
Ajit Pawar on Maratha Reservation : मराठा आरक्षणावरून राज्याचं राजकारण तापलं आहे. मराठा आरक्षणावरून मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेतली आहे. मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणावरून शिंदे सरकारला पुन्हा एकदा आंदोलनाचा इशारा दिला आहे. मनोज जरांगे यांच्या भूमिकेनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मराठा आरक्षणावर मोठं वक्तव्य केलं आहे.
सोलापुरातील विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याच्या ऊस गाळप हंगामाचा शुभारंभ उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते झाला. यानिमित्त शेतकरी संवाद मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याला अजित पवारांनी संबोधित केलं. या मेळाव्यात उपमुख्यमंत्री अजित पवारांनी मराठा आरक्षणावर मोठं भाष्य केलं.
|
|
अजित पवार म्हणाले, 'प्रत्येक समाजाला आरक्षण मागण्याचा अधिकार आहे. त्यासाठी उपोषण करू शकतात. सभा घेऊ शकतात. आंदोलन करू शकतात. पृथ्वीराज चव्हाण सरकारने दिलेलं मराठा आरक्षण हायकोर्टात टिकलं नाही. देवेंद्र फडणवीस यांनी दिलेलं आरक्षण हायकोर्टात टिकलं नाही'.
'राज्यात ६२ टक्के आरक्षण आहे. ५२ टक्के मागासवर्गीयांसाठी आरक्षण आहे. तर १० टक्के आर्थिक निकषांवर आरक्षण आहे. मनोज जरांगे याचं म्हणणं आहे की, 'मराठा समाजाला सरसकट कुणबी दाखले द्या'. ओबीसीमध्ये सध्या ३५० जाती आहेत. मी मराठा समजाचा आहे, दुसऱ्या समाजाचा नाही, असे अजित पवार पुढे म्हणाले.
'आपल्याला स्वातंत्र्य मिळालं, तेव्हा ३५ कोटी होतो. आता १४० कोटी झालो. त्यात कोणी थांबायलाच तयार नाही. त्यात देवाची कृपा नसते. आपलीच सगळी कृपा असते. आमची मराठा आरक्षणासंदर्भात तज्ज्ञांशी चर्चा सुरु आहे. आरक्षण दिलं तर टिकलं पाहीजे. सत्ताधारी म्हणून ती आमची जबाबदारी आहे, असे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.
'आताच्या आरक्षणाला धक्का न लावता नवीन आरक्षण देण्याची आमची भूमिका आहे. आम्ही सकारात्मक आहोत. आरक्षण कोर्टात टिकलं पाहीजे. मराठा समाजाला आरक्षण देताना इतरांच्या आरक्षणाला धक्का लागला नाही पाहीजे. त्यांच्या भावना दुखावल्या गेल्या नाही पाहीजेत, असे ते म्हणाले.
शिंदे सरकारमध्ये सहभागी होण्याच्या निर्णयावरही अजित पवार यांनी भाष्य केलं. 'बहुजन आणि वंचित समाजाला मदत करण्याकरिता आम्ही भाजपबरोबर जाण्याचा निर्णय घेतला. आम्ही शाहु-फुले-आंबेडकर यांच्या विचारानेच पुढे चाललो आहोत. त्यात कुठलीही तडजोड केलेली नाही, असे अजित पवारांनी सांगितले.
शहर
- मुंबई: कंपन्या बंद झाल्याचा केवळ आभास, त्यातील ७६ टक्के कंपन्या.. शरद पवारांच्या दाव्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे आकडेवारीसह जोरदार प्रत्युत्तर
- पुणे: १ हजार ३१७ बेवारस वाहनांचा जाहीर लिलाव; वाहतूक पोलिसांची मोठी कारवाई, वाहनमालकांना १५ दिवसांची मुदत
- मुंबई: मेट्रो-२बच्या कामादरम्यान क्रेन बिघडल्याने जुहू आणि अंधेरीत वाहतूक कोलमडली; दिवसभर वाहनचालक त्रस्त
- पुणे: अतिक्रमण करणाऱ्या ढोल पथकांना पाठीशी घालणार नाही; हलगर्जी किंवा नियमभंग झाल्यास कठोर नोटीस देणार - महापौर मंजुषा नागपुरे
महाराष्ट्र
- मुंबई: कंपन्या बंद झाल्याचा केवळ आभास, त्यातील ७६ टक्के कंपन्या.. शरद पवारांच्या दाव्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे आकडेवारीसह जोरदार प्रत्युत्तर
- पुणे: १ हजार ३१७ बेवारस वाहनांचा जाहीर लिलाव; वाहतूक पोलिसांची मोठी कारवाई, वाहनमालकांना १५ दिवसांची मुदत
- मुंबई: मेट्रो-२बच्या कामादरम्यान क्रेन बिघडल्याने जुहू आणि अंधेरीत वाहतूक कोलमडली; दिवसभर वाहनचालक त्रस्त
- पुणे: अतिक्रमण करणाऱ्या ढोल पथकांना पाठीशी घालणार नाही; हलगर्जी किंवा नियमभंग झाल्यास कठोर नोटीस देणार - महापौर मंजुषा नागपुरे
गुन्हा
- नाशिक: केमिकल वापरून बनवल्या जात होत्या बनावट नोटा; त्र्यंबकेश्वर मार्गावरील बंगल्यावर पोलिसांचा छापा
- कोल्हापूर: वीजचोरीचा मोठा भांडाफोड शिरोळमध्ये स्मार्ट मीटरमध्ये फेरफार करून ९ लाखांची चोरी; पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल!
- सांगली: "मेस बदलली म्हणून विद्यार्थ्याला लाथाबुक्क्यांनी अमानुष मारहाण; विटा येथील 'गुरुकुल'मधील प्रकाराने खळबळ."
- पुणे: "पहाटे ३ वाजता थरार; गळ्याला कोयता लावून व्यापाऱ्याची कार फोडली अन् रोकड लुटली!"
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- १३ ऑगस्ट २०२६ चे आजचे राशिभविष्य: श्रावण मासाच्या पहिल्या दिवशी कोणावर होणार शिवकृपा
- पंचांग १२ ऑगस्ट २०२६: दीपअमावस्या, बुधादित्य योग, गजकेसरी योग आणि शुभ मुहूर्त
- ८ ऑगस्ट २०२६ चे सविस्तर राशिभविष्य: आज शनीची विशेष कृपा, या राशींचे नशीब चमकणार!
- अंक भविष्य ४ ऑगस्ट २०२६: जाणून घ्या मूलांक १ ते ९ नुसार तुमचे आजचे राशीभविष्य
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- नवी दिल्ली: लोकशाही जिवंत ठेवण्याची आपली जबाबदारी आहे; कपिल सिब्बलांच्या युक्तिवादावर सरन्यायाधीशांचे महत्त्वपूर्ण निरीक्षण
- बांगलादेश: आता फक्त भारतच वाचवू शकतो का? रात्री ८ वाजताच दिवे बंद करण्याची वेळ का आली? नेमकं काय घडलं
- उत्तर प्रदेश: केस गळतीच्या गंभीर समस्येमुळे आणि उपचारांनंतरही फरक न पडल्याने १५ वर्षीय मुलीचे टोकाचे पाऊल; गळफास घेऊन संपवले जीवन!
- नवी दिल्ली: राज्यसभेत मोठा गदारोळ रामलिला मैदानावर झालेल्या 'शुद्धीकरण' हवन प्रकरणावरून मल्लिकार्जुन खर्गे यांचे भाजपवर जोरदार प्रहार!

























Subscribe to my channel




