Farmers to Rule Toll Plazas! 'Krishi Malls' to Open on Highways; Cheap Products for Consumers, Direct Profits for Farmers

टोल नाक्यांवर आता शेतकऱ्यांचे राज्य! महामार्गावर झळकणार 'कृषी मॉल'; ग्राहकांना स्वस्त, तर बळीराजाला मिळणार थेट नफा

Farmers to Rule Toll Plazas! 'Krishi Malls' to Open on Highways; Cheap Products for Consumers, Direct Profits for Farmersमुंबई: शेतकऱ्यांच्या घामाला योग्य दाम मिळवून देण्यासाठी राज्य सरकारने कंबर कसली आहे. दलाल आणि मध्यस्थांची साखळी तोडून शेतमाल थेट ग्राहकांच्या हातात पडावा, यासाठी आता राज्यातील सर्व प्रमुख महामार्ग आणि टोल नाक्यांच्या मोकळ्या जागेत अद्ययावत 'कृषी मॉल' उभारले जाणार आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या या महत्त्वाकांक्षी निर्णयामुळे शेतकऱ्यांची बाजार समितीमधील पिळवणूक थांबण्यास मदत होणार आहे.

​वाहतुकीचा खर्च वाचणार, नफा वाढणार
आजवर ग्रामीण भागातील शेतकऱ्याला भाजीपाला किंवा फळे विकण्यासाठी शहरात धाव घ्यावी लागत असे. यात वेळ, श्रम आणि खिशातून मोठा वाहतूक खर्च जात असे. मात्र, आता टोल नाक्यावरच सुसज्ज मॉल उभे राहिल्याने शेतकऱ्यांच्या दारातच बाजारपेठ येणार आहे. यामुळे वाहतुकीचा खर्च शून्य होऊन शेतकऱ्यांच्या निव्वळ नफ्यात मोठी भर पडेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

​प्रवाशांना 'ताजा' दिलासा
महामार्गावरून प्रवास करणाऱ्या हजारो लोकांसाठी ही पर्वणीच ठरणार आहे. प्रवासादरम्यान अनेकदा शिळा किंवा महागडा भाजीपाला खरेदी करावा लागतो. पण आता थेट शेतातून आलेली ताजी फळे आणि भाजीपाला प्रवाशांना प्रवासातच खरेदी करता येईल. मध्यस्थ नसल्याने हे दर बाजारभावापेक्षा कमी असतील, परिणामी ग्राहकांची मोठी बचत होणार आहे.

​प्रशासकीय तयारी अंतिम टप्प्यात
शहरांमधील 'शेतकरी आठवडी बाजारा'च्या यशानंतर आता हा प्रयोग राज्यभर राबवला जात आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने या मॉल्सच्या उभारणीसाठी आवश्यक पावले उचलली असून, लवकरच टोल नाक्यांच्या परिसराचे रूप पालटलेले दिसेल.



शहर

महाराष्ट्र

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *