मुंबई पश्चिम बंगालमधील निवडणूक निकाल आणि देशातील सध्याच्या राजकीय घडामोडींवर शिवसेना (उबाठा) नेते संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर प्रखर टीका केली आहे. "ममता बॅनर्जींचा पराभव झालेला नाही, तर सैन्य आणि आर्थिक दहशतवादाचा वापर करून त्यांना सत्तेपासून रोखण्यात आले आहे," असा खळबळजनक दावा राऊत यांनी केला. यावेळी त्यांनी नितीश कुमार यांच्यावरही बोचऱ्या शब्दांत निशाणा साधला.
हुकूमशाहीविरोधात 'इंडिया' आघाडी ठाम
संजय राऊत यांनी ममता बॅनर्जी यांना खंबीर पाठिंबा जाहीर केला आहे. "ममता बॅनर्जी यांनी राजीनामा न देण्याचा घेतलेला निर्णय हा सरकारविरोधी आंदोलनाचाच एक भाग आहे. उद्धव ठाकरेंसह 'इंडिया' आघाडीचे सर्व प्रमुख नेते त्यांच्या पाठीशी उभे आहेत. जर निवडणूक आयोग सत्ताधारी पक्षाचा गुलाम होणार असेल, तर विरोधी पक्षांनी निवडणुकीबाबत काय भूमिका घ्यावी, याचा गांभीर्याने विचार करण्याची वेळ आली आहे," असे राऊत यांनी नमूद केले.
नितीश कुमारांचे 'मानसिक संतुलन' बिघडले?
बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर टीका करताना राऊत यांची जीभ घसरली. "नितीश कुमार पहिल्यापासूनच भरकटलेले आहेत, ते कधीच कुठे स्थिर नव्हते. त्यांचे मानसिक संतुलन किती बिघडले आहे, हे संपूर्ण देश पाहत आहे. ते आघाडी सोडून जाणार आहेत, हे ममता बॅनर्जी यांनी पहिल्याच बैठकीत स्पष्ट केले होते," असा टोला त्यांनी लगावला. जर ममतांनी बंगालमध्ये काँग्रेसला सोबत घेतले असते, तर निकाल आज वेगळा असता, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.
लाडकी बहीण योजनेवर ताशेरे
राज्यातील 'लाडकी बहीण' योजनेवरूनही राऊत यांनी सरकारला धारेवर धरले. "या योजनेचे पैसे जर चुकीच्या मार्गाने कोणाच्या खिशात जात असतील, तर तो मोठा गुन्हा आहे. सरकारला या भ्रष्टाचाराची जाणीव असेल, तर त्यांनी तातडीने दोषींवर कठोर कारवाई केली पाहिजे," अशी मागणी त्यांनी केली.
मराठी भाषेचा सन्मान सर्वोच्च
हिंदी आणि इंग्रजी भाषेबाबत आपली भूमिका स्पष्ट करताना राऊत म्हणाले की, "आमचा हिंदीला विरोध नाही, राष्ट्रीय स्तरावर कामासाठी ती गरजेची आहे. मात्र, महाराष्ट्राची पहिली भाषा ही मराठीच आहे आणि तिचा सन्मान राखलाच गेला पाहिजे." सत्तेतील काही लोकांना लोकशाहीचे पतन मान्य नाही, त्यांनी हुकूमशाहीविरोधात एकत्र यावे, असे आवाहनही त्यांनी सत्ताधारी पक्षातील नेत्यांना केले.
शहर
- टोल नाक्यांवर आता शेतकऱ्यांचे राज्य! महामार्गावर झळकणार 'कृषी मॉल'; ग्राहकांना स्वस्त, तर बळीराजाला मिळणार थेट नफा
- धरण उशाला अन् कोरड घशाला! काळू प्रकल्पावरून राजू शेट्टींचा मुख्यमंत्र्यांवर प्रहार; 'भूमिपुत्रांच्या राखेवर ठाण्याला पाणी देणार का?'
- महिलांवरील अत्याचारांनी महाराष्ट्राच्या लौकिकाला काळिमा; 'शक्ती कायदा' तातडीने लागू करा, वर्षा गायकवाड यांचे राज्यपालांना पत्र
- प्रशासकीय अधिकाऱ्यांवर हिंदीची सक्ती कशासाठी? मनसेचा राज्य सरकारला निर्वाणीचा इशारा
महाराष्ट्र
- टोल नाक्यांवर आता शेतकऱ्यांचे राज्य! महामार्गावर झळकणार 'कृषी मॉल'; ग्राहकांना स्वस्त, तर बळीराजाला मिळणार थेट नफा
- धरण उशाला अन् कोरड घशाला! काळू प्रकल्पावरून राजू शेट्टींचा मुख्यमंत्र्यांवर प्रहार; 'भूमिपुत्रांच्या राखेवर ठाण्याला पाणी देणार का?'
- महिलांवरील अत्याचारांनी महाराष्ट्राच्या लौकिकाला काळिमा; 'शक्ती कायदा' तातडीने लागू करा, वर्षा गायकवाड यांचे राज्यपालांना पत्र
- प्रशासकीय अधिकाऱ्यांवर हिंदीची सक्ती कशासाठी? मनसेचा राज्य सरकारला निर्वाणीचा इशारा
गुन्हा
- नागपूर पोलीस दलात मोठी खळबळ! सायबर पोलीस निरीक्षकासह ९ जण निलंबित; गैरव्यवहार प्रकरण नडले
- पुणे: बाप झाला काळ! ९ वर्षांच्या चिमुरडीवर कोयत्याने वार; दौंडमधील देऊळगाव राजे हादरले
- बीडमध्ये पोलीस उपनिरीक्षकावर जीवघेणा हल्ला; मद्यधुंद टोळक्याची मुजोरी, दोन आरोपींना बेड्या
- मार्केट यार्डातील पेट्रोल पंपावर 'सायबर' डल्ला; ५० रुपयांच्या कमिशनसाठी व्यवस्थापकाकडून बँक खातेच स्वाधीन
राजकीय
- तमिळनाडूच्या राजकारणात 'थलपती' वादळ: विजयाने बदलली सत्तेची गणितं!
- ५ राज्यांचा निवडणूक निकाल : बंगालमध्ये भाजपची मोठी आघाडी, तामिळनाडूत TVKचा उदय; जाणून घ्या संपूर्ण चित्र
- बारामतीचा रणसंग्राम: 'हार कर जीतनेवाले को बाजीगर कहते हैं'; पराभवानंतरही करूणा मुंडे यांचा बाणा कायम
- बारामतीत सुनेत्रा पवारांची 'पॉवर'फुल मुसंडी; राहुरीत अक्षय कर्डिलेंचा विजयाचा गुलाल निश्चित!
इतर
- लाडक्या बहिणींना मोठा दिलासा! ई-केवायसी (e-KYC) करण्यासाठी ३० एप्रिलपर्यंत मुदतवाढ; मंत्री अदिती तटकरे यांची घोषणा
- भारतातील जातीव्यवस्था : वास्तव, परिणाम आणि पुढील दिशा
- पुण्याच्या आर्या नाचणची सिल्वासा CBSE बोर्डात चमकदार कामगिरी; AI विषयात 100/100 गुण
- भारतीय रेल्वे इतक्या रंगबिरंगी का? प्रवाशांसाठी या रंगांचा अर्थ काय?
मनोरंजन
- ९० च्या दशकातील सुपरस्टार राहुल रॉय ट्रोल; 'आशिकी' फेम अभिनेत्याचा रील व्हिडिओ व्हायरल, नेटकऱ्यांच्या संतप्त प्रतिक्रिया
- रणवीर सिंगचा धमाका आता जपानमध्ये! 'ऑपरेशन धुरंधर' १० जुलै रोजी जपानमध्ये होणार प्रदर्शित
- जय शिवराय’! ‘राजा शिवाजी’ चित्रपटातील दुसरे भव्य गीत प्रदर्शित; ऐकताच अंगावर रोमांच
- ३ आयडीयट्सचा सिक्वेल! आमिर खानने दिली मोठी पुष्टी
विडियो गॅलेरी

देश विदेश
- होर्मुझ सामुद्रधुनीमध्ये थरार! इराणच्या लष्कराने भारताकडे येणारे मालवाहू जहाज घेतले ताब्यात; 'मॉस्किटो फ्लीट' कारवाईचा व्हिडिओ व्हायरल
- भारत-रशिया ऐतिहासिक करार: ३००० सैनिकांच्या तैनातीला मंजुरी; सीमेवर तणाव वाढल्याने पाकिस्तानच्या पोटात गोळा
- इराणची मोठी कारवाई! जैश अल-अदल या दहशतवादी संघटनेच्या संपूर्ण टीमचा खात्मा; पाकिस्तान सीमेवर थरार
- LPG : युद्ध थांबताच एलपीजीबाबत केंद्राचा मोठा निर्णय; नवीन फॉर्म्युला जाहीर, कुणाला फायदा?






















Subscribe to my channel




