जगात सध्या युद्धाचे ढग दिसत आहेत. अमेरिका – इस्त्रायलने इराणवर केलेल्या हल्ल्याला त्यांच्याकडून चोख प्रत्युत्तर मिळत आहे. मध्य पूर्वेतील या युद्धाचा फटका सर्वांनाच बसतानादिसत आहे. इराणने विविध देशातील अमेरिकी सैन्याच्या ळावरही हल्ला चढवला. सर्वत्र तणावाचे वातावरण असून त्यातच आता पाकिस्तानचे राष्ट्रपती आसिफ अली जरदारी यांनी एक मोठा दावा केला आहे. भारत आणखी एका युद्धाची तयारी करत आहे, असं त्यांनी म्हटलं आहे. भारतीय नेते उघडपणे युद्धाबद्दल बोलत आहेत. पण प्रादेशिक शांततेचे नेहमीच समर्थक असल्यामुळे मी या मार्गाची शिफारस करणार नाही असं त्यांनी नमूद केलं. भारतासाठी शांततेचा संदेश पाकिस्तान भारतासोबत सार्थक आणि शांततापूर्ण चर्चेसाठी तयार आहे आणि युद्धापेक्षा प्रादेशिक सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी संवाद हा एकमेव मार्ग आहे, असेही झरदारी म्हणाले. ‘भारताला माझा संदेश आहे की युद्धाच्या वातावरणातून बाहेर पडून अर्थपूर्ण चर्चेसाठी टेबलावर बसा, कारण हाच प्रादेशिक शांतता आणि स्थिरतेचा मार्ग आहे.’ असं त्यांनी सांगितलं. दक्षिण आशियातील सुरक्षा परिस्थितीवरून वाढलेल्या तणावाच्या वेळी झरदारी यांचं हे विधान आलं आहे. सोमवारी संसदेच्या संयुक्त अधिवेशनाला संबोधित करताना, विरोधकांच्या गदारोळात, झरदारी यांनी अफगाणिस्तानबद्दलही एक विधान केलं. अफगाणिस्तानबाबत कठोर भूमिका अफगाण सीमेपलीकडून होणाऱ्या हल्ल्यांवरही झरदारी यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. दोहा कराराच्या अटींचे पालन न केल्याचा आरोप त्यांनी अफगाण नेतृत्वावर केला. झरदारी यांच्या मते, तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान आणि बीएलए सारख्या दहशतवादी गटांना अफगाण भूमीतून पाठिंबा मिळत आहे. पाकिस्तानचा संयम संपला आहे आणि कोणत्याही बाह्य किंवा देशांतर्गत शक्तीला पाकिस्तानची शांतता भंग करू दिली जाणार नाही असं त्यांनी स्पष्ट केलं. इराणवरील हल्ल्याचा केला निषेध पाकिस्तानी राष्ट्रपतींनी इराणविरुद्ध सुरू असलेल्या लष्करी कारवायांचा निषेध केला. एवढंच नव्हे तर त्यांनी इराणच्या सार्वभौमत्वाला पाठिंबा दर्शविला आणि अयातुल्ला अली खामेनी यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला. दरम्यान, इराणच्या सर्वोच्च नेत्याच्या हत्येनंतर झालेल्या हिंसक निदर्शनांना प्रतिसाद म्हणून पाकिस्तानव्याप्त गिलगिट-बाल्टिस्तानमधील स्कार्दूमध्ये तीन दिवसांचा संचारबंदी लागू करण्यात आली आहे. पाकिस्तान-अफगाणिस्तान सीमेवरही संघर्ष सुरूच आहे.
हे पण वाचा-
शहर
- मुंबई: आषाढी वारीसाठी मध्य रेल्वेचा मोठा निर्णय, मुंबई-पुणे ते पंढरपूर विशेष रेल्वे जाहीर, कधी सुटणार आणि कुठे थांबणार
- मुंबई: कल्याणमध्ये खळबळजनक हत्याकांड; मिंडा कंपनीतील वरिष्ठ कर्मचाऱ्याची २ सहकाऱ्यांनी केली निर्घृण हत्या, हत्येमागचे धक्कादायक कारण समोर
- नवी मुंबई: सोनम डोंगरे मृत्यू प्रकरण: ऐरोलीतील राजमाता जिजाऊ रुग्णालयातील डॉक्टरांना क्लीनचिट; अहवालात निष्काळजीपणा नसल्याचा दावा
- पुणे: कात्रजमध्ये थरारक खून! डोके, चेहरा आणि हातावर कोयत्याने अनेक वार करत १७ वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या
महाराष्ट्र
- मुंबई: आषाढी वारीसाठी मध्य रेल्वेचा मोठा निर्णय, मुंबई-पुणे ते पंढरपूर विशेष रेल्वे जाहीर, कधी सुटणार आणि कुठे थांबणार
- मुंबई: कल्याणमध्ये खळबळजनक हत्याकांड; मिंडा कंपनीतील वरिष्ठ कर्मचाऱ्याची २ सहकाऱ्यांनी केली निर्घृण हत्या, हत्येमागचे धक्कादायक कारण समोर
- नवी मुंबई: सोनम डोंगरे मृत्यू प्रकरण: ऐरोलीतील राजमाता जिजाऊ रुग्णालयातील डॉक्टरांना क्लीनचिट; अहवालात निष्काळजीपणा नसल्याचा दावा
- मध्य प्रदेश: दिवसाढवळ्या थरारक हत्याकांड! हॉटेलबाहेर ६० वर्षीय वकीलाची गोली झाडून निर्घृण हत्या, ३ हल्लेखोर फरार
गुन्हा
- सांगली: पेठनाका येथे भीषण अपघात, डंपरच्या धडकेत पतीचा जागीच मृत्यू, पत्नी गंभीर जखमी; परिसरात शोककळा
- छत्रपती संभाजीनगर: छळाला कंटाळून महिलेनं संपवलं जीवन; तीन चिमुकले आईच्या मायेला पारखे, उपस्थितांचे पाणावले डोळे
- वाघोली: सायबर गुन्ह्यांच्या फसवणुकीतील रक्कम फिरविण्यासाठी वापर झालेल्या वाघोली व लोणीकंद येथील बँकेच्या संशयित खातेदारांविरुद्ध गुन्हा दाखल
- मुंबई: पहिल्या नवऱ्याशी फोनवर बोलण्याच्या संशयातून संताप; पतीनेच ओशिवऱ्यात केला पत्नीचा काटा काढत आवळला गळा
राजकीय
- मुंबई/नाशिक: मातोश्रीवर उद्धव ठाकरेंनी नाशिकच्या नगरसेवकांचे वाढवले मनोबल; दिली एकनिष्ठतेची ग्वाही.
- दिल्ली: अमित शाहांच्या भेटीनंतर शिंदे गटाला मिळणार दोन मंत्रिपदे? 'या' नेत्यांच्या नावाची चर्चा.
- सिंधुदुर्ग: सावंतवाडी पाणीपुरवठा योजनेला वेग; आमदार दीपक केसरकर आणि जिल्हाधिकाऱ्यांकडून प्रकल्पाची प्रत्यक्ष पाहणी!
- नाशिक: १२ नगरसेवक फुटण्याच्या भीतीने उद्धव ठाकरे स्वतः रिंगणात; मातोश्रीवर होणार 'वन-टू-वन' चर्चा.
इतर
- आजचे राशिभविष्य १९ जुलै २०२६: 'या' राशींवर बरसणार बाप्पाची कृपा, करिअर आणि पैशांच्या बाबतीत मिळेल यश!
- आजचे राशिभविष्य १६ जुलै: गणरायाची विशेष कृपा या राशींवर; धनलाभ, यश आणि आनंदाचे संकेत
- आजचे राशिभविष्य १५ जुलै: गणरायाची विशेष कृपा या राशींवर; काहींनी आर्थिक आणि आरोग्याची घ्यावी काळजी.
- मुंबई: व्हायरल ताप, डेंग्यू आणि गॅस्ट्रोच्या रुग्णांत १५ ते २० टक्क्यांनी वाढ; 'या' लक्षणांकडे करू नका दुर्लक्ष!
मनोरंजन
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
- क्रिकेट विश्व: क्रिकेटर सौरव गांगुली च्या बायोपिक चं पहिलं पोस्टर रिलीज !
देश विदेश
- सिक्कीम: बोगद्यात मिथेन गॅसचा भीषण स्फोट, दरड कोसळून ९ कामगारांचा मृत्यू; अनेक जण अडकल्याने खळबळ
- दिल्ली: प्रसिद्ध मराठी अभिनेत्री चिन्मयी सुमीत मुलांसह जंतरमंतरवरील आंदोलनात सहभागी, व्हिडीओ व्हायरल
- उत्तर प्रदेश: युट्यूबवर शोधली हत्येची आयडिया! विवाहित प्रियकराने औषधाच्या नावाखाली नर्स प्रेयसीला दिली विषारी ड्रिप
- दिल्लीत हायअलर्ट! संसदेच्या सुरक्षेसाठी वॉटर गनचे बंब अन् हजारो जवान तैनात; सीजेपीच्या आंदोलनामुळे छावणीचे स्वरूप"
























Subscribe to my channel




