Nagpur : खरात अधिकाऱ्यांना एकमेकांच्या पत्नीशी संबंध ठेवायला लावायचा; वडेट्टीवारांचा गंभीर आरोप; सरकारकडून स्पष्टीकरण

Nagpur : राज्यात गाजत असलेल्या अशोक खरात प्रकरणामुळे राजकीय वातावरण आणखी तापले आहे. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी अत्यंत गंभीर आरोप करत सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला आहे.

वडेट्टीवार यांनी दावा केला की, या प्रकरणात नवीन आणि धक्कादायक बाब समोर आली असून, अशोक खरात काही वरिष्ठ अधिकाऱ्यांना एकमेकांच्या कुटुंबीयांशी संबंध ठेवण्यास भाग पाडत होता. “हे महाराष्ट्राची प्रतिमा मलिन करणारे अत्यंत खालच्या स्तराचे प्रकरण आहे. तरीही सत्ताधाऱ्यांना लाज वाटत नाही, ही दुर्दैवाची बाब आहे,” अशी तीव्र टीका त्यांनी केली.

ते पुढे म्हणाले की, या प्रकरणामुळे राज्याची प्रतिमा डागाळली जात असून, इतक्या गंभीर आरोपांवरही सरकारकडून अपेक्षित संवेदनशीलता दिसत नाही. यापूर्वीही त्यांनी या प्रकरणात काही आमदार, तसेच आयएएस आणि आयपीएस अधिकाऱ्यांची नावे कोड स्वरूपात नोंदवली गेल्याचा आरोप केला होता. संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी पुन्हा केली आहे.

दरम्यान, या आरोपांवर महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “अधिकाऱ्यांवर किंवा त्यांच्या कुटुंबीयांवर सार्वजनिकरित्या अशा प्रकारचे आरोप करणे योग्य नाही. यामुळे त्यांच्या विश्वासार्हतेवर आणि वैयक्तिक आयुष्यावर परिणाम होऊ शकतो,” असे त्यांनी म्हटले.

बावनकुळे पुढे म्हणाले की, “वडेट्टीवार यांच्याकडे कोणतीही ठोस माहिती असल्यास ती सरकारकडे सादर करावी. सार्वजनिकरित्या आरोप करून प्रशासनाची प्रतिमा मलिन करू नये. तपास यंत्रणा आपले काम करत आहे आणि आवश्यक त्या व्यक्तींना चौकशीसाठी बोलावले जाईल.”

या प्रकरणावर अनावश्यक चर्चा टाळावी आणि उपलब्ध माहिती असल्यास ती मुख्यमंत्र्यांकडे किंवा संबंधित विभागाकडे द्यावी, असे आवाहनही त्यांनी केले.



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *