
Pune : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या ‘क’ क्षेत्रीय कार्यालय हद्दीत येत असलेला भोसरी एमआयडीसी परिसर ३५०० एकर एवढ्या मोठ्या क्षेत्रफळामध्ये सन १९६२ पासून विस्तारलेला आहे. या परिसरामध्ये ४८०० प्लॉटधारक असून बहुउद्देशीय कंपन्यांना सुटे भाग पुरविणारे चार हजारहून अधिक लघुउद्योग आहेत. महापालिका अस्तित्वात आल्यापासून एमआयडीसी आणि पिंपरी-चिंचवड महापालिका यांच्या अंतर्गत वादात कायमच एमआयडीसी परिसर हा दुर्लक्षित राहिल्याचा उद्योजकांचा आरोप आहे. उद्योजकांच्या मूलभूत समस्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असून या समस्यांबाबत अद्याप ठोस तोडगा निघालेला नाही.
नेमकी समस्या काय?
एमआयडीसी परिसरात २२ ब्लॉक असून या परिसरातील कचरा संकलनासाठी केवळ एकच कचरागाडी विभागून देण्यात आली होती. महापालिकेने कचरा संकलनाचे काम खासगी संस्थेला दिले. याबाबतची निविदा प्रक्रिया राबविताना केवळ रहिवासी भागातील कचरा संकलनाचे नियोजन केले. परंतु, औद्योगिक भागाचा समावेश केला नाही. त्यासाठी कर्मचारी नियुक्त केले नाहीत. परिसरातील कचराकुंड्याही उचलण्यात आल्या. कचरा संकलन करणाऱ्या घंटा गाड्याही बंद केल्या. परिणामी, एमआयडीसीमध्ये प्रत्येक ठिकाणी कचऱ्याचे ढीग झालेले आढळून येतात. कचरा साचल्याने कामगारांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. कामगारांना डेंग्यू, मलेरिया, चिकुनगुनिया यांसारखे रोग झाले आहेत. गेल्या काही वर्षांमध्ये एमआयडीसी परिसरात उद्योजकांना कचरा विकत द्यावा लागतो. भंगारवाले कचरा परिसरामध्ये जाळून त्यातील उपयोगी वस्तू काढून घेतात. कचरा जाळल्याने परिसरामध्ये प्रदूषणही वाढत आहे.
|
Atal Setu: अटल सेतूवर कार थांबवली अन् समुद्रात उडी मारली; घटना CCTV मध्ये कैद |
उद्योजक काय म्हणतात?
गेल्या काही वर्षांपासून भोसरी, एमआयडीसी परिसरात कचऱ्याची समस्या जटील झाली आहे. कंपन्यांमधील कचरा उचलला जात नाही. कचऱ्याचे ढीग कंपन्यांमध्ये साचलेले असतात. कंपनीत दुर्गंधी पसरली आहे. रस्त्यांची नियमितपणे झाडलोट केली जात नाही. सर्वत्र अस्वच्छता आहे. याबाबत महापालिका प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा केला. परंतु, तोडगा काढला जात नसल्याचे पिंपरी-चिंचवड लघुउद्योग संघटनेचे अध्यक्ष संदीप बेलसरे यांनी सांगितले.
गेल्या पाच वर्षांपासून एमआयडीसी परिसरात कचरा विकत द्यावा लागतो ही उद्योजकांची शोकांतिका आहे. भंगार व्यावसायिकांना बोलावून कचरा द्यावा लागतो. या कचऱ्याबरोबर कंपनीतील अनेक किमती सामग्री सुद्धा ट्रकमध्ये चोरीस जाण्याचे प्रकार घडलेले आहेत. उद्योजकांनी कचरा रस्त्यावर टाकल्यास दंडात्मक कारवाई केली जाते. पाच ते २५ हजारापर्यंत दंड वसूल केला जातो. त्यामुळे उद्योजकांना गप्प बसून बुक्क्याचा मार सहन करावा लागत आहे. स्वतंत्र औद्योगिक महापालिका उभारण्याची मागणी राज्य शासनाकडे करण्यात आली आहे. उद्योजकांना मूलभूत सुविधा न मिळाल्यास एमआयडीसीतील उद्योग परराज्यात स्थलांतरित होतील, अशी भीती फोरम ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष अभय भोर यांनी सांगितले.
प्रशासनाचे म्हणणे काय?
कचरा संकलनाच्या निविदा प्रक्रियेत औद्योगिक भागातील कचरा उचलण्यासाठी मनुष्यबळाचा विचार केला नव्हता. एमआयडीसी परिसरातील कचरा उचलण्यासाठी नवीन कर्मचारी नियुक्त करण्याची कार्यवाही सुरू आहे. लवकरच नियमित कचरा उचलला जाईल. परिसरात स्वच्छता चालू होईल, असे आरोग्य विभागाचे सहायक आयुक्त अजिंक्य येळे यांनी सांगितले.
शहर
- छत्रपती संभाजीनगर: काळीज पिळवटणारी घटना! घरी बनवलेली खिचडी खाल्ल्याने विषबाधा होऊन २४ तासांत लहान भाऊ अन् बहिणीचा उपचारादरम्यान मृत्यू
- छत्रपती संभाजीनगर: लग्नाचा प्रस्ताव नाकारल्याच्या रागातून मेडिकल दुकानात घुसून २२ वर्षीय केमिस्टची निर्घृण हत्या, पोलिसांनी अवघ्या ९ तासांत आवळल्या आवडी
- अहिल्यानगर: दूध वाहतूक करणाऱ्या चालकाला एकट्यात गाठून कोयत्याने सपासप वार करत संपवले, खर्ड्यातील घटनेने खळबळ
- पुणे: ज्येष्ठ विचारवंत, राजकीय विश्लेषक व काँग्रेसचे निष्ठावान नेते डॉ. रत्नाकर महाजन यांचे पुण्यात निधन; पुरोगामी चळवळीचा अभ्यासू चेहरा हरपला
महाराष्ट्र
- रत्नागिरी: कोकणातील अंगावर काटा आणणारी वास्तवता! राजापूर तालुक्यातील सागवे वाडपवाडीत मृतदेह नेण्यासाठी ग्रामस्थांना चक्क पात्रातून काढावा लागतोय पायी रस्ता
- सातारा: देशसेवेदरम्यान शहीद झालेले वीर जवान रोहित पवार यांच्यावर साताऱ्यातील चिंचणी येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; साऱ्यांचे डोळे झाले पाणावले
- रत्नागिरी: कोकण किनारपट्टीवर आजपासून वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता! हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा जारी
- छत्रपती संभाजीनगर: काळीज पिळवटणारी घटना! घरी बनवलेली खिचडी खाल्ल्याने विषबाधा होऊन २४ तासांत लहान भाऊ अन् बहिणीचा उपचारादरम्यान मृत्यू
गुन्हा
- अहिल्यानगर: दूध वाहतूक करणाऱ्या चालकाला एकट्यात गाठून कोयत्याने सपासप वार करत संपवले, खर्ड्यातील घटनेने खळबळ
- हिंगोली: तू पोलिसांना टिप का देतोस? खबरी असल्याच्या संशयातून वसमतमध्ये २२ वर्षीय तरुणाची विटा-दगडने ठेचून निर्घृण हत्या
- पुणे: बारामतीत खळबळ! झुंबा डान्स क्लासवर कारवाई न करण्यासाठी ५ लाखांची लाच स्वीकारताना पोलीस हवालदार एसीबीच्या जाळ्यात
- उत्तर प्रदेश: प्रशासकीय हलगर्जीपणाचा कळस! उत्तर प्रदेशमधील पूरग्रस्त भागात मदत म्हणून वाटले एक्स्पायर्ड कफ सिरप, लहान मुलांची प्रकृती बिघडली
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य ९ सप्टेंबर २०२६: सिंह राशीतील चंद्र गोचरमुळे ‘डबल धमाका’ आणि मालमत्ता वाढीचे योग!
- आजचे राशिभविष्य ७ सप्टेंबर २०२६ : शेवटचा श्रावणी सोमवार या राशींसाठी ठरणार भाग्यशाली, शिवकृपा लाभणार!
- आजचे राशिभविष्य ५ सप्टेंबर २०२६ दहीहंडी विशेष: चंद्र-मंगळ योगामुळे या राशींना मिळणार प्रचंड धनलाभ आणि करिअरमध्ये यश!
- आजचे राशिभविष्य 4 सप्टेंबर 2026 : जन्माष्टमीच्या दिवशी ग्रहांचा शुभ संयोग या राशींसाठी नशीब बदलवणारा, श्रीकृष्णाची मिळणार कृपा !
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- दिल्ली: देशातून जातीव्यवस्था समूळ नष्ट करा, आम्ही स्वतःहून आरक्षण सोडायला तयार आहोत; केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंचे मोठे विधान
- नवी दिल्ली: राहुल गांधींच्या खटल्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण; न्यायमूर्ती सूर्यकांत म्हणाले न्यायालयासमोर सगळे समान आहेत, कोणीही श्रेष्ठ नाही
- उत्तर प्रदेश: प्रशासकीय हलगर्जीपणाचा कळस! उत्तर प्रदेशमधील पूरग्रस्त भागात मदत म्हणून वाटले एक्स्पायर्ड कफ सिरप, लहान मुलांची प्रकृती बिघडली
- तमिळनाडू: टीव्हीकेचे नेते विजय यांच्या सरकारसमोर मोठे राजकीय संकट, विरोधकांचे सरकार कोसळण्याचे भाकीत आणि नव्या समीकरणांची चर्चा



























Subscribe to my channel



