बीड: पुणे कनेक्शन अखेर सुरू! बीड ते थेट पुणे रेल्वे सेवा सुरू; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी पूर्ण केला अजितदादांचा शब्द!

बीड: मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाचे औचित्य साधून बीड आणि पुणेकरांसाठी एक अत्यंत आनंदाची आणि ऐतिहासिक बातमी समोर आली आहे. बीड जिल्ह्याचे लाडके नेते आणि दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बीडवासियांना दिलेल्या वचनाची पूर्तता करत आजपासून बीड ते थेट पुणे रेल्वे सेवा अधिकृतपणे सुरू करण्यात आली आहे. राज्याच्या उपमुख्यमंत्री आणि बीडच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते या महत्त्वकांक्षी थेट रेल्वे सेवेचा शुभारंभ करण्यात आला. या महत्त्वपूर्ण विकासकामुळे अनेक दशकांपासून रेल्वेच्या प्रतीक्षेत असलेल्या बीड जिल्ह्याचे पश्चिम महाराष्ट्राशी थेट जोडले जाण्याचे स्वप्न पूर्ण झाले आहे.

अजितदादांचा शब्द आणि सुनेत्रा पवारांची अंमलबजावणी याप्रकरणी बोलताना उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार भावूक होत म्हणाल्या की, "बीड जिल्ह्याला रेल्वेच्या जाळ्याशी जोडणे आणि प्रवाशांना थेट पुणे व मुंबईपर्यंतची कनेक्टिव्हिटी मिळवून देणे हे दिवंगत अजितदादांचे एक स्वप्न होते आणि त्यांनी बीडकरांना याविषयी शब्द दिला होता. आज त्यांचे वही स्वप्न सत्यात उतरवताना मला विशेष आनंद होत आहे. अजितदादांनी दिलेला प्रत्येक शब्द पूर्ण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत." अहिल्यानगर-बीड-परळी वैजनाथ या बहुप्रतिक्षित रेल्वे प्रकल्पाअंतर्गत हा टप्पा पूर्ण करण्यात आला असून यामुळे आता मराठवाड्यातील नागरिकांचा पुणे आणि मुंबईकडील प्रवास अधिक सुलभ, आरामदायक आणि कमी वेळेचा होणार आहे.

वाहतूक, व्यापार आणि शिक्षणाला मिळणार मोठी गती सध्या बीडहून सुटणाऱ्या या रेल्वेमुळे कृषी, उद्योग, शिक्षण आणि व्यापारी क्षेत्राला मोठी चालना मिळणार आहे. बीडहून पुण्याला जाणाऱ्या चाकरमानी, विद्यार्थी आणि रुग्णांना या थेट रेल्वेचा प्रचंड फायदा होणार असून, रस्ते प्रवासातील ताण आणि खर्च मोठ्या प्रमाणावर कमी होणार आहे. याशिवाय, आगामी डिसेंबर महिन्यापर्यंत बीड ते मुंबई थेट रेल्वे सेवा सुरू करण्याचे उद्दिष्ट प्रशासनाने ठेवले आहे. या ऐतिहासिक घडामोडीमुळे संपूर्ण बीड जिल्ह्यात उत्साहाचे वातावरण असून नागरिकांकडून आनंद व्यक्त केला जात आहे.

 



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

राजकीय

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *