ऋ ग्वेदाचे अंतिम संकलन साधारणपणे १००० इसवी सनापूर्वी केले गेले असे मानले जाते. यामध्ये कुरुकुळातील सदस्यांसाठी ‘भरत’ शब्दाचा वापर केला गेला आहे. या कुळातील सदस्य सिंधू नदीच्या खोऱ्यापासून गंगेच्या पश्चिम तटापर्यंत पसरलेल्या क्षेत्रावर नियंत्रण ठेवत असत. हा भूभाग आज पंजाब आणि हरियाणा म्हणून ओळखला जातो. या दृष्टीने भरत कुळातील राजांना हिंदुस्थानच्या सुरुवातीच्या राजांमध्ये गणले जाते. या राजांनी गंगेच्या मैदानी प्रदेशात वैदिक संस्कृतीची स्थापना आणि प्रसार करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.
साधारण एक हजार वर्षांनंतर, म्हणजेच १०० इसवी सनापूर्वीच्या आसपास ओडिशामध्ये जैन राजा खारवेलच्या शिलालेखात गंगेच्या मैदानी क्षेत्राला ‘भारतवर्ष’ म्हटले गेले आहे. हा उल्लेख सांगतो की, तोपर्यंत हे नाव एक भौगोलिक-सांस्कृतिक ओळख म्हणून प्रस्थापित झाले होते. साधारण याच कालखंडात भरत राजांची कथा ऋषी व्यासांद्वारे संस्कृत महाकाव्याच्या रूपात संकलित केली गेली. सुरुवातीला हा ग्रंथ ‘जय’ आणि नंतर ‘महाभारत’ नावाने प्रसिद्ध झाला. महाभारतात ययाती, शंतनू, पुरू, कुरू आणि भरत यांसारख्या राजांच्या कथा वर्णिल्या आहेत. कारण या राजांचा उल्लेख आधी ऋग्वेदातही मिळतो, त्यामुळे असे मानणे स्वाभाविक वाटते की महाभारतात वैदिक विचारांचे विस्तृत रूप मांडले गेले असेल. परंतु वास्तव मध्ये परिस्थिती यापेक्षा वेगळी दिसून येते. या नव्या महाकाव्यात भरताला शकुंतला आणि दुष्यंत यांचा पुत्र सांगितले आहे. शकुंतला ही मेनका आणि विश्वामित्राची मुलगी आहे. येथे मेनका एक अप्सरा आहे आणि विश्वामित्र सूर्यवंशी मानले जातात. दुसरीकडे दुष्यंत चंद्रवंशी आहेत. अशा प्रकारे राजा भरतमध्ये हिंदूु्थानच्या दोन महान राजवंशांचा (सूर्यवंश आणि चंद्रवंश) संगम दाखवला गेला आहे. साधारण ५०० इसवीमध्ये रचित विष्णुपुराणात भरत नावाच्या एका अन्य व्यक्तीचा उल्लेख मिळतो, जो राजा ऋषभनाथाचा पुत्र होता. ऋषभनाथाने तपस्वी बनल्यानंतर भरताने राजपद सांभाळले होते. ऋषभनाथ जैन परंपरेत प्रथम तीर्थंकर मानले जातात. जैन धर्मात जीवनात संयम आणि तपस्येला विशेष महत्त्व दिले गेले आहे. जैन विचारांचा प्रारंभ सुरुवातीपासूनच मौखिक स्वरूपात होत राहिला. जैन ग्रंथांनुसार भरत, ऋषभनाथांचे पुत्र आणि हिंदुस्थानचे पहिले चक्रवर्ती सम्राट होते. त्यांनी आपल्या ९९ भावांना पराजित करून मेरुपर्वतावर आपले नाव कोरले. परंतु त्यांचा अहंकार तेव्हा तुटला, जेव्हा त्यांना समजले की मेरुपर्वतावर त्यांच्याआधीही अनेक नावे कोरलेली होती. अशा वेळी प्रश्न पडतो की तो भरत कोण आहे, ज्याच्या नावावरून हिंदुस्थानला भारतवर्ष म्हटले जाते? ते वेदांत वर्णित राजे आहेत, महाभारताचे पात्र आहेत की जैन ग्रंथात उल्लेखित चक्रवर्ती सम्राट आहेत? या संदर्भात हे समजून घेणे आवश्यक आहे की कोणत्याही राजाने कधीही संपूर्ण हिंदुस्थानवर प्रत्यक्ष रूपाने शासन केले नाही. साधारण २३०० वर्षांपूर्वी सम्राट अशोकाने उत्तर भारतापासून दक्षिण केवळ तुंगभद्रा नदीपर्यंतच्या व्यापार मार्गांवरच नियंत्रण प्रस्थापित केले होते. अकबराचे शासनही प्रामुख्याने उत्तर भारतापर्यंत मर्यादित होते. इंग्रजांच्या शासनकाळातही अनेक संस्थाने स्वतंत्रपणे कार्यरत होती. हिमालयापासून महासागरापर्यंत पसरलेल्या एका अखंड भारताची धारणा मूलतः राजकीय नाही, तर सांस्कृतिक राहिली आहे.
सर्वात प्रसिद्ध पूर-वृत्तांत बायबलच्या ‘ओल्ड टेस्टामेंट’मध्ये आढळतो. त्यानुसार, मानवतेच्या वाढत्या क्रूरतेमुळे क्षुब्ध होऊन सृष्टीकर्ता म्हणजेच एकमेव ईश्वर ‘जेहोवाह’ने पृथ्वी जलमय करण्याचा निर्णय घेतला. ‘नोआह’ हा एक सत्शील आणि नीतिमान माणूस असल्याने, जेहोवाहने त्याला आगामी विनाशाची सूचना देऊन सुरक्षित राहण्याचा मार्ग सांगितला. बायबलमधील हे आख्यान प्राचीन सुमेरच्या परंपरांमधून उगम पावलेले मानले जाते, जिथे आजचा इराक स्थित आहे. परंतु तिथे केवळ एक देव नाही, तर ‘अनुनकी’ नावाचा देवसमूह मनुष्यांच्या कोलाहलामुळे क्रोधित होऊन पृथ्वीवर जलप्रलय आणतो. ग्रीस कथाही देवांचा अधिपती ‘झ्यूस’ने महापूर पाठवून मानवतेचा विनाश केला. यात ‘प्रोमीथीअस’ नावाच्या देवाच्या हस्तक्षेपामुळे ‘डेडलस’ नामक व्यक्ती बचावली. ज्याने आपल्या खांद्यामागे दगड फेकले आणि त्यातून मनुष्यांची उत्पत्ती झाली, असे सांगते. या सर्व पाश्चात्त्य आख्यानांमध्ये जलप्रलय हा दैवी क्रोधाचा परिणाम आहे. मात्र, चीन आणि भारताच्या कथांमध्ये कोणत्याही क्रोधित देवतेचा उल्लेख आढळत नाही. चिनी आख्यानानुसार, सर्वोच्च देवी ‘नूवा’ हिने आपल्या मनोरंजनासाठी मनुष्यांची रचना केली होती. एके दिवशी देवांमध्ये झालेल्या युद्धामुळे ज्या स्तंभांवर स्वर्ग टिकला होता ते नष्ट झाले आणि मुसळधार पाऊस सुरू झाला. यामुळे पृथ्वी जलमय झाली. तेव्हा नूवा देवीने एका विशाल कासवाच्या पायांच्या साहाय्याने स्वर्गाची भेग भरून काढली आणि पाऊस थांबला.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- Baramati : ‘डिजिटल अरेस्ट’ची भीती दाखवून व्हिडिओ कॉलवर वयोवृद्ध महिलेची 45 लाखांची लूट
- Pune : पुण्यात पुन्हा GBSचं संकट; 51 वर्षीय रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू, आरोग्य यंत्रणा अलर्ट
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
महाराष्ट्र
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
- एन. रघुरामन यांचा कॉलम:हातोडा कुठे, कसा आणि कधी मारायचा हेही समजले पाहिजे!
गुन्हा
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
राजकीय
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
- ZP Election : महापालिका पराभवानंतर पवारांचा मोठा डाव; जिल्हा परिषद निवडणुकीसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला
- PMC Election Results 2026 : खडकवासल्यात ‘कांटे की टक्कर’! भाजप–राष्ट्रवादीत जागांची बरोबरी; कुठे जल्लोष, तर कुठे अश्रू
इतर
- जळगावच्या केळी उत्पादकांवर अमेरिका-इराण तणावाचा परिणाम; निर्यात ठप्प झाल्याने शेतकरी चिंतेत
- अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी विलिनीकरण चर्चांना जयंत पाटील यांचा पूर्णविराम.
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
देश विदेश
- विधानसभेत ठाकरे गट आणि भाजप आमदारांचा जोरदार राडा; सचिन शेट्टी-भास्कर जाधव भिडले.
- लग्नसराईत साडीवर ५ मिनिटांत करा ट्रेंडी आणि आकर्षक बन हेअरस्टाईल्स
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती























Subscribe to my channel

