मुरबाड | ठाणे जिल्ह्यातील काळू धरण प्रकल्पासाठी राज्य सरकारने साडेचारशे कोटींचा निधी मंजूर केला असला तरी, या प्रकल्पावरून आता नव्या संघर्षाची ठिणगी पडली आहे. "स्थानिक भूमिपुत्रांना उद्ध्वस्त करून, त्यांची गावे बुडवून बाहेरून आलेल्या लोंढ्यांची तहान भागवण्यासाठी हा प्रकल्प रेटला जात असेल, तर तो कदापि सहन करणार नाही," अशा तीव्र शब्दांत शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी सरकारला फटकारले आहे.
छोटे बंधारे बांधा, गावे वाचवा!
मुरबाड तालुक्यातील १९ गावे या धरणामुळे पाण्याखाली जाणार आहेत. यावर भाष्य करताना राजू शेट्टी म्हणाले की, "शहरांना पाणी देण्यास आमचा विरोध नाही. मात्र, १४ टीएमसीचे अजस्त्र धरण बांधून गावे बेघर करण्याऐवजी छोटे बंधारे बांधा. त्यातून स्थानिक शेती आणि पिण्यासाठी थोडे पाणी द्या, बाकी सर्व पाणी खुशाल ठाणे-कल्याणला न्या. पण स्थानिक भूमिपुत्रांची राखरांगोळी करून पाणी देणार असाल, तर गावकऱ्यांमध्ये असलेला तीव्र असंतोष लवकरच रस्त्यावर येईल."
पुनर्वसनाच्या नावाखाली स्थानिक नेत्यांचा धंदा
या प्रकल्पामागे मोठ्या भ्रष्टाचाराचा संशय व्यक्त करताना शेट्टी यांनी स्थानिक नेत्यांवरही निशाणा साधला. "केवळ पुनर्वसन करायचे या नावाखाली मुरबाडमधील काही नेत्यांनी जमिनी कवडीमोल भावात विकत घेतल्या आहेत. आता याच जमिनी सरकारला चढ्या भावाने विकून अमाप पैसा मिळवण्याचा धंदा सुरू आहे. धरण पूर्ण झाल्यावरही ज्या १९ गावांतील जमिनी गेल्या, त्यांना पिण्यासाठी एक थेंब पाणीही मिळणार नाही. धरण उशाला आणि कोरड घशाला, अशी अवस्था जर शेतकऱ्यांची होणार असेल तर भूमिपुत्रांनी काय भीक मागायची का?" असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला.
जमिनींच्या व्यवहारावर श्वेतपत्रिका काढा!
काळू धरणाचे नोटिफिकेशन निघाल्यानंतरही जमिनींची खरेदी-विक्री झालीच कशी? असा प्रश्न विचारत राजू शेट्टी यांनी या व्यवहारांवर श्वेतपत्रिका काढण्याची मागणी केली आहे. "जमिनी खरेदी करणारे नेमके कोण आहेत आणि त्यांना परवानगी कोणी दिली, याचे सत्य बाहेर आले पाहिजे. हा सर्व प्रकार केवळ पैसा कमावण्याचा धंदा असून शेतकऱ्यांच्या व्यथांकडे सरकारचे साफ दुर्लक्ष आहे," असा गंभीर आरोपही त्यांनी यावेळी केला.
शहर
- टोल नाक्यांवर आता शेतकऱ्यांचे राज्य! महामार्गावर झळकणार 'कृषी मॉल'; ग्राहकांना स्वस्त, तर बळीराजाला मिळणार थेट नफा
- महिलांवरील अत्याचारांनी महाराष्ट्राच्या लौकिकाला काळिमा; 'शक्ती कायदा' तातडीने लागू करा, वर्षा गायकवाड यांचे राज्यपालांना पत्र
- प्रशासकीय अधिकाऱ्यांवर हिंदीची सक्ती कशासाठी? मनसेचा राज्य सरकारला निर्वाणीचा इशारा
- सत्तेच्या उबेखाली मंत्र्यांचा ओएसडी माजला; पत्नी-मुलाला रक्ताळलेल्या अवस्थेत घराबाहेर काढणाऱ्या नराधमावर वडेट्टीवारांचा प्रहार
महाराष्ट्र
- टोल नाक्यांवर आता शेतकऱ्यांचे राज्य! महामार्गावर झळकणार 'कृषी मॉल'; ग्राहकांना स्वस्त, तर बळीराजाला मिळणार थेट नफा
- महिलांवरील अत्याचारांनी महाराष्ट्राच्या लौकिकाला काळिमा; 'शक्ती कायदा' तातडीने लागू करा, वर्षा गायकवाड यांचे राज्यपालांना पत्र
- प्रशासकीय अधिकाऱ्यांवर हिंदीची सक्ती कशासाठी? मनसेचा राज्य सरकारला निर्वाणीचा इशारा
- सत्तेच्या उबेखाली मंत्र्यांचा ओएसडी माजला; पत्नी-मुलाला रक्ताळलेल्या अवस्थेत घराबाहेर काढणाऱ्या नराधमावर वडेट्टीवारांचा प्रहार
गुन्हा
- नागपूर पोलीस दलात मोठी खळबळ! सायबर पोलीस निरीक्षकासह ९ जण निलंबित; गैरव्यवहार प्रकरण नडले
- पुणे: बाप झाला काळ! ९ वर्षांच्या चिमुरडीवर कोयत्याने वार; दौंडमधील देऊळगाव राजे हादरले
- बीडमध्ये पोलीस उपनिरीक्षकावर जीवघेणा हल्ला; मद्यधुंद टोळक्याची मुजोरी, दोन आरोपींना बेड्या
- मार्केट यार्डातील पेट्रोल पंपावर 'सायबर' डल्ला; ५० रुपयांच्या कमिशनसाठी व्यवस्थापकाकडून बँक खातेच स्वाधीन
राजकीय
- निकालांनंतर अग्निहोत्रींचा धमाका: "बंगाल आता मुक्त झाला", ममतांच्या पराभवानंतर दिग्दर्शकाची पहिली प्रतिक्रिया.
- तमिळनाडूच्या राजकारणात 'थलपती' वादळ: विजयाने बदलली सत्तेची गणितं!
- ५ राज्यांचा निवडणूक निकाल : बंगालमध्ये भाजपची मोठी आघाडी, तामिळनाडूत TVKचा उदय; जाणून घ्या संपूर्ण चित्र
- बारामतीचा रणसंग्राम: 'हार कर जीतनेवाले को बाजीगर कहते हैं'; पराभवानंतरही करूणा मुंडे यांचा बाणा कायम
इतर
- लाडक्या बहिणींना मोठा दिलासा! ई-केवायसी (e-KYC) करण्यासाठी ३० एप्रिलपर्यंत मुदतवाढ; मंत्री अदिती तटकरे यांची घोषणा
- भारतातील जातीव्यवस्था : वास्तव, परिणाम आणि पुढील दिशा
- पुण्याच्या आर्या नाचणची सिल्वासा CBSE बोर्डात चमकदार कामगिरी; AI विषयात 100/100 गुण
- भारतीय रेल्वे इतक्या रंगबिरंगी का? प्रवाशांसाठी या रंगांचा अर्थ काय?
मनोरंजन
- ९० च्या दशकातील सुपरस्टार राहुल रॉय ट्रोल; 'आशिकी' फेम अभिनेत्याचा रील व्हिडिओ व्हायरल, नेटकऱ्यांच्या संतप्त प्रतिक्रिया
- रणवीर सिंगचा धमाका आता जपानमध्ये! 'ऑपरेशन धुरंधर' १० जुलै रोजी जपानमध्ये होणार प्रदर्शित
- जय शिवराय’! ‘राजा शिवाजी’ चित्रपटातील दुसरे भव्य गीत प्रदर्शित; ऐकताच अंगावर रोमांच
- ३ आयडीयट्सचा सिक्वेल! आमिर खानने दिली मोठी पुष्टी
विडियो गॅलेरी

देश विदेश
- होर्मुझ सामुद्रधुनीमध्ये थरार! इराणच्या लष्कराने भारताकडे येणारे मालवाहू जहाज घेतले ताब्यात; 'मॉस्किटो फ्लीट' कारवाईचा व्हिडिओ व्हायरल
- भारत-रशिया ऐतिहासिक करार: ३००० सैनिकांच्या तैनातीला मंजुरी; सीमेवर तणाव वाढल्याने पाकिस्तानच्या पोटात गोळा
- इराणची मोठी कारवाई! जैश अल-अदल या दहशतवादी संघटनेच्या संपूर्ण टीमचा खात्मा; पाकिस्तान सीमेवर थरार
- LPG : युद्ध थांबताच एलपीजीबाबत केंद्राचा मोठा निर्णय; नवीन फॉर्म्युला जाहीर, कुणाला फायदा?























Subscribe to my channel




