या रविवारी ईडन गार्डन्स मैदानावर जेव्हा भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यात उपांत्यपूर्व सामना खेळला गेला, तेव्हा ‘शांत राहा आणि काम पूर्ण होईपर्यंत क्रीजवर टिकून राहा’ असे कोणी कोणाला म्हटले, हे तुम्ही सांगू शकाल का? जोपर्यंत उत्साही क्रिकेट चाहते याचे उत्तर शोधतील, तोपर्यंत मी तुम्हाला इतर काही अज्ञात योगदात्यांकडे घेऊन जातो. आपल्यापैकी बहुतेकांनी पाहिले आहे की, नवीन चेंडूने, विशेषतः टी-20 सामन्यांमध्ये, जसप्रीत बुमराह सुरुवातीला त्याच्या कोट्यातील चारपैकी किमान दोन षटके तरी टाकतोच, पण या सामन्यात 11 व्या षटकापर्यंत त्याने फक्त एकच षटक टाकले होते. याचा अर्थ, कर्णधार सूर्यकुमार यादवने त्याला ‘ट्रम्प कार्ड’सारखे राखून ठेवले होते आणि जेव्हा सामन्याला कलाटणी द्यायची वेळ येईल, तेव्हाच त्याचा वापर करण्याचे ठरवले होते. वेस्ट इंडीजच्या धडाकेबाज फलंदाजीला लगाम घालण्यासाठी भारताला तत्काळ विकेटची गरज होती. फॉरमॅट कोणताही असो, गरज पडल्यास कोणत्याही कर्णधाराला सर्वाधिक मदत बुमराहनेच केली आहे. वेस्ट इंडीजकडून होणारी धावांची लयलूट पाहून खेळाडूंसोबतच चाहत्यांचा उत्साहही मावळू लागला होता,
परंतु 12 व्या षटकात बुमराहने जसा रन-अप सुरु केला, अचानक स्टँड्समधील ऊर्जा उसळू लागली. शिमरॉन हेटमायर फटकेबाजी करत होता आणि चेस धावा वसूल करत होता. हेटमायरचे हात खूप वेगाने चालतात आणि त्याला बाऊन्सचीही भीती वाटत नाही, पण बुमराहची अचूक गोलंदाजी त्याला जखडून ठेवू शकत होती. त्याने पहिले दोन चेंडू ‘स्लोअर’ टाकले आणि तिसऱ्याच ‘हार्ड लेंथ’ चेंडूवर हेटमायरला बाद केले. त्यानंतर त्याच षटकात बुमराहने ‘गुड लेंथ’ पेक्षा थोडा आखूड चेंडू फेकला, ज्याने क्रीजवर स्थिरावलेल्या चेसची खेळीही संपवली. आता मी तुम्हाला दुसऱ्या डावात घेऊन जातो. एकीकडे संजू सॅमसन भिंतीसारखा उभा होता, पण दुसरी बाजू डळमळीत होत होती. तिसऱ्या षटकात अभिषेक शर्मा, 5 व्या षटकात ईशान किशन आणि 11 व्या षटकात सूर्यकुमार यादवची विकेट गेली. जेव्हा सॅमसनने अर्धशतक पूर्ण केले, तेव्हा भारताची धावसंख्या 98/2 होती. त्याच्या अर्धशतकासह संपूर्ण स्टेडियम दुमदुमून गेले आणि गौतम गंभीर खुर्चीवरून उठून सॅमसनचा उत्साह वाढवू लागले. सॅमसनने कर्णधार यादवची प्रशंसा स्वीकारली आणि गंभीरकडे पाहिले, जणू धन्यवाद देत तो म्हणत होता की मी माझे काम पूर्ण केले आहे. नेमक्या याच वेळी गंभीरने इशाऱ्याने सांगितले, ‘हळू खेळ आणि टिकून राहा.’ सॅमसननेही पापण्यांच्या इशाऱ्याने उत्तर दिले, ‘मी टिकून राहीन.’ आणि त्याने दिलेला शब्द पाळला, पण कोणालाही कल्पना नव्हती की, एका धावेनंतरच, 99 वर यादव देखील बाद होईल. संजूमध्ये अर्धशतक पूर्ण केल्याचा विशेष उत्साहही दिसला नाही. ज्या खेळाडूने 26 चेंडूंत 53 धावा केल्या, त्यानेच पुढच्या 24 चेंडूंत 44 धावा कुटल्या, कारण त्याला माहीत होते की, त्या वेळी क्रीजवर टिकून असलेला तो एकमेव फलंदाज आहे. बाकी दोन आले, थोडे थांबले आणि निघून गेले. संजू सावधपणे, टिकून आणि सतर्कतेने खेळत होता, पण तो इष्ट ध्येयाकडेच वाटचाल करत होता. निश्चितच, संजूच्या 97 धावांनी भारताला उपांत्य फेरीत पोहोचवले, पण लक्षात ठेवा की, संघातील इतर सदस्यांच्या लहान-मोठ्या योगदानाकडे दुर्लक्ष करता येणार नाही. हे अगदी तसेच आहे, जसे तुमचे एसएससी किंवा एचएससीचे निकाल लागणार असतील आणि यशाचा जल्लोष साजरा करताना तुम्ही त्या आईला विसरू नका, जी रात्री उशिरापर्यंत तुमच्यासोबत जागी राहिली. त्या आजी-आजोबांना विसरू नका, ज्यांनी तुमच्यासाठी अनेकदा मंदिरात जाऊन प्रार्थना केली आणि त्या वडिलांनाही विसरू नका, जे तुम्हाला परीक्षा केंद्रापर्यंत सोडायला गेले आणि तुम्हाला ‘गुड लक’ म्हणाले. निःसंशयपणे अभ्यास तुम्हीच केला आणि गुणही तुम्हीच मिळवले. हीरो तर तुम्हीच आहात, पण इतर घटकांना आपण दुर्लक्षित करू शकत नाही.
फंडा असा की - त्या अज्ञात घटकांची आणि नायकांची प्रशंसा करण्याची सवय लावून घ्या, ज्यांनी तुम्हाला जिंकण्यासाठी मदत केली. अशी वृत्तीच होळीसारखी विजयाला रंगतदार बनवते.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- पुणे: न्यायालयाची प्रतिष्ठा आणि शिस्त जपण्यासाठी 'विधि आणि न्याय कट्टा'; पुण्याच्या शिवाजीनगर न्यायालयात अभिनव उपक्रम!
- नागपुर: माकडांचा उच्छाद! 'ऑरेंज सिटी पार्क'मध्ये ५ दिवसांत ६ हल्ले; महिला आणि फुटबॉलपटू जखमी.
- पुण्यात पाळीव कुत्र्याचा दहशत; १०-१२ जणांना चावा घेतल्याने मालकावर गुन्हा दाखल, नागरिकांकडून कडक नियमांची मागणी.
- ८ वर्षांनंतर न्याय! दिल्लीतील गोळीबार प्रकरणी भाजप आमदार राजू सिंह दोषी; महिलेचा घेतला होता बळी.
महाराष्ट्र
- पुणे: न्यायालयाची प्रतिष्ठा आणि शिस्त जपण्यासाठी 'विधि आणि न्याय कट्टा'; पुण्याच्या शिवाजीनगर न्यायालयात अभिनव उपक्रम!
- नागपुर: माकडांचा उच्छाद! 'ऑरेंज सिटी पार्क'मध्ये ५ दिवसांत ६ हल्ले; महिला आणि फुटबॉलपटू जखमी.
- पुण्यात पाळीव कुत्र्याचा दहशत; १०-१२ जणांना चावा घेतल्याने मालकावर गुन्हा दाखल, नागरिकांकडून कडक नियमांची मागणी.
- ८ वर्षांनंतर न्याय! दिल्लीतील गोळीबार प्रकरणी भाजप आमदार राजू सिंह दोषी; महिलेचा घेतला होता बळी.
गुन्हा
- मध्य प्रदेश: एकतर्फी प्रेमातून तरुणाचा अल्पवयीन तरुणीवर कुऱ्हाडीने हल्ला; छताला लटकवून दिला फास.
- कल्याणमध्ये गोळीबार; व्हॉट्सअॅप स्टेटसच्या वादातून तरुणावर जीवघेणा हल्ला, खडकपाडा पोलिसांकडून दोघांना अटक.
- लातूरच्या मुदगड प्राथमिक आरोग्य केंद्रात संतापजनक प्रकार; रुग्णांच्या जीवाशी खेळ, मोठ्या प्रमाणात मुदत संपलेली औषधे सापडली.
- चंद्रपूर कॅन्सर हॉस्पिटलवर सायबर हल्ला; रुग्णांचा डेटा हॅक, हॅकर्सची बिटकॉईनमध्ये खंडणीची मागणी.
राजकीय
- महाराष्ट्राची मोठी भरारी! मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ४,०८० कोटींच्या गुंतवणुकीचे सामंजस्य करार.
- टीएमसीमध्ये मोठा भूकंप! २२ खासदार बंडाच्या तयारीत, ममता बॅनर्जींच्या पक्षावर अस्तित्वाचे संकट.
- भाजपला रामराम! के. अण्णामलाई यांची नवी राजकीय 'चळवळ'; आगामी निवडणुकीसाठी कंबर कसली!
- तृणमूल काँग्रेसमध्ये मोठी खळबळ! २३ खासदार बंडखोर गटाच्या संपर्कात, ममता बॅनर्जींच्या अडचणीत वाढ?
इतर
- सकाळी उठल्यावर ही ५ लक्षणं दिसली तर सावध व्हा! किडनी खराब होण्याचे असू शकतात संकेत
- मुंबई हादरली: डोकेडिया कुटुंब मृत्यू प्रकरणाचे गूढ वाढले; टरबूज नाही, तर 'उंदीर मारण्याचे विष' कारणीभूत?
- आजचे राशीभविष्य ५ जून २०२६: ग्रहांच्या आशीर्वादाने नशीब उजळणार, जाणून घ्या काय सांगतात तुमचे तारे!
- पुणे: सामाजिक बांधिलकी जपत 'ONP Hospitals'तर्फे ७ जून रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन!
मनोरंजन
- आयपीएल फायनल नंतर गुजरात टायटन्सला मोठा धक्का! टीम बसमध्ये शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग; शुभमन गिलसह सर्व खेळाडू सुखरूप!
- अभिनेत्री यमुना हिच्या आयुष्यातील चढ-उतार आणि संघर्षाची कहाणी.
- "आरारारा खतरनाक…": 'मुळशी पॅटर्न २'ची घोषणा! हक्काच्या घराच्या संघर्षावर आधारित असेल नवा चित्रपट.
- "बॉलिवूडमध्ये मराठी कलाकारांना 'घाटी' समजलं जातं"; वैभव मांगलेंचे बॉलीवूडवर अत्यंत खळबळजनक भाष्य!
विडियो गॅलेरी

पुणे आणि पिंपरी-चिंचवडला हादरवून सोडणाऱ्या विषारी दारूकांडाचा थरारक खुलासा
नसरापूर हादरलंय… आणि प्रत्येक आई-बापाच्या काळजात भीतीचं सावट दाटलंय! @punebatamya
संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याला वैचारिक दिशा देणारे महामानव…
देश विदेश
- ५ वाजताची डेडलाईन! अभिजीत दिपकेच्या 'कॉक्रोच जनता पार्टी'च्या आंदोलनाला सायंकाळी ५ पर्यंतच परवानगी; दिल्ली पोलिसांचे कडक नियम लागू!
- भारत-नेपाल सीमेवर नागरिकांना मोठा दिलासा! बालेन शाह सरकारचा मोठा निर्णय; भारतातून आणणाऱ्या सामानावरील शुल्क सवलत पाच पटीने वाढवली!
- खिसा रिकामा, महागाई जोरात! २००० ते २०२६ दरम्यान जीवनावश्यक वस्तू ५ ते ६ पटीने महागल्या; पेट्रोल अन् दुधाचे दर ऐकून चक्रावाल!खिसा रिकामा, महागाई जोरात! २००० ते २०२६ दरम्यान जीवनावश्यक वस्तू ५ ते ६ पटीने महागल्या; पेट्रोल अन् दुधाचे दर ऐकून चक्रावाल!
- गरिबीवर मात! ई-रिक्षा चालकाच्या मुलाने क्रॅक केली JEE Advanced परीक्षा; आयआयटीत (IIT) जाणारा ठरला गावातील पहिलाच तरुण!
























Subscribe to my channel



