
Aditya Thackeray : छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपा आणि ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या हाणामारीनंतर राज्यातील राजकीय वातावरण तापू लागलं आहे. ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी काल पंतप्रधान मोदी यांच्या विरोधात आंदोलन केल्याने आज भाजपाकडून आज आदित्य ठाकरेंच्या दौऱ्याला विरोध केला जात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली असून यावरुन विविध राजकीय प्रतिक्रियाही उमटू लागल्या आहेत. या घटनेबाबत आता आदित्य ठाकरे यांनी भाष्य केलं आहे. छत्रपती संभाजी नगरमध्ये माध्यमांशी बोलताना त्यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली.
काय म्हणाले आदित्य ठाकरे?
“आम्ही काल जे आंदोलन केले, ते पंतप्रधान म्हणून त्यांना जाब विचारण्यासाठी केलं होतं. पण आज माझ्याकडे कोणतही पद नाही. त्यामुळे माझ्या विरोधात आंदोलन करण्याचं कोणतंही कारण नव्हते. आज आमच्या हातात काहीही नाही. आमच्या हातात सरकार दिलं तर कायद्याचा धाक काय असतो? हे आम्ही दाखवून देऊ. आम्ही शक्ती कायदा आणून दाखवला होता. मुळात ही निवडणूक आहे, लढाई नाही. त्यामुळे समोरच्या पक्षांनी हे लक्षात ठेवून वागावं, आम्ही कालचे आंदोलन केलं तेव्हा कुठेही कायदा सुव्यवस्थेचे उल्लंघन झाले नाही. आंदोलन करण्याच्या प्रत्येकाला अधिकार आहे, पण त्या आंदोलन कसं असायला पाहिजे याचं भान राजकीय पक्षांनी ठेवलं पाहिजे”, असं आदित्य ठाकरे म्हणाले.
|
|
“आज आमच्या कार्यकर्त्यांवर लाठीचार्ज झाला आहे. त्यासाठी मी पोलिसांना दोष देत नाही. त्यांना वरून कुणीतरी आदेश दिला असेल. काही दिवसांपूर्वी जरांगे पाटील यांच्यावरही लाठीचार्ज झाला होता, तो हल्ला कुणाच्या आदेशावरून झाला? त्याप्रकरणी पोलिसांवर कारवाई झाली असेल. पण हल्ल्याचे आदेश नेमके कुणी दिले. मुख्यमंत्री की दोन उपमुख्यमंत्री यापैकी खरा जनरल डायर कोण? हे अद्यापही समोर आलेलं नाही. वारकऱ्यांवर झालेल्या हल्ल्याचे तसेच बदलापूरमध्ये नागरिकांवर झालेल्या हल्ल्याचे आदेश कुणी दिले सुद्धा पुढे आलेलं नाही. त्यामुळे हल्ल्याचे आदेश नेमकं कोण देतं? याचे उत्तर आधी मिळायला हवं”, असे ते म्हणाले.
यावेळी बोलताना त्यांनी राज्यातील शिंदे सरकारवरही जोरदार टीका केली. “महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण झाली आहे. कालही एका पोलीस निरीक्षकावर कोयत्याने हल्ला झाला. जे आमच्या अडीच वर्षांच्या काळात घडलं नाही, ते आता या दोन वर्षांच्या काळात घडत आहे. पोलिसांवर हल्ले सुरू आहेत. महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. बदलापूरच्या घटनेनंतर वामन मात्रे यांनी पत्रकाराला तुझ्यावर रेप झाल्यासारखे का विचारते? असा प्रश्न विचारला, मात्र त्यांना अद्यापही पक्षातून काढण्यात आलेलं नाही. मुख्यमंत्री स्वत: या सगळ्या आंदोलनाला राजकीय म्हणाले. जेव्हा जनता रस्त्यावरून आंदोलन करते तेव्हा सरकार त्यांना राजकीय म्हणते. त्यांच्यावर लाठीचार्ज केला जातो. त्यांना अटक केली जाते. मात्र, ज्यांनी बलात्कार केला, त्यांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यासाठी दहा तास महिलेला बसाव लागलं, ही याची कामाची पद्धत आहे”, अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली.
शहर
- पुणे: फुरसुंगी गोळीबार प्रकरणात बिष्णोई टोळीचा सोशल मीडिया कनेक्शन; Signal ॲपवरून होत होता गुप्त संवाद
- पुणे: सरकारी कर्ज मिळवून देण्याच्या आमिषाने शेकडो महिलांची फसवणूक; मुख्य आरोपीला अटक
- पुणे: व्हिडिओ रेकॉर्ड करून कंत्राटदाराची आत्महत्या; आर्थिक वादातील गंभीर आरोपांमुळे खळबळ
- कोल्हापूर : भरदिवसा भाजप कार्यकर्त्यावर गोळीबार; खासगी सावकारीच्या वादातून हल्ल्याचा संशय
महाराष्ट्र
- पुणे: फुरसुंगी गोळीबार प्रकरणात बिष्णोई टोळीचा सोशल मीडिया कनेक्शन; Signal ॲपवरून होत होता गुप्त संवाद
- पुणे: सरकारी कर्ज मिळवून देण्याच्या आमिषाने शेकडो महिलांची फसवणूक; मुख्य आरोपीला अटक
- पुणे: व्हिडिओ रेकॉर्ड करून कंत्राटदाराची आत्महत्या; आर्थिक वादातील गंभीर आरोपांमुळे खळबळ
- कोल्हापूर : भरदिवसा भाजप कार्यकर्त्यावर गोळीबार; खासगी सावकारीच्या वादातून हल्ल्याचा संशय
गुन्हा
- कोल्हापूर : भरदिवसा भाजप कार्यकर्त्यावर गोळीबार; खासगी सावकारीच्या वादातून हल्ल्याचा संशय
- कोल्हापूर: उसने दिलेल्या पैशांसाठी तगादा लावणाऱ्या महिलेचा विष पाजून खून; दीड महिन्यानंतर पोलिसांनी उलगडला थरारक गुन्हा
- जळगाव: विवाहितेचे मुलासह अपहरण; दोन महिने डांबून ठेवत नराधमाकडून अत्याचार
- यवतमाळ: कौटुंबिक वादातून सासऱ्याने जावयाची हत्या केल्याचा आरोप; परिसरात खळबळ
राजकीय
- दिल्ली: अमित शाहांच्या भेटीनंतर शिंदे गटाला मिळणार दोन मंत्रिपदे? 'या' नेत्यांच्या नावाची चर्चा.
- सिंधुदुर्ग: सावंतवाडी पाणीपुरवठा योजनेला वेग; आमदार दीपक केसरकर आणि जिल्हाधिकाऱ्यांकडून प्रकल्पाची प्रत्यक्ष पाहणी!
- नाशिक: १२ नगरसेवक फुटण्याच्या भीतीने उद्धव ठाकरे स्वतः रिंगणात; मातोश्रीवर होणार 'वन-टू-वन' चर्चा.
- मुंबई: महाराष्ट्रात समान नागरी कायदा (UCC) लागू करण्याच्या हालचालींना वेग; दोन आठवड्यांत स्थापन होणार तज्ज्ञ समिती.
इतर
- आजचे राशिभविष्य १५ जुलै: गणरायाची विशेष कृपा या राशींवर; काहींनी आर्थिक आणि आरोग्याची घ्यावी काळजी.
- मुंबई: व्हायरल ताप, डेंग्यू आणि गॅस्ट्रोच्या रुग्णांत १५ ते २० टक्क्यांनी वाढ; 'या' लक्षणांकडे करू नका दुर्लक्ष!
- आजचे राशिभविष्य (१४ जुलै २०२६): गणरायाच्या कृपेने 'या' राशींना धनलाभ, यश आणि नव्या संधींची चाहूल!
- आजचे राशिभविष्य १३ जुलै २०२६: या राशींना होणार बंपर लाभ, आजचा दिवस ठरेल खास!
मनोरंजन
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
- क्रिकेट विश्व: क्रिकेटर सौरव गांगुली च्या बायोपिक चं पहिलं पोस्टर रिलीज !
देश विदेश
- छत्रपती संभाजीनगर: स्नॅपचॅटवरील प्रेमाची साद! ओडिशाहून प्रेमाखातर थेट महाराष्ट्रात पोहोचली १९ वर्षीय तरुणी.
- गोवा: सात खाण कंपन्यांना मोठा दिलासा; बेकायदा खाणकामप्रकरणी दाखल FIR मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाकडून रद्द
- उत्तर प्रदेश: ४९ वर्षांनंतर न्याय; १९७७ च्या हत्याकांडातील पाच आरोपींची सर्वोच्च न्यायालयाकडून निर्दोष मुक्तता
- जागतिक तेल संकट अटळ? होर्मुझमधील तणावामुळे 'सेफ्टी बफर' झाले रिकामे; IMF चा गंभीर इशारा.
























Subscribe to my channel




