मुंबई पश्चिम बंगालमधील निवडणूक निकाल आणि देशातील सध्याच्या राजकीय घडामोडींवर शिवसेना (उबाठा) नेते संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर प्रखर टीका केली आहे. "ममता बॅनर्जींचा पराभव झालेला नाही, तर सैन्य आणि आर्थिक दहशतवादाचा वापर करून त्यांना सत्तेपासून रोखण्यात आले आहे," असा खळबळजनक दावा राऊत यांनी केला. यावेळी त्यांनी नितीश कुमार यांच्यावरही बोचऱ्या शब्दांत निशाणा साधला.
हुकूमशाहीविरोधात 'इंडिया' आघाडी ठाम
संजय राऊत यांनी ममता बॅनर्जी यांना खंबीर पाठिंबा जाहीर केला आहे. "ममता बॅनर्जी यांनी राजीनामा न देण्याचा घेतलेला निर्णय हा सरकारविरोधी आंदोलनाचाच एक भाग आहे. उद्धव ठाकरेंसह 'इंडिया' आघाडीचे सर्व प्रमुख नेते त्यांच्या पाठीशी उभे आहेत. जर निवडणूक आयोग सत्ताधारी पक्षाचा गुलाम होणार असेल, तर विरोधी पक्षांनी निवडणुकीबाबत काय भूमिका घ्यावी, याचा गांभीर्याने विचार करण्याची वेळ आली आहे," असे राऊत यांनी नमूद केले.
नितीश कुमारांचे 'मानसिक संतुलन' बिघडले?
बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर टीका करताना राऊत यांची जीभ घसरली. "नितीश कुमार पहिल्यापासूनच भरकटलेले आहेत, ते कधीच कुठे स्थिर नव्हते. त्यांचे मानसिक संतुलन किती बिघडले आहे, हे संपूर्ण देश पाहत आहे. ते आघाडी सोडून जाणार आहेत, हे ममता बॅनर्जी यांनी पहिल्याच बैठकीत स्पष्ट केले होते," असा टोला त्यांनी लगावला. जर ममतांनी बंगालमध्ये काँग्रेसला सोबत घेतले असते, तर निकाल आज वेगळा असता, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.
लाडकी बहीण योजनेवर ताशेरे
राज्यातील 'लाडकी बहीण' योजनेवरूनही राऊत यांनी सरकारला धारेवर धरले. "या योजनेचे पैसे जर चुकीच्या मार्गाने कोणाच्या खिशात जात असतील, तर तो मोठा गुन्हा आहे. सरकारला या भ्रष्टाचाराची जाणीव असेल, तर त्यांनी तातडीने दोषींवर कठोर कारवाई केली पाहिजे," अशी मागणी त्यांनी केली.
मराठी भाषेचा सन्मान सर्वोच्च
हिंदी आणि इंग्रजी भाषेबाबत आपली भूमिका स्पष्ट करताना राऊत म्हणाले की, "आमचा हिंदीला विरोध नाही, राष्ट्रीय स्तरावर कामासाठी ती गरजेची आहे. मात्र, महाराष्ट्राची पहिली भाषा ही मराठीच आहे आणि तिचा सन्मान राखलाच गेला पाहिजे." सत्तेतील काही लोकांना लोकशाहीचे पतन मान्य नाही, त्यांनी हुकूमशाहीविरोधात एकत्र यावे, असे आवाहनही त्यांनी सत्ताधारी पक्षातील नेत्यांना केले.
शहर
- पुणे: एमपीएससी पेपर लीक प्रकरण विद्यार्थ्यांचा संताप अनावर, अध्यक्षांच्या हकालपट्टीची मागणी करत पुण्यात भव्य मोर्चाचा इशारा!
- पुणे: दहीहंडीच्या उत्साहाला गालबोट! जुन्या सांगवीत लोखंडी कमान आणि डीजेचा सांगाडा अंगावर कोसळून ४५ वर्षीय महिलेचा करुण अंत!
- मुंबई: तुरुंगात माझ्यावर विषप्रयोग झाला असावा का? खासदार संजय राऊतांचा खळबळजनक दावा, राहुल गांधींच्या सल्ल्यानंतर करणार 'टॉक्सिक टेस्ट'!
- मुंबई: जोगेश्वरी-गोरेगाव SRA घरकुल घोटाळा: पात्र लाभार्थ्यांना डावलून अपात्रांना घरे वाटप केल्याप्रकरणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे दोन अधिकाऱ्यांना तडकाफडकी निलंबित करण्याचे निर्देश!
महाराष्ट्र
- अमरावती: पेपरफुटीने संतापला युवा वर्ग! अमरावतीत MPSC विरोधात शेकडोंचा 'आक्रोश मोर्चा'; अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी
- पुणे: भीमाशंकरवाडीतील ९६ कुटुंबांच्या पुनर्वसनाचा मार्ग मोकळा; राज्य सरकारकडून हिरवा कंदील, प्रत्येकाला मिळणार ५०० चौरस फुटाचा भूखंड
- यवतमाळ: शेवटचा प्रवासही धोकादायक! अंत्यसंस्कारासाठी नाल्याच्या पुलावरून मृतदेह नेण्याची वेळ; प्रशासनाचा अनास्था कारभार चव्हाट्यावर
- पुणे: एमपीएससी पेपर लीक प्रकरण विद्यार्थ्यांचा संताप अनावर, अध्यक्षांच्या हकालपट्टीची मागणी करत पुण्यात भव्य मोर्चाचा इशारा!
गुन्हा
- धाराशिव: नळदुर्ग किल्ल्यावर मन हेलावणारी दुर्घटना; राष्ट्रीय स्तरावरील कुस्तीपटू मातेने तीन चिमुकल्यांसह मारली दरीत उडी, मायलेकांचा मृत्यू!
- अमरावतीत: ब्रेकअपचा बदला घेण्यासाठी भरदिवसा गर्दीच्या ठिकाणी १७ वर्षीय तरुणीची चाकूने भोसकून निर्घृण हत्या!
- कोल्हापूर: पन्हाळा तालुक्यातील काखे येथे अनैतिक संबंधाच्या संशयातून विवाहितेचा भरदिवसा अंगणात निर्घृण खून!
- कोल्हापूर: कौटुंबिक प्रेमप्रकरणाच्या रागातून १७ वर्षीय तरुणाचा इन्स्टाग्रामवरून बोलावून निर्घृण खून, मृतदेह दरीत फेकत पोलिसांची दिशाभूल!
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य 4 सप्टेंबर 2026 : जन्माष्टमीच्या दिवशी ग्रहांचा शुभ संयोग या राशींसाठी नशीब बदलवणारा, श्रीकृष्णाची मिळणार कृपा !
- आजचे राशिभविष्य ३ सप्टेंबर २०२६: या राशींवर असणार स्वामींची कृपा आणि गणपती बाप्पाचा आशीर्वाद, पहा तुमचे भाग्य!
- आजचे राशिभविष्य २९ ऑगस्ट २०२६: या ४ राशींसाठी ग्रहांची स्थिती अशुभ, सतर्क राहण्याचा सल्ला; वाचा सविस्तर भविष्य!
- आजचे राशिभविष्य: २० ऑगस्ट २०२६ रोजी तुमच्या राशीवर काय असेल ग्रहांची स्थिती? जाणून घ्या सविस्तर!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- नवी दिल्ली: समजा, मी तुमचा विद्यार्थी आहे, मला..पंतप्रधानांच्या प्रश्नावर शिक्षिकेचं उत्तर अन् एकच हशा पिकला
- केरळ: हायवेवर उभ्या असलेल्या लॉरीला कार धडकल्याने इंजिनिअरिंगच्या ८ विद्यार्थ्यांचा करुण अंत!
- चंदीगढ: संगीत जगतातून अत्यंत धक्कादायक बातमी; ३५ वर्षीय प्रसिद्ध पंजाबी गायक बलजीत सिंग याचा राहत्या घरी मृतदेह आढळल्याने मोठी खळबळ!
- दिल्ली: राजकारणात मोठा भूकंप होणार? संजय राऊतांचा मोठा दावा, देवेंद्र फडणवीस होऊ शकतात देशाचे नवे 'उपपंतप्रधान'!




























Subscribe to my channel




