पुणे:निवडणूक काळात राजकीय पक्षांची बूथ यंत्रणा अतिशय मजबूत असल्याचा मोठा दावा नेहमीच केला जातो. मात्र, केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार जाहीर करण्यात आलेल्या विशेष सखोल पुनरीक्षणा (SIR) नंतरच्या प्रारूप मतदारयादीने हा दावा फोल ठरल्याचे उघड केले आहे. विशेषतः भारतीय जनता पक्षाचे (BJP) पुण्यातले सर्वात मोठे आणि भक्कम मानले जाणारे बालेकिल्ले असलेल्या खडकवासला आणि कोथरूड विधानसभा मतदारसंघात मतदारांची मोठी गळती झाल्याचे समोर आले आहे. या दोन्ही मतदारसंघांत तब्बल ४६ टक्क्यांहून अधिक मतदारांची नावे प्रारूप यादीतून गायब झाल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
प्रारूप मतदारयादीतील आकडेवारी आणि धक्कादायक वास्तव:
प्रशासनाकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या नवीन प्रारूप यादीनुसार, भाजपचे प्राबल्य असलेल्या कोथरूड आणि खडकवासला या दोन्ही मतदारसंघांमध्ये मोठ्या प्रमाणात मतदारांची नावे कमी झाली आहेत. केवळ हेच नव्हे, तर महायुती किंवा पक्षाचे प्राबल्य असलेल्या अन्य काही भागांतही असाच मोठा घटलेला ट्रेक पाहायला मिळत आहे. याशिवाय, लगतच्या शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातही तब्बल ४४.४७ टक्के मतदार प्रारूप यादीतून बाहेर पडल्याचे किंवा त्यांची नावे गाळली गेल्याचे स्पष्ट झाले आहे.
निवडणूक आयोगाकडून राबवण्यात आलेल्या विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेदरम्यान मृत, दुबार, स्थलांतरित आणि अनुपस्थित मतदारांची नावे शोधून ती वगळण्याची प्रक्रिया पार पडली. परंतु, इतक्या मोठ्या प्रमाणावर पारंपरिक आणि हटकून मतदान करणाऱ्या शहरी व उच्चभ्रू भागांमधील मतदारांची नावे कमी झाल्यामुळे राजकीय पक्षांच्या पायाखालची जमीन सरकली आहे. विशेषतः भाजपच्या संघटन मंत्र्यांची आणि स्थानिक नेत्यांची झोप यामुळे उडाली असून, पक्षाच्या हजेरी आणि मतांच्या गणितावर याचा मोठा परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
पुढील प्रक्रिया आणि राजकीय चिंता:
या मोठ्या प्रमाणावर झालेल्या वगळणीमुळे नागरिकांमध्ये आणि राजकीय कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचे व चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. अनेक विद्यमान व पक्क्या मतदारांची नावे लिस्टमध्ये नसल्यामुळे त्यांना मतदानाचा हक्क बजावताना अडचणी येऊ शकतात. प्रशासनाने या प्रारूप यादीवर हरकती व दावे दाखल करण्यासाठी मुदत दिली असून, ज्यांची नावे चुकून किंवा तांत्रिक कारणांमुळे वगळली गेली आहेत, त्यांनी त्वरित प्रपत्र भरून आपली नावे पुन्हा समाविष्ट करून घ्यावीत, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे. आगामी निवडणुकांच्या तोंडावर बालेकिल्ल्यातीलच इतकी मोठी मतदार कपात पक्षासाठी डोकेदुखी ठरत आहे.
शहर
- पुणे: यंदाच्या उत्सवात पुणेकरांना अनुभवायला मिळणार कामाचा माणूस, अजितदादांच्या प्रशासकीय शैलीवर आधारित लक्षवेधी हलते देखावे!
- नाशिक: रस्त्यावरील चिखलामुळे दुचाकी घसरली, पाठीमागून आलेल्या बसच्या धडकेत विवाहितेचा जागीच मृत्यू
- पुणे: एक मराठा, लाख मराठा च्या गगनभेदी घोषणा; मनोज जरांगे पाटलांच्या समर्थनार्थ पुण्यातील कात्रज चौकात मराठा समाज आक्रमक, केला रास्ता रोको
- पुणे: जुन्नर तालुक्यातून खळबळजनक बातमी; बेपत्ता तरुणाचा मृतदेह आढळला आभाटेक जंगलात, परिसरात उडाली मोठी दहशत व शोककळा
महाराष्ट्र
- पुणे: हो, आमच्याकडून चुका झाल्या, आवाज आणि स्पर्धा वाढली, आता नियमांचे पालन करू गणेशोत्सवापूर्वी पुणे साऊंड व्यावसायिकांची मोठी कबुली!
- पुणे: यंदाच्या उत्सवात पुणेकरांना अनुभवायला मिळणार कामाचा माणूस, अजितदादांच्या प्रशासकीय शैलीवर आधारित लक्षवेधी हलते देखावे!
- नाशिक: रस्त्यावरील चिखलामुळे दुचाकी घसरली, पाठीमागून आलेल्या बसच्या धडकेत विवाहितेचा जागीच मृत्यू
- पुणे: एक मराठा, लाख मराठा च्या गगनभेदी घोषणा; मनोज जरांगे पाटलांच्या समर्थनार्थ पुण्यातील कात्रज चौकात मराठा समाज आक्रमक, केला रास्ता रोको
गुन्हा
- सांगली: पलूसमध्ये घरगुती वादातून पती-पत्नीचे टोकाचे पाऊल; विषारी औषध प्राशन करून दोघांचाही उपचारादरम्यान मृत्यू
- उत्तर प्रदेश: आग्रा येथे संतापजनक प्रकार! माजी राष्ट्रीय पॉवरलिफ्टर खेळाडूवर पतीकडून हॉटेलमध्ये चाकूने प्राणघातक हल्ला
- नाशिक: समृद्धी महामार्गावर दरोडेखोरांची दहशत; धावत्या वाहनांचे टायर पंक्चर करत छ. संभाजीनगरच्या कुटुंबाला १८ लाखांना लुटले, सिन्नर तालुक्यात खळबळ
- पुणे: बारामतीत धक्कादायक घटना; तांदूळवाडीत एकाच घरात माय-लेकाचा संशयास्पद मृत्यू
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य २९ ऑगस्ट २०२६: या ४ राशींसाठी ग्रहांची स्थिती अशुभ, सतर्क राहण्याचा सल्ला; वाचा सविस्तर भविष्य!
- आजचे राशिभविष्य: २० ऑगस्ट २०२६ रोजी तुमच्या राशीवर काय असेल ग्रहांची स्थिती? जाणून घ्या सविस्तर!
- आजचे राशीभविष्य: १९ ऑगस्ट २०२६, ग्रह नक्षत्रांचा तुमच्या राशीवर काय होईल परिणाम?
- आजचे राशिभविष्य १५ ऑगस्ट २०२६: शनिदेवाची कृपा, या राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- नेपाळ: पूर येताच सर्वात पहिली मदत भारताकडून आली; नेपाळच्या पंतप्रधानांचे संसदेत भारत आणि चीनचे मानले आभार; महाप्रलयाच्या पार्श्वभूमीवर मोठी घडामोड
- उत्तराखंड: पूर आलेली नदी पार करताना हातातून निसटली चिमुकली, लेकीला वाचवण्यासाठी आईने पाण्यात मारली उडी अन् दोघींचाही मृत्यू
- चेन्नई: थलपती विजय भारताचे पंतप्रधानच काय, अमेरिकेचे अध्यक्षही होऊ शकतात; ई. पलानीस्वामींचा उपरोधिक टोला
- पश्चिम बंगाल: ममता बॅनर्जींच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर! भाचीचा राहत्या घरी संशयास्पद मृत्यू; नोकरी गेल्यामुळे आणि घटस्फोटाच्या प्रकरणामुळे होती तणावात

























Subscribe to my channel




