इतिहासाला एक विचित्र सवय असते. त्याकडे दुर्लक्ष केले तर तो अनेकदा शोकांतिकेच्या रूपाने परत येतो. सात दशकांहून अधिक काळ अमेरिकेने जागतिक राजकारणावर असाधारण प्रभाव टाकला आहे. परंतु, दुसऱ्या देशांच्या अंतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करण्याच्या त्यांच्या रेकॉर्डवरून जो चिंताजनक पॅटर्न समोर येतो, तो त्यांच्या विवेकबुद्धीचा नाही, तर त्यांच्या एका चुकीच्या धारणेचा परिचय करून देतो. ती धारणा अशी की, गुंतागुंतीच्या समाजांना बाह्य दबाव, सत्तापालट किंवा कठपुतळी शासकांच्या स्थापनेद्वारे बदलले जाऊ शकते. इराणमध्ये 1979 च्या क्रांतीपूर्वी अमेरिका आणि त्यांचे सहकारी शाह रझा पहलवी यांना पाठिंबा देत होते. इराणकडे तेलाचा अफाट साठा होता आणि या संसाधनांपर्यंत पोहोच सुनिश्चित करणे हा पाश्चात्त्य भू-राजकीय समीकरणांचा मुख्य केंद्रबिंदू होता. शाह हे त्यांच्या पाश्चात्त्य शिक्षणामुळे आणि आधुनिकीकरणाच्या उत्साहामुळे पश्चिमेसाठी एक आदर्श भागीदार होते. परंतु, तेहरानच्या राजवाड्यांत त्या झगमगाटाखाली दुसरा इराणही अस्तित्वात होता. तो बाजारपेठा, धर्मगुरू आणि पर्शियन समाजात खोलवर रुजलेल्या सांस्कृतिक व धार्मिक परंपरांचा इराण होता. शहांची पाश्चात्त्य जीवनशैली आणि त्यांची हुकूमशाही राजवट त्यांच्याच लोकांमधील एका मोठ्या वर्गाला त्यांच्यापासून दूर करत होती. अमेरिकेने या विसंगती ओळखण्याचा प्रयत्न केला नाही आणि शाह यांच्याकडे केवळ एक अनुकूल सहकारी आणि तेल पुरवठ्याचा विश्वासार्ह रक्षक म्हणूनच पाहिले. परिणामी, क्रांतीने राजेशाही उखडून टाकली आणि तिथे एक धार्मिक प्रजासत्ताक स्थापन झाले, जे तेव्हापासून अमेरिकेच्या विरोधात राहिले आहे. तुर्कीमध्येही पश्चिमेने संस्थापक मुस्तफा कमाल अतातुर्क (1923-38) यांच्या वारशाचे उत्साहाने स्वागत केले. त्यांच्या व्यापक सुधारणांचा उद्देश उस्मानी साम्राज्याच्या पारंपरिक समाजाला एका धर्मनिरपेक्ष, पश्चिमाभिमुख प्रजासत्ताकात बदलणे हा होता. अतातुर्क यांची दृष्टी निःसंशयपणे धाडसी होती, पण त्यांनी ही चूक केली की एका व्यापक सनातनी आणि धार्मिक समाजाला पाश्चात्त्य मूल्यांशी जवळीक ठेवणाऱ्या एका लहान उच्चभ्रू वर्गाद्वारे कायमस्वरूपी बदलले जाऊ शकते. दशकानुदशके ही व्यवस्था टिकून राहिली. तुर्कीचे सैन्य वारंवार परदेशी मूल्य प्रणालींचे अंधानुकरण करत राहिले आणि पाश्चात्त्य सरकारे त्याचे कौतुक करत राहिली. परंतु, समाजाच्या सांस्कृतिक ओळखींना अनंतकाळपर्यंत दाबून ठेवता येत नाही. काळाबरोबर सनातनी आणि धार्मिक तुर्कांच्या राजकीय ऊर्जेने एर्दोगान यांचा उदय आणि अधिक आक्रमक राजकारणाला जन्म दिला. ज्या व्यवस्थेला कधीकाळी पश्चिमेसोबत जोडलेली एक आदर्श लोकशाही व्यवस्था म्हणून मांडले जात होते, ती हळूहळू एका गुंतागुंतीच्या आणि वादग्रस्त राजकीय परिदृश्यात बदलली. व्हिएतनाममध्ये अमेरिकेला खात्री होती की लष्करी हस्तक्षेप आणि एका कमकुवत दक्षिण व्हिएतनामी शासनाच्या समर्थनाने ते साम्यवाद रोखू शकतात. याचा परिणाम एका विनाशकारी युद्धाच्या रूपात समोर आला, ज्यामध्ये लाखो लोकांचा बळी गेला आणि सरतेशेवटी तोच परिणाम झाला जो अमेरिकेला रोखायचा होता. इराकवरील 2003 चे आक्रमण मोठ्या प्रमाणावरील विनाशाची शस्त्रे नष्ट करण्याच्या आणि क्षेत्रात लोकशाही आणण्याच्या आधारावर योग्य ठरवले गेले होते. ती शस्त्रे कधीच सापडली नाहीत, राज्यव्यवस्था कोलमडली आणि त्यातून अस्थिरतेने सांप्रदायिक हिंसाचार व उग्रवादी चळवळींच्या उदयाला खतपाणी घातले. लिबियामध्ये 2011 मध्ये पाश्चात्त्य समर्थित हस्तक्षेपामुळे गद्दाफीला सत्तेवरून हटवण्यात आले. याला मानवतावादी तत्त्वांचा विजय म्हटले गेले होते. परंतु, त्यानंतरचा काळ दीर्घ अराजकता, एकमेकांविरुद्ध लढणाऱ्या मिलिशिया टोळ्या आणि विखुरलेल्या देशाचा राहिला आहे. आज ट्रम्प इराणमध्ये सत्तापालट करण्यावर ठाम आहेत. परंतु, इराणचा सांस्कृतिक वारसा अत्यंत समृद्ध आहे. सुमारे नऊ कोटी लोकसंख्या असलेला हा देश एका विशाल आणि गुंतागुंतीच्या भूभागावर वसलेला आहे. तिथली राजकीय व्यवस्था बाहेरून नियंत्रित केली जाऊ शकत नाही. अमेरिका अजून किती काळ शक्तीचा वापर करत राहणार आणि पाश्चात्त्य राजकीय मॉडेल सर्व समाजांसाठी अनुकूल मानून कारवाई करत राहणार? (हे लेखकाचे वैयक्तिक मत आहे.)
जगावर वर्चस्व गाजवण्याची नाहक जिद्दट्रम्प इराणमध्ये सत्तापालट करण्यासाठी आग्रही आहेत. परंतु, इराणसारख्या मोठ्या आणि गुंतागुंतीच्या देशाची राजकीय व्यवस्था बाहेरून नियंत्रित केली जाऊ शकत नाही. अमेरिका नेमकी कधीपर्यंत जगावर असे शक्तिप्रदर्शन करत राहणार?
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- मुंबई: मेक्सिकन पर्यटकाला लुटणे चालकाला पडले महागात! अवघ्या २ किमी प्रवासासाठी मागितले ५०० रुपये, पर्यटकाचे अस्खलित हिंदी उत्तर ऐकून ड्रायव्हरची उडाली दांडी!
- इलॉन मस्क: भारतातील ११,२५६ गावांना स्टारलिंक जोडणार! इंटरनेट नसलेल्या दुर्गम भागांसाठी मोठी घोषणा!
महाराष्ट्र
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- महाराष्ट्र: शेतकऱ्यांप्रमाणे आता मच्छिमारांनाही मिळणार कर्जमाफी? मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे तयार करणार कर्जमाफीची सविस्तर रूपरेषा!
- साखर: तब्बल १० वर्षांनंतर भारतात होणार आयात! देशांतर्गत वाढत्या किंमती रोखण्यासाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय, १० लाख टन कच्ची साखर मागवण्यास मंजुरी!
गुन्हा
- मुंबई: लोकलमध्ये संतापजनक प्रकार जागेवरून झालेल्या वादानंतर धावत्या ट्रेनमधून खाली ढकलल्याने दिव्यांग वृद्धाचा मृत्यू!
- रत्नागिरी: ॲप डाउनलोड करून शुभेच्छा कार्ड तयार करणे पडले महागात; रत्नागिरीतील वृद्धाची साडेआठ लाखांची फसवणूक!
- पुणे: कोथरूडच्या एआरएआय टेकडीवर रक्ताच्या थारोळ्यात आढळला तरुणाचा मृतदेह
- नाशिक: १६ वर्षे लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या जोडीदाराची प्रियकराच्या मदतीने गळा चिरून हत्या, मृतदेह थेट कसारा घाटात फेकला
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- आजचे राशीभविष्य: १९ ऑगस्ट २०२६, ग्रह नक्षत्रांचा तुमच्या राशीवर काय होईल परिणाम?
- आजचे राशिभविष्य १५ ऑगस्ट २०२६: शनिदेवाची कृपा, या राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ!
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
- १३ ऑगस्ट २०२६ चे आजचे राशिभविष्य: श्रावण मासाच्या पहिल्या दिवशी कोणावर होणार शिवकृपा
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

पुण्यात NCP कार्यालयाबाहेर तरुणांच्या दोन गटांत राडा; एकमेकांना मारहाण
मुंबई लोकलच्या छतावर चढला तरुण; ओव्हरहेड वायरच्या संपर्कात येऊन 45% भाजला
वादळाआधीच मेक्सिकोत जोरदार वाऱ्यांचा तडाखा; मैदानातून खेळाडूंची धावपळ!
देश विदेश
- दिल्ली: बाळासाठी सोडली कॉर्पोरेट नोकरी वाटलं करिअर संपलं, स्निग्धाने होमस्टे व्यवसायातून उभा केला २१ लाखांचा महसूल!
- हैदराबाद: भरधाव 'ॲस्टन मार्टिन' कारची धडक, इनऑर्बिट मॉलबाहेर २६ वर्षीय तरुणीचा दुःखद अंत; आंध्र प्रदेशच्या राज्यसभा खासदाराच्या मुलावर गुन्हा दाखल!
- नवी दिल्ली: "आम्ही त्यांना आजच अपात्र घोषित करू शकतो का?" शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाचे मोठे सवाल
- चेन्नई: "ना डावे, ना CJP, कुणाच्याही आंदोलनात विद्यार्थी सहभाग नको"; तामिळनाडू सरकारच्या कठोर निर्देशाने तापले राजकारण!


























Subscribe to my channel



