणिकल्याणकारी कामगिरी आहे. पण, ते इंधन परवडणारेनसेल, तर त्याचा काय फायदा? भारत आजही आपल्याकच्च्या तेलाच्या गरजेच्या सुमारे 85% आयात करतो.एलपीजीच्या बाबतीतही 60% पेक्षा जास्त अवलंबित्वआयातीवर आहे. मोदी सरकारही यात निष्क्रिय राहिलेलेनाही. सरकारने इंधनावरील उत्पादन शुल्कात कपात केली आणि एलपीजी वापराला प्राधान्य दिले. असो, हीतर कथेची एक बाजू झाली. खरा प्रश्न हा आहेकी,कच्च्या तेलाच्या किमती कमी होत्या, तेव्हा त्याचाफायदा ग्राहकांना का दिला गेला नाही? उलट, करवाढवले गेले जेणेकरून ग्राहक वाढीव किंमत मोजतराहील आणि सरकारी तिजोरी सुरक्षित राहील. आजदिसणाऱ्या असंतोषाचे कारण हीच विषमता आहे.केरळचा चहावाला वाढत्या खर्चामुळे दुकान बंद करतो.चेन्नईतील डिलिव्हरी बॉय इंधनावर गरजेपेक्षा जास्तखर्च करत आहे. शेतकरी डिझेल आणि खतांच्यावाढत्या किमतींशी झुंजत आहे. रोजंदारी मजूर आपलीउपजीविका गमावत आहे. हे स्पष्ट करते की कशा प्रकारेदूरवरची युद्धे देशांतर्गत संकट बनतात. असे असूनही,प्रतिसादांमध्ये पुरवठा पुरेसा असल्याचे सांगून त्याचा दोषसाठेबाजी आणि नफेखोरीवर टाकला जातो.सकारात्मक बाजू पाहता, गेल्या दशकातील आपलाचांगला विकास दर आणि तुलनेने कमी महागाईनेआशावादी राहण्याचे कारण दिले आहे. पण व्यापकस्थिरतेचे महत्त्व तेव्हाच असते, जेव्हा जमिनीवरीलपरिस्थितीही सुधारलेली असते. दुसरे म्हणजे आयातकेलेल्या ऊर्जेवर आपले अवलंबित्व आहे हे भारतालामाहित असूनही, वास्तविक ऊर्जा सुरक्षेच्या दिशेनेआपली पावले विसंगत राहिली आहेत. चीननेदीर्घकालीन करार , अक्षय ऊर्जेतील विस्तार याद्वारेसुरक्षा मजबूत केली. याउलट, भारत आधीच तयारीकरण्याऐवजी परिस्थिती उद्भवल्यावर केवळ प्रतिसाददेणारा वाटतो. हे खरे आहे की ऊर्जा बदलांना वेळलागतो. भारताच्या विकासाच्या गरजाही मोठ्या आहेत.म्हणूनच तातडीची पावले उचलावीत. पहिले पाऊलआहे - प्रामाणिकपणा. सरकारे म्हणतात की परिणाममर्यादित आहेत, तेव्हा ते स्वतःचा फायदा करत नसतात.हे वास्तव स्वीकारणे म्हणजे कमजोरी नाही, तरविश्वासार्ह धोरणाचा तो पाया आहे. दुसरे पाऊल म्हणजे- तात्काळ दिलासा. इंधनाबाबत पारदर्शक आणिनियमांवर आधारित आराखडा असावा.जेणेकरूनतेलाच्या किमती कमी झाल्यावर त्याचा फायदाग्राहकांना मिळेल. एलपीजी सबसिडीवरही फेरविचार करणे आवश्यकआहे. आज महागाईचा दबाव निम्न मध्यमवर्गापर्यंतपोहोचला आहे. अशा स्थितीत अल्पकालीन दिलासापुरेसा ठरणार नाही. भारताला ऊर्जा आत्मनिर्भरतेच्यादिशेने अधिक गंभीर प्रयत्न करावे लागतील. अक्षयऊर्जा वेगाने स्वीकारावी लागेल. सर्वात महत्त्वाचेम्हणजे ऊर्जा धोरणाला आर्थिक रणनीतीशी जोडणेआवश्यक आहे. कारण ऊर्जा हाच कृषी, उद्योग आणिसेवा यांसारख्या प्रमुख आर्थिक क्षेत्रांचा पाया आहे.(हे लेखकाचे वैयक्तिक मत आहे.) सकारात्मक बाजू पाहिल्यास गेल्यादशकातील आपला चांगला विकास दरआणि तुलनेने कमी महागाईनेआपल्याला आशावादी राहण्याचे कारणदिले. परंतु प्रत्यक्ष परिस्थितीत सुधारणा होते तेव्हा व्यापक स्थिरतेचे महत्त्व असते.
हे पण वाचा-
शहर
- पुणे: अण्णाभाऊ साठे जयंती मिरवणुकीत डीजेवरील वादानंतर रक्तरंजित थरार; टोळक्याच्या बेदम मारहाणीत तरुण जागीच ठार, १० जण अटकेत
- पुणे: सदाशिव पेठेत पोलीस व्हॅनचा थरार! भरधाव गाडीने उडवल्या अनेक वाहने, सीसीटीव्ही व्हिडिओ व्हायरल
- पुणे: पाण्याची चिंता मिटली! खडकवासला धरणसाखळीतील चारही धरणे तुडुंब भरण्याच्या मार्गावर, पाणीसाठा ९६ टक्क्यांवर
- मुंबई: जुलैमध्ये पावसाचा दिलासा, शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद, पण ऑगस्टमध्ये काय होणार? हवामान विभागाचा ताजा अंदाज
महाराष्ट्र
- राज्यातील ९० लाखांहून अधिक शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी; पीएम किसान आणि नमो शेतकरी योजनेचे ४००० रुपये एकत्रित मिळणार का
- नागपुर: अवघ्या एकाच दिवसात तीन वेगवेगळ्या महिलांच्या अंगावरील लाखांचे सोन्याचे दागिने लांबवले
- वर्धा: एटीएम फोडून १२ लाखांची रोकड लांबवली; पुरावा नष्ट करण्यासाठी चोरांनी एटीएमलाच लावली आग
- पुणे: अण्णाभाऊ साठे जयंती मिरवणुकीत डीजेवरील वादानंतर रक्तरंजित थरार; टोळक्याच्या बेदम मारहाणीत तरुण जागीच ठार, १० जण अटकेत
गुन्हा
- अमरावती: बापट चौकात मध्यरात्री रक्ताचा थरार; तरुणाची निर्घृण हत्या, शहरात एकच खळबळ
- पुणे: सिंहगड रोड परिसरात खळबळ; किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या, परिसरात तीव्र संताप
- सांगली: बकरी विकण्याच्या आमिषाखाली ठाणे आणि सोलापूरमधील चार जणांची सायबर फसवणूक; सांगलीच्या सिमकार्डचा वापर
- ठाणे: उल्हासनगरमध्ये सायबर फसवणूक; लंडनच्या डॉक्टर मित्राकडून २५ हजार पाउंड्सचे आमिष दाखवून महिला डॉक्टरला २ लाखांना गंडा
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- आजचे राशिभविष्य १ ऑगस्ट २०२६: महिन्याची सुरुवात या राशींसाठी धडाक्यात, मिळणार गुडन्यूज तर या राशींची उडणार तारांबळ
- आजचे राशिभविष्य ३१ जुलै २०२६: या भाग्यवान राशींवर असणार श्रीगणेशाची कृपा, संपत्ती आणि लाभाचे योग
- आजचे राशिभविष्य ३० जुलै २०२६: या राशींच्या कुंडलीतील ग्रह मजबूत, स्वामींची साथ मिळणार तर काहींचे वाढणार टेन्शन
- आजचे राशिभविष्य २९ जुलै २०२६: गणपती बाप्पाच्या कृपेने ‘या’ राशींना मिळणार नवीन नोकरी आणि आनंदाची बातमी
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- ग्लास्गो राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताचा ऐतिहासिक पराक्रम; ज्युडोमध्ये सुवर्णपदक जिंकणारी अस्मिता डे ठरली पहिली भारतीय खेळाडू!
- गोवा: बांबोळीतील 'फुलान्चो खुरीस'जवळ भीषण अपघात; वाहन पेट घेतल्याने एक जण ठार, तर दोघे जण गंभीर जखमी
- नवी दिल्ली: आधार कार्डमध्ये पत्ता अपडेट करणे झाले आणखी सोपे; नवीन अॅपवरून घरबसल्या करा अर्ज
- जम्मू-काश्मीर: कुलगाममधील केल्लम भागात दहशतवादी हल्ला, छत्तीसगडच्या दोन मजुरांचा मृत्यू; 'लष्कर-ए-तैयबा'कडून कृत्याची कबुली




























Subscribe to my channel




