मुंबई: महाराष्ट्रातील उद्योगधंद्यांच्या स्थितीवरून आणि गेल्या ५ वर्षांत हजारो कंपन्या बंद पडल्याच्या मुद्यावरून राजकीय वर्तुळात मोठे आरोप-प्रत्यारोप सुरू असतानाच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर अत्यंत सविस्तर व आकडेवारीसह स्पष्टीकरण दिले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्यातील सुमारे ३६ हजार खासगी कंपन्या बंद पडल्याची चिंता व्यक्त करत सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली होती. यावर प्रत्युत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांचा हा दावा पूर्णपणे फेटाळून लावला असून, यामागील खरी वस्तुस्थिती आणि आकडेवारी जनतेसमोर मांडली आहे.
राज्यातून उद्योग किंवा कंपन्या बंद झाल्याचा केवळ एक चुकीचा आभास निर्माण केला जात आहे, असे स्पष्ट करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, संसदेतील प्रश्नोत्तरांच्या प्रक्रियेत संक्षिप्त स्वरूपात माहिती दिली जाते. मात्र, कंपन्यांबाबतचा सविस्तर आणि खरा तपशील हा केंद्रीय कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाच्या (Ministry of Corporate Affairs) अधिकृत संकेतस्थळावर पूर्णपणे उपलब्ध असतो. काही राजकीय नेत्यांनी आणि माध्यमांनी संसदेतील उत्तराचा आपापल्या सोयीनुसार अर्थ काढून समाजात गैरसमज पसरवण्याचे काम केले आहे, असा आरोप मुख्यमंत्र्यांनी केला.
या प्रकरणाची सविस्तर आकडेवारी मांडताना मुख्यमंत्री म्हणाले की, ज्या कंपन्या बंद झाल्याचे दाखवले जात आहेत, त्यापैकी तब्बल ७६ टक्के कंपन्या या प्रत्यक्ष सुरूच झालेल्या नव्हत्या, म्हणजेच त्या निष्क्रिय किंवा 'डिफंक्ट' स्वरूपाच्या होत्या. प्रत्यक्ष आर्थिक उलाढाल न करणाऱ्या किंवा केवळ कागदोपत्री नोंदणी होऊन कधीही कार्यान्वित न झालेल्या अशा कंपन्यांचे प्रमाण यामध्ये सर्वाधिक आहे. त्यामुळे प्रत्यक्षात चालू असलेले उद्योगधंदे बंद पडल्याचा दावा करणे धादांत खोटे आणि दिशाभूल करणारे आहे, असे ते म्हणाले.
याचबरोबर, पुण्यातील चाकण एमआयडीसीमधील काही कंपन्यांच्या स्थलांतराबाबत शरद पवार यांनी व्यक्त केलेल्या चिंतेवर बोलताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले की, महाराष्ट्र हे नेहमीच देशात उद्योगांच्या बाबतीत अग्रेसर राहिले आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा हा महाराष्ट्र औद्योगिक क्षेत्रात क्रमांक १ वर होता आणि कायम क्रमांक १ वरच राहील. राज्यातील उद्योगांना अधिक चांगल्या सुविधा मिळवून देण्यासाठी आणि त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी राज्य सरकार पूर्णपणे कटिबद्ध आहे, असे सांगत मुख्यमंत्र्यांनी विरोधकांच्या या मुद्द्याला जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
शहर
- पुणे: १ हजार ३१७ बेवारस वाहनांचा जाहीर लिलाव; वाहतूक पोलिसांची मोठी कारवाई, वाहनमालकांना १५ दिवसांची मुदत
- मुंबई: मेट्रो-२बच्या कामादरम्यान क्रेन बिघडल्याने जुहू आणि अंधेरीत वाहतूक कोलमडली; दिवसभर वाहनचालक त्रस्त
- पुणे: अतिक्रमण करणाऱ्या ढोल पथकांना पाठीशी घालणार नाही; हलगर्जी किंवा नियमभंग झाल्यास कठोर नोटीस देणार - महापौर मंजुषा नागपुरे
- नाशिक: केमिकल वापरून बनवल्या जात होत्या बनावट नोटा; त्र्यंबकेश्वर मार्गावरील बंगल्यावर पोलिसांचा छापा
महाराष्ट्र
- पुणे: १ हजार ३१७ बेवारस वाहनांचा जाहीर लिलाव; वाहतूक पोलिसांची मोठी कारवाई, वाहनमालकांना १५ दिवसांची मुदत
- मुंबई: मेट्रो-२बच्या कामादरम्यान क्रेन बिघडल्याने जुहू आणि अंधेरीत वाहतूक कोलमडली; दिवसभर वाहनचालक त्रस्त
- पुणे: अतिक्रमण करणाऱ्या ढोल पथकांना पाठीशी घालणार नाही; हलगर्जी किंवा नियमभंग झाल्यास कठोर नोटीस देणार - महापौर मंजुषा नागपुरे
- नाशिक: केमिकल वापरून बनवल्या जात होत्या बनावट नोटा; त्र्यंबकेश्वर मार्गावरील बंगल्यावर पोलिसांचा छापा
गुन्हा
- नाशिक: केमिकल वापरून बनवल्या जात होत्या बनावट नोटा; त्र्यंबकेश्वर मार्गावरील बंगल्यावर पोलिसांचा छापा
- कोल्हापूर: वीजचोरीचा मोठा भांडाफोड शिरोळमध्ये स्मार्ट मीटरमध्ये फेरफार करून ९ लाखांची चोरी; पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल!
- सांगली: "मेस बदलली म्हणून विद्यार्थ्याला लाथाबुक्क्यांनी अमानुष मारहाण; विटा येथील 'गुरुकुल'मधील प्रकाराने खळबळ."
- पुणे: "पहाटे ३ वाजता थरार; गळ्याला कोयता लावून व्यापाऱ्याची कार फोडली अन् रोकड लुटली!"
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- १३ ऑगस्ट २०२६ चे आजचे राशिभविष्य: श्रावण मासाच्या पहिल्या दिवशी कोणावर होणार शिवकृपा
- पंचांग १२ ऑगस्ट २०२६: दीपअमावस्या, बुधादित्य योग, गजकेसरी योग आणि शुभ मुहूर्त
- ८ ऑगस्ट २०२६ चे सविस्तर राशिभविष्य: आज शनीची विशेष कृपा, या राशींचे नशीब चमकणार!
- अंक भविष्य ४ ऑगस्ट २०२६: जाणून घ्या मूलांक १ ते ९ नुसार तुमचे आजचे राशीभविष्य
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- नवी दिल्ली: लोकशाही जिवंत ठेवण्याची आपली जबाबदारी आहे; कपिल सिब्बलांच्या युक्तिवादावर सरन्यायाधीशांचे महत्त्वपूर्ण निरीक्षण
- बांगलादेश: आता फक्त भारतच वाचवू शकतो का? रात्री ८ वाजताच दिवे बंद करण्याची वेळ का आली? नेमकं काय घडलं
- उत्तर प्रदेश: केस गळतीच्या गंभीर समस्येमुळे आणि उपचारांनंतरही फरक न पडल्याने १५ वर्षीय मुलीचे टोकाचे पाऊल; गळफास घेऊन संपवले जीवन!
- नवी दिल्ली: राज्यसभेत मोठा गदारोळ रामलिला मैदानावर झालेल्या 'शुद्धीकरण' हवन प्रकरणावरून मल्लिकार्जुन खर्गे यांचे भाजपवर जोरदार प्रहार!























Subscribe to my channel




