मुंबई: राज्यात महिला आणि चिमुकल्या मुलींवर होणाऱ्या अत्याचारांच्या वाढत्या घटनांवर काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. महाराष्ट्राची ओळख एक प्रगत आणि सुरक्षित राज्य अशी होती, मात्र आजची परिस्थिती अत्यंत भीषण असून राज्याच्या लौकिकाला काळिमा फासला जात आहे, अशा शब्दांत त्यांनी आपली व्यथा मांडली आहे. या गंभीर विषयावर त्यांनी राज्यपाल जिष्णूदेव वर्मा यांना पत्र लिहून राज्यात 'शक्ती कायद्या'ची तात्काळ अंमलबजावणी करण्याची आग्रही मागणी केली आहे.
पुण्यातील घटनांनी महाराष्ट्र हादरला
पुण्यातील नसरापूर येथील बलात्कार आणि हत्या प्रकरणामुळे संपूर्ण राज्यात संतापाची लाट असतानाच, शहराच्या मध्यवर्ती भागात एका ९ वर्षीय मुलीवर तिच्याच नातेवाईकाने अत्याचार करण्याचा प्रयत्न केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनांमुळे जनमानसात प्रचंड भीती आणि संतापाचे वातावरण आहे. याच पार्श्वभूमीवर वर्षा गायकवाड यांनी राज्यपालांना पत्र लिहून हस्तक्षेपाची विनंती केली आहे.
'शक्ती कायदा' केंद्र सरकारकडे धूळ खात
महाविकास आघाडी सरकारच्या काळात गुन्हेगारांना २१ दिवसांत फाशीची शिक्षा देणारा कठोर 'शक्ती कायदा' मंजूर करण्यात आला होता. मात्र, दुर्दैवाने गेल्या तीन वर्षांपासून हा कायदा केंद्र सरकारकडे मंजुरीविना पडून आहे. "भगिनींना खऱ्या अर्थाने न्याय हवा असेल, तर हा कायदा त्वरित लागू होणे गरजेचे आहे. राज्यपालांनी यासाठी केंद्र सरकारकडे तातडीने पाठपुरावा करावा," अशी मागणी गायकवाड यांनी पत्राद्वारे केली आहे.
राज्याला पूर्णवेळ गृहमंत्र्याची गरज
मुंबईसारख्या सुरक्षित मानल्या जाणाऱ्या शहरातही महिलांवरील गुन्ह्यांमध्ये १२.८ टक्क्यांनी वाढ झाली आहे. बलात्कार, विनयभंग आणि 'पोक्सो' अंतर्गत नोंदवल्या जाणाऱ्या गुन्ह्यांची वाढती संख्या राज्यासाठी शरमेची बाब आहे. वर्षा गायकवाड यांनी सध्याच्या गृहविभागाच्या कामकाजावरही बोट ठेवले आहे. "सध्याच्या मुख्यमंत्र्यांकडे अनेक खात्यांचा अवाढव्य भार असल्याने गृहविभागाकडे दुर्लक्ष होत आहे. राज्याच्या कायदा-सुव्यवस्थेचा पुरता बोजवारा उडाला असून महाराष्ट्राला आज एका सक्षम आणि पूर्णवेळ गृहमंत्र्याची गरज आहे," अशी टीका त्यांनी केली आहे.
केवळ इव्हेंटबाजी नको, सुरक्षा हवी
महायुती सरकारवर निशाणा साधताना त्या म्हणाल्या की, "सरकार 'लाडकी बहीण' म्हणत केवळ इव्हेंटबाजी करत आहे. पण बहीण फक्त कागदावर लाडकी असून चालत नाही, तर ती रस्त्यावर, शाळेत आणि कामाच्या ठिकाणी सुरक्षित असणे अधिक महत्त्वाचे आहे." महिलांच्या सुरक्षेसाठी कागदी घोषणांऐवजी ठोस कृतीची गरज असल्याचे त्यांनी पत्रात आवर्जून नमूद केले आहे.
शहर
- टोल नाक्यांवर आता शेतकऱ्यांचे राज्य! महामार्गावर झळकणार 'कृषी मॉल'; ग्राहकांना स्वस्त, तर बळीराजाला मिळणार थेट नफा
- धरण उशाला अन् कोरड घशाला! काळू प्रकल्पावरून राजू शेट्टींचा मुख्यमंत्र्यांवर प्रहार; 'भूमिपुत्रांच्या राखेवर ठाण्याला पाणी देणार का?'
- प्रशासकीय अधिकाऱ्यांवर हिंदीची सक्ती कशासाठी? मनसेचा राज्य सरकारला निर्वाणीचा इशारा
- सत्तेच्या उबेखाली मंत्र्यांचा ओएसडी माजला; पत्नी-मुलाला रक्ताळलेल्या अवस्थेत घराबाहेर काढणाऱ्या नराधमावर वडेट्टीवारांचा प्रहार
महाराष्ट्र
- टोल नाक्यांवर आता शेतकऱ्यांचे राज्य! महामार्गावर झळकणार 'कृषी मॉल'; ग्राहकांना स्वस्त, तर बळीराजाला मिळणार थेट नफा
- धरण उशाला अन् कोरड घशाला! काळू प्रकल्पावरून राजू शेट्टींचा मुख्यमंत्र्यांवर प्रहार; 'भूमिपुत्रांच्या राखेवर ठाण्याला पाणी देणार का?'
- प्रशासकीय अधिकाऱ्यांवर हिंदीची सक्ती कशासाठी? मनसेचा राज्य सरकारला निर्वाणीचा इशारा
- सत्तेच्या उबेखाली मंत्र्यांचा ओएसडी माजला; पत्नी-मुलाला रक्ताळलेल्या अवस्थेत घराबाहेर काढणाऱ्या नराधमावर वडेट्टीवारांचा प्रहार
गुन्हा
- नागपूर पोलीस दलात मोठी खळबळ! सायबर पोलीस निरीक्षकासह ९ जण निलंबित; गैरव्यवहार प्रकरण नडले
- पुणे: बाप झाला काळ! ९ वर्षांच्या चिमुरडीवर कोयत्याने वार; दौंडमधील देऊळगाव राजे हादरले
- बीडमध्ये पोलीस उपनिरीक्षकावर जीवघेणा हल्ला; मद्यधुंद टोळक्याची मुजोरी, दोन आरोपींना बेड्या
- मार्केट यार्डातील पेट्रोल पंपावर 'सायबर' डल्ला; ५० रुपयांच्या कमिशनसाठी व्यवस्थापकाकडून बँक खातेच स्वाधीन
राजकीय
- निकालांनंतर अग्निहोत्रींचा धमाका: "बंगाल आता मुक्त झाला", ममतांच्या पराभवानंतर दिग्दर्शकाची पहिली प्रतिक्रिया.
- तमिळनाडूच्या राजकारणात 'थलपती' वादळ: विजयाने बदलली सत्तेची गणितं!
- ५ राज्यांचा निवडणूक निकाल : बंगालमध्ये भाजपची मोठी आघाडी, तामिळनाडूत TVKचा उदय; जाणून घ्या संपूर्ण चित्र
- बारामतीचा रणसंग्राम: 'हार कर जीतनेवाले को बाजीगर कहते हैं'; पराभवानंतरही करूणा मुंडे यांचा बाणा कायम
इतर
- लाडक्या बहिणींना मोठा दिलासा! ई-केवायसी (e-KYC) करण्यासाठी ३० एप्रिलपर्यंत मुदतवाढ; मंत्री अदिती तटकरे यांची घोषणा
- भारतातील जातीव्यवस्था : वास्तव, परिणाम आणि पुढील दिशा
- पुण्याच्या आर्या नाचणची सिल्वासा CBSE बोर्डात चमकदार कामगिरी; AI विषयात 100/100 गुण
- भारतीय रेल्वे इतक्या रंगबिरंगी का? प्रवाशांसाठी या रंगांचा अर्थ काय?
मनोरंजन
- ९० च्या दशकातील सुपरस्टार राहुल रॉय ट्रोल; 'आशिकी' फेम अभिनेत्याचा रील व्हिडिओ व्हायरल, नेटकऱ्यांच्या संतप्त प्रतिक्रिया
- रणवीर सिंगचा धमाका आता जपानमध्ये! 'ऑपरेशन धुरंधर' १० जुलै रोजी जपानमध्ये होणार प्रदर्शित
- जय शिवराय’! ‘राजा शिवाजी’ चित्रपटातील दुसरे भव्य गीत प्रदर्शित; ऐकताच अंगावर रोमांच
- ३ आयडीयट्सचा सिक्वेल! आमिर खानने दिली मोठी पुष्टी
विडियो गॅलेरी

देश विदेश
- होर्मुझ सामुद्रधुनीमध्ये थरार! इराणच्या लष्कराने भारताकडे येणारे मालवाहू जहाज घेतले ताब्यात; 'मॉस्किटो फ्लीट' कारवाईचा व्हिडिओ व्हायरल
- भारत-रशिया ऐतिहासिक करार: ३००० सैनिकांच्या तैनातीला मंजुरी; सीमेवर तणाव वाढल्याने पाकिस्तानच्या पोटात गोळा
- इराणची मोठी कारवाई! जैश अल-अदल या दहशतवादी संघटनेच्या संपूर्ण टीमचा खात्मा; पाकिस्तान सीमेवर थरार
- LPG : युद्ध थांबताच एलपीजीबाबत केंद्राचा मोठा निर्णय; नवीन फॉर्म्युला जाहीर, कुणाला फायदा?























Subscribe to my channel




