राज्यसभेच्या रिक्त होणाऱ्या 37 जागांसाठी द्विवार्षिक निवडणुकीची घोषणा करण्यात आली आहे. सर्वात जास्त 7 जागा महाराष्ट्रात रिक्त होणार आहेत. इथल्या निवडणुकांवर सगळ्यांची नजर आहे. महाराष्ट्रातील राज्यसभा खासदार केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्याशिवाय विरोधी पक्षातील शरद पवार आणि प्रियंका चतुर्वेदी यांच्यासारखे नेते रिटायर होणार आहेत. यावेळी महाराष्ट्रातील संख्याबळाचं समीकरण असं आहे की, विरोधी पक्षाच्या नेत्यांना विजय मिळवण्यासाठी कठोर मेहनत करावी लागेल.
महाराष्ट्रात सात जागा रिक्त होणार आहेत. वर्तमान संख्याबळानुसार 7 पैकी 5 जागांवर सत्ताधारी महायुती आघाडीची बाजू वरचढ आहे. उरलेल्या दोन जागांसाठी विरोधी पक्षांच्या महाविकास आघाडीत जोरदार चुरस आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते शरद पवार यांना पुन्हा राज्यसभा खासदार बनायचं आहे. शिवसेना यूबीटी आणि काँग्रेस आपपाल्या बाजूने जोर लावतायत.
26 फेब्रुवारीला अधिसूचना
एप्रिल महिन्यात 37 राज्यसभा खासदार रिटायर होणार आहेत. ते गेल्यानंतर रिक्त होणाऱ्या पदांसाठी द्विवार्षिक निवडणुकीची निवडणूक आयोगाने घोषणा केली आहे. 10 राज्यात 37 जागांसाठी 16 मार्चला मतदान होणार आहे. त्याचदिवशी संध्याकाळी 5 वाजता मतमोजणी होईल. निवडणुकी संदर्भात 26 फेब्रुवारीला अधिसूचना जारी होईल.
जास्त जागा निवडून येणं स्वाभाविक
राज्यसभा निवडणुकीत जनतेचा थेट सहभाग नसतो. पण याचं राजकीय महत्व मोठं आहे. कारण राज्यसभा सदस्यांची निवड संबंधित राज्यातील विधानसभेचे आमदार करतात. महाराष्ट्राच्या राजकारणात विद्यमान विधानसभेची समीकरणं पाहिली तर महायुती आघाडीच्या जास्त जागा निवडून येणं स्वाभाविक आहे. पण अतिरिक्त उमेदवार उतरवले तर क्रॉस वोटिंगची सुद्धा शक्यता आहे. विरोधी पक्ष एखादा उमेदवार जास्त उतरवून निवडणूक रंगतदार करु शकतात.
एका उमेदवाराच्या विजयासाठी आवश्यक मतांची संख्या किती?
राज्यसभा निवडणुकीत एका उमेदवाराच्या विजयासाठी आवश्यक मतांची संख्या एकूण वैध मतांच्या आधारावर ठरते. सामान्यत: महाराष्ट्रात एकाजागेसाठी जवळपास 38 ते 42 मतांची गरज पडते. महाराष्ट्रात दोन सभागृह आहेत. विधानसभा आणि विधान परिषद. विधान परिषदेत 78 सदस्य आहेत. विद्यमान राजकीय समीकरणांनुसार दोन्ही सभागृहात सर्व पक्षांची स्थिती अशी आहे. 288 सदस्यांच्या विधानसभेत भाजपचे 132 आमदार आहेत. शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे 57 आणि एनसीपी अजित पवार गटाचे 41 आमदार आहेत. महायुतीचा एकूण आकडा 220 च्या आसपास आहे. विरोधी पक्षात असलेल्या उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडे 20 आमदार आहेत. काँग्रेसचे 16 आणि एनसीपी शरद पवार गटाचे 10 आमदार आहेत. महाविकास आघाडीचा आकडा 45-50 च्या आसपास आहे. त्याशिवाय काही छोटे पक्ष आणि अपक्ष आमदार आहेत.
आता रिटायर होणारे खासदार कोण?
आता जे खासदार रिटायर होणार आहेत, त्यात भागवत कराड, धैर्यशील मोहन पाटिल, रजनी अशोक राव पाटिल त्या शिवाय काँग्रेसकडून डॉ. फौज़िया ताहसीन अहमद खान यांचं नाव आहे. शिवसेना यूबीटीकडून प्रियंका चतुर्वेदी, एनसीपीकडून शरद पवार आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांची नावं आहेत.
रामदास आठवले आता केंद्रीय मंत्री आहेत. त्यांना काहीही करुन महायुतीत राज्यसभेची सीट हवी आहे. रजनी पाटील आणि धैर्यशील पाटील यांना राज्यसभा खासदार बनायचं आहे. भाजपं काही नवीन चेहऱ्यांना संधी देऊ शकते. विरोधी पक्षाच्या महाविकास आघाडीकडून प्रियंका चतुर्वेदी आणि एनसीपी नेते शरद पवार यांना पुन्हा राज्यसभेवर जायचं आहे. काँग्रेसला सुद्धा संख्याबळाच्या आधारावर राज्यसभेची जागा हवी आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला राज्यसभेची एक जागा हवीय. एकूणच बदललेल्या राजकीय समीकरणात जोडं-तोड आणि चर्चांचा बाजार गरम आहे.
शहर
- पुणे: राजगुरूनगरमध्ये भीषण हत्याकांड! उपचारासाठी आलेल्या आजारी मामाची भाच्याकडून धारदार शस्त्राने हत्या, नंतर स्वतःही संपवले जीवन!
- नांदेड: दुष्काळाच्या बैठकीत नेत्यांना काजू-बदामाची मेजवानी मिळायला नको दुष्काळी स्थितीवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले!
- पुणे: सोलापूर महामार्गावर भीषण अपघात; रस्ता ओलांडताना अज्ञात वाहनाच्या धडकेत सहाय्यक फौजदाराचा जागीच मृत्यू!
- पुणे: मोठी कारवाई! आग प्रतिबंधक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या लोहगावमधील ११ विनापरवाना पीजी-हॉस्टेल सील!
महाराष्ट्र
- मुंबई: लालबागच्या राजाच्या दर्शनादरम्यान मोठी दुर्घटना; २५ वर्षीय जयदीप नेमाडे तरुणाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू!
- पुणे: राजगुरूनगरमध्ये भीषण हत्याकांड! उपचारासाठी आलेल्या आजारी मामाची भाच्याकडून धारदार शस्त्राने हत्या, नंतर स्वतःही संपवले जीवन!
- सातारा: जिल्हा बँक निवडणूक महायुती म्हणून एकत्र लढवावी; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची स्पष्ट भूमिका!
- नांदेड: दुष्काळाच्या बैठकीत नेत्यांना काजू-बदामाची मेजवानी मिळायला नको दुष्काळी स्थितीवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले!
गुन्हा
- अहिल्यानगर: संतापजनक प्रकार; पवनचक्कीच्या निर्जन परिसरामध्ये नेऊन महिलेचे अपहरण व जबर मारहाण
- हिंगोली: वसमतमध्ये खळबळ! पडक्या आणि निर्जन विश्रामगृहात आढळला ३२ वर्षीय तरुणाचा संशयास्पद मृतदेह; डोक्यावर गंभीर जखमा असल्यामुळे हत्येचा दाट संशय
- पुणे: "आम्ही इथले भाई... बघतोय काय!"; पुण्यात उघडपणे कोयता फिरवून नागरिकांमध्ये दहशत पसरवल्याची धक्कादायक घटना!
- छत्रपती संभाजीनगर: लग्नाचा प्रस्ताव नाकारल्याच्या रागातून मेडिकल दुकानात घुसून २२ वर्षीय केमिस्टची निर्घृण हत्या, पोलिसांनी अवघ्या ९ तासांत आवळल्या आवडी
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
- आजचे राशिभविष्य १५ सप्टेंबर २०२६: महादेवाची कृपा आणि गणेशाची साथ या राशींसाठी ठरणार भाग्य चमकवणारी, होणार धनलाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- मध्य प्रदेश: मतदान न करण्याच्या' इशाऱ्यामुळे संतापले केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया; गुना येथे ३ कोटींच्या रस्ता प्रकल्पाची त्वरित घोषणा!
- दिल्ली: धर्म म्हणजे कोणताही रिलीजन किंवा पूजापद्धती नव्हे; राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवतांचे महत्त्वपूर्ण विधान आणि धर्माची नेमकी व्याख्या
- नवी दिल्ली: पहिले शिवसेना, नंतर राष्ट्रवादी आणि आता तृणमूल काँग्रेस; टीएमसीचे नाव व चिन्ह गोठवल्यावरून राहुल गांधींचा केंद्र सरकार व निवडणूक आयोगावर कडाडून हल्लाबोल
- दिल्ली: विद्यापीठ निवडणूक २०२६ मतदानाच्या पूर्वसंध्येला नॉर्थ कॅम्पसमध्ये दोन विद्यार्थी गट भिडले, तुफान हाणामारीत एक विद्यार्थी गंभीर जखमी!


























Subscribe to my channel




