
Nashik : अवकाळी पावसाने अक्षरशः झोडपून काढले आहे. यात शेती पिकांचे नुकसान होऊन शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला आहे. दरम्यान मे महिन्यात झालेल्या अवकाळी पावसाचा सर्वाधिक फटका कांद्याला बसला आहे. कारण एकट्या नाशिक जिल्ह्यात तब्बल तीन हजार हेक्टर क्षेत्रावरील कांदा मातीमोल झाला आहे. याशिवाय फळबागा देखील उध्वस्त झाल्या आहेत. यात शेतकऱ्यांचे प्रचंड आर्थिक नुकसान झाले आहे.
राज्यभरात अनेक ठिकाणी गेले काही दिवस पावसाचा जोर कायम पाहायला मिळत आहे. मे महिन्याच्या सुरवातीपासून सुरु झालेला पाऊस अजून देखील थांबलेला नाही. या मान्सूनपूर्व पावसामुळे शेतकऱ्याचं मोठं आर्थिक नुकसान झाले. यामध्ये काढणी केलेला व काढणीवर आलेल्या कांद्याचे प्रचंड नुकसान झाले आहे. कांद्यापाठोपाठ आंबा, डाळिंब, भाजीपाला आणि काही प्रमाणात द्राक्षांचे देखील नुकसान झाले आहे.
|
|
नाशिक जिल्ह्यात साडेसहा हेक्टरवर पिकांचे नुकसान मे महिन्याच्या सुरवातीपासून सुरु झालेल्या अवकाळी पावसामुळे नाशिक जिल्ह्यात एकूण ६ हजार ५०० हेक्टरवरील पिकांना फटका बसला आहे. यात सर्वाधिक नुकसान कांद्याचे झाले असून मुसळधार पावसामुळे तब्बल ३ हजार हेक्टरवरील कांदा मातीमोल गेला आहे. काढणी करून ठेवलेला कांदा शेतातच सोडून गेल्याचे चित्र पाहण्यास मिळत आहे. अर्थात विक्रीसाठी नेण्यासाठी देखील शेतकऱ्याला उसंत मिळाली नसल्याने लाखो रुपयांचे नुकसान कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे झाले आहे.
वाफसाचा अंदाज घेऊनच खरिप पेरणीचे आवाहन दरम्यान अवकाळी पाऊस सुरु असताना राज्यात मॉन्सून दाखल झालेला आहे. मॉन्सून दाखल झाल्याने अनेक शेतकरी पेरणीच्या कामाला लागण्याची शक्यता आहे. नाशिक जिल्ह्यात यंदा साडे ६ लाख ४४ हजार हेक्टरवर खरिपाच्या पेरणीचा अंदाज आहे. मात्र शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये. ज्या भागात ८० ते १०० मिलिमीटर पाऊस झाला. त्या भागातील शेतकऱ्यांनी मातीच्या वाफसाचा अंदाज घेऊनच खरिपाच्या पेरणी करावी; असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अभिमन्यू काशिद यांनी केले आहे.
शहर
- पुणे: एम.ए. रंगूनवाला कॉलेजतर्फे अबेदा इनामदार इम्प्लांटोलॉजी आणि डिजिटल दंतचिकित्सा केंद्राचा शुभारंभ
- पुणे: आषाढी वारीची सांगता! 'ज्ञानोबा-तुकाराम'च्या जयघोषाने देहूनगरी दुमदुमली, तुकोबा पोहोचले देहूला.
- मुंबई: मॉर्निंग वॉकला जाणे पडले महागात; मुंबईत पहाटे फिरायला गेलेल्या तरुणावर चाकूने वार करत पैसे लुटले!
- चंद्रपूर: अंगणवाडीतील पोषण आहाराच्या तांदळात आढळले जिवंत किडे; प्रयोगशाळेकडून तांदूळ 'असुरक्षित' घोषित.
महाराष्ट्र
- सिंधुदुर्ग: आंबोलीत मन हेलावणारी दुर्घटना: धबधब्यावर सर्पदंश झालेल्या पर्यटकाचा वाहतूक कोंडीत रुग्णवाहिका अडकल्याने उपचाराअभावी मृत्यू
- पुणे: एम.ए. रंगूनवाला कॉलेजतर्फे अबेदा इनामदार इम्प्लांटोलॉजी आणि डिजिटल दंतचिकित्सा केंद्राचा शुभारंभ
- जळगाव: जामनेर आगारातून नवी कोरी एसटी बस लांबवली; बसचे चाक पंक्चर होताच चोरट्याने रस्त्यातच सोडली!
- मुंबई: मॉर्निंग वॉकला जाणे पडले महागात; मुंबईत पहाटे फिरायला गेलेल्या तरुणावर चाकूने वार करत पैसे लुटले!
गुन्हा
- अहमदाबाद: इमारतीच्या टेरेसवर जाऊन २२ वर्षीय पीजी विद्यार्थीनीवर सुरक्षा रक्षकाचा जीवघेणा अत्याचार.
- पुणे: प्रियकरासोबत राहत असल्याच्या रागातून पतीने केला पत्नीचा निर्घृण खून.
- पुणे: माणुसकी वेशीवर! पुण्यातील खराडी येथे मुळा-मुठा नदीपात्रात आढळला नवजात चिमुकलीचा मृतदेह; पोलिसांनी सुरू केला सखोल तपास.
- पुणे: भोरमध्ये संतापजनक घटना; दारू पिण्यास विरोध करणाऱ्या पोटच्या आईलाच दारुड्या मुलाने लोखंडी रॉडने ठेचून संपवले, मृतदेह घरात ठेवून पळाला.
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- अंक भविष्य ४ ऑगस्ट २०२६: जाणून घ्या मूलांक १ ते ९ नुसार तुमचे आजचे राशीभविष्य
- आजचे राशिभविष्य ३ ऑगस्ट २०२६: जाणून घ्या आज कोणत्या राशींवर होणार शिवाची कृपा आणि कोणाला मिळणार ग्रहांची साथ
- आजचे राशिभविष्य १ ऑगस्ट २०२६: महिन्याची सुरुवात या राशींसाठी धडाक्यात, मिळणार गुडन्यूज तर या राशींची उडणार तारांबळ
- आजचे राशिभविष्य ३१ जुलै २०२६: या भाग्यवान राशींवर असणार श्रीगणेशाची कृपा, संपत्ती आणि लाभाचे योग
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- प्रसिद्ध संगीतकार ए.आर. रहमानच्या मुलाला अपघात: गायक ए.आर. अमीनच्या कारला चेन्नईत धडक, थोडक्यात बचावला!
- अहमदाबाद: इमारतीच्या टेरेसवर जाऊन २२ वर्षीय पीजी विद्यार्थीनीवर सुरक्षा रक्षकाचा जीवघेणा अत्याचार.
- बिहार: आईच्या उपचारासाठी जमीन गहाण ठेवली, एका गायीपासून सुरू केला प्रवास; बिहारच्या रोशन कुमार यांची प्रेरणादायी यशोगाथा.
- दिल्ली: ४२ वर्षीय महिला वकिलाचा हैदरपूर उड्डाणपुलावरून पडून मृत्यू; पतीने ढकलून दिल्याची कुटुंबीयांची तक्रार, पतीवर गुन्हा दाखल.



























Subscribe to my channel



