मुंबई: राज्यात महिला आणि चिमुकल्या मुलींवर होणाऱ्या अत्याचारांच्या वाढत्या घटनांवर काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. महाराष्ट्राची ओळख एक प्रगत आणि सुरक्षित राज्य अशी होती, मात्र आजची परिस्थिती अत्यंत भीषण असून राज्याच्या लौकिकाला काळिमा फासला जात आहे, अशा शब्दांत त्यांनी आपली व्यथा मांडली आहे. या गंभीर विषयावर त्यांनी राज्यपाल जिष्णूदेव वर्मा यांना पत्र लिहून राज्यात 'शक्ती कायद्या'ची तात्काळ अंमलबजावणी करण्याची आग्रही मागणी केली आहे.
पुण्यातील घटनांनी महाराष्ट्र हादरला
पुण्यातील नसरापूर येथील बलात्कार आणि हत्या प्रकरणामुळे संपूर्ण राज्यात संतापाची लाट असतानाच, शहराच्या मध्यवर्ती भागात एका ९ वर्षीय मुलीवर तिच्याच नातेवाईकाने अत्याचार करण्याचा प्रयत्न केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनांमुळे जनमानसात प्रचंड भीती आणि संतापाचे वातावरण आहे. याच पार्श्वभूमीवर वर्षा गायकवाड यांनी राज्यपालांना पत्र लिहून हस्तक्षेपाची विनंती केली आहे.
'शक्ती कायदा' केंद्र सरकारकडे धूळ खात
महाविकास आघाडी सरकारच्या काळात गुन्हेगारांना २१ दिवसांत फाशीची शिक्षा देणारा कठोर 'शक्ती कायदा' मंजूर करण्यात आला होता. मात्र, दुर्दैवाने गेल्या तीन वर्षांपासून हा कायदा केंद्र सरकारकडे मंजुरीविना पडून आहे. "भगिनींना खऱ्या अर्थाने न्याय हवा असेल, तर हा कायदा त्वरित लागू होणे गरजेचे आहे. राज्यपालांनी यासाठी केंद्र सरकारकडे तातडीने पाठपुरावा करावा," अशी मागणी गायकवाड यांनी पत्राद्वारे केली आहे.
राज्याला पूर्णवेळ गृहमंत्र्याची गरज
मुंबईसारख्या सुरक्षित मानल्या जाणाऱ्या शहरातही महिलांवरील गुन्ह्यांमध्ये १२.८ टक्क्यांनी वाढ झाली आहे. बलात्कार, विनयभंग आणि 'पोक्सो' अंतर्गत नोंदवल्या जाणाऱ्या गुन्ह्यांची वाढती संख्या राज्यासाठी शरमेची बाब आहे. वर्षा गायकवाड यांनी सध्याच्या गृहविभागाच्या कामकाजावरही बोट ठेवले आहे. "सध्याच्या मुख्यमंत्र्यांकडे अनेक खात्यांचा अवाढव्य भार असल्याने गृहविभागाकडे दुर्लक्ष होत आहे. राज्याच्या कायदा-सुव्यवस्थेचा पुरता बोजवारा उडाला असून महाराष्ट्राला आज एका सक्षम आणि पूर्णवेळ गृहमंत्र्याची गरज आहे," अशी टीका त्यांनी केली आहे.
केवळ इव्हेंटबाजी नको, सुरक्षा हवी
महायुती सरकारवर निशाणा साधताना त्या म्हणाल्या की, "सरकार 'लाडकी बहीण' म्हणत केवळ इव्हेंटबाजी करत आहे. पण बहीण फक्त कागदावर लाडकी असून चालत नाही, तर ती रस्त्यावर, शाळेत आणि कामाच्या ठिकाणी सुरक्षित असणे अधिक महत्त्वाचे आहे." महिलांच्या सुरक्षेसाठी कागदी घोषणांऐवजी ठोस कृतीची गरज असल्याचे त्यांनी पत्रात आवर्जून नमूद केले आहे.
शहर
- मुंबईच्या वारशाला नवी ओळख! गिरगावमधील ३०० वर्षे जुन्या ऐतिहासिक विठ्ठल-रखुमाई मंदिराचा 'हेरिटेज' श्रेणीत समावेश होणार; प्रशासनाकडून हरकती-सूचना मागवल्या
- पुणे-मुंबई प्रवास करणाऱ्यांसाठी मोठी बातमी! माळशेज घाटात रस्ता खचल्याने वाहतूक पूर्णपणे बंद; प्रशासनाकडून पर्यायी मार्गांची घोषणा"
- यवतमाळ: शालेय पोषण आहाराचा मोठा फज्जा; नवीन सत्र सुरू होऊनही धान्यसाठा संपल्याने विद्यार्थ्यांच्या ताटातून खिचडी गायब
- पुणे: पाण्याचा अंदाज चुकला अन् क्षणार्धात संपलं; माळशेज घाटातील काळू धबधब्यावर नदी पार करताना प्रवाहात बुडून दोन तरुणांचा मृत्यू
महाराष्ट्र
- सांगली: ग्रामसेवकाच्या समोरच तंटामुक्त समितीच्या अध्यक्षाकडून महिलेला जातीवरून शिवीगाळ, गावात तणाव
- मुंबईच्या वारशाला नवी ओळख! गिरगावमधील ३०० वर्षे जुन्या ऐतिहासिक विठ्ठल-रखुमाई मंदिराचा 'हेरिटेज' श्रेणीत समावेश होणार; प्रशासनाकडून हरकती-सूचना मागवल्या
- पुणे-मुंबई प्रवास करणाऱ्यांसाठी मोठी बातमी! माळशेज घाटात रस्ता खचल्याने वाहतूक पूर्णपणे बंद; प्रशासनाकडून पर्यायी मार्गांची घोषणा"
- चंद्रपुर: हॉटेलमध्ये घुसून एमआयएमच्या एकमेव नगरसेवकावर १५ ते १६ जणांकडून प्राणघातक हल्ला, राजकीय वर्तुळात चिंता
गुन्हा
- चंद्रपुर: हॉटेलमध्ये घुसून एमआयएमच्या एकमेव नगरसेवकावर १५ ते १६ जणांकडून प्राणघातक हल्ला, राजकीय वर्तुळात चिंता
- चंदीगड: ट्यूशन घेणाऱ्या पत्नीचे २० वर्षांच्या विद्यार्थ्यासोबत अफेअर, पतीने रंगेहाथ पकडल्यानंतर उचलले टोकाचे पाऊल
- पुणे: सोशल मीडियावरील मैत्री ठरली घातक; पुण्याच्या कोंढव्यात शिक्षिकेच्या घरून १४ लाखांचा ऐवज लांबवणारा मित्र अखेर गुजरातधून जेतीत
- उत्तर प्रदेश: हुंड्यात बुलेट बाइक मिळाली नाही म्हणून नराधम पतीने केली २२ वर्षीय पत्नीची धारदार शस्त्राने निर्घृण हत्या; अवघ्या दोन वर्षांपूर्वीच झाले होते लग्न
राजकीय
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
- जळगाव: राष्ट्रवादीचा मोठा नेता भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या मार्गावर, मंत्री गुलाबराव पाटील यांच्यासमोर तगडे आव्हान निर्माण होणार?
इतर
- आजचे राशिभविष्य २५ जुलै २०२६: विठूरायाची कृपा आणि शनीची साथ, या राशींचा दिवस ठरणार सोन्याचा!
- आजचे राशिभविष्य २४ जुलै २०२६: शुक्र या राशींसाठी पाडणार पैशांचा पाऊस, पुण्याई येणार फळाला, इच्छापूर्ती होणार!
- आजचे राशिभविष्य २३ जुलै २०२६: सूर्य-गुरूचा द्विग्रह योग या राशींसाठी ठरणार लकी, गुरु देणार यश, संपत्ती व प्रगती!
- आजचे राशिभविष्य २१ जुलै २०२६: या राशींना मिळणार गुडन्यूज तर या राशींना बसणार मोठा फटका! पहा तुमचे भविष्य
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- नवी दिल्ली: झारखंड हायकोर्टाचा मोठा निर्णय: रात्री २ वाजता बायकोने काजळ-लिपस्टिक लावले म्हणजे ती मानसिक रोगी ठरत नाही
- नवी दिल्ली: केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर सोनम वांगचुक यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले- 'हा लोकशाहीचा विजय'
- नवी दिल्ली: 'आताची पिढी प्रश्न विचारतेय, ऐकून घ्यायला हवं'; CJP आंदोलनावर सरसंघचालक मोहन भागवतांचं मोठं वक्तव्य
- बंगळुरू : BMTC बसमध्ये महिलेची छेडछाड, चालकाने आरोपीला दिली कडक शिक्षा

























Subscribe to my channel



