या रविवारी ईडन गार्डन्स मैदानावर जेव्हा भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यात उपांत्यपूर्व सामना खेळला गेला, तेव्हा ‘शांत राहा आणि काम पूर्ण होईपर्यंत क्रीजवर टिकून राहा’ असे कोणी कोणाला म्हटले, हे तुम्ही सांगू शकाल का? जोपर्यंत उत्साही क्रिकेट चाहते याचे उत्तर शोधतील, तोपर्यंत मी तुम्हाला इतर काही अज्ञात योगदात्यांकडे घेऊन जातो. आपल्यापैकी बहुतेकांनी पाहिले आहे की, नवीन चेंडूने, विशेषतः टी-20 सामन्यांमध्ये, जसप्रीत बुमराह सुरुवातीला त्याच्या कोट्यातील चारपैकी किमान दोन षटके तरी टाकतोच, पण या सामन्यात 11 व्या षटकापर्यंत त्याने फक्त एकच षटक टाकले होते. याचा अर्थ, कर्णधार सूर्यकुमार यादवने त्याला ‘ट्रम्प कार्ड’सारखे राखून ठेवले होते आणि जेव्हा सामन्याला कलाटणी द्यायची वेळ येईल, तेव्हाच त्याचा वापर करण्याचे ठरवले होते. वेस्ट इंडीजच्या धडाकेबाज फलंदाजीला लगाम घालण्यासाठी भारताला तत्काळ विकेटची गरज होती. फॉरमॅट कोणताही असो, गरज पडल्यास कोणत्याही कर्णधाराला सर्वाधिक मदत बुमराहनेच केली आहे. वेस्ट इंडीजकडून होणारी धावांची लयलूट पाहून खेळाडूंसोबतच चाहत्यांचा उत्साहही मावळू लागला होता,
परंतु 12 व्या षटकात बुमराहने जसा रन-अप सुरु केला, अचानक स्टँड्समधील ऊर्जा उसळू लागली. शिमरॉन हेटमायर फटकेबाजी करत होता आणि चेस धावा वसूल करत होता. हेटमायरचे हात खूप वेगाने चालतात आणि त्याला बाऊन्सचीही भीती वाटत नाही, पण बुमराहची अचूक गोलंदाजी त्याला जखडून ठेवू शकत होती. त्याने पहिले दोन चेंडू ‘स्लोअर’ टाकले आणि तिसऱ्याच ‘हार्ड लेंथ’ चेंडूवर हेटमायरला बाद केले. त्यानंतर त्याच षटकात बुमराहने ‘गुड लेंथ’ पेक्षा थोडा आखूड चेंडू फेकला, ज्याने क्रीजवर स्थिरावलेल्या चेसची खेळीही संपवली. आता मी तुम्हाला दुसऱ्या डावात घेऊन जातो. एकीकडे संजू सॅमसन भिंतीसारखा उभा होता, पण दुसरी बाजू डळमळीत होत होती. तिसऱ्या षटकात अभिषेक शर्मा, 5 व्या षटकात ईशान किशन आणि 11 व्या षटकात सूर्यकुमार यादवची विकेट गेली. जेव्हा सॅमसनने अर्धशतक पूर्ण केले, तेव्हा भारताची धावसंख्या 98/2 होती. त्याच्या अर्धशतकासह संपूर्ण स्टेडियम दुमदुमून गेले आणि गौतम गंभीर खुर्चीवरून उठून सॅमसनचा उत्साह वाढवू लागले. सॅमसनने कर्णधार यादवची प्रशंसा स्वीकारली आणि गंभीरकडे पाहिले, जणू धन्यवाद देत तो म्हणत होता की मी माझे काम पूर्ण केले आहे. नेमक्या याच वेळी गंभीरने इशाऱ्याने सांगितले, ‘हळू खेळ आणि टिकून राहा.’ सॅमसननेही पापण्यांच्या इशाऱ्याने उत्तर दिले, ‘मी टिकून राहीन.’ आणि त्याने दिलेला शब्द पाळला, पण कोणालाही कल्पना नव्हती की, एका धावेनंतरच, 99 वर यादव देखील बाद होईल. संजूमध्ये अर्धशतक पूर्ण केल्याचा विशेष उत्साहही दिसला नाही. ज्या खेळाडूने 26 चेंडूंत 53 धावा केल्या, त्यानेच पुढच्या 24 चेंडूंत 44 धावा कुटल्या, कारण त्याला माहीत होते की, त्या वेळी क्रीजवर टिकून असलेला तो एकमेव फलंदाज आहे. बाकी दोन आले, थोडे थांबले आणि निघून गेले. संजू सावधपणे, टिकून आणि सतर्कतेने खेळत होता, पण तो इष्ट ध्येयाकडेच वाटचाल करत होता. निश्चितच, संजूच्या 97 धावांनी भारताला उपांत्य फेरीत पोहोचवले, पण लक्षात ठेवा की, संघातील इतर सदस्यांच्या लहान-मोठ्या योगदानाकडे दुर्लक्ष करता येणार नाही. हे अगदी तसेच आहे, जसे तुमचे एसएससी किंवा एचएससीचे निकाल लागणार असतील आणि यशाचा जल्लोष साजरा करताना तुम्ही त्या आईला विसरू नका, जी रात्री उशिरापर्यंत तुमच्यासोबत जागी राहिली. त्या आजी-आजोबांना विसरू नका, ज्यांनी तुमच्यासाठी अनेकदा मंदिरात जाऊन प्रार्थना केली आणि त्या वडिलांनाही विसरू नका, जे तुम्हाला परीक्षा केंद्रापर्यंत सोडायला गेले आणि तुम्हाला ‘गुड लक’ म्हणाले. निःसंशयपणे अभ्यास तुम्हीच केला आणि गुणही तुम्हीच मिळवले. हीरो तर तुम्हीच आहात, पण इतर घटकांना आपण दुर्लक्षित करू शकत नाही.
फंडा असा की - त्या अज्ञात घटकांची आणि नायकांची प्रशंसा करण्याची सवय लावून घ्या, ज्यांनी तुम्हाला जिंकण्यासाठी मदत केली. अशी वृत्तीच होळीसारखी विजयाला रंगतदार बनवते.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- पुणे: सुरक्षेचा मोठा प्रश्न! केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या अधिकृत ताफ्याला दुचाकीस्वाराने मारला 'कट'; ३२ वर्षीय तरुणाविरोधात गुन्हा दाखल!
- पुणे: "ओम नमस्ते गणपतये...!" पुण्यात स्त्रीशक्तीचा अभूतपूर्व जागर; श्रीमंत दगडूशेठ बाप्पासमोर तब्बल ३५ हजार महिलांचे सामूहिक अथर्वशीर्ष पठण!
- मुंबई: कावळ्याच्या शापाने गाय मरत नसते...राज ठाकरेंच्या एकाच वाक्यातील सूचक आणि रहस्यमय पोस्टमुळे राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ!
- छत्रपती संभाजीनगर: गणरायाच्या स्वागतावेळी मृत्यूने साधला डाव; कंटेनर थेट मिरवणुकीच्या गर्दीत घुसल्याने २ ठार, पाच वर्षांच्या बालकासह १२ जण जखमी!
महाराष्ट्र
- उल्हासनगर: महापालिकेचा अजब कारभार! पावसाळा संपल्यावर विद्यार्थ्यांना मिळणार रेनकोट आणि शालेय साहित्य; पालकांमध्ये संताप!
- पुणे: फर्ग्युसन रोडवर २१ हजार पाणीपुरीच्या पुऱ्यांपासून साकारला तब्बल १३ फूट उंच देखणा गणपती बाप्पा!
- कोल्हापूर: पोलिसांची भन्नाट क्लिष्ट कामगिरी! एका छोट्या 'फोन पे' ट्रान्झॅक्शन आणि कपड्याच्या तुकड्यामुळे लागला तब्बल ५ लाखांच्या चोरीचा छडा!
- सोलापूर: अचानक प्रकृती बिघडून रक्ताची उलटी झाल्याने २५ वर्षीय महिला पोलीस प्रतीक्षा पाटील यांची मृत्यूशी झुंज अपयशी; पांगरीत शोककळा!
गुन्हा
- अहिल्यानगर: दूध वाहतूक करणाऱ्या चालकाला एकट्यात गाठून कोयत्याने सपासप वार करत संपवले, खर्ड्यातील घटनेने खळबळ
- हिंगोली: तू पोलिसांना टिप का देतोस? खबरी असल्याच्या संशयातून वसमतमध्ये २२ वर्षीय तरुणाची विटा-दगडने ठेचून निर्घृण हत्या
- पुणे: बारामतीत खळबळ! झुंबा डान्स क्लासवर कारवाई न करण्यासाठी ५ लाखांची लाच स्वीकारताना पोलीस हवालदार एसीबीच्या जाळ्यात
- उत्तर प्रदेश: प्रशासकीय हलगर्जीपणाचा कळस! उत्तर प्रदेशमधील पूरग्रस्त भागात मदत म्हणून वाटले एक्स्पायर्ड कफ सिरप, लहान मुलांची प्रकृती बिघडली
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य ११ सप्टेंबर २०२६: धनलक्ष्मीच्या कृपेने वाढणार बँक बॅलन्स, शुक्र देणार लक्झरी लाईफस्टाईल!
- आजचे राशिभविष्य ९ सप्टेंबर २०२६: सिंह राशीतील चंद्र गोचरमुळे ‘डबल धमाका’ आणि मालमत्ता वाढीचे योग!
- आजचे राशिभविष्य ७ सप्टेंबर २०२६ : शेवटचा श्रावणी सोमवार या राशींसाठी ठरणार भाग्यशाली, शिवकृपा लाभणार!
- आजचे राशिभविष्य ५ सप्टेंबर २०२६ दहीहंडी विशेष: चंद्र-मंगळ योगामुळे या राशींना मिळणार प्रचंड धनलाभ आणि करिअरमध्ये यश!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- कर्नाटक: बेळगावात गणेशोत्सवाच्या रात्री भीषण दुर्घटना! रेफ्रिजरेटरचा (फ्रिज) स्फोट होऊन लागलेल्या आगीत एकाच कुटुंबातील ४ जणांचा जिवंत जळून करपून मृत्यू!
- लंडन: ब्रिटनच्या संसदेत एकनाथ शिंदेंचा डंका! अस्खलित इंग्रजीत भाषण करत लंडनमध्येही गाजवली 'लाडकी बहीण' योजना
- दिल्ली: देशातून जातीव्यवस्था समूळ नष्ट करा, आम्ही स्वतःहून आरक्षण सोडायला तयार आहोत; केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंचे मोठे विधान
- नवी दिल्ली: राहुल गांधींच्या खटल्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण; न्यायमूर्ती सूर्यकांत म्हणाले न्यायालयासमोर सगळे समान आहेत, कोणीही श्रेष्ठ नाही





























Subscribe to my channel




