राज्यसभेच्या रिक्त होणाऱ्या 37 जागांसाठी द्विवार्षिक निवडणुकीची घोषणा करण्यात आली आहे. सर्वात जास्त 7 जागा महाराष्ट्रात रिक्त होणार आहेत. इथल्या निवडणुकांवर सगळ्यांची नजर आहे. महाराष्ट्रातील राज्यसभा खासदार केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्याशिवाय विरोधी पक्षातील शरद पवार आणि प्रियंका चतुर्वेदी यांच्यासारखे नेते रिटायर होणार आहेत. यावेळी महाराष्ट्रातील संख्याबळाचं समीकरण असं आहे की, विरोधी पक्षाच्या नेत्यांना विजय मिळवण्यासाठी कठोर मेहनत करावी लागेल.
महाराष्ट्रात सात जागा रिक्त होणार आहेत. वर्तमान संख्याबळानुसार 7 पैकी 5 जागांवर सत्ताधारी महायुती आघाडीची बाजू वरचढ आहे. उरलेल्या दोन जागांसाठी विरोधी पक्षांच्या महाविकास आघाडीत जोरदार चुरस आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते शरद पवार यांना पुन्हा राज्यसभा खासदार बनायचं आहे. शिवसेना यूबीटी आणि काँग्रेस आपपाल्या बाजूने जोर लावतायत.
26 फेब्रुवारीला अधिसूचना
एप्रिल महिन्यात 37 राज्यसभा खासदार रिटायर होणार आहेत. ते गेल्यानंतर रिक्त होणाऱ्या पदांसाठी द्विवार्षिक निवडणुकीची निवडणूक आयोगाने घोषणा केली आहे. 10 राज्यात 37 जागांसाठी 16 मार्चला मतदान होणार आहे. त्याचदिवशी संध्याकाळी 5 वाजता मतमोजणी होईल. निवडणुकी संदर्भात 26 फेब्रुवारीला अधिसूचना जारी होईल.
जास्त जागा निवडून येणं स्वाभाविक
राज्यसभा निवडणुकीत जनतेचा थेट सहभाग नसतो. पण याचं राजकीय महत्व मोठं आहे. कारण राज्यसभा सदस्यांची निवड संबंधित राज्यातील विधानसभेचे आमदार करतात. महाराष्ट्राच्या राजकारणात विद्यमान विधानसभेची समीकरणं पाहिली तर महायुती आघाडीच्या जास्त जागा निवडून येणं स्वाभाविक आहे. पण अतिरिक्त उमेदवार उतरवले तर क्रॉस वोटिंगची सुद्धा शक्यता आहे. विरोधी पक्ष एखादा उमेदवार जास्त उतरवून निवडणूक रंगतदार करु शकतात.
एका उमेदवाराच्या विजयासाठी आवश्यक मतांची संख्या किती?
राज्यसभा निवडणुकीत एका उमेदवाराच्या विजयासाठी आवश्यक मतांची संख्या एकूण वैध मतांच्या आधारावर ठरते. सामान्यत: महाराष्ट्रात एकाजागेसाठी जवळपास 38 ते 42 मतांची गरज पडते. महाराष्ट्रात दोन सभागृह आहेत. विधानसभा आणि विधान परिषद. विधान परिषदेत 78 सदस्य आहेत. विद्यमान राजकीय समीकरणांनुसार दोन्ही सभागृहात सर्व पक्षांची स्थिती अशी आहे. 288 सदस्यांच्या विधानसभेत भाजपचे 132 आमदार आहेत. शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे 57 आणि एनसीपी अजित पवार गटाचे 41 आमदार आहेत. महायुतीचा एकूण आकडा 220 च्या आसपास आहे. विरोधी पक्षात असलेल्या उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडे 20 आमदार आहेत. काँग्रेसचे 16 आणि एनसीपी शरद पवार गटाचे 10 आमदार आहेत. महाविकास आघाडीचा आकडा 45-50 च्या आसपास आहे. त्याशिवाय काही छोटे पक्ष आणि अपक्ष आमदार आहेत.
आता रिटायर होणारे खासदार कोण?
आता जे खासदार रिटायर होणार आहेत, त्यात भागवत कराड, धैर्यशील मोहन पाटिल, रजनी अशोक राव पाटिल त्या शिवाय काँग्रेसकडून डॉ. फौज़िया ताहसीन अहमद खान यांचं नाव आहे. शिवसेना यूबीटीकडून प्रियंका चतुर्वेदी, एनसीपीकडून शरद पवार आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांची नावं आहेत.
रामदास आठवले आता केंद्रीय मंत्री आहेत. त्यांना काहीही करुन महायुतीत राज्यसभेची सीट हवी आहे. रजनी पाटील आणि धैर्यशील पाटील यांना राज्यसभा खासदार बनायचं आहे. भाजपं काही नवीन चेहऱ्यांना संधी देऊ शकते. विरोधी पक्षाच्या महाविकास आघाडीकडून प्रियंका चतुर्वेदी आणि एनसीपी नेते शरद पवार यांना पुन्हा राज्यसभेवर जायचं आहे. काँग्रेसला सुद्धा संख्याबळाच्या आधारावर राज्यसभेची जागा हवी आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला राज्यसभेची एक जागा हवीय. एकूणच बदललेल्या राजकीय समीकरणात जोडं-तोड आणि चर्चांचा बाजार गरम आहे.
शहर
- पुणे: एम.ए. रंगूनवाला कॉलेजतर्फे अबेदा इनामदार इम्प्लांटोलॉजी आणि डिजिटल दंतचिकित्सा केंद्राचा शुभारंभ
- पुणे: आषाढी वारीची सांगता! 'ज्ञानोबा-तुकाराम'च्या जयघोषाने देहूनगरी दुमदुमली, तुकोबा पोहोचले देहूला.
- मुंबई: मॉर्निंग वॉकला जाणे पडले महागात; मुंबईत पहाटे फिरायला गेलेल्या तरुणावर चाकूने वार करत पैसे लुटले!
- चंद्रपूर: अंगणवाडीतील पोषण आहाराच्या तांदळात आढळले जिवंत किडे; प्रयोगशाळेकडून तांदूळ 'असुरक्षित' घोषित.
महाराष्ट्र
- सिंधुदुर्ग: आंबोलीत मन हेलावणारी दुर्घटना: धबधब्यावर सर्पदंश झालेल्या पर्यटकाचा वाहतूक कोंडीत रुग्णवाहिका अडकल्याने उपचाराअभावी मृत्यू
- पुणे: एम.ए. रंगूनवाला कॉलेजतर्फे अबेदा इनामदार इम्प्लांटोलॉजी आणि डिजिटल दंतचिकित्सा केंद्राचा शुभारंभ
- जळगाव: जामनेर आगारातून नवी कोरी एसटी बस लांबवली; बसचे चाक पंक्चर होताच चोरट्याने रस्त्यातच सोडली!
- मुंबई: मॉर्निंग वॉकला जाणे पडले महागात; मुंबईत पहाटे फिरायला गेलेल्या तरुणावर चाकूने वार करत पैसे लुटले!
गुन्हा
- अहमदाबाद: इमारतीच्या टेरेसवर जाऊन २२ वर्षीय पीजी विद्यार्थीनीवर सुरक्षा रक्षकाचा जीवघेणा अत्याचार.
- पुणे: प्रियकरासोबत राहत असल्याच्या रागातून पतीने केला पत्नीचा निर्घृण खून.
- पुणे: माणुसकी वेशीवर! पुण्यातील खराडी येथे मुळा-मुठा नदीपात्रात आढळला नवजात चिमुकलीचा मृतदेह; पोलिसांनी सुरू केला सखोल तपास.
- पुणे: भोरमध्ये संतापजनक घटना; दारू पिण्यास विरोध करणाऱ्या पोटच्या आईलाच दारुड्या मुलाने लोखंडी रॉडने ठेचून संपवले, मृतदेह घरात ठेवून पळाला.
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- अंक भविष्य ४ ऑगस्ट २०२६: जाणून घ्या मूलांक १ ते ९ नुसार तुमचे आजचे राशीभविष्य
- आजचे राशिभविष्य ३ ऑगस्ट २०२६: जाणून घ्या आज कोणत्या राशींवर होणार शिवाची कृपा आणि कोणाला मिळणार ग्रहांची साथ
- आजचे राशिभविष्य १ ऑगस्ट २०२६: महिन्याची सुरुवात या राशींसाठी धडाक्यात, मिळणार गुडन्यूज तर या राशींची उडणार तारांबळ
- आजचे राशिभविष्य ३१ जुलै २०२६: या भाग्यवान राशींवर असणार श्रीगणेशाची कृपा, संपत्ती आणि लाभाचे योग
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- प्रसिद्ध संगीतकार ए.आर. रहमानच्या मुलाला अपघात: गायक ए.आर. अमीनच्या कारला चेन्नईत धडक, थोडक्यात बचावला!
- अहमदाबाद: इमारतीच्या टेरेसवर जाऊन २२ वर्षीय पीजी विद्यार्थीनीवर सुरक्षा रक्षकाचा जीवघेणा अत्याचार.
- बिहार: आईच्या उपचारासाठी जमीन गहाण ठेवली, एका गायीपासून सुरू केला प्रवास; बिहारच्या रोशन कुमार यांची प्रेरणादायी यशोगाथा.
- दिल्ली: ४२ वर्षीय महिला वकिलाचा हैदरपूर उड्डाणपुलावरून पडून मृत्यू; पतीने ढकलून दिल्याची कुटुंबीयांची तक्रार, पतीवर गुन्हा दाखल.


























Subscribe to my channel



