एकदा एका माणसाने एका चिमणीला पकडले. चिमणीने ‘आपल्याला जीवदान द्यावे. त्या बदल्यात तीन धडे शिकवेल. यातून तुमचे जीवन सुधारेल,’ अशी याचना चिमणीने केली. चिमणी किलबिलाट करत म्हणाली, “तुम्ही मला मुक्त केले तर मी तुम्हाला पहिला धडा शिकवेन. दुसरा धडा मी माझ्या समोर असलेल्या त्या झाडावर बसेन तेव्हा देईल. आणि तिसरा मी आकाशात उडेन तेव्हा देईल.’ मग त्या व्यक्तीने उत्सुकतेने तिची सुटका केली. चिमणी जवळच्या कुंपणावर बसली आणि त्याला पहिला धडा शिकवला : भूतकाळाबद्दल कधीही शोक करू नका; तो वेळेचा अपव्यय आहे. त्या व्यक्तीने खांदे उडवले आणि म्हटले की त्याला अशा गोष्टी आधीच माहीत आहेत. मग चिमणी एका उंच फांदीवर उडून गेली आणि त्याला दुसरा धडा शिकवला : तुम्ही स्वतःच्या डोळ्यांनी सत्य पाहत नाही तोपर्यंत कधीही कोणावरही विश्वास ठेवू नका, भलेही तो जवळचा का असेना. या वेळीही त्या व्यक्तीने त्यास क्षुल्लक म्हणून फेटाळून लावले. मग पक्ष्याने खाली पाहिले आणि म्हणाला, “तू खूप मोठी चूक केली आहेस. माझ्या शरीरात दोन मोठे हिरे आहेत. तू मला मारले असतेस तर तू पृथ्वीवरील सर्वात श्रीमंत माणूस असतास.
त्या व्यक्तीचे हृदय पिळवटून गेले. त्याने आपल्या चुकीबद्दल दु:ख व्यक्त केले आणि पश्चात्ताप केला. मग त्याने वर पाहिले आणि तिसरा धडा मागितला. या आशेने की किमान एक तरी त्याला उपयुक्त ठरेल. पक्षी म्हणाला, “मी तुला तिसरा धडा का शिकवू? तू आधीच्या दोन धड्यांकडे दुर्लक्ष केलेस. तू भूतकाळाबद्दल दु:ख व्यक्त केलेस आणि एका चिमणीत दोन मोठे हिरे असू शकतात या अशक्य गोष्टीवरही विश्वास ठेवला. मनुष्याने आपल्या प्रगतीसाठी ज्ञान मिळवले होते. भौतिक संपत्ती गोळा केली होती. परंतु ती वापरण्याची बुद्धी त्याने गमावली आहे,’ असे म्हणत पक्षी उडून गेला. या शुक्रवारी मुंबई उच्च न्यायालयाचा निकाल वाचताना मला ही बोधकथा आठवली. हा खटला एका मुलाशी संबंधित होता. त्याने “हिऱ्या’सारख्या वडिलोपार्जित मालमत्तेच्या आमिषाने आपल्या वडिलांच्या मालमत्तेच्या एक तृतीयांश भागावर दावा केला. वडिलांनी विरोध केला. तेव्हा वाद घालण्याऐवजी किंवा कौटुंबिक कर्तव्याचा उल्लेख करण्याऐवजी मुलाने कायद्याचे ज्ञान शस्त्र म्हणून वापरले आणि मानसिक आरोग्यसेवा कायद्याच्या तरतुदींचा वापर करण्यासाठी याचिका दाखल केली. त्याने आपल्या वडिलांच्या मानसिक स्थितीची स्वतंत्र मूल्यांकनाची मागणी केली. आणि अशा प्रकारे वृद्धाची त्याला आव्हान देण्याची कायदेशीर क्षमता हिरावून घेतली. या खटल्याची सुनावणी करणारे न्यायमूर्ती फरहान दुबाश यांनी ही चाल लक्षात घेतली. मुलाची याचिका कायदेशीर प्रतिकाराच्या मुळावर प्रहार करण्याचा स्पष्ट प्रयत्न होता. एमएचएला कमकुवत करणे आणि असुरक्षित व्यक्तींना संरक्षण देण्यासाठी ढाल म्हणून केले होते. परंतु मुलाने त्याचा वापर तलवारीसारखा करून वडिलांचा कायदेशीर दर्जा नष्ट करण्याचा प्रयत्न केला. मुलासाठी त्याचे वडील आता पालक राहिले नाहीत तर केवळ मालमत्तेमधील अडथळा होते आणि त्याच्या सर्व युक्त्या लोभातून जन्माला आल्या होत्या. ही कायदेशीर लढाई चिमणीने दिलेल्या इशाऱ्याला अधोरेखित करणारी आहे. माणसाने भौतिक प्रगतीसाठी ज्ञान मिळवले, परंतु आपला विवेक हरवून टाकला. चिमणी असो किंवा इतर कोणताही पक्षी... ते स्वतःच्या पिल्लांना वाढवण्यासाठी कधीही दुसऱ्या पक्ष्याचे घरटे नष्ट करत नाहीत. परंतु मुलगा वडिलांच्या विचारसरणीत कायदेशीर त्रुटी शोधू लागतो तेव्हा तो कुटुंबाचा वारसा याकडे ताब्यात घेण्यायोग्य मालमत्ता म्हणून बघू लागतो. तेव्हा त्या चिमणीचे म्हणणे खरे वाटते. 10 मार्च 1876 रोजी ग्रॅहम बेलने टेलिफोनचा शोध लावला. 1887 मध्ये जर्मन-अमेरिकन शोधक एमिल बर्लिनर यांनी फ्लॅट-डिस्क ग्रामोफोन तयार केला. 3 एप्रिल 1973 रोजी मोटोरोला अभियंता मार्टिन कूपर यांनी पहिला हाताळता येणारा मोबाइल फोन विकसित केला होता. ध्वनी क्षेत्रातील हे सर्व शोध मानवी प्रजातीकडे ज्ञान असल्यामुळे शक्य झाले. परंतु त्याच मानवी प्रजातीचा एक मुलगा त्याच्या घरात राहणाऱ्या आपल्या वडिलांचा आवाज ऐकू शकत नाही. म्हणूनच माणूस म्हणून आपण बुद्धी गमावून बसलो आहोत ही बाब एका चिमणीलादेखील समजते असे म्हणावे लागते. फंडा असा की - संपत्तीचा लोभ सर्वात “शिक्षित’ व्यक्तीलादेखील एका क्षणात मूलभूत तर्कशुद्ध आणि नैतिक तत्त्वांविषयी अंध बनवू शकतो.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- पुणे: बारामतीत धक्कादायक घटना; तांदूळवाडीत एकाच घरात माय-लेकाचा संशयास्पद मृत्यू
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- मुंबई: मेक्सिकन पर्यटकाला लुटणे चालकाला पडले महागात! अवघ्या २ किमी प्रवासासाठी मागितले ५०० रुपये, पर्यटकाचे अस्खलित हिंदी उत्तर ऐकून ड्रायव्हरची उडाली दांडी!
महाराष्ट्र
- पुणे: बारामतीत धक्कादायक घटना; तांदूळवाडीत एकाच घरात माय-लेकाचा संशयास्पद मृत्यू
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- महाराष्ट्र: शेतकऱ्यांप्रमाणे आता मच्छिमारांनाही मिळणार कर्जमाफी? मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे तयार करणार कर्जमाफीची सविस्तर रूपरेषा!
गुन्हा
- मुंबई: लोकलमध्ये संतापजनक प्रकार जागेवरून झालेल्या वादानंतर धावत्या ट्रेनमधून खाली ढकलल्याने दिव्यांग वृद्धाचा मृत्यू!
- रत्नागिरी: ॲप डाउनलोड करून शुभेच्छा कार्ड तयार करणे पडले महागात; रत्नागिरीतील वृद्धाची साडेआठ लाखांची फसवणूक!
- पुणे: कोथरूडच्या एआरएआय टेकडीवर रक्ताच्या थारोळ्यात आढळला तरुणाचा मृतदेह
- नाशिक: १६ वर्षे लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या जोडीदाराची प्रियकराच्या मदतीने गळा चिरून हत्या, मृतदेह थेट कसारा घाटात फेकला
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशीभविष्य: १९ ऑगस्ट २०२६, ग्रह नक्षत्रांचा तुमच्या राशीवर काय होईल परिणाम?
- आजचे राशिभविष्य १५ ऑगस्ट २०२६: शनिदेवाची कृपा, या राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ!
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
- १३ ऑगस्ट २०२६ चे आजचे राशिभविष्य: श्रावण मासाच्या पहिल्या दिवशी कोणावर होणार शिवकृपा
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- साखर: तब्बल १० वर्षांनंतर भारतात होणार आयात! देशांतर्गत वाढत्या किंमती रोखण्यासाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय, १० लाख टन कच्ची साखर मागवण्यास मंजुरी!
- दिल्ली: बाळासाठी सोडली कॉर्पोरेट नोकरी वाटलं करिअर संपलं, स्निग्धाने होमस्टे व्यवसायातून उभा केला २१ लाखांचा महसूल!
- हैदराबाद: भरधाव 'ॲस्टन मार्टिन' कारची धडक, इनऑर्बिट मॉलबाहेर २६ वर्षीय तरुणीचा दुःखद अंत; आंध्र प्रदेशच्या राज्यसभा खासदाराच्या मुलावर गुन्हा दाखल!
- नवी दिल्ली: "आम्ही त्यांना आजच अपात्र घोषित करू शकतो का?" शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाचे मोठे सवाल

























Subscribe to my channel



