कोल्हापूर: गोकुळ दूध संघाची (Kolhapur Gokul Milk Union Election) आगामी निवडणूक जसजशी जवळ येत आहे, तसतसे कोल्हापूरच्या राजकारणात आणि सहकार क्षेत्रात संघर्ष टोकाला पोहोचल्याचे चित्र दिसत आहे. अलीकडेच पार पडलेली गोकुळच्या संलग्न दूध संस्थांच्या हरkती आणि पात्रतेबाबतची सुनावणी तसेच प्राथमिक मतदार यादीच्या मुद्द्यावरून आयोजित एक महत्त्वाची बैठक अक्षरशः 'कुरूक्षेत्र' बनली. बैठकीत अधिकारी, नेते आणि दूध संस्थांचे प्रतिनिधी यांच्यामध्ये जोरदार खडाजंगी उडाली, ज्यामुळे वातावरण अत्यंत तापले होते.
"रॉकेल आणा रे, पेटवून टाकूया..." दूध संस्थांचा अनावर झालेला राग: गोकुळ दूध संघाच्या निवडणूक प्रक्रियेत आणि कच्च्या याद्यांमध्ये मनमानी पद्धतीने बदल केले जात असल्याचा गंभीर आरोप यावेळी संतप्त दूध संस्थांच्या प्रतिनिधींनी केला. सुनावणीच्या नावाखाली दूध उत्पादक आणि संस्थाचालकांना विनाकारण वेठीस धरले जात असल्याचा संताप व्यक्त करत काही प्रतिनिधींनी थेट बैठकीतच तीव्र शब्दांत रोष व्यक्त केला. एका संतापलेल्या प्रतिनिधीने तर "रॉकेल आणा रे, हे सगळं पेटवून टाकूया..." अशा शब्दांत आपला राग अनावर झाल्याचे दाखवले. सहकार विभागाच्या अधिकारांचा गैरवापर करून विशिष्ट गटाच्या दबावाखाली निर्णय घेतले जात असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.
पैसे घेतल्याचे गंभीर आरोप आणि अधिकाऱ्यांवर धडक: बैठकीदरम्यान काही दूध संस्थांच्या प्रतिनिधींनी थेट आर्थिक गैरव्यवहाराचे आणि वसुलीचे गंभीर आरोप केले. सुनावणी आणि नावे समाविष्ट करण्यासाठी अथवा वगळण्यासाठी पैसे घेतले जात असल्याचा गौप्यस्फोट करत उपस्थितांनी अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. "न्यायालय आणि सहकार कायद्यापेक्षा तुम्ही मोठे झालात का? कोणतीही पूर्वकल्पना किंवा अधिकृत नोटीस न देता परस्पर मोबाईलवरून मेसेज पाठवून सुनावणीला बोलावणे ही कोणती हुकूमशाही आहे?" असा संतप्त सवाल यावेळी दुग्ध विभाग आणि संबंधितांना विचारण्यात आला.
सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये राजकीय संघर्ष तीव्र: दुसरीकडे, गोकुळ दूध संघावर वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी महायुती विरुद्ध विरोधक (विशेषतः आमदार सतेज पाटील गट) यांच्यामध्ये जोरदार रस्सीखेच सुरू आहे. निवडणुकीच्या तोंडावर मतदार याद्यांमध्ये फेरफार करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे, तर दुसरीकडे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार ६0 दिवसांच्या आत निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याचे बंधन असल्याने प्रशासनावरही मोठा ताण आला आहे. दूध संस्थांच्या प्रतिनिधींनी घेतलेल्या या आक्रमक भूमिकेमुळे गोकुळची निवडणूक अत्यंत अटीतटीची आणि राजकीयदृष्ट्या स्फोटक होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
शहर
- मुंबई: राजकीय वर्तुळात मोठी खळबळ! नवरात्रीपूर्वी उद्धव ठाकरेंचे १४ आमदार शिंदे गटात प्रवेश करण्याची शक्यता, राजकीय सूत्रांची माहिती
- मुंबई: एसटीचा मोठा निर्णय! महिला व ज्येष्ठ नागरिकांना सवलतीच्या प्रवासासाठी आजपासून NCMC कार्ड अनिवार्य
- नाशिक: महागाईचं विघ्न! आंतरराष्ट्रीय युद्ध अन् एफडीएच्या कारवाईमुळे गणेशमूर्तींच्या दरात ३० टक्क्यांनी वाढ
- पुणे: मी केवळ एक आमदार, सरकारचा भाग नाही मराठा आरक्षण आणि संवादावर सुधीर मुनगंटीवार यांचे स्पष्टीकरण
महाराष्ट्र
- मुंबई: राजकीय वर्तुळात मोठी खळबळ! नवरात्रीपूर्वी उद्धव ठाकरेंचे १४ आमदार शिंदे गटात प्रवेश करण्याची शक्यता, राजकीय सूत्रांची माहिती
- मुंबई: एसटीचा मोठा निर्णय! महिला व ज्येष्ठ नागरिकांना सवलतीच्या प्रवासासाठी आजपासून NCMC कार्ड अनिवार्य
- नाशिक: महागाईचं विघ्न! आंतरराष्ट्रीय युद्ध अन् एफडीएच्या कारवाईमुळे गणेशमूर्तींच्या दरात ३० टक्क्यांनी वाढ
- पुणे: मी केवळ एक आमदार, सरकारचा भाग नाही मराठा आरक्षण आणि संवादावर सुधीर मुनगंटीवार यांचे स्पष्टीकरण
गुन्हा
- पुणे: बारामतीत धक्कादायक घटना; तांदूळवाडीत एकाच घरात माय-लेकाचा संशयास्पद मृत्यू
- मुंबई: लोकलमध्ये संतापजनक प्रकार जागेवरून झालेल्या वादानंतर धावत्या ट्रेनमधून खाली ढकलल्याने दिव्यांग वृद्धाचा मृत्यू!
- रत्नागिरी: ॲप डाउनलोड करून शुभेच्छा कार्ड तयार करणे पडले महागात; रत्नागिरीतील वृद्धाची साडेआठ लाखांची फसवणूक!
- पुणे: कोथरूडच्या एआरएआय टेकडीवर रक्ताच्या थारोळ्यात आढळला तरुणाचा मृतदेह
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य: २० ऑगस्ट २०२६ रोजी तुमच्या राशीवर काय असेल ग्रहांची स्थिती? जाणून घ्या सविस्तर!
- आजचे राशीभविष्य: १९ ऑगस्ट २०२६, ग्रह नक्षत्रांचा तुमच्या राशीवर काय होईल परिणाम?
- आजचे राशिभविष्य १५ ऑगस्ट २०२६: शनिदेवाची कृपा, या राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ!
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- उत्तर प्रदेश: कौशांबीत पटाखा कारखान्यात भीषण स्फोट; महिला व बालकांसह ७ ते ८ जणांचा मृत्यू, परिसर हादरला
- नवी दिल्ली: 'कॉकरोच जनता पार्टी'च्या रॅलीला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा स्पष्ट नकार; सरन्यायाधीशांचे महत्त्वाचे निरीक्षण
- चेन्नई: २०२९ला राहुल गांधीच पंतप्रधान, विजय यांनी समर्थन न दिल्यास मंत्रिपदाचे राजीनामे देऊ ;काँग्रेसचा तामिळनाडू सरकारला थेट इशारा
- मुंबई: नेपाळमधील महाप्रलय: मेसेजला सिंगल टिक, नेटवर्क नसेल का? ठाण्यातील समीर व अपर्णा जोशी यांच्या कुटुंबांची वाढली घालमेल

























Subscribe to my channel




