मुंबई पश्चिम बंगालमधील निवडणूक निकाल आणि देशातील सध्याच्या राजकीय घडामोडींवर शिवसेना (उबाठा) नेते संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर प्रखर टीका केली आहे. "ममता बॅनर्जींचा पराभव झालेला नाही, तर सैन्य आणि आर्थिक दहशतवादाचा वापर करून त्यांना सत्तेपासून रोखण्यात आले आहे," असा खळबळजनक दावा राऊत यांनी केला. यावेळी त्यांनी नितीश कुमार यांच्यावरही बोचऱ्या शब्दांत निशाणा साधला.
हुकूमशाहीविरोधात 'इंडिया' आघाडी ठाम
संजय राऊत यांनी ममता बॅनर्जी यांना खंबीर पाठिंबा जाहीर केला आहे. "ममता बॅनर्जी यांनी राजीनामा न देण्याचा घेतलेला निर्णय हा सरकारविरोधी आंदोलनाचाच एक भाग आहे. उद्धव ठाकरेंसह 'इंडिया' आघाडीचे सर्व प्रमुख नेते त्यांच्या पाठीशी उभे आहेत. जर निवडणूक आयोग सत्ताधारी पक्षाचा गुलाम होणार असेल, तर विरोधी पक्षांनी निवडणुकीबाबत काय भूमिका घ्यावी, याचा गांभीर्याने विचार करण्याची वेळ आली आहे," असे राऊत यांनी नमूद केले.
नितीश कुमारांचे 'मानसिक संतुलन' बिघडले?
बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर टीका करताना राऊत यांची जीभ घसरली. "नितीश कुमार पहिल्यापासूनच भरकटलेले आहेत, ते कधीच कुठे स्थिर नव्हते. त्यांचे मानसिक संतुलन किती बिघडले आहे, हे संपूर्ण देश पाहत आहे. ते आघाडी सोडून जाणार आहेत, हे ममता बॅनर्जी यांनी पहिल्याच बैठकीत स्पष्ट केले होते," असा टोला त्यांनी लगावला. जर ममतांनी बंगालमध्ये काँग्रेसला सोबत घेतले असते, तर निकाल आज वेगळा असता, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.
लाडकी बहीण योजनेवर ताशेरे
राज्यातील 'लाडकी बहीण' योजनेवरूनही राऊत यांनी सरकारला धारेवर धरले. "या योजनेचे पैसे जर चुकीच्या मार्गाने कोणाच्या खिशात जात असतील, तर तो मोठा गुन्हा आहे. सरकारला या भ्रष्टाचाराची जाणीव असेल, तर त्यांनी तातडीने दोषींवर कठोर कारवाई केली पाहिजे," अशी मागणी त्यांनी केली.
मराठी भाषेचा सन्मान सर्वोच्च
हिंदी आणि इंग्रजी भाषेबाबत आपली भूमिका स्पष्ट करताना राऊत म्हणाले की, "आमचा हिंदीला विरोध नाही, राष्ट्रीय स्तरावर कामासाठी ती गरजेची आहे. मात्र, महाराष्ट्राची पहिली भाषा ही मराठीच आहे आणि तिचा सन्मान राखलाच गेला पाहिजे." सत्तेतील काही लोकांना लोकशाहीचे पतन मान्य नाही, त्यांनी हुकूमशाहीविरोधात एकत्र यावे, असे आवाहनही त्यांनी सत्ताधारी पक्षातील नेत्यांना केले.
शहर
- मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी! जोगेश्वरीच्या 'शिल्पग्राम'चा होणार कायापालट; आंतरराष्ट्रीय दर्जाचे 'मुंबई हाट' सांस्कृतिक केंद्र उभारणार"
- अहमदनगरमध्ये नीट परीक्षेचा धक्कादायक निकाल; पुनर्परीक्षेत कमी गुण मिळाल्याने विद्यार्थिनीची आत्महत्या, परीक्षेच्या तणावातून उचलले टोकाचे पाऊल
- पुणे: सोशल मीडियावरील मैत्री ठरली घातक; पुण्याच्या कोंढव्यात शिक्षिकेच्या घरून १४ लाखांचा ऐवज लांबवणारा मित्र अखेर गुजरातधून जेतीत
- अहिल्यानगर: पहाटेच्या अंधारात निघाला, खड्डा न दिसल्यानं बाईकसह पुलाखाली कोसळला; अहिल्यानगरमधील जामखेड येथे भीषण अपघातात तरुणाचा जागीच मृत्यू
महाराष्ट्र
- मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी! जोगेश्वरीच्या 'शिल्पग्राम'चा होणार कायापालट; आंतरराष्ट्रीय दर्जाचे 'मुंबई हाट' सांस्कृतिक केंद्र उभारणार"
- पुणे: सोशल मीडियावरील मैत्री ठरली घातक; पुण्याच्या कोंढव्यात शिक्षिकेच्या घरून १४ लाखांचा ऐवज लांबवणारा मित्र अखेर गुजरातधून जेतीत
- पंढरपुर: आषाढी एकादशीच्या दिवशी मोठी दुर्घट घटना; वारीच्या बंदोबस्तावर आलेल्या SRPF जवानाने स्वतःवर गोळ्या झाडून संपवले आयुष्य
- अहिल्यानगर: पहाटेच्या अंधारात निघाला, खड्डा न दिसल्यानं बाईकसह पुलाखाली कोसळला; अहिल्यानगरमधील जामखेड येथे भीषण अपघातात तरुणाचा जागीच मृत्यू
गुन्हा
- पुणे: सोशल मीडियावरील मैत्री ठरली घातक; पुण्याच्या कोंढव्यात शिक्षिकेच्या घरून १४ लाखांचा ऐवज लांबवणारा मित्र अखेर गुजरातधून जेतीत
- उत्तर प्रदेश: हुंड्यात बुलेट बाइक मिळाली नाही म्हणून नराधम पतीने केली २२ वर्षीय पत्नीची धारदार शस्त्राने निर्घृण हत्या; अवघ्या दोन वर्षांपूर्वीच झाले होते लग्न
- मुंबई: 'पंतप्रधान आवास'मध्ये १८ कोटींचा घोटाळा; तत्कालीन मुख्याधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल, नेमके प्रकरण काय?
- अकोला: पोलिसाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार; आत्महत्येच्या प्रयत्नानंतर पीडित मुलगी कोमात
राजकीय
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
- जळगाव: राष्ट्रवादीचा मोठा नेता भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या मार्गावर, मंत्री गुलाबराव पाटील यांच्यासमोर तगडे आव्हान निर्माण होणार?
इतर
- आजचे राशिभविष्य २५ जुलै २०२६: विठूरायाची कृपा आणि शनीची साथ, या राशींचा दिवस ठरणार सोन्याचा!
- आजचे राशिभविष्य २४ जुलै २०२६: शुक्र या राशींसाठी पाडणार पैशांचा पाऊस, पुण्याई येणार फळाला, इच्छापूर्ती होणार!
- आजचे राशिभविष्य २३ जुलै २०२६: सूर्य-गुरूचा द्विग्रह योग या राशींसाठी ठरणार लकी, गुरु देणार यश, संपत्ती व प्रगती!
- आजचे राशिभविष्य २१ जुलै २०२६: या राशींना मिळणार गुडन्यूज तर या राशींना बसणार मोठा फटका! पहा तुमचे भविष्य
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- नवी दिल्ली: झारखंड हायकोर्टाचा मोठा निर्णय: रात्री २ वाजता बायकोने काजळ-लिपस्टिक लावले म्हणजे ती मानसिक रोगी ठरत नाही
- नवी दिल्ली: केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर सोनम वांगचुक यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले- 'हा लोकशाहीचा विजय'
- नवी दिल्ली: 'आताची पिढी प्रश्न विचारतेय, ऐकून घ्यायला हवं'; CJP आंदोलनावर सरसंघचालक मोहन भागवतांचं मोठं वक्तव्य
- बंगळुरू : BMTC बसमध्ये महिलेची छेडछाड, चालकाने आरोपीला दिली कडक शिक्षा

























Subscribe to my channel



