एकदा एका माणसाने एका चिमणीला पकडले. चिमणीने ‘आपल्याला जीवदान द्यावे. त्या बदल्यात तीन धडे शिकवेल. यातून तुमचे जीवन सुधारेल,’ अशी याचना चिमणीने केली. चिमणी किलबिलाट करत म्हणाली, “तुम्ही मला मुक्त केले तर मी तुम्हाला पहिला धडा शिकवेन. दुसरा धडा मी माझ्या समोर असलेल्या त्या झाडावर बसेन तेव्हा देईल. आणि तिसरा मी आकाशात उडेन तेव्हा देईल.’ मग त्या व्यक्तीने उत्सुकतेने तिची सुटका केली. चिमणी जवळच्या कुंपणावर बसली आणि त्याला पहिला धडा शिकवला : भूतकाळाबद्दल कधीही शोक करू नका; तो वेळेचा अपव्यय आहे. त्या व्यक्तीने खांदे उडवले आणि म्हटले की त्याला अशा गोष्टी आधीच माहीत आहेत. मग चिमणी एका उंच फांदीवर उडून गेली आणि त्याला दुसरा धडा शिकवला : तुम्ही स्वतःच्या डोळ्यांनी सत्य पाहत नाही तोपर्यंत कधीही कोणावरही विश्वास ठेवू नका, भलेही तो जवळचा का असेना. या वेळीही त्या व्यक्तीने त्यास क्षुल्लक म्हणून फेटाळून लावले. मग पक्ष्याने खाली पाहिले आणि म्हणाला, “तू खूप मोठी चूक केली आहेस. माझ्या शरीरात दोन मोठे हिरे आहेत. तू मला मारले असतेस तर तू पृथ्वीवरील सर्वात श्रीमंत माणूस असतास.
त्या व्यक्तीचे हृदय पिळवटून गेले. त्याने आपल्या चुकीबद्दल दु:ख व्यक्त केले आणि पश्चात्ताप केला. मग त्याने वर पाहिले आणि तिसरा धडा मागितला. या आशेने की किमान एक तरी त्याला उपयुक्त ठरेल. पक्षी म्हणाला, “मी तुला तिसरा धडा का शिकवू? तू आधीच्या दोन धड्यांकडे दुर्लक्ष केलेस. तू भूतकाळाबद्दल दु:ख व्यक्त केलेस आणि एका चिमणीत दोन मोठे हिरे असू शकतात या अशक्य गोष्टीवरही विश्वास ठेवला. मनुष्याने आपल्या प्रगतीसाठी ज्ञान मिळवले होते. भौतिक संपत्ती गोळा केली होती. परंतु ती वापरण्याची बुद्धी त्याने गमावली आहे,’ असे म्हणत पक्षी उडून गेला. या शुक्रवारी मुंबई उच्च न्यायालयाचा निकाल वाचताना मला ही बोधकथा आठवली. हा खटला एका मुलाशी संबंधित होता. त्याने “हिऱ्या’सारख्या वडिलोपार्जित मालमत्तेच्या आमिषाने आपल्या वडिलांच्या मालमत्तेच्या एक तृतीयांश भागावर दावा केला. वडिलांनी विरोध केला. तेव्हा वाद घालण्याऐवजी किंवा कौटुंबिक कर्तव्याचा उल्लेख करण्याऐवजी मुलाने कायद्याचे ज्ञान शस्त्र म्हणून वापरले आणि मानसिक आरोग्यसेवा कायद्याच्या तरतुदींचा वापर करण्यासाठी याचिका दाखल केली. त्याने आपल्या वडिलांच्या मानसिक स्थितीची स्वतंत्र मूल्यांकनाची मागणी केली. आणि अशा प्रकारे वृद्धाची त्याला आव्हान देण्याची कायदेशीर क्षमता हिरावून घेतली. या खटल्याची सुनावणी करणारे न्यायमूर्ती फरहान दुबाश यांनी ही चाल लक्षात घेतली. मुलाची याचिका कायदेशीर प्रतिकाराच्या मुळावर प्रहार करण्याचा स्पष्ट प्रयत्न होता. एमएचएला कमकुवत करणे आणि असुरक्षित व्यक्तींना संरक्षण देण्यासाठी ढाल म्हणून केले होते. परंतु मुलाने त्याचा वापर तलवारीसारखा करून वडिलांचा कायदेशीर दर्जा नष्ट करण्याचा प्रयत्न केला. मुलासाठी त्याचे वडील आता पालक राहिले नाहीत तर केवळ मालमत्तेमधील अडथळा होते आणि त्याच्या सर्व युक्त्या लोभातून जन्माला आल्या होत्या. ही कायदेशीर लढाई चिमणीने दिलेल्या इशाऱ्याला अधोरेखित करणारी आहे. माणसाने भौतिक प्रगतीसाठी ज्ञान मिळवले, परंतु आपला विवेक हरवून टाकला. चिमणी असो किंवा इतर कोणताही पक्षी... ते स्वतःच्या पिल्लांना वाढवण्यासाठी कधीही दुसऱ्या पक्ष्याचे घरटे नष्ट करत नाहीत. परंतु मुलगा वडिलांच्या विचारसरणीत कायदेशीर त्रुटी शोधू लागतो तेव्हा तो कुटुंबाचा वारसा याकडे ताब्यात घेण्यायोग्य मालमत्ता म्हणून बघू लागतो. तेव्हा त्या चिमणीचे म्हणणे खरे वाटते. 10 मार्च 1876 रोजी ग्रॅहम बेलने टेलिफोनचा शोध लावला. 1887 मध्ये जर्मन-अमेरिकन शोधक एमिल बर्लिनर यांनी फ्लॅट-डिस्क ग्रामोफोन तयार केला. 3 एप्रिल 1973 रोजी मोटोरोला अभियंता मार्टिन कूपर यांनी पहिला हाताळता येणारा मोबाइल फोन विकसित केला होता. ध्वनी क्षेत्रातील हे सर्व शोध मानवी प्रजातीकडे ज्ञान असल्यामुळे शक्य झाले. परंतु त्याच मानवी प्रजातीचा एक मुलगा त्याच्या घरात राहणाऱ्या आपल्या वडिलांचा आवाज ऐकू शकत नाही. म्हणूनच माणूस म्हणून आपण बुद्धी गमावून बसलो आहोत ही बाब एका चिमणीलादेखील समजते असे म्हणावे लागते. फंडा असा की - संपत्तीचा लोभ सर्वात “शिक्षित’ व्यक्तीलादेखील एका क्षणात मूलभूत तर्कशुद्ध आणि नैतिक तत्त्वांविषयी अंध बनवू शकतो.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- छत्रपती संभाजीनगर: काळीज पिळवटणारी घटना! घरी बनवलेली खिचडी खाल्ल्याने विषबाधा होऊन २४ तासांत लहान भाऊ अन् बहिणीचा उपचारादरम्यान मृत्यू
- छत्रपती संभाजीनगर: लग्नाचा प्रस्ताव नाकारल्याच्या रागातून मेडिकल दुकानात घुसून २२ वर्षीय केमिस्टची निर्घृण हत्या, पोलिसांनी अवघ्या ९ तासांत आवळल्या आवडी
- अहिल्यानगर: दूध वाहतूक करणाऱ्या चालकाला एकट्यात गाठून कोयत्याने सपासप वार करत संपवले, खर्ड्यातील घटनेने खळबळ
- पुणे: ज्येष्ठ विचारवंत, राजकीय विश्लेषक व काँग्रेसचे निष्ठावान नेते डॉ. रत्नाकर महाजन यांचे पुण्यात निधन; पुरोगामी चळवळीचा अभ्यासू चेहरा हरपला
महाराष्ट्र
- रत्नागिरी: कोकणातील अंगावर काटा आणणारी वास्तवता! राजापूर तालुक्यातील सागवे वाडपवाडीत मृतदेह नेण्यासाठी ग्रामस्थांना चक्क पात्रातून काढावा लागतोय पायी रस्ता
- सातारा: देशसेवेदरम्यान शहीद झालेले वीर जवान रोहित पवार यांच्यावर साताऱ्यातील चिंचणी येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; साऱ्यांचे डोळे झाले पाणावले
- रत्नागिरी: कोकण किनारपट्टीवर आजपासून वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता! हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा जारी
- छत्रपती संभाजीनगर: काळीज पिळवटणारी घटना! घरी बनवलेली खिचडी खाल्ल्याने विषबाधा होऊन २४ तासांत लहान भाऊ अन् बहिणीचा उपचारादरम्यान मृत्यू
गुन्हा
- अहिल्यानगर: दूध वाहतूक करणाऱ्या चालकाला एकट्यात गाठून कोयत्याने सपासप वार करत संपवले, खर्ड्यातील घटनेने खळबळ
- हिंगोली: तू पोलिसांना टिप का देतोस? खबरी असल्याच्या संशयातून वसमतमध्ये २२ वर्षीय तरुणाची विटा-दगडने ठेचून निर्घृण हत्या
- पुणे: बारामतीत खळबळ! झुंबा डान्स क्लासवर कारवाई न करण्यासाठी ५ लाखांची लाच स्वीकारताना पोलीस हवालदार एसीबीच्या जाळ्यात
- उत्तर प्रदेश: प्रशासकीय हलगर्जीपणाचा कळस! उत्तर प्रदेशमधील पूरग्रस्त भागात मदत म्हणून वाटले एक्स्पायर्ड कफ सिरप, लहान मुलांची प्रकृती बिघडली
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य ९ सप्टेंबर २०२६: सिंह राशीतील चंद्र गोचरमुळे ‘डबल धमाका’ आणि मालमत्ता वाढीचे योग!
- आजचे राशिभविष्य ७ सप्टेंबर २०२६ : शेवटचा श्रावणी सोमवार या राशींसाठी ठरणार भाग्यशाली, शिवकृपा लाभणार!
- आजचे राशिभविष्य ५ सप्टेंबर २०२६ दहीहंडी विशेष: चंद्र-मंगळ योगामुळे या राशींना मिळणार प्रचंड धनलाभ आणि करिअरमध्ये यश!
- आजचे राशिभविष्य 4 सप्टेंबर 2026 : जन्माष्टमीच्या दिवशी ग्रहांचा शुभ संयोग या राशींसाठी नशीब बदलवणारा, श्रीकृष्णाची मिळणार कृपा !
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

4 September 2026
श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त मथुरेत भक्तिमय वातावरण; कृष्ण जन्मभूमी मंदिरात जन्मोत्सवाचा जल्लोष!
जन्माष्टमीनिमित्त चौपाटीच्या इस्कॉन मंदिरात भक्तिमय वातावरण! 🦚🙏
देश विदेश
- दिल्ली: देशातून जातीव्यवस्था समूळ नष्ट करा, आम्ही स्वतःहून आरक्षण सोडायला तयार आहोत; केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंचे मोठे विधान
- नवी दिल्ली: राहुल गांधींच्या खटल्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण; न्यायमूर्ती सूर्यकांत म्हणाले न्यायालयासमोर सगळे समान आहेत, कोणीही श्रेष्ठ नाही
- उत्तर प्रदेश: प्रशासकीय हलगर्जीपणाचा कळस! उत्तर प्रदेशमधील पूरग्रस्त भागात मदत म्हणून वाटले एक्स्पायर्ड कफ सिरप, लहान मुलांची प्रकृती बिघडली
- तमिळनाडू: टीव्हीकेचे नेते विजय यांच्या सरकारसमोर मोठे राजकीय संकट, विरोधकांचे सरकार कोसळण्याचे भाकीत आणि नव्या समीकरणांची चर्चा


























Subscribe to my channel



