Vastu Shastra: घराच्या या दिशेला लावा दिवा, आयुष्यात कधीच पैशांची कमी पडणार नाही

वास्तुशास्त्र Image Credit source: टीव्ही 9 मराठी

हिंदू धर्मशास्त्रामध्ये असं मानलं जातं की दररोज घरात पूजा, प्रार्थना केल्यामुळे सर्व प्रकारची नकारात्म ऊर्जा नष्ट होते, घरात सुख, शांती समृद्धी येते. तुम्ही जर दररोज देवाची पूजा करत असाल मनोभावे प्रार्थना करत असाल तर त्यामुळे तुमच्या मनाला देखील शांती मिळते. तुम्हाला तुमच्या प्रत्येक कामात यश मिळतं. मात्र कोणतेही धार्मिक विधी हे योग्य नियमानुसारच व्हायला हवेत, तरच तुम्हाला त्याचं फळ मिळतं. त्यामुळे पूजेचे सर्व नियम समजून घेणं गरजेचं असतं. घरात सकाळी आणि संध्यांकाळी केल्या जाणाऱ्या पूजेचं विशेष महत्त्व असतं.सकाळी पूजा करताना देवाला जल, फूल, गंध आणि नवैद्य या गोष्टी अर्पण कराव्यात, या गोष्टींचं पूजेमध्ये विशेष महत्त्व असतं. तर सायंकाळच्या पूजेवेळी दिव्याचं विशेष महत्त्व असतं. आज आपण देवासमोर दिवा लावण्याचे योग्य नियम काय आहेत? तसेच देवघरासमोर तर दिवा लावला गेलाच पाहिजे, मात्र त्या व्यतिरिक्त वास्तुशास्त्रानुसार घरात अन्य कुठे-कुठे दिवा लावणं शुभ आहे? याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत.

घराचा मुख्य दरवाजा – वास्तुशास्त्रानुसार सायंकाळच्या वेळी घराच्या मुख्य द्वारासमोर एक दिवा नित्यनियमाने लवला गेला पाहिजे. यामुळे घरात येणारी सर्व प्रकारची नकारात्मक ऊर्जा नष्ट होते, घरात केवळ सकारात्मक ऊर्जाच प्रवेश करते, त्यामुळे सर्व प्रकारचे वास्तुदोष नष्ट होतात, आणि घरात सुख, शांती समृद्धी येते, असं वास्तुशास्त्रामध्ये म्हटलं आहे. त्यामुळे सायंकाळच्या वेळी घराच्या मुख्य दरवाजाजवळ दिवा लावणं हे अत्यंत शुभ मानलं गेलं आहे.

तुळशीजवळ लावा दिवा – तुळस ही भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांना अत्यंत प्रिय आहे, ज्या घरात तुळस आहे, ज्या घरात नियमितपणे तुळशीची पूजा होते, त्या घरावर सदैव भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांचा आशीर्वाद राहतो. त्या घरात कधीही पैशांची कमी भासत नाही, असं हिंदू धर्मशास्त्रामध्ये सांगण्यात आलं आहे, त्यामुळे सायंकाळच्यावेळी नियमितपणे तुळशीजवळ दिवा लावण्याचा सल्ला वास्तुशास्त्रामध्ये देण्यात आला आहे.

या गोष्टी देखील लक्षात ठेवा – दिवा लावताना काही गोष्टी या लक्षात ठेवल्या पाहिजेत, अन्यथा त्याचं फळ मिळत नाही. दिवा लावताना दिव्यामध्ये नेहमी शुद्ध तेलच वापरावे, तसेच तुम्ही दिव्यासाठी जे तेल वापरणार आहात, ते तेल वेगळं ठेवावं, आणि त्याच तेलापासून दररोज तीन ठिकाणी तुमच्या देवघरासमोर, घराच्या मुख्य दरवाजाजवळ आणि तुळशीजवळ दिवा लावावा, तसेच दिवा लावता दिव्याचं तोंड हे नेहमी पूर्व-पश्चिम असावं, दिवा कधीही दक्षिणेकडे तोंड करून लावू नये, असं वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आलं आहे.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *