'Dams Overflowing, Necks Parched!' Raju Shetti Blasts CM Over Kalu Project; Asks, 'Will You Give Water to Thane on the Ashes of Local Farmers?'

धरण उशाला अन् कोरड घशाला! काळू प्रकल्पावरून राजू शेट्टींचा मुख्यमंत्र्यांवर प्रहार; 'भूमिपुत्रांच्या राखेवर ठाण्याला पाणी देणार का?'

'Dams Overflowing, Necks Parched!' Raju Shetti Blasts CM Over Kalu Project; Asks, 'Will You Give Water to Thane on the Ashes of Local Farmers?'मुरबाड | ठाणे जिल्ह्यातील काळू धरण प्रकल्पासाठी राज्य सरकारने साडेचारशे कोटींचा निधी मंजूर केला असला तरी, या प्रकल्पावरून आता नव्या संघर्षाची ठिणगी पडली आहे. "स्थानिक भूमिपुत्रांना उद्ध्वस्त करून, त्यांची गावे बुडवून बाहेरून आलेल्या लोंढ्यांची तहान भागवण्यासाठी हा प्रकल्प रेटला जात असेल, तर तो कदापि सहन करणार नाही," अशा तीव्र शब्दांत शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी सरकारला फटकारले आहे.

छोटे बंधारे बांधा, गावे वाचवा!
मुरबाड तालुक्यातील १९ गावे या धरणामुळे पाण्याखाली जाणार आहेत. यावर भाष्य करताना राजू शेट्टी म्हणाले की, "शहरांना पाणी देण्यास आमचा विरोध नाही. मात्र, १४ टीएमसीचे अजस्त्र धरण बांधून गावे बेघर करण्याऐवजी छोटे बंधारे बांधा. त्यातून स्थानिक शेती आणि पिण्यासाठी थोडे पाणी द्या, बाकी सर्व पाणी खुशाल ठाणे-कल्याणला न्या. पण स्थानिक भूमिपुत्रांची राखरांगोळी करून पाणी देणार असाल, तर गावकऱ्यांमध्ये असलेला तीव्र असंतोष लवकरच रस्त्यावर येईल."

पुनर्वसनाच्या नावाखाली स्थानिक नेत्यांचा धंदा
या प्रकल्पामागे मोठ्या भ्रष्टाचाराचा संशय व्यक्त करताना शेट्टी यांनी स्थानिक नेत्यांवरही निशाणा साधला. "केवळ पुनर्वसन करायचे या नावाखाली मुरबाडमधील काही नेत्यांनी जमिनी कवडीमोल भावात विकत घेतल्या आहेत. आता याच जमिनी सरकारला चढ्या भावाने विकून अमाप पैसा मिळवण्याचा धंदा सुरू आहे. धरण पूर्ण झाल्यावरही ज्या १९ गावांतील जमिनी गेल्या, त्यांना पिण्यासाठी एक थेंब पाणीही मिळणार नाही. धरण उशाला आणि कोरड घशाला, अशी अवस्था जर शेतकऱ्यांची होणार असेल तर भूमिपुत्रांनी काय भीक मागायची का?" असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला.

जमिनींच्या व्यवहारावर श्वेतपत्रिका काढा!
काळू धरणाचे नोटिफिकेशन निघाल्यानंतरही जमिनींची खरेदी-विक्री झालीच कशी? असा प्रश्न विचारत राजू शेट्टी यांनी या व्यवहारांवर श्वेतपत्रिका काढण्याची मागणी केली आहे. "जमिनी खरेदी करणारे नेमके कोण आहेत आणि त्यांना परवानगी कोणी दिली, याचे सत्य बाहेर आले पाहिजे. हा सर्व प्रकार केवळ पैसा कमावण्याचा धंदा असून शेतकऱ्यांच्या व्यथांकडे सरकारचे साफ दुर्लक्ष आहे," असा गंभीर आरोपही त्यांनी यावेळी केला.



शहर

महाराष्ट्र

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *