इतिहासाला एक विचित्र सवय असते. त्याकडे दुर्लक्ष केले तर तो अनेकदा शोकांतिकेच्या रूपाने परत येतो. सात दशकांहून अधिक काळ अमेरिकेने जागतिक राजकारणावर असाधारण प्रभाव टाकला आहे. परंतु, दुसऱ्या देशांच्या अंतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करण्याच्या त्यांच्या रेकॉर्डवरून जो चिंताजनक पॅटर्न समोर येतो, तो त्यांच्या विवेकबुद्धीचा नाही, तर त्यांच्या एका चुकीच्या धारणेचा परिचय करून देतो. ती धारणा अशी की, गुंतागुंतीच्या समाजांना बाह्य दबाव, सत्तापालट किंवा कठपुतळी शासकांच्या स्थापनेद्वारे बदलले जाऊ शकते. इराणमध्ये 1979 च्या क्रांतीपूर्वी अमेरिका आणि त्यांचे सहकारी शाह रझा पहलवी यांना पाठिंबा देत होते. इराणकडे तेलाचा अफाट साठा होता आणि या संसाधनांपर्यंत पोहोच सुनिश्चित करणे हा पाश्चात्त्य भू-राजकीय समीकरणांचा मुख्य केंद्रबिंदू होता. शाह हे त्यांच्या पाश्चात्त्य शिक्षणामुळे आणि आधुनिकीकरणाच्या उत्साहामुळे पश्चिमेसाठी एक आदर्श भागीदार होते. परंतु, तेहरानच्या राजवाड्यांत त्या झगमगाटाखाली दुसरा इराणही अस्तित्वात होता. तो बाजारपेठा, धर्मगुरू आणि पर्शियन समाजात खोलवर रुजलेल्या सांस्कृतिक व धार्मिक परंपरांचा इराण होता. शहांची पाश्चात्त्य जीवनशैली आणि त्यांची हुकूमशाही राजवट त्यांच्याच लोकांमधील एका मोठ्या वर्गाला त्यांच्यापासून दूर करत होती. अमेरिकेने या विसंगती ओळखण्याचा प्रयत्न केला नाही आणि शाह यांच्याकडे केवळ एक अनुकूल सहकारी आणि तेल पुरवठ्याचा विश्वासार्ह रक्षक म्हणूनच पाहिले. परिणामी, क्रांतीने राजेशाही उखडून टाकली आणि तिथे एक धार्मिक प्रजासत्ताक स्थापन झाले, जे तेव्हापासून अमेरिकेच्या विरोधात राहिले आहे. तुर्कीमध्येही पश्चिमेने संस्थापक मुस्तफा कमाल अतातुर्क (1923-38) यांच्या वारशाचे उत्साहाने स्वागत केले. त्यांच्या व्यापक सुधारणांचा उद्देश उस्मानी साम्राज्याच्या पारंपरिक समाजाला एका धर्मनिरपेक्ष, पश्चिमाभिमुख प्रजासत्ताकात बदलणे हा होता. अतातुर्क यांची दृष्टी निःसंशयपणे धाडसी होती, पण त्यांनी ही चूक केली की एका व्यापक सनातनी आणि धार्मिक समाजाला पाश्चात्त्य मूल्यांशी जवळीक ठेवणाऱ्या एका लहान उच्चभ्रू वर्गाद्वारे कायमस्वरूपी बदलले जाऊ शकते. दशकानुदशके ही व्यवस्था टिकून राहिली. तुर्कीचे सैन्य वारंवार परदेशी मूल्य प्रणालींचे अंधानुकरण करत राहिले आणि पाश्चात्त्य सरकारे त्याचे कौतुक करत राहिली. परंतु, समाजाच्या सांस्कृतिक ओळखींना अनंतकाळपर्यंत दाबून ठेवता येत नाही. काळाबरोबर सनातनी आणि धार्मिक तुर्कांच्या राजकीय ऊर्जेने एर्दोगान यांचा उदय आणि अधिक आक्रमक राजकारणाला जन्म दिला. ज्या व्यवस्थेला कधीकाळी पश्चिमेसोबत जोडलेली एक आदर्श लोकशाही व्यवस्था म्हणून मांडले जात होते, ती हळूहळू एका गुंतागुंतीच्या आणि वादग्रस्त राजकीय परिदृश्यात बदलली. व्हिएतनाममध्ये अमेरिकेला खात्री होती की लष्करी हस्तक्षेप आणि एका कमकुवत दक्षिण व्हिएतनामी शासनाच्या समर्थनाने ते साम्यवाद रोखू शकतात. याचा परिणाम एका विनाशकारी युद्धाच्या रूपात समोर आला, ज्यामध्ये लाखो लोकांचा बळी गेला आणि सरतेशेवटी तोच परिणाम झाला जो अमेरिकेला रोखायचा होता. इराकवरील 2003 चे आक्रमण मोठ्या प्रमाणावरील विनाशाची शस्त्रे नष्ट करण्याच्या आणि क्षेत्रात लोकशाही आणण्याच्या आधारावर योग्य ठरवले गेले होते. ती शस्त्रे कधीच सापडली नाहीत, राज्यव्यवस्था कोलमडली आणि त्यातून अस्थिरतेने सांप्रदायिक हिंसाचार व उग्रवादी चळवळींच्या उदयाला खतपाणी घातले. लिबियामध्ये 2011 मध्ये पाश्चात्त्य समर्थित हस्तक्षेपामुळे गद्दाफीला सत्तेवरून हटवण्यात आले. याला मानवतावादी तत्त्वांचा विजय म्हटले गेले होते. परंतु, त्यानंतरचा काळ दीर्घ अराजकता, एकमेकांविरुद्ध लढणाऱ्या मिलिशिया टोळ्या आणि विखुरलेल्या देशाचा राहिला आहे. आज ट्रम्प इराणमध्ये सत्तापालट करण्यावर ठाम आहेत. परंतु, इराणचा सांस्कृतिक वारसा अत्यंत समृद्ध आहे. सुमारे नऊ कोटी लोकसंख्या असलेला हा देश एका विशाल आणि गुंतागुंतीच्या भूभागावर वसलेला आहे. तिथली राजकीय व्यवस्था बाहेरून नियंत्रित केली जाऊ शकत नाही. अमेरिका अजून किती काळ शक्तीचा वापर करत राहणार आणि पाश्चात्त्य राजकीय मॉडेल सर्व समाजांसाठी अनुकूल मानून कारवाई करत राहणार? (हे लेखकाचे वैयक्तिक मत आहे.)
जगावर वर्चस्व गाजवण्याची नाहक जिद्दट्रम्प इराणमध्ये सत्तापालट करण्यासाठी आग्रही आहेत. परंतु, इराणसारख्या मोठ्या आणि गुंतागुंतीच्या देशाची राजकीय व्यवस्था बाहेरून नियंत्रित केली जाऊ शकत नाही. अमेरिका नेमकी कधीपर्यंत जगावर असे शक्तिप्रदर्शन करत राहणार?
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- छत्रपती संभाजीनगर: काळीज पिळवटणारी घटना! घरी बनवलेली खिचडी खाल्ल्याने विषबाधा होऊन २४ तासांत लहान भाऊ अन् बहिणीचा उपचारादरम्यान मृत्यू
- छत्रपती संभाजीनगर: लग्नाचा प्रस्ताव नाकारल्याच्या रागातून मेडिकल दुकानात घुसून २२ वर्षीय केमिस्टची निर्घृण हत्या, पोलिसांनी अवघ्या ९ तासांत आवळल्या आवडी
- अहिल्यानगर: दूध वाहतूक करणाऱ्या चालकाला एकट्यात गाठून कोयत्याने सपासप वार करत संपवले, खर्ड्यातील घटनेने खळबळ
- पुणे: ज्येष्ठ विचारवंत, राजकीय विश्लेषक व काँग्रेसचे निष्ठावान नेते डॉ. रत्नाकर महाजन यांचे पुण्यात निधन; पुरोगामी चळवळीचा अभ्यासू चेहरा हरपला
महाराष्ट्र
- रत्नागिरी: कोकणातील अंगावर काटा आणणारी वास्तवता! राजापूर तालुक्यातील सागवे वाडपवाडीत मृतदेह नेण्यासाठी ग्रामस्थांना चक्क पात्रातून काढावा लागतोय पायी रस्ता
- सातारा: देशसेवेदरम्यान शहीद झालेले वीर जवान रोहित पवार यांच्यावर साताऱ्यातील चिंचणी येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; साऱ्यांचे डोळे झाले पाणावले
- रत्नागिरी: कोकण किनारपट्टीवर आजपासून वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता! हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा जारी
- छत्रपती संभाजीनगर: काळीज पिळवटणारी घटना! घरी बनवलेली खिचडी खाल्ल्याने विषबाधा होऊन २४ तासांत लहान भाऊ अन् बहिणीचा उपचारादरम्यान मृत्यू
गुन्हा
- अहिल्यानगर: दूध वाहतूक करणाऱ्या चालकाला एकट्यात गाठून कोयत्याने सपासप वार करत संपवले, खर्ड्यातील घटनेने खळबळ
- हिंगोली: तू पोलिसांना टिप का देतोस? खबरी असल्याच्या संशयातून वसमतमध्ये २२ वर्षीय तरुणाची विटा-दगडने ठेचून निर्घृण हत्या
- पुणे: बारामतीत खळबळ! झुंबा डान्स क्लासवर कारवाई न करण्यासाठी ५ लाखांची लाच स्वीकारताना पोलीस हवालदार एसीबीच्या जाळ्यात
- उत्तर प्रदेश: प्रशासकीय हलगर्जीपणाचा कळस! उत्तर प्रदेशमधील पूरग्रस्त भागात मदत म्हणून वाटले एक्स्पायर्ड कफ सिरप, लहान मुलांची प्रकृती बिघडली
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य ९ सप्टेंबर २०२६: सिंह राशीतील चंद्र गोचरमुळे ‘डबल धमाका’ आणि मालमत्ता वाढीचे योग!
- आजचे राशिभविष्य ७ सप्टेंबर २०२६ : शेवटचा श्रावणी सोमवार या राशींसाठी ठरणार भाग्यशाली, शिवकृपा लाभणार!
- आजचे राशिभविष्य ५ सप्टेंबर २०२६ दहीहंडी विशेष: चंद्र-मंगळ योगामुळे या राशींना मिळणार प्रचंड धनलाभ आणि करिअरमध्ये यश!
- आजचे राशिभविष्य 4 सप्टेंबर 2026 : जन्माष्टमीच्या दिवशी ग्रहांचा शुभ संयोग या राशींसाठी नशीब बदलवणारा, श्रीकृष्णाची मिळणार कृपा !
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- दिल्ली: देशातून जातीव्यवस्था समूळ नष्ट करा, आम्ही स्वतःहून आरक्षण सोडायला तयार आहोत; केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंचे मोठे विधान
- नवी दिल्ली: राहुल गांधींच्या खटल्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण; न्यायमूर्ती सूर्यकांत म्हणाले न्यायालयासमोर सगळे समान आहेत, कोणीही श्रेष्ठ नाही
- उत्तर प्रदेश: प्रशासकीय हलगर्जीपणाचा कळस! उत्तर प्रदेशमधील पूरग्रस्त भागात मदत म्हणून वाटले एक्स्पायर्ड कफ सिरप, लहान मुलांची प्रकृती बिघडली
- तमिळनाडू: टीव्हीकेचे नेते विजय यांच्या सरकारसमोर मोठे राजकीय संकट, विरोधकांचे सरकार कोसळण्याचे भाकीत आणि नव्या समीकरणांची चर्चा


























Subscribe to my channel



