पुणे: वीर धरण १०० टक्के भरले; १५,०११ क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू झाल्याने नीरा नदी दुथडी भरून वाहू लागली, बळीराज्यात आनंदाचे वातावरण

पुणे: पुरंदर आणि नीरा खोऱ्याच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे महत्त्वाचे असणारे वीर धरण पूर्णपणे भरले आहे. धरणाची पाणी साठवणूक क्षमता १०० टक्क्यांवर पोहोचल्यामुळे प्रशासनाकडून धरणाचे दरवाजे उघडून पाण्याचा मोठ्या प्रमाणावर विसर्ग सुरू करण्यात आला आहे. वीर धरणाच्या सांडव्यातून तब्बल १५ हजार १११ क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग नीरा नदीत सोडण्यात येत असल्याने नीरा नदी दुथडी भरून वाहू लागली आहे. या जलमय आणि सुजलाम सुफलाम दृश्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये व नागरिकांमध्ये प्रचंड आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे.

मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, गेल्या काही दिवसांपासून धरण पाणलोट क्षेत्रात पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे वीर धरणात पाण्याची आवक झपाट्याने वाढली होती. पाण्याची सततची आवक लक्षात घेता धरणाची सुरक्षा व पाण्याची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी प्रशासनाला विसर्ग वाढवण्याचा निर्णय घ्यावा लागला. धरणातून १५ हजार १११ क्युसेक इतका मोठा विसर्ग नीरा नदीपात्रात सोडण्यात आल्यामुळे नदीच्या पाणीपातळीत प्रचंड वाढ झाली आहे.

नदी दुथडी भरून वाहू लागल्यामुळे भविष्यातील सिंचन आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटल्याने शेतकरी वर्गात मोठा उत्साह व समाधानाचे वातावरण आहे. रब्बी आणि खरीप हंगामातील पिकांना यामुळे पाण्याचा मोठा आधार मिळणार असून, शेतीसाठी हे पाणी वरदान ठरणार आहे. तथापि, नदीपात्रात मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग सुरू असल्यामुळे नदीकाठच्या सर्व गावांना प्रशासनाकडून आधीच सतर्कतेचा (अलर्ट) इशारा देण्यात आला आहे. नदीच्या पात्रात नागरिकांनी किंवा जनावरांनी जाऊ नये, तसेच नदीकाठच्या वाड्या-वस्त्यांवरील नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन जलसंपदा विभाग आणि जिल्हा प्रशासनाकडून वारंवार केले जात आहे.

 



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

राजकीय

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *